शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

साडेतीन लाख जणांकडे ‘पंतप्रधान विमा’

By admin | Updated: June 1, 2015 00:51 IST

जिल्ह्णात प्रचंड प्रतिसाद: एकविस दिवसांत विक्रमी लोकांनी घेतला लाभ, ३१ आॅगस्टपर्यंत मुदत

भीमगोंडा देसाई - कोल्हापू प्रधानमंत्री सुरक्षा’ आणि ‘जीवनज्योती बीमा’ योजना केंद्र शासनाने सुरू केल्यानंतर केवळ २१ दिवसांत जिल्ह्णातील साडेतीन लाख जणांनी हा विमा उतरविला आहे. याला प्रचंड प्रतिसाद मिळत आहे. सर्वच राष्ट्रीयीकृत बँकांमध्ये तसेच काही सहकारी बॅँकामध्येही विमा उतरविण्यासाठी गर्दी होत आहे. त्यामुळे ३१ मेपर्यंत असलेली ही मुदत वाढवून आता ३१ आॅगस्ट २०१५ पर्यंत करण्यात आली आहे. विमा योजनांची अंमलबजावणी ९ मेपासून सुरू झाली आहे. बँकांनी आपल्या खातेदारांना एसएमएसद्वारे विमा उरविण्याचे आवाहन केले. याशिवाय शासनाने सर्व संस्था, पंचायत समित्या, जिल्हा परिषद, अन्य स्थानिक स्वराज्य संस्था यांना आदेश देऊन इच्छुुक खातेदारांचा विमा उतरविण्यासाठी प्रयत्न करावेत, असे आवाहन केले. वर्षाचा विमा हप्ता कमी आणि दोन लाखांपर्यंत विमा संरक्षण असल्यामुळे मध्यमवर्गीय, सर्वसामान्य खातेदारही याचा लाभ घेत आहेत. बँकेत खाते असल्यास आधार कार्डच्या झेरॉक्ससह, वारसदाराचे नाव आणि जन्मतारखेसह विहित नमुन्यातील अर्ज भरून दिल्यास विमा संरक्षण मिळणार आहे. इतकी सोपी प्रक्रिया आहे. त्यामुळे बहुतांश राष्ट्रीयीकृत बँकेत विमा घेण्यासाठी सुरुवातीपासून गर्दी कायम आहे. सुरक्षा बीमा योजनेतून विमा संरक्षणासाठी वार्षिक हप्ता फक्त १२ रुपये आहे. १८ ते ७० वर्षे वयोगटातील कोणालाही याचा लाभ घेता येतो. हा विमा उतरविलेल्याचा अपघातात मृत्यू झाल्यास वारसांना व पूर्ण अपंगत्व आल्यास संबंधितांना दोन लाख रुपये मिळणार आहेत. हप्ता नाममात्र असल्यामुळे या विम्यास अधिक लोक पसंती देत आहेत. जीवन ज्योती विमा योजनेतून १८ ते ५० वर्षे वयोगटातील आधार कार्डधारक कोणतीही व्यक्ती विम्याचा लाभ घेऊ शकते. हा विमा असलेल्या व्यक्तीचा कोणत्याही कारणांनी मृत्यू झाल्यास वारसांना दोन लाख रुपये मिळणार आहेत. यासाठी वार्षिक विमा हप्ता ३३० रुपये आहे. विविध राष्ट्रीयीकृत बॅँकांत तसेच काही सहकारी बॅँकांत खाते असल्यास एकाच बँकेतून हा लाभ घेता येणार आहे.दोन्ही विमा योजनेतून कमी दिवसांत जिल्ह्णातील साडेतीन लाख खातेदारांनी विमा उतरविला आहे. वार्षिक हप्त्याची रक्कम कमी असल्यामुळे बहुतेकांनी सुरक्षा विमा योजना उतरविणे पसंत केले आहे. विमा उतरविण्यासाठी ३१ आॅगस्टपर्यंत मुदत वाढविण्यात आली आहे. - एम. जी. कुलकर्णी, व्यवस्थापक, अग्रणी बँक, कोल्हापूर