शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! महाराष्ट्राचे राज्यपाल सीपी राधाकृष्णन उपराष्ट्रपती पदाची निवडणूक लढणार; भाजपाची घोषणा
2
योगींच्या गोटात खळबळ! १०० हून अधिक आमदारांचा पत्ता कट होण्याची शक्यता; सपाही टेन्शनमध्ये...
3
लग्नानंतर ४५ दिवसांत असं काय घडलं, २७ वर्ष युवकानं स्वत:ला संपवलं?; आईला केला होता शेवटचा कॉल
4
पावसाळ्यात बेडूक येतात तसं निवडणूक आल्यावर जरांगे बाहेर पडतात; भाजपा आमदाराची बोचरी टीका
5
न्यायालयात लेखी स्वरुपात देणार का? निवडणूक आयोगाच्या 'त्या' वक्तव्यावर काँग्रेसचा पलटवार
6
'आता तरी उठा' या पुण्यातील बॅनरवरून अण्णा हजारेंनी मौन सोडलं, म्हणाले, "हे माझं दुर्दैव..."
7
महाराष्ट्रातील मतदानावर आरोप, ECI नं राहुल गांधींना सुनावलं; "निकालानंतर आरोप केले, पण आजपर्यंत एकही..."
8
जिथे नवीन मतदार, तिथे BJP चा विजय; महाराष्ट्रात जादूने १ कोटी मतदार निर्माण झाले- राहुल गांधी
9
दावा जगाची युद्धे थांबविल्याचा, ट्रम्पना वॉशिंग्टन डीसीतील परिस्थिती आवरेना...; दुसऱ्या राज्यातून सुरक्षा मागविली
10
आई-पत्नी आणि मुलीसमोर तरुणावर तलवारीने हल्ला; एका व्हॉट्सअॅप फॉरवर्डमुळे गेला जीव
11
७ दिवसांत प्रतिज्ञापत्र द्या अन्यथा देशाची माफी मागा; निवडणूक आयोगाचं राहुल गांधींना चॅलेंज
12
उतावीळ...! नोबेल द्या नाहीतर प्रचंड टेरिफ लावू...; ट्रम्प यांची नॉर्वेच्या अर्थमंत्र्यांना धमकी
13
'मत चोरी'च्या आरोपांना आम्ही घाबरत नाही; राहुल गांधींना निवडणूक आयोगाचे उत्तर
14
आता अफगाणिस्तानही पाकिस्तानचे पाणी रोखणार; नद्यांवर धरणे बांधण्यास सुरुवात 
15
तुमचं पॅन कार्ड हरवलंय? काळजी करू नका, घरबसल्या फक्त ५ मिनिटांत मिळेल डुप्लिकेट ई-पॅन
16
यंदा दिवाळीला डबल बोनस मिळणार; पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा
17
एल्विश यादवच्या घरावरील गोळीबाराचा व्हिडीओ समोर, ते आले अन् धाड धाड गोळ्या झाडल्या!
18
चोरट्यांनी शोधला बँक खाती रिकामी करण्याचा नवा मार्ग; काय आहे 'व्हॉट्सअ‍ॅप स्क्रीन मिररिंग फ्रॉड'?
19
कार-बाईक खरेदी करायचीय? दिवाळीपर्यंत थांबा; GST दरात बदलाची शक्यता, स्वस्तात मस्त दर मिळतील
20
बाजारातून परदेशी गुंतवणूकदारांचा काढता पाय? १५ दिवसात २१ हजार कोटी काढले; कारण आलं समोर

एलबीटीबाबत आता माघार नाही

By admin | Updated: June 12, 2014 00:50 IST

अजिज कारचे : प्रशासकीय त्रुटी व दराबाबतचा संभ्रम दूर करू

सांगली : राज्य शासनाने एलबीटीचा कायदा केला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला कराची वसुली करावीच लागणार आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार प्रशासकीय त्रुटी व दराबाबतच्या संभ्रम दूर करण्याची अजूनही तयारी आहे. आता एलबीटी वसुलीतून कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही, असे स्पष्ट भूमिका आयुक्त अजिज कारचे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. महापालिका हद्दीत एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एलबीटी की जकात याचा चेंडू महापालिकांच्या कोर्टात टाकण्यात आला. याबाबत आज आयुक्त कारचे यांची भेट घेतली असता एलबीटीची वसुलीसाठी ठोस पावले उचलण्याचे संकेत त्यांनी दिले.ते म्हणाले की, महापालिकेसाठी एलबीटी कर चांगला आहे. राज्यातील अनेक महापालिकांनी जकातीपेक्षा एलबीटीचे अधिक उत्पन्न मिळाले आहे. शासनाने एलबीटीचा कायदा केला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी वसुली करू नये, असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे महापालिकांना एलबीटीची वसूली करावीच लागेल. त्यातून माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. बैठकीत एलबीटीच्या दरातील तफावतीवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी दराबाबत लवचिक भूमिका घेण्याचे निर्देश दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी एलबीटी, जकात हे दोन पर्याय दिले आहेत. त्याशिवाय एलबीटीची वसुली विक्रीकरामार्फत करण्याच्याही पर्यायावर विचार सुरू आहे. वास्तविक सांगली महापालिका प्रशासनाने सुरुवातीपासून एलबीटीबाबत चर्चेची दारे खुली ठेवली होती. व्यापाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली आहे. एलबीटीतील त्रुटी दूर करण्याची अजूनही प्रशासनाची तयारी आहे. पण प्रत्येकवेळी व्यापारी संघर्षाच्या भूमिकेतून चर्चेला येतात. काही संघटनांची एलबीटी दराबाबत तक्रार आहे. तो संभ्रमही दूर करण्याची तयारी आहे. महापालिका कर्मचाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना त्रास दिला जाईल, अशी भीतीही व्यक्त केली जाते. त्यावर उपाय म्हणून तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची तयारी आहे. तसेच एक समिती नियुक्त करून दर आठवड्याला या तक्रारींचा आढावा घेतला जाईल. समितीत लोकप्रतिनिधी, अधिकारी, व्यापारी प्रतिनिधींचा समावेश असेल. त्यामुळे पालिका कर्मचारी व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रश्नच येणार नाही. एलबीटीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून व्यापाऱ्यांची बैठक बोलविण्याचा विचार आहे. जोपर्यंत एलबीटीचा कायदा अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्याची वसुली करावीच लागणार आहे. मला संस्थेचे हित महत्त्वाचे आहे. व्यापाऱ्यांनी कर भरला तर शहरातील सहा लाख नागरिकांना सुविधा देणे शक्य होणार आहे. त्यासाठी आता एलबीटीतून माघार घेणार नाही, असे स्पष्ट करीत ठोस कृती करण्याचे संकेत दिले. (प्रतिनिधी)