शहरं
Join us  
Trending Stories
1
‘एमपीएससी’ची तयारी करणाऱ्या एकुलत्या एक मुलाचा अपघाती मृत्यू; पुण्याच्या दिशेने जात होता...
2
‘लाडकी बहीण’मुळे निधी उशिरा, कामे होणार कशी? गुलाबी रंगात निवडून आलेल्या अजित पवार गटाच्या मंत्र्यांचाच तक्रारीचा सूर
3
६ दिवसांपासून बेपत्ता असलेल्या स्नेहाचा मृतदेह सापडला; आई-वडिलांचा टाहो, मैत्रिणीचा मोठा दावा
4
Good Luck Cafe: बन मस्क्यामध्ये काचेचे तुकडे; एफ. सी. रोडवरील गुडलक कॅफेचा परवाना तात्पुरता निलंबित
5
Accident: आंब्याने भरलेली लॉरी मिनी ट्रकवर उलटली; ९ जण ठार, अनेकजण जखमी!
6
गृहप्रवेशानंतर नववधू चक्कर येऊन पडली, पतीने थेट प्रेग्नन्सी टेस्ट किटच आणली! चिडलेल्या नवरीने काय केलं वाचाच... 
7
Pravin Gaikwad : 'माझ्या हत्येचा कट होता, याला पूर्णपणे सरकार जबाबदार'; प्रवीण गायकवाडांचा आरोप
8
स्मशानभूमीचे उद्घाटन न झाल्याने अंत्यविधीस परवानगी नाकारली; भरपावसात डिझेल ओतून पेटवली चिता
9
नवी मुंबई: बेलापूरमधील पारसिक टेकडीवर भूस्खलन; मातीच्या ढिगाऱ्यासह झाडे उन्मळून पडली
10
Anthem Biosciences IPO आजपासून गुंतवणुकीसाठी खुला; कधीपर्यंत आणि किती करावी लागेल गुंतवणूक, GMP किती?
11
मनसेचे २ दिवसीय शिबिर, ठाकरे बंधू युतीवर भूमिका ठरणार; राज ठाकरे काय देणार 'कानमंत्र'?
12
'ते गप्पा चांगल्या मारतात, पण रात्रीच्या अंधारात लोकांवर बॉम्ब टाकतात', ट्रम्प पुतीन यांच्यावर भडकले
13
अरे देवा! आई वारंवार भेंडीची भाजी बनवायची म्हणून लेक चिडला, १२०० किमी दूर पळून गेला अन्...
14
नोकरीसाठी डिग्री आणि सीव्हीची गरज नाही! थेट १ कोटी रुपयांचं पॅकेज, फक्त 'या' २ अटी पूर्ण करा
15
ऑपरेशन 'सिंदूर'नंतर 'ब्रह्मोस मिसाइल'ची मागणी वाढली, १४-१५ देश रांगा लावून उभे!
16
रशियाकडून क्रुड ऑईलची विक्रमी आयात; पेट्रोलियम मंत्री म्हणाले, "भारताचं ऊर्जा धोरण कोणत्याही दबावाखाली..."
17
"कलाकाराला ऐकून घ्यावंच लागतं, पण..." शरद उपाध्येंच्या आरोपांवर निलेश साबळेचं पुन्हा प्रत्युत्तर
18
ठाणे स्टेशनजवळ भीषण आग! स्कायवॉकजवळच्या आगीमुळे प्रवाशांमध्ये उडाला गोंधळ
19
साप्ताहिक राशीभविष्य: २ राजयोगांचा ९ राशींना दुपटीने लाभ, सुबत्ता-भरभराट; गुंतवणुकीत नफा!
20
गुडबाय ISS! पृथ्वीवर परतण्यापूर्वी शुभांशू शुक्ला यांचे फोटो आले समोर, आजपासून परतीचा प्रवास सुरू होणार

निवडणूक विभागाची लगबग वाढली

By admin | Updated: September 16, 2014 23:39 IST

आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारी

कोल्हापूर : विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली तशी जिल्हा निवडणूक शाखेची लगबग वाढली असून, निवडणुकीचे कागदावरील नियोजन प्रत्यक्षात उतरविण्याचे प्रयत्न सुरू झाले आहे. मतदार नोंदणीचा उद्या, बुधवार शेवटचा दिवस असून, त्यानंतर अंतिम यादी प्रसिद्ध केली जाणार आहे. दरम्यान, जिल्ह्यात विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर दि. १३ सप्टेंबरपासून १५ आॅक्टोबरपर्यंत जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी कलम १४४ अनुसार प्रतिबंधात्मक आदेश लागू केला आहे. विधानसभा निवडणुकीची तारीख जाहीर झाली. आता शनिवारी (दि. २०) अधिसूचना जाहीर होणार असून, त्याच दिवसापासून उमेदवारी अर्ज भरण्याची प्रक्रिया सुरू होणार आहे. त्यामुळे जिल्हा निवडणूक शाखेत लगबग सुरू झाली आहे. सध्या या शाखेतर्फे प्रत्येक मतदारसंघाच्या निवडणूक अधिकाऱ्याकडे इलेक्ट्रिक व्होटिंग मशीनचे वाटप करण्याचे नियोजन करण्यात येत आहे. आवश्यक त्या कर्मचारी वर्गाच्या नियुक्तीचे काम सुरू आहे. निवडणुकीसाठी घेतलेल्या कर्मचाऱ्यांना प्रत्यक्ष प्रशिक्षण देण्याचे नियोजन केले जात आहे. कर्मचाऱ्यांच्या नियुक्तीचे काम संपल्यानंतर पुढील आठवड्यात प्रशिक्षण आयोजित केले जाणार आहे. विधानसभा निवडणुकीच्या निमित्ताने मतदार नोंदणी करण्याची मुदत आता उद्यापर्यंत आहे. ज्यांना आपली नावे मतदार यादीत नावे समाविष्ट करायची आहेत, त्यांनी नव्याने अर्ज सादर करावेत. मतदार ओळखपत्र असले म्हणजे मतदानाचा हक्क प्राप्त झाला असे नाही; तर त्याकरिता यादीत नाव असणे आवश्यक आहे.मतदार यादीत ज्यांचे नाव नाही त्यांना नावनोंदणी करण्याची शेवटची संधी आहे. या संधीचा लाभ घेऊन नावनोंदणी करावी, असे आवाहन करण्यात आले आहे. (प्रतिनिधी) मतदार नोंदणीचा आज शेवटचा दिवस, १५ आॅक्टोबरअखेर प्रतिबंधात्मक आदेशलाउडस्पीकरचा वापर पूर्व परवानगीशिवाय करता येणार नाही.लाउडस्पीकरचा वापर सकाळी ६ ते १० पर्यंतच करता येईल. मतदानाच्या ४८ तास अगोदर लाउडस्पीकर बंद राहतील. उमेदवारांना मतदान केंद्राबाहेर बूथ लावता येणार नाही. आचारसंहितेचे पालन करावे : जिल्हाधिकारीनिवडणूक प्रक्रिया शिस्तबद्ध, निर्भय आणि पारदर्शक पद्धतीने पार पडावी यासाठी सर्व विभागांच्या अधिकाऱ्यांनी आचारसंहितेचे काटेकोरपणे पालन करावे, असे आवाहन जिल्हाधिकारी राजाराम माने यांनी केले. आदर्श आचारसंहितेच्या अंमलबजावणीबाबत सर्व विभागप्रमुखांच्या बैठकीत जिल्हाधिकारी मार्गदर्शन करीत होते. सर्व विभागप्रमुखांनी आचारसंहितेचे पालन होईल याची खबरदारी घ्यावी, असे सांगून ग्रामीण, नगरपालिका, महानगरपालिका स्तरांवरील फलकांची पूर्वपरवानगी घेणे आवश्यक आहे. परवानगी न घेतलेले फलक त्वरित काढून टाकून योग्य ती कारवाई करावी. शासकीय वास्तूंचा गैरवापर होणार नाही, याची काळजी घ्यावी. निवडणूक प्रक्रियेसाठी सर्व विभागांनी वाहने व कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत, अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या.