शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
2
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
3
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
4
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
5
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
6
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
7
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
8
Raid 2 Review: या 'धाडी'मध्ये दडलंय काय? कसा आहे अजय देवगण-रितेश देशमुखचा 'रेड २'? वाचा रिव्ह्यू
9
"मी तुला मंडपातून..."; एकतर्फी प्रेमात वेड्या झालेल्या तरुणाची धमकी, पोलीस बंदोबस्तात झालं लग्न
10
'...तर एकनाथ शिंदेच मुख्यमंत्री झाले असते'; शहाजीबापू पाटलांनी कारणही सांगितले
11
“पूर्वी विरोधक दिलदार होते, आता कुठल्याही कामाला चांगले म्हणत नाही”; अजित पवारांचा खोचक टोला
12
जयंती विशेष:हिंदू धर्म पुनरुत्थानाचे जनक, प्रतिकूल काळात धर्मरक्षण करणारे आद्य शंकराचार्य
13
पाकिस्तानच्या हालचाली सुरु; ISI प्रमुखांकडे दिली मोठी जबाबदारी, सीमेवरील चौक्यांवर पुन्हा लावले झेंडे
14
भारताला मिळणार संधी! अमेरिकेच्या बाजारात विकणार केवळ इंडिया मेड आयफोन; चीनला झटका
15
पहलगाम हल्ल्यानंतर चक्र फिरली! बॉलिवूड अभिनेत्रीच्या सिनेमावर आता पाकिस्तानात बंदी, ९ मे रोजी होणार होता रिलीज
16
भारतानं उचललं आणखी एक पाऊल; 'नोटीस टू एअरमन' जारी करत पाकिस्तानला दिला दणका
17
Pahalgam Terror Attack : "लहान मुलं आईपासून कशी दूर राहतील?; एकटं पाकिस्तानला पाठवणं अशक्य, हे खूप वेदनादायक"
18
२६ वर्ष पोलीस सेवेनंतरही कॉन्स्टेबलला भारत सोडण्याचे आदेश; हायकोर्टानं थांबवले, प्रकरण काय?
19
Pahalgam Terror Attack: दहशतवाद्यांनी शेवटच्या क्षणी बदलला प्लॅन; आधी टार्गेटवर होतं 'हे' पर्यटन स्थळ, केलेली रेकी
20
“जातनिहाय जनगणना निर्णय फसवा, जनतेची दिशाभूल करणारा, सरकारी भूमिका दुटप्पी”: प्रकाश आंबेडकर

गुरुजींच्या बॅँकेत सव्वा तीन कोटींची उधळपट्टी

By admin | Updated: February 5, 2015 00:13 IST

प्राधिकृत अधिकाऱ्यांचा अहवाल : संचालक मंडळ बरखास्तीची विरोधकांची मागणी

कोल्हापूर : प्राथमिक शिक्षक बँकेच्या संचालकांनी विविध बाबींवर सव्वा तीन कोटींची उधळपट्टी केल्याचा अहवाल प्राधिकृत अधिकाऱ्यांनी दिला असून त्यानुसार बँकेचे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी शिक्षक बॅँक बचाव संयुक्त कृती समितीच्यावतीने पत्रकार परिषदेत केली. सत्तारुढ गटाने निवडणुकीनंतर पहिल्या वर्षी पारदर्शक कारभाराचा आव आणला, त्यानंतर खरे दात दाखविण्यास सुरुवात केली. संचालक मंडळाच्या कामकाजाविरोधात आम्ही जिल्हा उपनिबंधकांकडे तक्रार केली. त्यानुसार करवीरचे साहाय्यक निबंधक प्रदीप मालगावे व शहर उपनिबंधक रंजन लाखे यांनी चौकशी केली. त्यामध्ये पारदर्शकतेच्या गप्पा मारणाऱ्यांनी काय दिवे लावलेत, हे स्पष्ट होते. रिझर्व्ह बँकेच्या धोरणालाच तिलांजली देत तरलता राखण्याकडे दुर्लक्ष केल्याने २ लाख ४ हजारांचा दंड झाला. कोअर बॅँकिंगचा व्यवहार करताना निविदा न मागवताच कारभार केला. रिझर्व्ह बॅँकेची मनाई असताना लाभांश वाटप केले,असे ठपके ठेवले आहेत. या चौकशी अहवालात सव्वा तीन कोटींची उधळपट्टी संचालकांनी केल्याचे स्पष्ट होते. त्यामुळे संचालक मंडळ बरखास्त करून त्यांच्यावर जबाबदारी निश्चित करावी, अशी मागणी पुरोगामी शिक्षक संघटनेचे राज्याध्यक्ष प्रसाद पाटील, शिक्षक समितीचे राज्य उपाध्यक्ष जोतिराम पाटील व कृष्णात कारंडे यांनी केली. बॅँकेपेक्षा कमी सभासद व व्यवहार कमी असताना जिल्हा परिषद कर्मचारी सोसायटीचा नफा २ कोटी ४० लाख रुपये होतो, मग शिक्षक बँकेचा फक्त २५ लाख नफा कसा? असा सवाल करत सत्तारुढ गटाने गेले पाच वर्षांत आपले दात दाखविले असून बचाव समितीच्या माध्यमातून सत्तारुढ गटाला उघडे पाडल्याशिवाय स्वस्थ बसणार नसल्याचा इशारा प्रसाद पाटील यांनी दिला. बॅँकेच्या हिताचे कारण पुढे करत बँक कर्मचाऱ्यांचे पगार ४ ते ५ हजारांनी गोठवले आणि दुसरीकडे उधळपट्टी करायची? ही कसली हुकुमशाही, असा सवाल बाळासो पोवार यांनी केला. दोन वेळा रस्ते प्रकल्पाचा दर्जा तपासण्याचा प्रयत्न झाला. मात्र, त्याचा अहवाल बाहेर आलाच नाही. आता नव्याने मूल्यांकन केले जाणार आहे. त्यांच्या भूमिकेबाबत साशंकता असल्याने विरोध केला. आताच्या समितीमध्ये महापालिका व आर्किटेक्ट असोसिएशनचा प्रतिनिधी घेतला आहे. त्यामुळे मूल्यांकन समितीचे स्वागत करू. आणखी काही काळ वाट पाहण्याची तयारी आहे. समितीला कृती समिती सहकार्य करील, असे कृती समितीचे निमंत्रक निवास साळोखे यांनी स्पष्ट केले.रस्ते प्रकल्पाबाबत सर्व माहिती घेतली आहे. मूल्यांकनाच्या सर्व तांत्रिक बाजू समजावून घेऊ. कोणत्याही परिस्थितीत शहरवासीयांवर भुर्दंड पडणार नाही, याची काळजी घेऊ. - पी. शिवशंकर, महापालिका आयुक्त