शहरं
Join us  
Trending Stories
1
'अश्लील फोटो, मेसेज अन्...', भाजप आमदार शिवाजी पाटलांना 'हनी ट्रॅप'मध्ये अडकवण्याचा प्रयत्न; सख्ख्या बहीण-भावाला अटक
2
भारतीय संघासमोर ऑस्ट्रेलियाचा ऐतिहासिक विजय! हीलीच्या सेंच्युरीनंतर पेरीनं सिक्सर मारत संपवली मॅच
3
Bihar Election 2025: एनडीएचं जागावाटप झालं, पण कोणाला करावी लागली तडजोड? २०२० मध्ये कोणी किती जागा लढवल्या होत्या?
4
"जे हुंडा घेतील ते नामर्द, बायको लक्ष्मी म्हणून घरात आणायची आणि..."; मकरंद अनासपुरेंचे परखड भाष्य
5
Thane: सराईत सोनसाखळी चोरट्यास ठाण्यात अटक; अडीच लाखांचे दागिने हस्तगत!
6
बदली रद्द करण्यासाठी पोलिसाचा 'जुगाड'; बनावट कागदपत्रे जोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल
7
Jemimah Rodrigues Flying Catch : जबरदस्त! जेमीनं हवेत झेपावत टिपला वर्ल्ड कप स्पर्धेतील सर्वोत्तम झेल
8
"माझ्या आणि प्रकाश आंबेडकर यांच्यातही..." ठाकरे बंधूंच्या भेटीवर रामदास आठवलेंचं मोठं वक्तव्य
9
ऐतिहासिक भागीदारी! ऑस्ट्रेलियाविरुद्ध स्मृती मानधना- प्रतीका रावल यांनी रचला विक्रम
10
NDA चे जागावाटप ठरले! BJP-JDU प्रत्येकी 101 जागांवर लढणार; चिराग अन् माझींंच्या पक्षाला किती जागा?
11
बाबासाहेबांचे आर्थिक, सामाजिक समानतेचे स्वप्न पूर्ण होईल: सरन्यायाधीश भूषण गवई
12
सांगलीकर स्मृतीची बॅट चांगलीच तळपली; एक्स्प्रेस वेगानं ५००० धावा करत 'चारचौघीं'वर पडली भारी!
13
Nagpur: दिवाळीच्या गर्दीत नागपूर रेल्वेस्थानक हाउसफुल, आरपीएफ- जीआरपीची गस्त वाढली, गुन्हेगारांवर नजर!
14
"अमेरिकेची भूमिका दुटप्पी, आम्हीही..."; ट्रम्प यांच्या १०० टक्के टॅरिफच्या धमकीला चीनचे उत्तर
15
IND vs AUS : स्मृती-प्रतीकाची तुफान फटकेबाजी; टीम इंडियाने ऑस्ट्रेलियासमोर उभारली विक्रमी धावसंख्या
16
संतापजनक! प्रेमानंद महाराजांची भेट करुन देण्याच्या बहाण्याने हॉटेलमध्ये महिलेवर अत्याचार, मथुरा येथे आरोपीला अटक
17
Viral Video: तिकीट न काढता मेट्रोतून प्रवास करण्याचा जुगाड, व्हिडीओ पाहून डोक्याला माराल हात!
18
Thane Video: पतीला मारहाण करत शिवीगाळ, मनसे पदाधिकारी असलेल्या पत्नीने परप्रांतीय महिलेच्या लगावली कानशिलात; ठाण्यातील घटना
19
नैतिकता शिवणाऱ्या IAS अधिकाऱ्याने घेतली १० कोटींची लाच; कोण आहेत नागार्जुन गौडा? जाणून घ्या प्रकरण...
20
IND vs WI 2nd Test Day 3 Stumps : फॉलोऑनची नामुष्की ओढावल्यावर या दोघांची बॅट तळपली, अन्...

विचारशक्तीशिवाय क्रांती नाही

By admin | Updated: January 18, 2015 00:36 IST

मंदाकिनी आमटे : ताराराणी विद्यापीठातर्फे ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कारा’ने गौरव

कोल्हापूर : जोपर्यंत विचारांची शक्ती वाढत नाही तोपर्यंत क्रांती होत नाही. हीच विचारांची क्रांती आम्ही शिक्षणाच्या माध्यमातून या आदिवासींच्यात वाढविल्यामुळे आज ते माणूस म्हणून जगत आहेत, असे प्रतिपादन डॉ. मंदाताई आमटे यांनी व्यक्त केले. ताराराणी विद्यापीठातर्फे अखिल भारतीय स्तरावरील महिलेस दिला जाणाऱ्या ‘भद्रकाली ताराराणी पुरस्कारा’ने त्यांना गौरविण्यात आले. त्याप्रसंगी सत्काराला उत्तर देताना त्या बोलत होत्या. कोल्हापुरातील व्ही. टी. पाटील सभागृहात आज, शनिवारी कै. डॉ. व्ही. टी. पाटील तथा काकाजी यांच्या विसाव्या स्मृतिदिनानिमित्त या पुरस्काराचे वितरण माजी वनमंत्री पतंगराव कदम यांच्या हस्ते देण्यात आला. याप्रसंगी ‘लोकबिरादरी’चे प्रमुख प्रकाश आमटे, कमला महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांची प्रमुख उपस्थिती होती. डॉ. मंदाताई आमटे म्हणाले, आम्ही लोकबिरादरी हा प्रकल्प सुरू केला तेव्हा प्रथम भाषेची अडचण आली येथील स्थानिक लोक आमच्या जवळ येत नव्हते. स्थानिक अधिकाऱ्यांच्या मदतीने त्यांची भाषा अवगत केली. त्यांच्यासोबत बोलू लागलो. त्यांचा आमच्यावर विश्वास बसला. त्यांच्यात खूप मोठी अंधश्रद्धा होती ती कमी करण्यासाठी त्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणले. अनेक मुले आज अधिकारी, डॉक्टर, इंजिनिअर या पदांवर काम करत आहेत. माजी वनमंत्री पतंगराव कदम म्हणाले, आज-काल दुसऱ्याला किरकोळ मदत करतात आणि आपण किती समाजकार्य केले हे दाखविण्यासाठी धडपडतात. मात्र, आमटे कुटुंबीय म्हणजे त्याग आणि सहनशीलतेचे प्रतीकच होय. आदिवासी लोकांनी माणूस जगावे या उद्देशाने आज त्यांची तिसरी पिढी कार्यरत आहे. हे खऱ्या अर्थाने कौतुकास्पद आहे. आमटे कुटुंबीय समाजकार्यात झोकून देऊन काम करत आहेत डॉ. प्रकाश आमटे म्हणाले, तरुणांनी आपल्या गरजा किती आहेत हे ओळखल्या पाहिजेत. फक्त पैशांतूनच सर्व गोष्टी मिळतात असे नाही. समाजाची आपली काही तरी बांधीलकी आहे. ही गोष्ट सतत मनात ठेवली पाहिजे. सूत्रसंचालन प्रा. डॉ. तेजस्विनी मुडेकर व अंजली साठे यांनी केले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. क्रांतिकुमार पाटील यांनी केले. पैसा कुठे मुरला कळाले नाही सरकारने आदिवासींसाठी खूप पैसा खर्च केला, पण हा पैसा कुठे मुरला हे काही कळाले नाही. गडचिरोलीसारख्या भागात काम करण्यासाठी कोणी अधिकारी धजत नाही. त्यामुळे एखाद्या अधिकाऱ्याने जर काम केले नाही, तर आम्ही त्याला गडचिरोलीला पाठवेन, असा दम देतो, असे पतंगराव कदम म्हणताच सभागृहात हश्या पिकला.