शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

गावा-गावातून स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सडोली (खालसा) : गावा-गावातून स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे. लोकांचे आरोग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सडोली (खालसा)

: गावा-गावातून स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी परिसराची स्वच्छता महत्त्वाची असून, स्वच्छता ही सेवा अभियान प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ‘शाश्वत स्वच्छतेसाठी स्वच्छता’ ही सेवा अभियानाच्या प्रारंभप्रसंगी सडोली खालसा (ता. करवीर) येथे राहुल पाटील बोलत होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले, स्वच्छता ही आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे. आपले गाव आज स्वच्छतेच्याबाबतीत अग्रेसर राहील. हाच वारसा पुढच्या पिढीला देऊ शकतो.

यावेळी गावात स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, कोरोना काळात काम केलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत सरपंच अमित पाटील यांनी केले. जिल्हा परिषद जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे यांनी प्रास्ताविक केले. करवीर गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी आभार मानले.

उद्योजक रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य सविता पाटील, उपसरपंच तेजस्विनी पाटील, पोलीसपाटील पंकजकुमार पवार-पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळ

सडोली (खालसा) ता. करवीर येथे स्वच्छ भारत मिशन अभियानचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य कार्यकारी संजयसिंह चव्हाण, सरपंच अमित पाटील, प्रियदर्शनी मोरे, गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या उपस्थितीत झाला.

फोटो दिव्या फोटो गाडेगोंडवाडी

१७ सडोलीखालसा स्वच्छता अभियान