शहरं
Join us  
Trending Stories
1
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
2
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
3
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
4
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
7
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
8
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
9
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
10
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
11
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
12
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
13
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
14
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
15
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
16
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
17
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
18
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
19
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
20
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

दराअभावी हजारो टन काजू बोंडे झाडाखालीच कुजताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:18 IST

सदाशिव मोरे आजरा : उष्ण व दमट हवामानामुळे आजरा तालुक्यात प्रतिवर्षी काजूचे उत्पादन चांगले होते. मात्र, अत्यल्प दर आणि ...

सदाशिव मोरे

आजरा : उष्ण व दमट हवामानामुळे आजरा तालुक्यात प्रतिवर्षी काजूचे उत्पादन चांगले होते. मात्र, अत्यल्प दर आणि काजू बोंडांवर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे हजारो टन काजू बोंडे (मुरटं) कुजत आहेत. त्यातच कोरोनामुळे काजू बोंडांची गोवा राज्यातून होणारी खरेदीही थांबली असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. काजू बियांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांप्रमाणे काजू बोंडांवरही प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची गरज आहे. आजऱ्याच्या काजूगराला ज्याप्रमाणे पौष्टिकता व चवदारपणा आहे, त्याचप्रमाणे काजू बोंडांमध्येही चवदारपणा आहे. ताज्या काजू बोंडांना गोव्यातून येणारे व्यापारी नाममात्र शुल्क देऊन खरेदी करून घेऊन जातात. मात्र, काजूच्या हंगामातच गेल्या व यावर्षी कोरोनाचे लाॅकडाऊन सुरू असल्याने काजू बोंडांची खरेदीच थांबली आहे. त्यातच कोरोनामुळे दुसऱ्याच्या बागेतील काजूबिया व बोंडे गोळा करण्यासाठी मजुरीने माणसेही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला गोव्याहून येणाऱ्या गाडीप्रमाणे ताजी काजू बोंडे गोळा करणे शक्य होत नाही. झाडावरून पडलेली काजूबोंडे सध्या झाडाखालीच पडून कुजून जात आहेत. काजूच्या बोंडाला मिळणारा दरही कमी आहे. त्यामुळेही काजू बोंडे गोळा करण्याकडे शेतकरी उदासीनता दाखवत आहेत. मजुरी जादा व काजूबोंडांचा दर कमी अशी विचित्र अवस्था आहे.

आजरा तालुक्यात जवळपास ५५ ते ६० गावांमध्ये काजूच्या बागा आहेत. काजू उत्पादनावर तालुक्यातील ४० ते ५० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल प्रत्येक वर्षी होत असते. अनेक गावांमध्ये शेताच्या बांधांवर काजूची झाडे लावल्यामुळे शेतकऱ्यांना ती प्रतिवर्षी उत्पन्न मिळवून देतात. अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या काजूच्या झाडांच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. चालू वर्षी काजू बागा सुरुवातीला मोहरल्या. मध्येच धुके व ढगाळ वातावरणाचाही परिणाम झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजूचे उत्पादन चांगले आहे. गेल्या चार दिवसांपासून पडणारा वळवाचा पाऊस याचाही चांगला फायदा काजूच्या बागांना झाला आहे. पुन्हा काजूच्या बागा मोहरल्या आहेत.

चौकट: काजू बोंडापासून फेनी उद्योगाची गरज

काजूच्या बोंडापासून गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात काजू फेनी तयार केली जाते, तसेच काजूच्या बोंडाचा रंग तयार करण्यासाठीही वापर केला जातो. गोवा राज्याप्रमाणे आजरा परिसरात काजू बोंडापासून फेणी व रस प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. काजूच्या एका झाडापासून मिळणारी बोंडे किमान अंदाजे ८० ते ९० किलो मिळतात. मात्र, वेळेवर व ताजी बोंडे असतील तरच गोव्यातील टेम्पोधारक ती खरेदी करतात. अन्यथा ती जागेवरच कुजून जातात, तर या काजू बोंडाच्या डब्याला फक्त आठ रुपये मिळतात. त्यामुळे मजुराने काजू बोंडे गोळा करणे हे शेतकऱ्यांना न परवडणारे गणित आहे.

फोटो : २८ काजू बोंडे

कॅप्शन- कोळिंद्रे ( ता.आजरा ) येथे झाडाखालीच कुजून गेलेली काजूची बोंडे.