शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA 4th T20I : शुभमन गिल 'आउट'; टॉसला उशीर! जाणून घ्या त्यामागचं कारण
2
“मी माझ्या पक्षाचा पर्मनंट चिफ, कुणी बायपास करणार नाही, तसा प्रयत्न झाला तर…”: रामदास आठवले
3
“माणिकराव कोकाटेंना वाचवण्याचा सरकारकडून प्रयत्न, २४ तास झाले अद्याप अटक का नाही?”: सपकाळ
4
"मला कधीच वाटलं नव्हतं की इतकी पर्सनल..."; MMS लीक प्रकरणावर Payal Gaming चे स्पष्टीकरण
5
वांद्रे-वरळी सी लिंकवर २५२ किमी प्रतितास वेगाने पळवली लॅम्बॉर्गिनी, पोलिसांनी केली अशी कारवाई  
6
आवळा कँडी ते च्यवनप्राश... आरोग्यासाठी ठरू शकतं घातक; न्यूट्रिशनिस्टने सांगितले साइड इफेक्ट
7
"शिक्षा देण्यापेक्षा माफ करण्यातच कायद्याचा मोठेपणा"; बूट फेक प्रकरणावर माजी सरन्यायाधीश गवईंचे रोखठोक भाष्य
8
Maruti Suzuki ने लॉन्च केली नवीन WagonR; वृद्ध आणि दिव्यांगांसाठी मिळणार खास 'स्विव्हल सीट'
9
प्रियंका आणि राहुल गांधी यांच्यात वाद, कुटुंबीयांशी भांडून परदेशात गेले; केंद्रीय मंत्र्याचा मोठा दावा
10
“SIR प्रक्रिया निरर्थक, ५०० परदेशींसाठी ८ कोटी लोकांचा छळ”; माजी निवडणूक आयुक्त थेट बोलले
11
९९६६ धावा आणि ७०५ विकेट्स…तरीही तो अनसोल्ड! देशांतर्गत क्रिकेटमधील ‘कपिल देव’ची अनटोल्ड स्टोरी
12
"दिल्लीत प्रदूषण वाढवण्यासाठी ठिकठिकाणी कचरा जाळतेय AAP"; पर्यावरण मंत्र्यांचा गंभीर आरोप
13
गडकिल्ल्यांवरील अतिक्रमण हटवण्यासाठी समिती; नितेश राणेंची माहिती, सरकारचा महत्त्वाचा निर्णय
14
भारतात टीशर्टवर राहणाऱ्या राहुल गांधींना जर्मनीत भरली 'हुडहुडी'! स्वेटरवर दिसले
15
आई-वडिलांचा केला खून, मृतदेहांचे तुकडे करून गोणीत भरले, अन् नदीत फेकले, मुलाचं धक्कादायक कृत्य 
16
‘महाराष्ट्रात येणाऱ्या सर्व विमानांमध्ये मराठी भाषेत उद्घोषणा करा’, नाना पटोले यांची मागणी 
17
हृदयद्रावक! 'तो' सेल्फी ठरला अखेरचा; लग्नाच्या वाढदिवशी पतीसमोर पत्नीचा पाय घसरला अन्...
18
कसा आहे 'अवतार: फायर अँड ॲश'? सर्वात आधी चित्रपट पाहून राजामौली म्हणाले "थिएटरमध्ये बसलेल्या लहान मु
19
मोठी बातमी! कबड्डी खेळाडू राणा बलाचौरिया यांच्या हत्येतील आरोपी चकमकीत ठार; दोन पोलिस जखमी
20
टोल नाके दुसरीकडे हलवा...; प्रदूषण कमी करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या प्रशासनाला सूचना
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक विभागाची लगबग वाढली

By admin | Updated: September 16, 2014 23:39 IST

आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारी

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली तशी जिल्हा निवडणूक शाखेची लगबग वाढली असून, निवडणुकीचे कागदावरील नियोजन प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. मतदार नोंदणीचा उद्या, बुधवार शेवटचा दिवस असून, त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १३ सप्टेंबरपासून १५ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कलम १४४ अनुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली. आता शनिवारी (दि. २०) अधिसूचना जाहीर होणार असून, त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेत लगबग सुरू झाली आहे. सध्या या शाखेतर्फे प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे इलेक्ट्रिक व्होटिंग मशीनचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आवश्यक त्या कर्मचारी वर्गाच्या नियुक्तीचे काम सुरू आहे. निवडणुकीसाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे काम संपल्यानंतर पुढील आठवड्यात प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार नोंदणी करण्याची मुदत आता उद्यापर्यंत आहे. ज्यांना आपली नावे मतदार यादीत नावे समाविष्ट करायची आहेत, त्यांनी नव्याने अर्ज सादर करावेत. मतदार ओळखपत्र असले म्हणजे मतदानाचा हक्क प्राप्त झाला असे नाही; तर त्याकरिता यादीत नाव असणे आवश्यक आहे.मतदार यादीत ज्यांचे नाव नाही त्यांना नावनोंदणी करण्याची शेवटची संधी आहे. या संधीचा लाभ घेऊन नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) मतदार नोंदणीचा आज शेवटचा दिवस, १५ आॅक्टोबरअखेर प्रतिबंधात्मक आदेशलाउडस्पीकरचा वापर पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही.लाउडस्पीकरचा वापर सकाळी ६ ते १० पर्यंतच करता येईल. मतदानाच्या ४८ तास अगोदर लाउडस्पीकर बंद राहतील. उमेदवारांना मतदान केंद्राबाहेर बूथ लावता येणार नाही. आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारीनिवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केले. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करीत होते. सर्व विभागप्रमुखांनी आचारसंहितेचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी, असे सांगून ग्रामीण, नगरपालिका, महानगरपालिका स्तरांवरील फलकांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेतलेले फलक त्वरित काढून टाकून योग्य ती कारवाई करावी. शासकीय वास्तूंचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घ्यावी. निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व विभागांनी वाहने व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.