शहरं
Join us  
Trending Stories
1
"सैनिकांचे मनोबल तोडू नका"; पहलगाम हल्ल्याची चौकशी करण्याची मागणी करणाऱ्यांना कोर्टाने फटकारले
2
महायुती सरकारचं १०० दिवसांचं प्रगती पुस्तक जाहीर; २४ टक्के मिळवत 'हा' विभाग ठरला नापास
3
३५ वर्ष हेच सुरू, काश्मिरींना खूप त्रास सहन करावा लागतो; पहलगामवरून फारूक अब्दुल्ला थेट बोलले
4
पहलगाम हल्ल्याच्या लिंक शोधतेय ATS! तपासला सुरुवा होताच रुग्णालयात पोहोचली सीमा हैदर; जाणून घ्या संपूर्ण प्रकरण
5
UPI युजर्ससाठी दिलासादायक बातमी, आता प्रत्येक ट्रान्झॅक्शन १५ सेकंदात होणार; स्टेटसही लवकर कळणार
6
अमृता खानविलकरची Waves summit मध्ये हजेरी, 'थलायवा'सोबत फोटो शेअर करत म्हणाली...
7
“राज्य किती कमजोर झाले याची श्वेतपत्रिका काढा, दिल्लीसमोर झुकणारा महाराष्ट्र निर्माण झाला”
8
Pahalgam Terror Attack : "तुमची आजी जिवंत असती तर पहलगाम हल्ला झाला नसता"; राहुल गांधींना भेटताच शुभमचे वडील भावुक
9
“आरक्षणाची ५० टक्क्यांची मर्यादा हटवावी, जातनिहाय जनगणनेची कालमर्यादा जाहीर करावी”: काँग्रेस
10
"समस्या दाढीची नाही, तर..."; पतीला सोडून दीरासोबत पळाली होती वहिनी, कहानीत नवा ट्विस्ट
11
प्रत्येक पाकिस्तानीने भारत सोडला पाहिजे, भारत सरकारने परतण्याची अंतिम मुदत वाढवली
12
“जातनिहाय जनगणना निर्णयाचे श्रेय राहुल गांधींनाच, सरकारला गुडघे टेकायला लागले”: संजय राऊत
13
भरत जाधव यांनी शेतात बांधलंय राधाकृष्णाचं मंदिर, म्हणाले- "मुंबईत येताना वडिलांनी कृष्णाचा फोटो आणला आणि... "
14
भारतानं एअरस्पेस केली बंद, जाणून घ्या पाकिस्तानला कसा बसणार फटका; 'इतकं' होणार नुकसान
15
पतीला लागला नाद! एका महिलेसोबत रंगेहाथ पकडल्यानंतर दुसरीसोबत गेला पळून, पत्नीने...
16
इलेक्ट्रिक शॉक, हाडे मोडली, डोळे, मेंदूही काढला,अन्...: महिला पत्रकाराचा भयावह अंत
17
अजिबात 'या' वेळी करू नका ब्रश, नाहीतर लवकर किडतील दात; ९०% लोक करतात 'ही' चूक
18
दारूची बाटली फुटली अन् वाद झाला; मैत्री झाली पण, नंतर...; सीसीटीव्हीमुळे उलगडली व्यक्तीच्या हत्येची कहाणी
19
आजपासून ११ राज्यांतील १५ बँका बंद, ग्रामीण बँकांचं मर्जर; One State-One RRB पॉलिसी झाली लागू
20
भारताकडून पाकिस्तानचा गोल्ड मेडिलिस्ट अर्शद नदीमचे इंस्टाग्राम अकाऊंट ब्लॉक!

‘बीएलओं’ला निवडणूक विभागाकडील फॉर्म आणायला वेळ नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 29, 2018 00:22 IST

प्रवीण देसाई । कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीची मोहीम गतीने सुरु आहे; परंतु आळसावलेल्या ‘बीएलओं’मुळे नागरिकांना मनस्ताप ...

प्रवीण देसाई ।कोल्हापूर : लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदार नोंदणीची मोहीम गतीने सुरु आहे; परंतु आळसावलेल्या ‘बीएलओं’मुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. निवडणूक विभागाकडे मतदार नोंदणीचे फॉर्म उपलब्ध असूनही ते आणण्यास त्यांना वेळ नाही. उलट ‘तुम्हीच झेरॉक्स काढा,’ असे नागरिकांना सांगून त्यांना भुर्दंड घालण्याचे प्रकार होत आहेत.निवडणूक आयोगाने १ सप्टेंबर ते ३१ आॅक्टोबर या कालावधीमध्ये मतदार नोंदणीसाठी विशेष पुनरीक्षण कार्यक्रम सुरू केला आहे. यामध्ये नावनोंदणी, नावातील दुरुस्ती, मतदारांची रंगीत छायाचित्रे गोळा करणे, आदी कामे मतदान केंद्रस्तरीय अधिकारीच्या (बीएलओ) माध्यमातून करायची आहेत. जिल्हा निवडणूक विभागाने हे काम युद्धपातळीवर सुरू केले आहे; परंतु काही ‘बीएलओ’ मात्र जिल्हा प्रशासनालाही जुमानायला तयार नाहीत. रविवारी सुट्टीदिवशी विशेष मोहीम घेण्यात येत आहे. हा रविवार शेवटचा असल्याने बहुतांश मतदान केंद्रांवर नोंदणीसाठी गर्दी होती. नावनोंदणी, स्थलांतरण, नावात दुरुस्ती यांसाठी निवडणूक विभागाकडून सर्वच ‘बीएलओं’ना फॉर्म उपलब्ध करून दिले आहेत; परंतु काही आळसावलेल्या ‘बीएलओं’नी कळसच केला आहे. ते निवडणूक विभागाकडे फॉर्मच आणायला फिरकलेले नाहीत. त्यांनी आपल्याच पातळीवर ‘फॉर्मची झेरॉक्स काढा आणि नावनोंदणी करा,’ असा फॉर्म्युला राबविला आहे. दौलतनगर शेजारील एका शाळेत, तसेच राजेंद्रनगर येथील एका मतदान केंद्रातील हा प्रकार रविवारी समोर आला. नावनोंदणी व स्थलांतरासंदर्भातील फॉर्म मागण्यासाठी गेलेल्या नागरिकाला ‘तुम्हीच झेरॉक्स काढून आणा,’ असा सल्ला ‘बीएलओं’नी दिला. सुट्टीचा दिवस असल्याने बहुतांश ठिकाणची झेरॉक्स सेंटर बंद असल्याने नागरिकांची दिवसभर फरफट झाली. हे एक प्रातिनिधिक उदाहरण आहे.निवडणूक विभागाकडे चौकशी केली असता पुरेशा प्रमाणात फॉर्म उपलब्ध आहेत. जर फॉर्म संपले असतील तर संबंधित ‘बीएलओ’ने ते येऊन नेण्याची जबाबदारी त्याच्यावर आहे. नागरिकांना परस्पर झेरॉक्स काढायला लावणे हे चुकीचे असून संबंधितांवर कारवाई केली जाईल, असे सांगण्यात आले.