शहरं
Join us  
Trending Stories
1
"अमेरिकेचे जहाजेही होर्मुझ सामुद्रधुनीतून जाऊ शकतात, फक्त त्यांनी...", इराणची ट्रम्प यांच्याकडे मागणी काय?
2
LPG-PNG ची चिंता मिटली! देशभरात गॅस अन् पेट्रोल-डिझेलचा पुरवठा सुरळीत, केंद्राची स्पष्टोक्ती
3
RR vs RCB : जोफ्राचा सॉलिड बाउन्सर! पहिल्याच बॉलवर सॉल्टचा 'करेक्ट कार्यक्रम' (VIDEO)
4
हे काय चाललंय! आधी धडक दिली, प्रश्न विचारताच तरुणाला फरफटत नेले, अंबरनाथमधील घटना कॅमेऱ्यात कैद
5
IPL 2026 : RR नं हुषार गोलंदाजाला बसवलं बाकावर; RCB च्या ताफ्यात 'मॅच विनर' परतल्याचा आनंद
6
मुंबईत २५३८, तर महाराष्ट्रात MHADA १३ हजार १२ घरे बांधणार
7
Video - वृंदावनमध्ये मोठी दुर्घटना! यमुनेत भाविकांची बोट उलटली; १० जणांचा मृत्यू, अनेक जण बेपत्ता
8
LSG ला मोठा धक्का! मॅच विनर ऑलराउंडर स्पर्धेतून OUT; 'या' खेळाडूची IPL मध्ये वाइल्ड कार्ड एन्ट्री
9
चमत्कार! अपघातात अपहरण केलेले दोन चिमुकले वाचले, तर तीन अपहरणकर्त्यांचा जागीच मृत्यू
10
Sanoj Mishra : Video - "मोनालिसा अल्पवयीन, सत्याचा विजय, लव्ह-जिहादचा पर्दाफाश"; सनोज मिश्रांचा हल्लाबोल
11
होर्मुजमधून जाण्यासाठी इराण घेतोय २० लाख डॉलर! भारत किती रुपये मोजतोय? परराष्ट्र मंत्रालयानं दिले उत्तर
12
Ashok Kharat Case: रुपाली चाकणकर यांची बहीण प्रतिभा चाकणकरांची चौकशी होणार,पोलिसांनी बजावली नोटीस
13
Mumbai: वांद्र्यात जलवाहिनी फुटल्यानं रस्ते जलमय; वाहतूक विस्कळीत, नागरिकांचेही हाल!
14
RR vs RCB : 'छोटा पॅक बडा धमाका' की, स्विंगचा किंग पुन्हा ठरणार भारी! वैभव पलटवार करणार?
15
मोठी पण अनपेक्षित घडामोड! रशिया-युक्रेनमध्ये झालेले सीझफायर भविष्यासाठी किती फायद्याचे...
16
रात्री WiFi चालू ठेवून झोपल्याने खरंच कॅन्सर होतो? रिसर्चमधून मोठा खुलासा
17
४ वर्षांनंतर Bajaj Pulsur 180 बाजारात दाखल; मस्क्युलर लूक आणि तगड्या फीचर्ससह कमबॅक!
18
मला बी नोबेल मिळू द्या की...! पाकिस्तानात शांततेच्या नोबेलचा तिसरा दावेदारही तयार; पक्षाने प्रस्तावच ठेवला
19
"आज ऑफिसला येऊ शकणार नाही", म्हणताच त्याला नोकरीवरूनच काढले; गुरुग्राममधील प्रकरण काय?
20
घालमेल...! पाकिस्तानची JF-17, F-16 लढाऊ विमाने सौदी, इराणच्या दिशेने उडाली; 'ऑपरेशन आयर्न एस्कॉर्ट' ठेवले नाव
Daily Top 2Weekly Top 5

उठसूठ बेताल आरोप करण्यापेक्षा, एका व्यासपीठावर या...!

By admin | Updated: April 17, 2015 00:08 IST

महादेवराव महाडिक यांचे आव्हान : ‘राजाराम’चा कारभार पारदर्शकच, स्वत:च्या कारखान्याची तपासणी करा; सभासदांना पेन्शन योजना सुरू करणार

अवघ्या तीन दिवसांवर येऊन ठेपलेल्या ‘राजाराम’ सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीचे रणांगण आता चांगलेच तापले आहे. आमदार महादेवराव महाडिक यांच्या सत्तारूढ राजर्षी शाहू पॅनेल व माजी मंत्री सतेज पाटील यांच्या राजर्षी शाहू ‘परिवर्तन’ पॅनेलमध्ये सामना रंगला आहे. यानिमित्त सत्तारूढ गटाचे नेते आमदार महादेवराव महाडिक यांनी पॅनेलप्रमुख या नात्याने मांडलेली ‘माझी भूमिका’....प्रश्न - कारखान्याचा कारभार पारदर्शक आहे, तर भ्रष्टाचाराचे आरोप कसे?उत्तर - विरोधक गेली अनेक वर्षे शिळ्या कढीला ऊत आणत आहेत. कारखान्याचा कारभार हा अतिशय पारदर्शक आणि सभासद शेतकरी यांच्या हिताचा असाच सुरू आहे. गेल्या काही वर्षांपासून साखर उद्योगावर अनेक संकटे आल्याने अनेक कारखाने बंद पडले. मात्र ‘राजाराम’ कारखाना जुना असूनही तो उत्तमरित्या चालू आहे. प्रत्येक वर्षी सरासरी ४ लाखांच्या वरती गाळप केले जाते. गेल्या वर्षी कारखान्याने जुनी मशिनरी बदलून अद्ययावत तंत्रज्ञान असलेली मशिनरी कमी खर्चात बसवली. त्यामुळे ३८०० ते ४००० मेट्रीक टन गाळप प्रतिदिन करू शकलो. तरीही आमच्यावर आरोप होत आहेत. ७० ते ७५ कि. मी. अंतरावरून तसेच १२२ गावांतून आम्ही ऊस आणतो. हे विरोधकांनी विसरू नये. उठसूठ आरोप करत बसू नये. हिम्मत असेल तर त्यांनी एका व्यासपीठावर येऊन समोरासमोर आरोप करावेत. महाडिक त्यांना त्यावेळी उत्तर देतील. व्यासपीठाचे ठिकाण, वेळ, तारीख त्यांनीच ठरवावी. प्रश्न- निवडणूक ‘राजाराम’ची असताना डी. वाय. पाटील कारखान्यावर आरोप कसे काय?उत्तर - ‘राजाराम’च्या कारभारावर आरोप करणाऱ्यांनी आधी आपल्या कारखान्यात काय चाललंय ते पहावे. या कारखान्यात कार्यक्षेत्रातील कमी आणि पुणा, मुंबई, कोल्हापूर आणि इतर भागातील सभासदच जास्त आहेत. वार्षिक सभेच्या अहवालाच्या प्रतीही काही मोजक्याच काढल्या जातात. प्रश्न - कारखान्याचा कारभार काटकसरीचा आहे म्हणजे नेमका कसा?उत्तर- कारखान्याने आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची कर्जे काढून त्याची परतफेड केली आहे. सद्य:स्थितीत कारखान्यावर एकही रुपयाचे कर्ज नाही. कर्मचाऱ्यांचे पगार वेळेवर होतात. इतर देय रकमाही वेळेवर दिल्या जातात. कारखान्याने अवलंबलेल्या पर्चेस सिस्टिममुळे कारखान्याने खरेदी केलेले दर हे साखर आयुक्तालयाच्या दरसूचीपेक्षा अत्यंत कमी आहेत. त्यामुळे कारखान्यात उधळपट्टी सुरू आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कारखान्यास सुरुवातीला शासनाकडून मिळालेले शेअर भांडवलही यापूर्वीच संपूर्ण परतफेड केले आहे. कोल्हापूर जिल्ह्यातील एकमेव असा कारखाना आहे. इतका पारदर्शी कारभार आम्ही करीत आहोत. कारखान्याच्या कारभाराची कोणताही सभासद केव्हाही तपासणी करू शकतो.प्रश्न - ऊस उत्पादक शेतकरी सभासदांसाठी भविष्यात काय योजना आहेत?उत्तर - कष्टकरी ऊस उत्पादक सभासदांसाठी कारखान्यामार्फत पेन्शन योजना चालू करण्याची आमची भूमिका आहे. त्यासाठी काही कालावधी जावा लागेल. सरकारची त्यासाठी परवानगी घ्यावी लागेल. भविष्यात अशी योजना राबविणारा ‘राजाराम’ पहिला साखर कारखाना असेल. याशिवाय ठिबक योजना राबविण्यात येणार आहे. ऊस विकास योजना सध्या राबविण्यात आली आहे. कारखान्याला कायमचा व हक्काचा ऊस उपलब्ध होणेसाठी कारखाना कार्यक्षेत्रातील काही गावात जलसिंचन योजना राबविल्या आहेत. स्वच्छ आणि पारदर्शक कारभारामुळे सभासद आमच्या पाठीशी आहेत. ते पुन्हा आमच्याकडेच सत्ता देतील, यात शंका नाही, असेही आमदार महाडिक शेवटी म्हणाले.- रमेश पाटील, कसबा बावडा(उद्याच्या अंकात माजी मंत्री सतेज पाटील यांची मुलाखत)