शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारताच्या दोन्ही शत्रूंकडे न्यूक्लिअर वेपन', CDS अनिल चौहान यांचे भविष्यातील युद्धाबाबत मोठे वक्तव्य
2
T20I पदार्पणात वर्ल्ड रेकॉर्ड! या पठ्ठ्यानं पहिल्याच षटकात ५ विकेट्स घेत फिरवली मॅच
3
चिनी शस्त्रास्त्रे विकून पाकिस्तान मिळवतोय पैसे; लिबियाशी केला ४ अब्ज डॉलर्सचा लष्करी करार
4
मुंबईतील एवढ्या वॉर्डात मुस्लिम मतदार निर्णायक, काँग्रेस उद्धवसेनेसह 'या' पक्षांची मुस्लिम मतांवर नजर
5
फास्ट फूड बनलं सायलेंट किलर; चाऊमीन, पिझ्झा-बर्गरमुळे आतड्यांना छिद्र; १६ वर्षीय मुलीचा मृत्यू
6
राहुल गांधींनी जर्मनीत उपस्थित केला 'व्होट चोरी'चा मुद्दा; देशाची बदनामी केल्याचा भाजपचा आरोप
7
Beed: सरपंच संतोष देशमुख हत्येप्रकरणी वाल्मिक कराडसह सर्व आरोपींवर आरोप निश्चित
8
भारतीय रेल्वेच नंबर १… चीन, रशिया, जपान देशांना धोबीपछाड दिली; नवा मोठा वर्ल्ड रेकॉर्ड केला!
9
सायबर भामट्यांकडून IPS अधिकाऱ्याला ८ कोटींना गंडा; १२ पानांच्या चिठ्ठीत सगळं लिहिलं अन्...
10
Prashant Jagtap: अजित पवारांसोबत जाण्याला विरोध का? प्रशांत जगतापांनी अखेर कारण सांगितलं, पुणेकरांचा मांडला मुद्दा
11
सोने, स्टॉक की बिटकॉइन? अब्जाधीश गुंतवणूकदार रे डॅलिओ यांनी निखिल कामतसोबत उलगडली गुपिते
12
अदानींच्या 'या' उद्योगासंदर्भात मोठी अपडेट, ₹62 चा शेअर खरेदी करण्यासाठी उडाली लोकांची झुंबड
13
राज्यातील महानगरपालिका निवडणुकीसाठी काँग्रेसचे ४० स्टार प्रचारक जाहीर; पाहा, संपूर्ण यादी
14
Palmistry: तुमच्या हातावरील 'शुक्र पर्वत' सांगतो विवाहसौख्याचे गुपित; खडतर जीवन की श्रीमंती?
15
ठाकरे एकत्र, युती लवकरच; पण मनसेला समाधानकारक जागा मिळतील का?; संदीप देशपांडेचे मोठे विधान
16
DJ वाजवण्यापासून रोखलं, लग्नाची मिरवणूक निघण्यापूर्वीच नवरदेवानं उचललं टोकाचं पाऊल
17
ईशनिंदा नव्हे...! वाद प्रमोशनचा होता अन् धर्माच्या नावानं मारून टाकलं; दीपूचंद्र दासच्या कुटुंबाचा धक्कादायक खुलासा
18
संघर्षाचं सोनं झालं अन् 'आशा' बनली नगराध्यक्ष, नीलडोहच्या भूमिका मंडपेंची प्रेरणादायी वाटचाल 
19
Amravati Crime: प्रेमजाळं, ती २६ वर्षांची, तो २१ वर्षांचा! अनेकवेळा अत्याचार, दोनदा गर्भपात अन् तरीही धनंजयचा लग्नास नकार!
20
Vijay Hazare Trophy : किंग कोहली मैदानात उतरणार; पण स्टेडियममध्ये चाहत्यांना नो एन्ट्री; कारण...
Daily Top 2Weekly Top 5

उठसूठ बेताल आरोप करण्यापेक्षा, एका व्यासपीठावर या...!

By admin | Updated: April 17, 2015 00:08 IST

महादेवराव महाडिक यांचे आव्हान : ‘राजाराम’चा कारभार पारदर्शकच, स्वत:च्या कारखान्याची तपासणी करा; सभासदांना पेन्शन योजना सुरू करणार

अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘राजाराम’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणांगण आता चांगलेच तापले आहे. आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तारूढ राजर्षी शाहू पॅनेल व माजी मंत्री सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू ‘परिवर्तन’ पॅनेलमध्ये सामना रंगला आहे. यानिमित्त सत्तारूढ गटाचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी पॅनेलप्रमुख या नात्याने मांडलेली ‘माझी भूमिका’....प्रश्न - कारखान्याचा कारभार पारदर्शक आहे, तर भ्रष्टाचाराचे आरोप कसे?उत्तर - विरोधक गेली अनेक वर्षे शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. कारखान्याचा कारभार हा अतिशय पारदर्शक आणि सभासद शेतकरी यांच्या हिताचा असाच सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून साखर उद्योगावर अनेक संकटे आल्याने अनेक कारखाने बंद पडले. मात्र ‘राजाराम’ कारखाना जुना असूनही तो उत्तमरित्या चालू आहे. प्रत्येक वर्षी सरासरी ४ लाखांच्या वरती गाळप केले जाते. गेल्या वर्षी कारखान्याने जुनी मशिनरी बदलून अद्ययावत तंत्रज्ञान असलेली मशिनरी कमी खर्चात बसवली. त्यामुळे ३८०० ते ४००० मेट्रीक टन गाळप प्रतिदिन करू शकलो. तरीही आमच्यावर आरोप होत आहेत. ७० ते ७५ कि. मी. अंतरावरून तसेच १२२ गावांतून आम्ही ऊस आणतो. हे विरोधकांनी विसरू नये. उठसूठ आरोप करत बसू नये. हिम्मत असेल तर त्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर आरोप करावेत. महाडिक त्यांना त्यावेळी उत्तर देतील. व्यासपीठाचे ठिकाण, वेळ, तारीख त्यांनीच ठरवावी. प्रश्न- निवडणूक ‘राजाराम’ची असताना डी. वाय. पाटील कारखान्यावर आरोप कसे काय?उत्तर - ‘राजाराम’च्या कारभारावर आरोप करणाऱ्यांनी आधी आपल्या कारखान्यात काय चाललंय ते पहावे. या कारखान्यात कार्यक्षेत्रातील कमी आणि पुणा, मुंबई, कोल्हापूर आणि इतर भागातील सभासदच जास्त आहेत. वार्षिक सभेच्या अहवालाच्या प्रतीही काही मोजक्याच काढल्या जातात. प्रश्न - कारखान्याचा कारभार काटकसरीचा आहे म्हणजे नेमका कसा?उत्तर- कारखान्याने आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची कर्जे काढून त्याची परतफेड केली आहे. सद्य:स्थितीत कारखान्यावर एकही रुपयाचे कर्ज नाही. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतात. इतर देय रकमाही वेळेवर दिल्या जातात. कारखान्याने अवलंबलेल्या पर्चेस सिस्टिममुळे कारखान्याने खरेदी केलेले दर हे साखर आयुक्तालयाच्या दरसूचीपेक्षा अत्यंत कमी आहेत. त्यामुळे कारखान्यात उधळपट्टी सुरू आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कारखान्यास सुरुवातीला शासनाकडून मिळालेले शेअर भांडवलही यापूर्वीच संपूर्ण परतफेड केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव असा कारखाना आहे. इतका पारदर्शी कारभार आम्ही करीत आहोत. कारखान्याच्या कारभाराची कोणताही सभासद केव्हाही तपासणी करू शकतो.प्रश्न - ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसाठी भविष्यात काय योजना आहेत?उत्तर - कष्टकरी ऊस उत्पादक सभासदांसाठी कारखान्यामार्फत पेन्शन योजना चालू करण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी काही कालावधी जावा लागेल. सरकारची त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. भविष्यात अशी योजना राबविणारा ‘राजाराम’ पहिला साखर कारखाना असेल. याशिवाय ठिबक योजना राबविण्यात येणार आहे. ऊस विकास योजना सध्या राबविण्यात आली आहे. कारखान्याला कायमचा व हक्काचा ऊस उपलब्ध होणेसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील काही गावात जलसिंचन योजना राबविल्या आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे सभासद आमच्या पाठीशी आहेत. ते पुन्हा आमच्याकडेच सत्ता देतील, यात शंका नाही, असेही आमदार महाडिक शेवटी म्हणाले.- रमेश पाटील, कसबा बावडा(उद्याच्या अंकात माजी मंत्री सतेज पाटील यांची मुलाखत)