शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH vs DC : दिल्लीच्या फलंदाजांनी नांगी टाकली; पण पावसाच्या बॅटिंगमुळे हैदराबाद फक्त बॉलिंग करून 'आउट'
2
"९० हजार सैनिकांचे पायजमे आजही तिथे टांगलेले आहेत’’, मुनीर आणि पाकिस्तानचं बलूच नेत्याकडून वस्रहरण   
3
IPL 2025 Playoffs Race : आता ४ जागेसाठी ७ दावेदार! कोणत्या संघासाठी कसे आहे प्लेऑफ्सचे समीकरण?
4
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं सरपंच संतोष देशमुख यांची कन्या वैभवीचं कौतुक
5
दोन्ही दिल्लीकर एकाच क्रीजमध्ये; रन आउटसाठी स्टँडमध्ये काव्या मारनची 'दातओठ खात' तळमळ (VIDEO)
6
"वेगळे राजकारण करून पॅनलला गालबोट लावण्याचा प्रयत्न केल्यास माझ्या दारात येऊ नका",अजित पवार यांचा इशारा
7
SRH vs DC : पॅट कमिन्सचा विकेट्सचा खास पॅटर्न! स्पेल बघून काव्या मारनही झाली शॉक
8
निकाल ऐकण्यापूर्वीच विद्यार्थिनीने संपवलं जीवन, नापास झाल्याच्या भीतीतून उचलले पाऊल
9
Shivalik Sharma: क्रिकेटरला अटक; लग्नाचे आमिष दाखवून तरुणीवर अत्याचार केल्याचा आरोप
10
रेल्वे स्थानकाच्या पायऱ्यांवर पाकिस्तानी ध्वज चिकटवला; पाहताच महिलेने घातला गोंधळ, व्हिडीओ व्हायरल
11
SRH vs DC : "डिअर क्रिकेट प्लीज प्लीज ..." दुसऱ्यांदा पदरी भोपळा पडल्यावर करूण नायर झाला ट्रोल
12
"महायुती म्हणजे 'तीन तिघाडा, काम बिघाडा"; काँग्रेस फोडण्याच्या मुद्द्यावरून प्रणिती शिंदेंची टीका
13
ड्रग्स टेस्टमध्ये दोषी आढळलेला कगिसो रबाडा पुन्हा IPL खेळणार, 'या' संघाविरूद्ध होणार 'कमबॅक'
14
हवाई हल्ल्याची तयारी... पाकिस्तानसोबत तणावाच्या पार्श्वभूमीवर गृह मंत्रालयाचे सर्व राज्यांना निर्देश
15
भारताच्या संरक्षण वेबसाईट्सवर पाकिस्तानकडून सायबर हल्ला, महत्त्वपूर्ण गोपनीय माहिती लीक झाल्याचा संशय
16
काही लोक काँग्रेस सोडत आहेत, आमची वेळ आल्यावर आम्हीही बदला घेऊ- विजय वडेट्टीवार
17
वाहतुकीचे नियम तोडले तर मिळतील निगेटिव्ह पॉईंट्स, ड्रायव्हिंग लायसन होणार सस्पेंड, अशी आहे नवी पॉईंट सिस्टिम
18
ही आहे भारताची ताकद; जर्मनी-फ्रान्सचा पाकिस्तानबाबत मोठा निर्णय, जाणून घ्या...
19
पाकवर आर्थिक हल्ला; ADB अध्यक्षांना भेटल्या निर्मला सीतारामण, निधी रोखण्याची केली मागणी
20
२२ महीने राबला, पगार मागताच हॉटेल मालक, मॅनेजरने स्वयंपाक्याचा गुप्तांग ठेचून खून केला

गावा-गावातून स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहावी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST

लोकमत न्यूज नेटवर्क सडोली (खालसा) : गावा-गावातून स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे. लोकांचे आरोग्य ...

लोकमत न्यूज नेटवर्क

सडोली (खालसा)

: गावा-गावातून स्वच्छतेची लोकचळवळ उभी राहणे गरजेचे आहे. लोकांचे आरोग्य चांगले राहण्यासाठी परिसराची स्वच्छता महत्त्वाची असून, स्वच्छता ही सेवा अभियान प्रभावीपणे राबवण्याची गरज आहे, असे प्रतिपादन जिल्हा परिषद अध्यक्ष राहुल पाटील यांनी केले. स्वच्छ भारत मिशनअंतर्गत ‘शाश्वत स्वच्छतेसाठी स्वच्छता’ ही सेवा अभियानाच्या प्रारंभप्रसंगी सडोली खालसा (ता. करवीर) येथे राहुल पाटील बोलत होते.

जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संजय सिंह चव्हाण म्हणाले, स्वच्छता ही आपल्या भारतीय संस्कृतीचा भाग आहे. आपले गाव आज स्वच्छतेच्याबाबतीत अग्रेसर राहील. हाच वारसा पुढच्या पिढीला देऊ शकतो.

यावेळी गावात स्वच्छताविषयक विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. दरम्यान, कोरोना काळात काम केलेल्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

कार्यक्रमाचे स्वागत सरपंच अमित पाटील यांनी केले. जिल्हा परिषद जल जीवन मिशनच्या प्रकल्प संचालिका प्रियदर्शनी मोरे यांनी प्रास्ताविक केले. करवीर गटविकास अधिकारी जयवंत उगले यांनी आभार मानले.

उद्योजक रवींद्र पाटील यांनी मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमास पंचायत समिती सदस्य सविता पाटील, उपसरपंच तेजस्विनी पाटील, पोलीसपाटील पंकजकुमार पवार-पाटील, तंटामुक्त अध्यक्ष राजेंद्र पाटील, बाजीराव पाटील आदी उपस्थित होते.

फोटो ओळ

सडोली (खालसा) ता. करवीर येथे स्वच्छ भारत मिशन अभियानचा प्रारंभ जिल्हा परिषदेचे अध्यक्ष राहुल पाटील, मुख्य कार्यकारी संजयसिंह चव्हाण, सरपंच अमित पाटील, प्रियदर्शनी मोरे, गटविकास अधिकारी जयवंत उगले यांच्या उपस्थितीत झाला.

फोटो दिव्या फोटो गाडेगोंडवाडी

१७ सडोलीखालसा स्वच्छता अभियान