शहरं
Join us  
Trending Stories
1
'मला आवडतो पाकिस्तान, पण मोदी महान'; मुनीर भेटीदरम्यान काय म्हणाले डोनाल्ड ट्रम्प?
2
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
3
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
4
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
5
Pune Crime News: लिपस्टिकने चिठ्ठी लिहिली अन् विवाहितेने चिमूरड्यासह पाचव्या मजल्यावरून स्वतःला झोकून दिलं
6
Viral Video : कशासाठी तो हट्ट? चिमुकल्याला सिंहाच्या पाठीवर बसवत होता बाबा, पुढे जे झालं ते बघाच... 
7
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
8
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
9
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
10
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
11
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
12
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
13
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
14
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
15
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
16
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
17
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
18
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
19
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
20
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...

कुरुंदवाड शहराचा तिसरा डोळा बंद

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 10, 2021 04:16 IST

गणपती कोळी : कुरुंदवाड: शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे शहराचा तिसरा डोळाच बंद असल्याने शहराची ...

गणपती कोळी :

कुरुंदवाड:

शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत. त्यामुळे शहराचा तिसरा डोळाच बंद असल्याने शहराची सुरक्षितता धोक्यात आली असून चोरीचे प्रमाण वाढले आहे. शहराच्या विकासाच्या नावाखाली ईर्षेतून निधींची घोषणा करणाऱ्या नेत्यांनी किमान शहरातील सीसीटीव्ही कॅमेरे सुरू करावेत, अशी मागणी शहरवासीयांतून होत आहे.

शहरातील गुन्हेगारी, चोरी, नाहक गोंधळ घालून सर्वसामान्य जनतेला वेठीस धरणाऱ्यांचा नेमका शोध घेता यावा व यातून शहराची सुरक्षितता ठेवता यावी, यासाठी पोलिसांच्या सूचनेनुसार शहरातील प्रमुख आणि संवेदनशील अशा अठरा ठिकाणी सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात आले होते. या कॅमेऱ्यांचे नियंत्रण पोलीस ठाण्यात करण्यात आले होते.

सीसीटीव्हीच्या माध्यमातून पोलिसांचे गैरवर्तन करणाऱ्यांवर लक्ष असल्याने चोरीच्या अथवा गुन्हेगारांच्या घटनांना आळा बसला होता. मात्र २०१९ च्या प्रलयकारी महापुरात सीसीटीव्ही कॅमेऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाल्याने व त्याची दुरुस्तीच न झाल्याने सीसीटीव्ही कॅमेरे गेल्या दोन वर्षांपासून बंद आहेत. सीसीटीव्ही सुरू करण्यासाठी पोलिसांनी पालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींकडे वारंवार मागणी करूनही आश्वासनापलीकडे काहीच मिळाले नाही. त्यामुळे चोरट्यांना फावले असून शहरातील चोरीच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे.

राजकीय ईर्षेतून शहरातील सत्ताधारी-विरोधक गटनेत्यांनी आपापल्या नेत्यांकडून शहराच्या विकासासाठी निधी मंजूर झाल्याची घोषणा करत आहेत; मात्र प्रत्यक्षात किती निधी मिळाला, विकास किती झाला हा चिंतनाचा विषय आहे. शहरातील भूलभुलैया राजकारणावर शहरवासीयांतून तीव्र संताप व्यक्त होत असून लोकप्रतिनिधी, नेत्यांनी किमान सीसीटीव्ही कॅमेरे सुरु करुन शहराची सुरक्षितता ठेवावी, अशी मागणी होत आहे.

----------------------

चौकट - सीसीटीव्हीसाठी प्रयत्न गरजेचे

दोन दिवसांपूर्वी शहरातील भरवस्तीत आणि पोलीस ठाण्यापासून हाकेच्या अंतरावर असलेल्या घरात घरफोडी करुन साडेतीन लाखांचा ऐवज चोरट्यांनी लंपास केल्याची घटना घडली आहे. चोरट्यांना शोधण्यात पोलिसांना अद्याप यश आले नाही. या भागात पालिकेचे सीसीटीव्ही कॅमेरे आहेत; मात्र सीसीटीव्ही यंत्रणाच बंद असल्याने चोरांचे फावले असून कॅमेरे सुरु असते तर चोरांच्या मुसक्या आवळण्यात पोलिसांना यश आले असते. त्यामुळे पालिका प्रशासन आणि शहरातील लोकप्रतिनिधींनी आतातरी स्वत:चे डोळे उघडून पोलिसांचा तिसरा डोळा उघडण्यासाठी प्रयत्न करणे गरजेचे आहे.