शहरं
Join us  
Trending Stories
1
'1971 आणि 2025 ची परिस्थिती वेगळी', युद्धविराम अन् इंदिरा गांधींबाबत शशी थरुर स्पष्टच बोलले
2
भारतानं पाकिस्तानात घुसून मारलं, लष्कराचा दरारा रावळपिंडीपर्यंत पोहोचला; ऑपरेशन सिंदूरवर राजनाथ सिंह स्पष्टच बोलले 
3
Yogi Adityanath : "पाकिस्तानला विचारा 'ब्रह्मोस' क्षेपणास्त्राची ताकद काय आहे?"; योगी आदित्यनाथ कडाडले
4
"मी मोठी झाल्यावर सैन्यात भरती होईन आणि बदला घेईन"; शहीद जवानाच्या लेकीचा निर्धार
5
भारत-पाकिस्तान संघर्षाचा BCCI ला मोठा फटका; आठवड्यात ४२० कोटी रुपये पाण्यात जाणार?
6
Ceasefire Violation: भारतासोबत शस्त्रसंधीची चर्चा करणारे पाकिस्तानी लष्कराचे डीजीएमओ कोण आहेत?
7
Bhagwant Mann : "देशाच्या हितासाठी पंजाब रक्त..."; भगवंत मान यांची राजस्थानला अतिरिक्त पाणी देण्याची मोठी घोषणा
8
युद्धविराम पंतप्रधान मोदींनी घेतली उच्चस्तरीय बैठक, तिन्ही लष्करप्रमुखांसह अजित डोवाल, राजनाथ सिंहांची उपस्थिती
9
लक्ष्य साध्य झाले पण 'ऑपरेशन सिंदूर' अजूनही सुरुच; हवाई दलाने दिली मोठी अपडेट...
10
मेळघाटातील ‘त्या’ आरएफओंची राज्य महिला आयोगाकडे धाव, ‘त्या’ अधिकाऱ्याला अभय
11
फक्त एक मिस्ड कॉल किंवा SMS द्वारे PF बॅलन्स तपासा; कुठेही लॉगइन करण्याची गरज नाही
12
'युद्धविरामचे पालन करू, पण काश्मीर अन् सिंधू करार...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे मोठे विधान
13
फक्त ४० रुपयांमध्ये पोटभर जेवण! 'या' बॉलिवूड कलाकाराने उघडलंय हॉटेल, चाहत्यांकडून कौतुक
14
मुलगा देशसेवेसाठी दिलाय;काही झालं तर मन घट्ट केलंय! कर्नल नितीन काळदाते यांच्या आईची कृतार्थ भावना
15
पैशांसाठी कुणावरही अवलंबून राहू नये असं वाटतं? मग आजपासून 'या' १० टीप्स फोलो करा
16
IPL Re-Start : फायनल ठरलेल्या दिवशीच खेळवण्याचा प्लॅन; पण ते कसं शक्य होईल?
17
पाकिस्तानकडून युद्धविरामचे उल्लंघन; भारतीय क्रिकेटपटूंनी पाकची केली कुत्र्याची तुलना, म्हणाले...
18
"बुद्धिमत्तापूर्ण आणि संतुलित"; पी चिदंबरम यांनी पंतप्रधान मोदींच्या युद्ध धोरणाचं केलं भरभरुन कौतुक
19
पुन्हा समोर आला पाकिस्तानचा दुटप्पी चेहरा; युद्धविरामानंतर रात्री काय-काय घडलं? जाणून घ्या
20
भीषण! भरधाव कारने घराबाहेर बसलेल्या महिलेसह ४ मुलांना चिरडलं; थरकाप उडवणारा Video

निधीसाठी पालकमंत्र्यांना दहावेळा विनंती करून साधी बैठकही नाही : सतेज पाटील

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 4, 2018 00:53 IST

कोल्हापूर : शहराचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी, तसेच शहराच्या विकासासाठी जादा निधी मिळवून द्यावा याकरिता चर्चा करून निर्णय घ्यावा ...

कोल्हापूर : शहराचे रखडलेले प्रश्न मार्गी लावण्यासाठी, तसेच शहराच्या विकासासाठी जादा निधी मिळवून द्यावा याकरिता चर्चा करून निर्णय घ्यावा म्हणून पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे मी स्वत: दहा वेळा विनंती केली; पण त्यांनी अद्यापही प्रतिसाद दिलेला नाही. निधी मिळाला नसल्यामुळे शहरात विकासकामे झालेली नाहीत, अशा शब्दांत आमदार सतेज पाटील यांनी सोमवारी येथे खंत बोलून दाखविली. अशीच खंत आमदार हसन मुश्रीफ यांनीही व्यक्त केली.कॉँग्रेस - राष्टÑवादी आघाडीतील नगरसेवकांच्या बैठकीत ते बोलत होते. महापालिकेत सत्ता टिकविण्याचे काम आम्ही केले; मात्र राज्यात व देशात भाजपचे सरकार आले. त्यामुळे विकासकामे करण्यात खूपच अडचणी येत आहेत. . त्यामध्ये आम्ही आणलेल्या थेट पाईपलाईनचा प्रश्न महत्त्वाचा आहे. सरकारच्या हस्तक्षेपाशिवाय हा प्रकल्प पूर्ण होणे अशक्य आहे. शहरातील रस्ते प्रचंड खराब झाले आहेत. त्याकरिता किमान २५ कोटींचा निधी राज्य सरकारने द्यावा, तसेच एलबीटीच्या वाढीव उत्पन्नाचा काही भाग पालिकेलाही मिळावा यासाठी प्रयत्न करीत आहोत, असे पाटील यांनी सांगितले.आमदार मुश्रीफ यांनीही हाच धागा पकडून शहरातील रखडलेल्या कामांबाबत तीव्र नाराजी व्यक्त केली. या प्रश्नाकडे लक्ष वेधण्याकरिता आम्ही विधानसभेच्या दारात उभे राहून आंदोलन केले; मात्र तरीही त्याकडे दुर्लक्ष होत आहे.पाणी काय फक्त कॉँग्रेस-राष्ट्रवादीलाथेट पाईपलाईन हे एक आमचे स्वप्न होते. योजना मंजूर झाल्यानंतर त्याचे काम गतीने होणे आवश्यक होते; पण सरकारचीच अनेक खाती अडचणी निर्माण करीत आहेत. ही योजना पूर्ण झाल्यावर केवळ कॉँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या प्रभागांतच पाणी मिळणार आहे आणि भाजप - ताराराणीच्या प्रभागांत मिळणार नाही असे काहीच नाही. सर्वांनाच पाणी मिळणार आहे, असे आमदार पाटील म्हणाले.