शहरं
Join us  
Trending Stories
1
विश्वासदर्शक ठरावासाठी विशेष अधिवेशन बोलवण्याच्या तयारीत हरियाणा सरकार!
2
भरधाव डंपरने कारला दिली धडक, भाजपा नेत्याचा अपघातात मृत्यू
3
Mahhi Vij : "तू जादू आहेस..."; अभिनेत्री माही विजने सांगितला लेकीच्या जन्मावेळचा भावूक प्रसंग
4
पाकिस्तानच्या कब्जातून बाहेर पडतोय POK? जनतेचा उठाव, पुन्हा भारतात विलीन होण्यासंदर्भात लावले पोस्टर
5
यामिनी जाधव, वायकरांना उमेदवारी का दिली? मुख्यमंत्री शिंदे म्हणाले, 'त्यांची चूक असती तर मी...'
6
"रायबरेलीत कमळ फुलवा, ४०० चा आकडा आपोआप पार होईल", काँग्रेसच्या बालेकिल्ल्यात अमित शाहांचा हल्लाबोल
7
सिंग इज किंग! सिमरजीतने RR ला धक्क्यांवर धक्के दिले, CSK चे पहिल्या इनिंग्जमध्ये वर्चस्व 
8
Lok Sabha Election 2024 : औरंगजेबाचा जयजयकार, सावरकरांचा अपमान का? मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंना सवाल
9
Mother's Day निमित्त संजय दत्तने शेअर केली खास पोस्ट, चाहतेही झाले भावुक
10
गोपीनाथ मुंडे मुख्यमंत्री झाले असते, पण...; संजय शिरसाटांचा उद्धव ठाकरेंवर गंभीर आरोप
11
BAN vs ZIM : झिम्बाब्वेचे शाकीब अल हसनला चोख प्रत्युत्तर; अखेरच्या सामन्यात बांगलादेश चीतपट
12
धक्कादायक! नूडल्स खाणं बेतलं जीवावर; 7 वर्षांच्या मुलाचा मृत्यू, संपूर्ण कुटुंब पडलं आजारी
13
'मला समुद्रात उडी मारायची...', Air India च्या विमानात प्रवाशाने घातला गोंधळ
14
१९९९ च्या निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपा युतीचं सरकार पडण्यामागे काय कारणं होती?
15
Arvind Kejriwal : "देशभरात मोफत वीज, मोफत शिक्षण, मोफत उपचार"; जनतेसाठी अरविंद केजरीवालांच्या 10 गॅरंटी
16
हृदयद्रावक! चारही मुलं करोडपती पण आई वृद्धाश्रमात; 88 वर्षांच्या महिलेची डोळे पाणावणारी गोष्ट
17
'तू नागपूरला ये नाहीतर मी बारामतीला येतो'; सुनील केदार यांचं अजित पवारांना चॅलेंज
18
MS Dhoni चा चेपॉकवर शेवटचा सामना? CSK चे फॅन्सना भावनिक आवाहन, मॅच संपल्यावर जरा थांबा
19
"मुंबई आणि भारतासाठी...", वर्ल्ड कपच्या तोंडावर इरफानला सतावतेय मोठी चिंता
20
Mothers Day : सचिनपासून रोहितपर्यंत...! भारतीय खेळाडू अन् त्यांना घडवणारी ती 'माऊली'

गुळाचे दर ५०० रुपयांपर्यंत पडले; व्यापाºयांची खेळी : शेतकºयांमधून संताप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 16, 2017 10:55 PM

कोल्हापूर : मागणी होत नसल्याचे कारण पुढे करीत व्यापाºयांकडून ३०० ते ५०० रुपयांपर्यंत गुळाचे दर पाडले जात आहेत.

कोल्हापूर : मागणी होत नसल्याचे कारण पुढे करीत व्यापाºयांकडून ३०० ते ५०० रुपयांपर्यंत गुळाचे दर पाडले जात आहेत. गेल्या आठ दिवसांतील हे चित्र असून, व्यापाºयांच्या या खेळीकडे शेती उत्पन्न बाजार समितीकडून जाणीवपूर्वक दुर्लक्ष होत आहे. यामुळे शेतकºयांमधून संतप्त प्रतिक्रिया उमटत आहेत.

गुरुवारी बाजार समितीत एक किलो वजनाच्या रव्याचे सात हजार ७८७ बॉक्सची आवक झाली. याला प्रतिक्विंटल तीन हजार ७०० ते चार हजार ५०० रुपये दर मिळाला. हा दर सरासरी चार हजार १०० इतका आहे. दहा किलो वजनाच्या ३९ हजार ५९० रव्यांची आवक झाली. याला तीन हजार ५०० ते चार हजार ७७० इतका दर मिळाला. सरासरी प्रतिक्विंटल तीन हजार ९०० रुपये इतका दर यावेळी मिळाला. यावरून आठ दिवसांपूर्वी गुळाला मिळालेल्या दराच्या तुलनेत प्रतिक्विंटल सरासरी ३०० ते ५०० रुपये कमी राहिला. यावरून व्यापाºयांकडून दर पाडण्याचा घाट घातला जात आहे.

गुळाला फक्त मुहूर्ताच्या सौद्या पुरताच दर मिळतो. दसरा, दीपावली पाडव्याच्या मुहूर्तावर निघणाºया सौद्यांमध्ये उच्चांकी दर, त्यानंतर मात्र दर आपोआपच गडगडतात हा आतापर्यंतचा अनुभव आहे. यंदाही हेच चित्र आहे. मुहूर्ताच्या सौद्यामध्ये उच्चांकी पाच हजार १५१ रुपयांपर्यंत दर गेला होता. त्यानंतर काही दिवस सरासरी ४७०० ते ५००० रुपये इतका दर स्थिर राहिला होता. यामध्ये एक किलोच्या गुळाला पाच हजार १०० ते पाच हजार २०० रुपये इतका दर होता. दहा किलोच्या रव्याला सरासरी चार हजार ८०० ते चार हजार ९०० इतका दर मिळाला.परंतु, गेल्या आठ दिवसांपासून गुळाचे दर घसरत चालले आहेत. दररोज शंभर ते दोनशे रुपयांनी दर कमी होत आहे.