शहरं
Join us  
Trending Stories
1
एकल पदाच्या पदोन्नती, भरतीमध्ये आरक्षण नाहीच! आजवरचे सगळे आदेश रद्द करून काढला नवा शासन निर्णय
2
"तोपर्यंत इराणला पत्ताही नव्हता"; अमेरिकेतील 'त्या' खबऱ्यामुळे अडकले असते दोन सैनिक; ट्रम्प यांचा खुलासा
3
Stock Markets Today: Sensex मध्ये ७५० अंकांची मोठी घसरण, निफ्टी २०० अंकांनी घसरला; ऑटो-रियल्टी इंडेक्स १-१ टक्क्यांनी घसरले
4
‘भळाभळा रक्त वाहत होते, पण तो…’ ट्रम्प यांनी सांगितली इराणमध्ये अडकलेल्या ‘त्या’ सैनिकाच्या शौर्याची कहाणी  
5
LPG Price Today: आज एलपीजी सिलिंडरच्या किमतीबाबत काय आहेत अपटेड? पटापट चेक करा
6
आजचे राशीभविष्य, ०७ एप्रिल २०२६: गूढ रहस्यमय विद्येचे आकर्षण राहील; प्रकृती उत्तम राहील
7
'आमच्या बाई आम्हाला परत द्या', विद्यार्थ्यांचा टाहो; जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनासमोर चिमुरड्यांचा ठिय्या
8
Air India च्या सीईओंचा राजीनामा, अनेक आव्हानांचा सामना करतेय कंपनी; पाहा डिटेल्स
9
इराणला अमेरिकेचा अखेरचा अल्टिमेटम; "रात्री ८ पर्यंत निर्णय घ्या, अन्यथा थेट पाषाण युगात पाठवू"
10
राज्यातील खासदार, आमदारांविरोधात हत्या, बलात्काराचे खटले; आकडेवारीत मुंबई प्रथम
11
भोंदू अशोक खरातवर EDकडून गुन्हा दाखल; आर्थिक गैरव्यवहारप्रकरणी लवकरच होणार छापेमारी
12
समान नागरी संहिता, वन नेशन-वन इलेक्शन हे भाजपचे अजेंडे अद्याप अपूर्ण: पंतप्रधान मोदी
13
राष्ट्र समृद्ध आणि सुरक्षित असेल तरच वैयक्तिक समृद्धी शक्य- सरसंघचालक मोहन भागवत
14
धोक्याची घंटा! एआय डेटा सेंटर्समुळे वाढतोय पृथ्वीचा पारा; कोट्यवधींवर ओढावणार संकट
15
अनिल अंबानी समूहाच्या कर्ज प्रकरणात ७३ हजार कोटी रुपयांचा महाघोटाळा; CBIचा दावा
16
दिल्ली विधानसभेत थरार! कडक सुरक्षा व्यवस्थेला आव्हान देत बॅरिकेड तोडून SUV आत
17
आसाममध्ये हिमंता बिस्वा सरमा सत्ता टिकवणार की, गौरव गोगोई समीकरणे बदलणार?
18
इराणमधील अनेक शहरांवर बॉम्ब हल्ले; शैक्षणिक संस्थाही लक्ष्य, २५ हून अधिक नागरिक ठार
19
आयपीओंचा महापूर, ३८ ‘ड्राफ्ट पेपर’ दाखल! १२४ कंपन्या मुहूर्ताच्या प्रतीक्षेत, गुंतवणूकदारांची चांदी
20
तामिळनाडूमध्ये ७५ टक्के मंत्रिमंडळ भ्रष्टाचाराच्या खाईत अडकलेले : देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

सत्ताधाऱ्यांकडे सांगण्यासारखे काहीच नाही-बच्चू कडू यांची टीका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 8, 2018 00:48 IST

 कोल्हापूर : राज्य सरकारकडे गेल्या तीन वर्षांत सांगण्यासारखी विकासकामे नाहीत. शेतकरी, दिव्यांग यांच्यासह सर्व घटक सरकारवर नाराज आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते विरोधी पक्षांना कुत्रे, मांजरांसारखी उपमा देऊन सर्वसामान्यांचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून विचलित करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका प्रहार संघटनेचे संस्थापक व आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी केली. ‘अखिल भारतीय ...

 कोल्हापूर : राज्य सरकारकडे गेल्या तीन वर्षांत सांगण्यासारखी विकासकामे नाहीत. शेतकरी, दिव्यांग यांच्यासह सर्व घटक सरकारवर नाराज आहेत. भाजपचे वरिष्ठ नेते विरोधी पक्षांना कुत्रे, मांजरांसारखी उपमा देऊन सर्वसामान्यांचे लक्ष मूळ मुद्द्यांवरून विचलित करण्याचे काम करीत आहेत, अशी टीका प्रहार संघटनेचे संस्थापक व आमदार बच्चू कडू यांनी शनिवारी केली. ‘अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटने’च्या वतीने शाहू स्मारक भवन येथे आयोजित सत्कार समारंभानंतर ते पत्रकारांशी बोलत होते.

यावेळी आमदार कडू म्हणाले, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दीडपट हमीभावासह सामान्य जनतेच्या बँक खात्यावर १५ लाख रुपये जमा करण्याचे आश्वासन दिल होते. सत्ता आल्यानंतर केंद्र सरकारने जाहीर केलेला हमीभाव आणि राज्य सरकारने केलेली शिफारस यांमध्ये ५० टक्क्यांचा फरक असल्याने दीडपट हमीभाव कसा देणार, असा सवालही त्यांनी केला. सरकारकडे संजय गांधी निराधार योजनेची पेन्शन देण्यास निधी नसताना १५ लाख कोठून जमा करणार, असा टोला त्यांनी सरकारला लगावला. केंद्र सरकारने अनाथ मुलांसाठी सर्वच ठिकाणी आरक्षण जाहीर केले; पण राज्य सरकारने आरक्षणाची व्याख्याच बदलून टाकली आहे. आरक्षणाची मोडतोड केल्याने अनेक अनाथ मुले आरक्षणापासून वंचित राहणार आहेत. त्यामुळे राज्य सरकारला१५ आॅगस्टपर्यंत नव्याने मसुदा तयार करून देणार आहोत.

एकलव्य व छत्रपती पुरस्कारप्राप्त दिव्यांग खेळाडूंना थेट नोकरीमध्ये सामावून घेण्याचा अध्यादेश२००३ मध्ये काढला; पण प्रशासनाने त्याची अद्यापही कार्यवाही केलेली नाही. यावरून प्रशासनावर वचक नसल्याचे सिद्ध होत आहे. याही अध्यादेशाची अंमलबजावणी करण्यास सरकारला भाग पाडू. शिवशाही बसमध्ये दिव्यांगांसाठी असणारे आरक्षण बंद केले आहे. तेही पुन्हा सुरू न केल्यास ही बस बंद पाडू, असा इशाराही त्यांनी दिला.

यावेळी अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्यावतीने दिव्यांगांना पेन्शन मिळवून दिल्याबद्दल आमदार कडू यांचा विठ्ठल पोवार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी संदीप मोहिते, दत्ताभाऊ खंडागळे, डॉ. श्रीकांत पाटील, देवदत्त माने, आदी उपस्थित होते. डॉ. श्रीकांत पाटील यांनी प्रास्ताविक केले. दगडू माने यांनी आभार मानले.प्रतीकात्मक घरकुल बांधून आंदोलनकेंद्र सरकारने अनुसूचित जाती व जमातींमधील दिव्यांगांना घरकुल देण्याचे मान्य केले आहे; पण यामध्ये खुल्या व ओबीसी घटकांचा समावेश केलेला नाही. या प्रवर्गातील दिव्यांगांना घरकुल देण्यासाठी पंतप्रधान मोदी व मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या नावाने घरकुल बांधून प्रतीकात्मक आंदोलन करणार आहे.अखिल भारतीय प्रहार चित्रपट संघटनेच्यावतीने शाहू स्मारक भवन येथे दिव्यांगांना पेन्शन मिळवून दिल्याबद्दल आमदार बच्चू कडू यांचा विठ्ठल पाटील यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. यावेळी देवदत्त माने, संदीप मोहिते, दत्ताभाऊ खंडागळे, डॉ. श्रीकांत पाटील, आदी उपस्थित होते.