शहरं
Join us  
Trending Stories
1
भारताच्या कारवाईमुळे बांगलादेश खवळला, भारतीयांसाठी व्हिसा सर्व्हिस केली बंद 
2
‘बांगलादेशी आहेस का?’, केरळमध्ये परप्रांतीय तरुणाला बेदम मारहाण, रुग्णालयात मृत्यू 
3
वैभव सूर्यवंशी आणि आयुष म्हात्रेनं जशास तसे उत्तर दिलं; पण सरफराज अहमदला ते नाही दिसलं! म्हणे...
4
रशियाला युद्धादरम्यान मोठा धक्का ! सैन्याचे लेफ्टनंट जनरल सर्वारोव्हचा कार स्फोटात मृत्यू
5
सौदी अरेबियातील वाळवंटात पसरली बर्फाची चादर, अनेक वर्षांनंतर दिसलं असं चित्र, आपली पृथ्वी देतेय असे संकेत
6
बाथरूममध्ये तरुणाने प्रस्थापित केले संबंध, अतिरक्तस्त्रावाने गर्लफ्रेंडचा मृत्यू, वडिलांचे गंभीर आरोप
7
युजवेंद्र चहलने विकत घेतली आलिशान BMW Z4 कार; भारतात त्याची किंमत ऐकून धक्काच बसेल!
8
नवीन वर्षाच्या सुरूवातीला कमी हाेणार थंडीचा जोर; हवामान तज्ज्ञांनी व्यक्त केला अंदाज
9
Vijay Hazare Trophy स्पर्धेत दिसणार रोहित-विराटचा जलवा! ही जोडी कधी अन् कोणत्या मैदानात खेळणार सामना?
10
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
11
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
12
AI शक्तिशाली सहाय्यक, मात्र मानवी मेंदूला पर्याय नाही; सर्व तज्ज्ञांचे एकमताने शिक्कामोर्तब
13
भारतीय ऑलराउंडरची क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती! IPL लिलावात CSK नं लावली होती विक्रमी बोली
14
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
15
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
16
Video: उकळत्या तेलात हात घालून काढते गरमागरम पकोडे... 'समोसा गर्ल' ची रंगलीये तुफान चर्चा
17
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
18
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
19
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
20
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
Daily Top 2Weekly Top 5

विचारशक्तीशिवाय क्रांती नाही

By admin | Updated: January 18, 2015 00:36 IST

मंदाकिनी आमटे : ताराराणी विद्यापीठातर्फे ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कारा’ने गौरव

कोल्हापूर : जोपर्यंत विचारांची शक्ती वाढत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही. हीच विचारांची क्रांती आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून या आदिवासींच्यात वाढविल्यामुळे आज ते माणूस म्हणून जगत आहेत, असे प्रतिपादन डॉ. मंदाताई आमटे यांनी व्यक्त केले. ताराराणी विद्यापीठातर्फे अखिल भारतीय स्तरावरील महिलेस दिला जाणाऱ्या ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कारा’ने त्यांना गौरविण्यात आले. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कोल्हापुरातील व्ही. टी. पाटील सभागृहात आज, शनिवारी कै. डॉ. व्ही. टी. पाटील तथा काकाजी यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी ‘लोकबिरादरी’चे प्रमुख प्रकाश आमटे, कमला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मंदाताई आमटे म्हणाले, आम्ही लोकबिरादरी हा प्रकल्प सुरू केला तेव्हा प्रथम भाषेची अडचण आली येथील स्थानिक लोक आमच्या जवळ येत नव्हते. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांची भाषा अवगत केली. त्यांच्यासोबत बोलू लागलो. त्यांचा आमच्यावर विश्वास बसला. त्यांच्यात खूप मोठी अंधश्रद्धा होती ती कमी करण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. अनेक मुले आज अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर या पदांवर काम करत आहेत. माजी वनमंत्री पतंगराव कदम म्हणाले, आज-काल दुसऱ्याला किरकोळ मदत करतात आणि आपण किती समाजकार्य केले हे दाखविण्यासाठी धडपडतात. मात्र, आमटे कुटुंबीय म्हणजे त्याग आणि सहनशीलतेचे प्रतीकच होय. आदिवासी लोकांनी माणूस जगावे या उद्देशाने आज त्यांची तिसरी पिढी कार्यरत आहे. हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. आमटे कुटुंबीय समाजकार्यात झोकून देऊन काम करत आहेत डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, तरुणांनी आपल्या गरजा किती आहेत हे ओळखल्या पाहिजेत. फक्त पैशांतूनच सर्व गोष्टी मिळतात असे नाही. समाजाची आपली काही तरी बांधीलकी आहे. ही गोष्ट सतत मनात ठेवली पाहिजे. सूत्रसंचालन प्रा. डॉ. तेजस्विनी मुडेकर व अंजली साठे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले. पैसा कुठे मुरला कळाले नाही सरकारने आदिवासींसाठी खूप पैसा खर्च केला, पण हा पैसा कुठे मुरला हे काही कळाले नाही. गडचिरोलीसारख्या भागात काम करण्यासाठी कोणी अधिकारी धजत नाही. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याने जर काम केले नाही, तर आम्ही त्याला गडचिरोलीला पाठवेन, असा दम देतो, असे पतंगराव कदम म्हणताच सभागृहात हश्या पिकला.