शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

वर्षात तीनशे जखमींना जीवदान!

By admin | Updated: December 7, 2014 00:47 IST

काळाने गाठलं की वेळेत पोहोचायचं : महामार्ग देखभालच्या कर्मचाऱ्यांची धाडसी ‘माणुसकी’

माणिक डोंगरे / मलकापूरअपघात म्हटलं की बघ्यांची गर्दी; पण मदत करणाऱ्यांची वानवा, असे चित्र दिसते. महामार्गावर तर हे चित्र रोजचेच. मात्र, महामार्ग देखभाल विभाग कर्मचाऱ्यांच्या माणुसकीमुळे आजपर्यंत अनेकांना जीवदान मिळालंय. २०१४ या एका वर्षात १४० अपघातांतील सुमारे ३०० जखमींना देखभालच्या कर्मचाऱ्यांमुळे वेळेत वैद्यकीय मदत पोहोचलीय. त्यामुळे त्या जखमींचा जीव बचावलाय. या धाडसी व समाजोपयोगी कार्याची दखल घेऊन पोलिसांसह रुग्णालयांनीही संबंधित कर्मचाऱ्यांचा वेळोवेळी सन्मान केला आहे.शेंद्रे ते पेठनाका हा पुणे-बंगळूर राष्ट्रीय महामार्गाचा ८४ किलोमीटरचा पट्टा अपघातप्रवण पट्टा समजला जातो़ कऱ्हाड तालुक्यातील ४५ किलोमीटरच्या पट्ट्यात सर्वाधिक अपघात घडल्याचा आजपर्यंतचा इतिहास आहे़ २०१४ या चालू वर्षात ८४ किलोमीटर पट्ट्यात एकूण १४० लहान-मोठे अपघात झाले आहेत़ त्यामध्ये ३४ जणांना आपला जीव गमवावा लागला आहे़ सुमारे ३०० जण जखमी झाले आहेत़ जखमींपैकी १५३ जणांना गंभीर स्वरूपाच्या इजा झाल्या असून अनेकांना आपल्या शरीराचे अवयव गमवावे लागले आहेत़ १४७ किरकोळ जखमी झाले आहेत़ अपघात म्हटलं की मदत हा तातडीचा पर्याय जखमींच्या दृष्टीने महत्त्वाचा असतो़ दिवसेंदिवस मदतीची भूमिका लोप पावत असल्यामुळे अपघातस्थळी बघ्यांची गर्दी जास्त होते़ अशा बाबींना छेद देत महामार्ग देखभाल विभागाचे कर्मचारी मात्र अपघाताची माहिती मिळताच तातडीने घटनास्थळी जातात़ कोणाताही विचार न करता जखमींना तातडीने रूग्णालयात पाठवून देतात़ या त्यांच्या तत्पर सेवेमुळे २०१४ या एका वर्षात सुमारे ३०० जखमींना जीवदान मिळाले आहे़ जखमींना मदत करण्याचे काम हे कर्मचारी रात्री-अपरात्री व चोख पध्दतीने पार पाडत आहेत़ ही त्यांची कार्य तत्परता विचारात घेता कृष्णा रूग्णालयासह इतर रूग्णालय व पोलीस प्रशासनाच्या वतीने त्यांना सन्मानपत्र देऊन गौरवण्यात आले आह़े हीच माणुसकी समाजातील इतर तरूणांना आदर्श घेण्यासारखी आहे़