शहरं
Join us  
Trending Stories
1
Rain Red Alert: पाऊस महाराष्ट्रात मुक्काम ठोकणार; मुंबई पुण्यासह 'या' जिल्ह्यांना सतर्कतेचा इशारा
2
ऑनलाइन दूध ऑर्डर करायला गेल्या अन् १८ लाख गायब झाले; मुंबईतील महिलेची फसवणूक
3
संस्कृतीच्या दहीहंडीत जय जवानचा विश्वविक्रम; कोकण नगर नंतर जय जवानने रचले 10 थर
4
अहिल्यानगर: आधी चार मुलांना ढकललं विहिरीत, नंतर स्वतः घेतली उडी; पत्नीसोबत काय बिनसलं की, कुटुंबच संपवलं? 
5
भारतासोबत मैत्रीचा दिखावा, चीन पाकिस्तानला गरजेपेक्षा जास्त मदत करतेय; पाणबुडी देऊन तणाव वाढवला
6
Jyoti Malhotra : ज्योती पाकिस्तानसाठी हेरगिरी करत होती, तपासात ठोस पुरावे; २५०० पानांचे आरोपपत्र
7
मुंबई विमानतळावर मोठी दुर्घटना टळली, इंडिगो विमानाचा मागचा भाग धावपट्टीवर आदळला
8
पाकिस्तानमध्ये अतिवृष्टी-पुरामुळे प्रचंड विध्वंस, ३०७ जणांचा मृत्यू, अनेकजण बेपत्ता
9
'आई बाबा, चिठ्ठी वाचत असाल, तोपर्यंत मी मेलेलो असेल'; B.Tech करणाऱ्या विद्यार्थ्याने मृत्युला कवटाळलं
10
‘मतचोरी’च्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर निवडणूक आयोगाची रविवारी पत्रकार परिषद, मोठी घोषणा होणार?
11
अलास्कामध्ये डोनाल्ड ट्रम्प यांना भेटला व्लादिमीर पुतीन यांचा डुप्लिकेट? त्या गोष्टीमुळे केला जातोय असा दावा
12
कोणत्याही खेळाडूवर येणार नाही पंतसारखी वेळ! जाणून घ्या BCCI चा नवा नियम
13
Jyoti Chandekar Death: 'ठरलं तर मग'मधील पूर्णा आजींचं निधन, ज्योती चांदेकर यांनी पुण्यात घेतला अखेरचा श्वास
14
इकडे अलास्कात सुरू होती ट्रम्प-पुतिन यांची 'महाबैठक'; तिकडे युक्रेनमध्ये रशियाने केला मोठा 'खेला'; झेलेन्स्की हादरले!
15
F-22, B-2 बॉम्बर्स, F-35 सारखे सुपरजेट कामाला आले नाहीत; पुतिन यांच्या एका चालीमुळे ट्रम्प अमेरिकेतच ट्रोल झाले
16
गेल्याच वर्षी मृत्यूच्या दाढेतून परत आलेल्या पूर्णा आजी, 'ठरलं तर मग'च्या सेटवरच बेशुद्ध होऊन पडल्या आणि मग...
17
मॅक्सवेलची जिगरबाज खेळी! उलटा फटका मारत हातून निसटलेल्या मॅचसह ऑस्ट्रेलियाला जिंकून दिली मालिका
18
"राजकारणाकडे करिअर म्हणून बघा...", सुप्रिया सुळेंची मल्हार फेस्टमध्ये हजेरी; विद्यार्थ्यांना केलं मार्गदर्शन
19
'आम्ही मुंबईत येऊ नये म्हणून सरकार दंगल घडवून आणणार असेल, तर...'; मनोज जरांगे भडकले
20
Dahi Handi Mumbai: थर लावताना मुंबईमध्ये एका गोविंदाचा मृत्यू, ३० जण जखमी; कुठे घडल्या घटना?

दराअभावी हजारो टन काजू बोंडे झाडाखालीच कुजताहेत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 29, 2021 04:18 IST

सदाशिव मोरे आजरा : उष्ण व दमट हवामानामुळे आजरा तालुक्यात प्रतिवर्षी काजूचे उत्पादन चांगले होते. मात्र, अत्यल्प दर आणि ...

सदाशिव मोरे

आजरा : उष्ण व दमट हवामानामुळे आजरा तालुक्यात प्रतिवर्षी काजूचे उत्पादन चांगले होते. मात्र, अत्यल्प दर आणि काजू बोंडांवर प्रक्रिया करणारे उद्योग नसल्यामुळे हजारो टन काजू बोंडे (मुरटं) कुजत आहेत. त्यातच कोरोनामुळे काजू बोंडांची गोवा राज्यातून होणारी खरेदीही थांबली असल्याने शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा फटका बसत आहे. काजू बियांवर प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांप्रमाणे काजू बोंडांवरही प्रक्रिया करणाऱ्या उद्योगांची गरज आहे. आजऱ्याच्या काजूगराला ज्याप्रमाणे पौष्टिकता व चवदारपणा आहे, त्याचप्रमाणे काजू बोंडांमध्येही चवदारपणा आहे. ताज्या काजू बोंडांना गोव्यातून येणारे व्यापारी नाममात्र शुल्क देऊन खरेदी करून घेऊन जातात. मात्र, काजूच्या हंगामातच गेल्या व यावर्षी कोरोनाचे लाॅकडाऊन सुरू असल्याने काजू बोंडांची खरेदीच थांबली आहे. त्यातच कोरोनामुळे दुसऱ्याच्या बागेतील काजूबिया व बोंडे गोळा करण्यासाठी मजुरीने माणसेही मिळत नाहीत. त्यामुळे शेतकऱ्याला गोव्याहून येणाऱ्या गाडीप्रमाणे ताजी काजू बोंडे गोळा करणे शक्य होत नाही. झाडावरून पडलेली काजूबोंडे सध्या झाडाखालीच पडून कुजून जात आहेत. काजूच्या बोंडाला मिळणारा दरही कमी आहे. त्यामुळेही काजू बोंडे गोळा करण्याकडे शेतकरी उदासीनता दाखवत आहेत. मजुरी जादा व काजूबोंडांचा दर कमी अशी विचित्र अवस्था आहे.

आजरा तालुक्यात जवळपास ५५ ते ६० गावांमध्ये काजूच्या बागा आहेत. काजू उत्पादनावर तालुक्यातील ४० ते ५० कोटी रुपयांची आर्थिक उलाढाल प्रत्येक वर्षी होत असते. अनेक गावांमध्ये शेताच्या बांधांवर काजूची झाडे लावल्यामुळे शेतकऱ्यांना ती प्रतिवर्षी उत्पन्न मिळवून देतात. अनेक शेतकऱ्यांचा उदरनिर्वाह या काजूच्या झाडांच्या उत्पादनावरच अवलंबून आहे. चालू वर्षी काजू बागा सुरुवातीला मोहरल्या. मध्येच धुके व ढगाळ वातावरणाचाही परिणाम झाला. गेल्या वर्षीच्या तुलनेत काजूचे उत्पादन चांगले आहे. गेल्या चार दिवसांपासून पडणारा वळवाचा पाऊस याचाही चांगला फायदा काजूच्या बागांना झाला आहे. पुन्हा काजूच्या बागा मोहरल्या आहेत.

चौकट: काजू बोंडापासून फेनी उद्योगाची गरज

काजूच्या बोंडापासून गोवा राज्यात मोठ्या प्रमाणात काजू फेनी तयार केली जाते, तसेच काजूच्या बोंडाचा रंग तयार करण्यासाठीही वापर केला जातो. गोवा राज्याप्रमाणे आजरा परिसरात काजू बोंडापासून फेणी व रस प्रक्रिया उद्योगाची गरज आहे. काजूच्या एका झाडापासून मिळणारी बोंडे किमान अंदाजे ८० ते ९० किलो मिळतात. मात्र, वेळेवर व ताजी बोंडे असतील तरच गोव्यातील टेम्पोधारक ती खरेदी करतात. अन्यथा ती जागेवरच कुजून जातात, तर या काजू बोंडाच्या डब्याला फक्त आठ रुपये मिळतात. त्यामुळे मजुराने काजू बोंडे गोळा करणे हे शेतकऱ्यांना न परवडणारे गणित आहे.

फोटो : २८ काजू बोंडे

कॅप्शन- कोळिंद्रे ( ता.आजरा ) येथे झाडाखालीच कुजून गेलेली काजूची बोंडे.