शहरं
Join us  
Trending Stories
1
कैमूरमध्ये मतमोजणीदरम्यान मोठा हिंसाचार; पोलिसांचा लाठीचार्ज, दगडफेकीत ३ पोलीस जखमी, स्कॉर्पिओ जाळली
2
कोपरगावजवळ भीषण अपघात; लक्झरी बसच्या धडकेत कार जळून खाक, चालकाचा जागीच मृत्यू
3
बिहारचा निकाल खरोखरच धक्कादायक; पराभवाची सखोल समीक्षा करणार: राहुल गांधी
4
२०१५ ते २०२५.... संघ सक्रियतेनंतर बिहारमध्ये भाजपचा ‘ग्राफ’ वर!
5
दिल्ली स्फोट: लष्कराने डॉ. उमर नबीचे घर आयईडी बॉम्बस्फोट करून उडवून दिले; ६ डिसेंबरसाठी ३२ कार तयार होत्या...
6
कर्ज फेडण्यासाठी इंजिनिअरच्या मुलानेच रचले स्वतःच्या अपहरणाचे नाटक; ५० लाखांची खंडणी मागितली अन्... 
7
बिहारमध्ये NOTA ला किती मतदान झाले? २०२० च्या तुलनेत किती टक्के वाढ झाली?
8
वैभव सूर्यवंशीचा दणका, ३२ चेंडूत केला 'शतकी धमाका'! लगावले १५ षटकार; टी२० मध्ये 'अशी' कामगिरी करणारा एकमेव खेळाडू
9
Travel : भारताचे १०००० रुपये घेऊन जा आणि मनसोक्त फिरा 'हा' देश! संस्कृती, शॉपिंग सगळ्यासाठी बेस्ट
10
'नितीश कुमार पुन्हा मुख्यमंत्री होतील, मला पूर्ण विश्वास', चिराग पासवान यांचे सूचक विधान
11
पाकिस्तानच्या मंत्र्याने केले मोठे विधान; चीनचे अब्जावधी डॉलर्स वाया गेले? ड्रॅगनचे टेन्शन वाढले
12
Bihar Election 2020 vs 2025: बिहारमध्ये कोणत्या पक्षाला सर्वाधिक फटका, कोणाला पक्षाला मिळाला 'बुस्टर डोज'
13
हा बिहार नाही...! निवडणूक निकालाने उत्साहित भाजपच्या बंगालसंदर्भातील विधानावर टीएमसीची प्रतिक्रिया
14
आयुष्यमान कार्डचे हे काम लगेच करा; नाहीतर ५ लाखांचा लाभ मिळणार नाही
15
CM उमर अब्दुल्लांना मोठा धक्का; J-K पोटनिवडणुकीत दोन्ही जागांवर पराभव, भाजपचा विजय...
16
राहुल गांधी आतापर्यंत किती निवडणुका हरले? भाजपनं थेट आकडाच सांगितला, उडवली खिल्ली! 
17
बायकोचा महागड्या क्रिम्सवर खर्च, नवरा कंगाल होताच गेली सोडून; आता झाला डिलिव्हरी ड्रायव्हर
18
बिहारमध्ये सुशासन आणि विकासचा विजय; निवडणूक निकालावर पंतप्रधान मोदींच पहिली प्रतिक्रिया, आणखी काय म्हणाले?
19
बिबट्याने घेतला नरडीचा घोट; पाच वर्षाच्या रियांकाचा शाळेच्या पाठीमागे मिळाला मृतदेह
20
Bihar Election Result: जसा सांगितला, तसाच निकाल लागला; मराठी माणसाचा एक्झिट पोल तंतोतंत खरा ठरला 
Daily Top 2Weekly Top 5

‘बीएलओं’ला निवडणूक विभागाकडील फॉर्म आणायला वेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:22 IST

प्रवीण देसाई । कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीची मोहीम गतीने सुरु आहे; परंतु आळसावलेल्या ‘बीएलओं’मुळे नागरिकांना मनस्ताप ...

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीची मोहीम गतीने सुरु आहे; परंतु आळसावलेल्या ‘बीएलओं’मुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवडणूक विभागाकडे मतदार नोंदणीचे फॉर्म उपलब्ध असूनही ते आणण्यास त्यांना वेळ नाही. उलट ‘तुम्हीच झेरॉक्स काढा,’ असे नागरिकांना सांगून त्यांना भुर्दंड घालण्याचे प्रकार होत आहेत.निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये नावनोंदणी, नावातील दुरुस्ती, मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करणे, आदी कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारीच्या (बीएलओ) माध्यमातून करायची आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने हे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे; परंतु काही ‘बीएलओ’ मात्र जिल्हा प्रशासनालाही जुमानायला तयार नाहीत. रविवारी सुट्टीदिवशी विशेष मोहीम घेण्यात येत आहे. हा रविवार शेवटचा असल्याने बहुतांश मतदान केंद्रांवर नोंदणीसाठी गर्दी होती. नावनोंदणी, स्थलांतरण, नावात दुरुस्ती यांसाठी निवडणूक विभागाकडून सर्वच ‘बीएलओं’ना फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत; परंतु काही आळसावलेल्या ‘बीएलओं’नी कळसच केला आहे. ते निवडणूक विभागाकडे फॉर्मच आणायला फिरकलेले नाहीत. त्यांनी आपल्याच पातळीवर ‘फॉर्मची झेरॉक्स काढा आणि नावनोंदणी करा,’ असा फॉर्म्युला राबविला आहे. दौलतनगर शेजारील एका शाळेत, तसेच राजेंद्रनगर येथील एका मतदान केंद्रातील हा प्रकार रविवारी समोर आला. नावनोंदणी व स्थलांतरासंदर्भातील फॉर्म मागण्यासाठी गेलेल्या नागरिकाला ‘तुम्हीच झेरॉक्स काढून आणा,’ असा सल्ला ‘बीएलओं’नी दिला. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश ठिकाणची झेरॉक्स सेंटर बंद असल्याने नागरिकांची दिवसभर फरफट झाली. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.निवडणूक विभागाकडे चौकशी केली असता पुरेशा प्रमाणात फॉर्म उपलब्ध आहेत. जर फॉर्म संपले असतील तर संबंधित ‘बीएलओ’ने ते येऊन नेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. नागरिकांना परस्पर झेरॉक्स काढायला लावणे हे चुकीचे असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.