शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis : "कसाबने ट्रेनिंग घेतलेला अड्डा भारताने नेस्तनाबूत केला, पाकिस्तानला धडा शिकवला"
2
सुरक्षा दलाची सर्वात मोठी कारवाई; 31 कुख्यात नक्षलवाद्यांचा खात्मा, शस्त्रसाठाही जप्त
3
Video : पाकिस्तान-चीनची झोप उडवणार, एकाचवेळी अनेक ड्रोन्स पाडणार! भारताचं 'भार्गवास्त्र' पाहिलं का?
4
अर्ध्या किंमतीत करत होती हेअर ट्रान्सप्लांट, रुग्णाचा मृत्यू होताच डॉक्टर झाली फरार!
5
रोहित- कोहली यांचा निवृत्तीचा निर्णय युवराज सिंहच्या वडिलांना खटकला, म्हणाले...
6
कर्नल सोफिया कुरेशींबाबत वादग्रस्त विधान करणारे मंत्री विजय शाह अडचणीत, ४ तासांत FIR दाखल करण्याचे कोर्टाचे आदेश  
7
IPL 2025 Playoffs आधी 'या' संघाला मोठा धक्का; २ परदेशी दोन खेळाडूंचा परतण्यास नकार
8
पाकिस्तानच्या माजी पंतप्रधानांना अजूनही भारताची भीती! म्हणाले, ते हल्ला करु शकतात, मोदी संतापलेत
9
कौतुकास्पद! दहावीच्या परीक्षेत ६५ वर्षीय आजी आणि नातू एकत्र झाले पास, मिळवलं घवघवीत यश
10
"अभिनेत्री केवळ शोभेच्या बाहुल्या...", दीपिका पादुकोणने मांडलं स्पष्ट मत; करिअरबद्दल म्हणाली...
11
"आमच्या २६ बहिणींचं कुंकू पुसलं ते दहशतवादी कुठे आहेत?"; काँग्रेस नेत्याचा भाजपावर निशाणा
12
"लक्ष्याने जगाचा निरोप घेण्यापूर्वी मला..."; ज्येष्ठ मराठी अभिनेत्याने सांगितला भावुक किस्सा
13
Solapur Accident: वडिलांचा अंत्यविधी उरकून परतताना लेकालाही मृत्यूनं गाठलं, सोलापुरातील घटना!
14
भारताचे २ वेगवेगळे संघ निवडले जाणार; इंग्लंड दौऱ्यापूर्वी सिलेक्टर्सचा मोठा निर्णय, पण का?
15
पाकला पुन्हा मिळाली आर्थिक मदत; भारतासोबतच्या तणावादरम्यान IMF ने दिले ₹8400 कोटी
16
तुर्कस्तान आणि अझरबैजानला विमाने पाठवणार का? इंडिगो कंपनीने दिली मोठी अपडेट
17
Tejasvee Ghosalkar : "भाजपात जाण्याबाबत मी..."; तेजस्वी घोसाळकरांनी घेतली उद्धव ठाकरेंची भेट
18
Surya Gochar 2025: सूर्य होणार अधिक प्रखर, मात्र 'या' राशींसाठी ठरणार सुखकर; कसा ते पहा!
19
'तुझा मुलगा जिन्न आहे' मांत्रिकाचं ऐकून १२ वर्षांनी झालेल्या मुलाला कालव्यात फेकलं!
20
भारतात Trump Towerचा जलवा, ८ ते १५ कोटींचे फ्लॅट्स; १२५ कोटींचं पेंटहाऊस, पहिल्याच दिवशी सोल्ड आऊट

निवडणूक विभागाची लगबग वाढली

By admin | Updated: September 16, 2014 23:39 IST

आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारी

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली तशी जिल्हा निवडणूक शाखेची लगबग वाढली असून, निवडणुकीचे कागदावरील नियोजन प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. मतदार नोंदणीचा उद्या, बुधवार शेवटचा दिवस असून, त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १३ सप्टेंबरपासून १५ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कलम १४४ अनुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली. आता शनिवारी (दि. २०) अधिसूचना जाहीर होणार असून, त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेत लगबग सुरू झाली आहे. सध्या या शाखेतर्फे प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे इलेक्ट्रिक व्होटिंग मशीनचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आवश्यक त्या कर्मचारी वर्गाच्या नियुक्तीचे काम सुरू आहे. निवडणुकीसाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे काम संपल्यानंतर पुढील आठवड्यात प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार नोंदणी करण्याची मुदत आता उद्यापर्यंत आहे. ज्यांना आपली नावे मतदार यादीत नावे समाविष्ट करायची आहेत, त्यांनी नव्याने अर्ज सादर करावेत. मतदार ओळखपत्र असले म्हणजे मतदानाचा हक्क प्राप्त झाला असे नाही; तर त्याकरिता यादीत नाव असणे आवश्यक आहे.मतदार यादीत ज्यांचे नाव नाही त्यांना नावनोंदणी करण्याची शेवटची संधी आहे. या संधीचा लाभ घेऊन नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) मतदार नोंदणीचा आज शेवटचा दिवस, १५ आॅक्टोबरअखेर प्रतिबंधात्मक आदेशलाउडस्पीकरचा वापर पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही.लाउडस्पीकरचा वापर सकाळी ६ ते १० पर्यंतच करता येईल. मतदानाच्या ४८ तास अगोदर लाउडस्पीकर बंद राहतील. उमेदवारांना मतदान केंद्राबाहेर बूथ लावता येणार नाही. आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारीनिवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केले. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करीत होते. सर्व विभागप्रमुखांनी आचारसंहितेचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी, असे सांगून ग्रामीण, नगरपालिका, महानगरपालिका स्तरांवरील फलकांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेतलेले फलक त्वरित काढून टाकून योग्य ती कारवाई करावी. शासकीय वास्तूंचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घ्यावी. निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व विभागांनी वाहने व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.