शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
2
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
3
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...
4
आरक्षण वाद तापला, जरांगेंची भुजबळांवर टीका; म्हणाले, “नागालँड, नेपाळला पाठवा, तिकडेच शोभतो”
5
"आजकाल मित्रही सापासारखे झाले आहेत...!" मोहन भागवत यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
6
'टेक ऑफ'वेळी चाक निखळलं, धावपट्टीवर सापडलं; मुंबई एअरपोर्टवर स्पाईसजेटच्या विमानाचं 'इमर्जन्सी लँडिंग'
7
"मी हळूहळू राजकारणातून निवृत्त होणार..."; शरद पवारांच्या निष्ठावंत नेत्याने केला खुलासा
8
Duleep Trophy Final : रजतसह यशनं साधला सेंच्युरीचा डाव! फायनलमध्ये 'सुवर्ण'च्या दिशेनं वाटचाल
9
जिओ-एअरटेलने बंद केले सर्वात स्वस्त प्रीपेड प्लान! ट्रायने कंपन्यांना विचारला जाब; आता कोणते पर्याय उपलब्ध?
10
Travel : दुबई फिरायला जाताय? चुकूनही करू नका 'या' गोष्टी; खावी लागले तुरुंगाची हवा!
11
'अंबानगरीची हिरवी ओळख' देशात अमरावती शहराची हवा 'या' कारणांमुळे ठरली शुद्ध !
12
गर्भवती होताच कोरियन सरकारने दिला भरभरून पैसा; मूळ भारतीय महिलेने हिशोबच सांगितला
13
मुंबई, पुणेच नाही...! छोट्या शहरांतही विवाहबाह्य संबंध वाढू लागले, ही पाच कारणे हादरवून टाकतील...
14
“नाशिकने आम्हाला नाकारले ते चांगले केले, पण...”; मनसे नेते बाळा नांदगावकर नेमके काय म्हणाले?
15
BEL-बजाज फायनान्ससह 'या' शेअर्समध्ये तेजी! पण, टाटांच्या कंपनीचा स्टॉक आपटला, कुठे किती वाढ?
16
Pitru Paksha 2025: घरात पितरांचे फोटो आहेत, पण दिशा चुकीची असेल तर कसा जाईल वास्तुदोष?
17
मोठी बातमी! 'ती' खुर्ची कुणासाठी राखीव? राज्यातील जिल्हा परिषद अध्यक्षपदाचे आरक्षण जाहीर; जाणून घ्या...
18
सिंह दरबार जाळून टाकला, आता कुठे बसणार नेपाळच्या नव्या पंतप्रधान? Gen-Z शोधताहेत नवी जागा!
19
बॉयकॉट, बॉयकॉट, बॉयकॉट...! भारत-पाकिस्तान सामन्याकडे चाहत्यांची पाठ; तिकीटे खपेनात...
20
२४-२२ कॅरेट सोडा, १८ कॅरेट सोन्याला सर्वाधिक मागणी! दागिन्यांसाठी सर्वोत्तम का मानले जाते?

‘ते’ धमकीपत्र मंगळवार पेठ पोस्टातून

By admin | Updated: April 26, 2016 00:14 IST

पोलिस अधीक्षक : स्थानिक व्यक्तीचे कृत्य असण्याची शक्यता

कोल्हापूर : येथील ज्येष्ठ पत्रकार डॉ. सुभाष देसाई यांना निनावी धमकी पत्रापाठोपाठ अज्ञात व्यक्तीने फोनवरून दिलेली धमकी हे स्थानिक व्यक्तीचे कृत्य असल्याचा प्राथमिक अंदाज पोलिसांचा आहे. देसाई यांना आलेले पत्र हे जुना राजवाडा पोलिस ठाण्याच्या हद्दीमधील मंगळवार पेठ पोस्टातून आल्याचे निष्पन्न झाले आहे. लवकरच आम्ही या घटनेमागच्या सूत्रधारास अटक करू, असे पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांनी सोमवारी पत्रकारांशी बोलताना सांगितले. देसाई यांना ‘सनातन धर्माला, सनातन परंपरेला आणि पुरोहितांना विरोध करू नका. आमच्या तीन गोळ््यांनी अचूक वेध घेतलाय. चौथ्या गोळीवर स्वत:चे नाव लिहून घेण्याचा अट्टाहास सोडा. नशिबाने एक देसाई वाचली, दुसऱ्या देसाई यांचे नशीब साथ देईलच असे नाही,’ या आशयाचे धमकीचे निनावी पत्र आल्याने खळबळ उडाली. या पत्राची वरिष्ठ पातळीवर गोपनीय चौकशी सुरू असतानाच त्यांच्या कार्यालयातील लँडलाईन नंबरवर फोन आला. ‘मी आॅस्ट्रेलियातून रवी पुजारी बोलतोय, ‘अंबाबाई’च्या मंदिरातील पुजाऱ्यांच्या जिवावर उठलाय तुम्ही, हे थांबवा, अन्यथा त्याचे गंभीर परिणाम भोगावे लागतील’ अशी धमकी दिली. पोलिस प्रशासनाने या धमकीची गांभीर्याने दखल घेत फोन कुठून आला, त्याची माहिती सायबर सेलकडून घेण्याचा प्रयत्न केला. देसाई यांचे दोन्हीही नंबर बीएसएनएलचे असल्याने सायबर सेलने भारत संचार निगम (बीएसएनएल) विभागाच्या मुख्य कार्यालयाशी संपर्क साधून देसाई यांच्या लँडलाईन नंबरच्या कॉल डिटेल्सची माहिती मागविली. सोमवारी रात्री त्याचे डिटेल्स पोलिस अधीक्षक देशपांडे यांच्या हाती मिळाले. देसाई यांना आलेले पत्र मंगळवार पेठेतील पोस्ट कार्यालयातून आले आहे. त्यामुळे या पोस्ट कार्यालयाच्या बाहेर असलेल्या सीसीटीव्ही फुटेज पोलिस बारकाईने तपासत आहेत. ‘सनातन’ व हिंदुत्ववादी संघटनेचे काही साधकही पोलिसांच्या रडावर आहेत. देसाई यांनी प्रसिद्ध केलेल्या अंबाबाईच्या पुस्तकावरून कोणी दुखावले असण्याची शक्यता आहे. तृप्ती देसाई यांच्या गाभार प्रवेश वादानंतरच देसाई यांना धमकी आली. त्यामुळे सर्व बाजूंनी व अत्यंत अभ्यासपूर्ण या प्रकरणी तपास सुरू आहे. आतापर्यंतच्या तपासामध्ये स्थानिक व्यक्तीचे हे कृत्य असण्याची शक्यता आहे. त्यादृष्टीने पोलिस कसोशीने तपास करत आहेत. देसाई यांच्या कार्यालय व साळोखेनगर येथील निवासस्थानी कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवला आहे. परिसरातही साध्या वेशात पोलिसांचे पथक टेहाळणी करत असल्याचे देशपांडे यांनी यावेळी सांगितले.