शहरं
Join us  
Trending Stories
1
Sambhajinagar Accident: संभाजीनगरात भीषण अपघात, भरधाव कार दुभाजकाला धडकून उलटली, ३ जण जागीच ठार!
2
IND vs ENG: केएल राहुलने शुभमन गिलकडून घेतली 'कॅप्टन्सी', पराभवापूर्वी सामन्यात अचानक काय घडलं?
3
संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा वाल्मीक कराडच 'डायरेक्टर'; न्यायालयात ३ तास काय झाला युक्तिवाद?
4
IND vs ENG: आधी चार झेल सोडले, नंतर हसत-खेळत केली 'तशी' कृती... यशस्वी जैस्वालवर संतापले नेटिझन्स
5
मदरशामध्ये अल्पवयीन विद्यार्थ्यासोबत ठेवले अनैसर्गिक संबंध, व्हिडीओही काढले, सोशल मीडियावर शेअर केले, आरोपी अटकेत
6
पाकिस्तान सुधारणार नाही, राजौरीमध्ये नियंत्रण रेषेवर घुसखोरीचा प्रयत्न अयशस्वी; दहशतवादी गोळीबार करून पळून गेले
7
Iran Israel Conflict: इराण इस्रायल प्रकरणी भारत शांत का? एक चूक आणि ५७,४४८ कोटी येतील धोक्यात
8
Pramod Kondhare: पाठीमागून आला आणि...; भाजप पदाधिकाऱ्याचं महिला पोलीसाशी गैरवर्तन, गुन्हा दाखल
9
जगभर: चिनी राष्ट्राध्यक्षांच्या ‘अज्ञात’ मुलीची ‘हेरगिरी’! शी जिनपिंग यांची मुलगी कोण?
10
पीएफ खात्यातून ७२ तासांत काढता येणार ५ लाख रुपये; एटीएम आणि यूपीआयद्वारेही पैसे काढता येणार
11
दोन पत्नी असल्याने आमदारकी रद्द होत नाही; शिवसेना आमदाराला मुंबई उच्च न्यायालयात मोठा दिलासा
12
Mumbra Local Train Accident: ‘त्या’ प्रवाशामुळे मुंब्र्यात अपघात? दोन्ही ट्रेनमधील प्रवाशांमध्ये होते फक्त ०.७५ मीटर अंतर
13
"...म्हणून आम्ही हरलो", पराभवानंतर शुभमन गिलने यांच्यावर फोडलं अपयशाचं खापर 
14
नीरज चोप्राचं सोनेरी यश, ओस्ट्रावा गोल्डन स्पाईक स्पर्धेत जिंकलं सुवर्णपदक   
15
आजचे राशीभविष्य - २५ जून २०२५, नोकरीत पदोन्नतीची शक्यता, वैवाहिक सौख्य लाभेल!
16
विशेष लेख: आणीबाणीने देशाला शिकवलेले तीन धडे
17
Samruddhi Mahamarg: 'समृद्धी'वर शहापूरजवळ ओव्हरपासच्या पुलावर १९ दिवसांतच पडले खड्डे
18
लेख: तोटा सोसून बँकेच्या बचत खात्यात लोकांनी पैसे का ठेवावे?
19
शक्तिपीठ महामार्ग होणारच; 'कोल्हापुरात महामार्ग नको', कोल्हापूरच्या मंत्र्यांची भूमिका
20
India vs England: जिथे कमी तिथे केएल राहुल!

एलबीटीबाबत आता माघार नाही

By admin | Updated: June 12, 2014 00:50 IST

अजिज कारचे : प्रशासकीय त्रुटी व दराबाबतचा संभ्रम दूर करू

सांगली : राज्य शासनाने एलबीटीचा कायदा केला आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाला कराची वसुली करावीच लागणार आहे. मुख्यमंत्र्यांशी झालेल्या चर्चेनुसार प्रशासकीय त्रुटी व दराबाबतच्या संभ्रम दूर करण्याची अजूनही तयारी आहे. आता एलबीटी वसुलीतून कोणत्याही स्थितीत माघार घेणार नाही, असे स्पष्ट भूमिका आयुक्त अजिज कारचे यांनी पत्रकारांशी बोलताना मांडली. महापालिका हद्दीत एलबीटीची अंमलबजावणी सुरू झाल्यापासून व्यापाऱ्यांनी विरोध केला होता. काल मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्यासोबत झालेल्या बैठकीत एलबीटी की जकात याचा चेंडू महापालिकांच्या कोर्टात टाकण्यात आला. याबाबत आज आयुक्त कारचे यांची भेट घेतली असता एलबीटीची वसुलीसाठी ठोस पावले उचलण्याचे संकेत त्यांनी दिले.ते म्हणाले की, महापालिकेसाठी एलबीटी कर चांगला आहे. राज्यातील अनेक महापालिकांनी जकातीपेक्षा एलबीटीचे अधिक उत्पन्न मिळाले आहे. शासनाने एलबीटीचा कायदा केला आहे. त्यात मुख्यमंत्र्यांनी वसुली करू नये, असे कोणतेही आदेश दिलेले नाहीत. त्यामुळे महापालिकांना एलबीटीची वसूली करावीच लागेल. त्यातून माघार घेण्याचा प्रश्नच येत नाही. बैठकीत एलबीटीच्या दरातील तफावतीवर चर्चा झाली. मुख्यमंत्र्यांनी दराबाबत लवचिक भूमिका घेण्याचे निर्देश दिले आहे. मुख्यमंत्र्यांनी एलबीटी, जकात हे दोन पर्याय दिले आहेत. त्याशिवाय एलबीटीची वसुली विक्रीकरामार्फत करण्याच्याही पर्यायावर विचार सुरू आहे. वास्तविक सांगली महापालिका प्रशासनाने सुरुवातीपासून एलबीटीबाबत चर्चेची दारे खुली ठेवली होती. व्यापाऱ्यांशी अनेकदा चर्चा केली आहे. एलबीटीतील त्रुटी दूर करण्याची अजूनही प्रशासनाची तयारी आहे. पण प्रत्येकवेळी व्यापारी संघर्षाच्या भूमिकेतून चर्चेला येतात. काही संघटनांची एलबीटी दराबाबत तक्रार आहे. तो संभ्रमही दूर करण्याची तयारी आहे. महापालिका कर्मचाऱ्यांकडून व्यापाऱ्यांना त्रास दिला जाईल, अशी भीतीही व्यक्त केली जाते. त्यावर उपाय म्हणून तक्रार निवारण कक्ष सुरू करण्याची तयारी आहे. तसेच एक समिती नियुक्त करून दर आठवड्याला या तक्रारींचा आढावा घेतला जाईल. समितीत लोकप्रतिनिधी, अधिकारी, व्यापारी प्रतिनिधींचा समावेश असेल. त्यामुळे पालिका कर्मचारी व्यापाऱ्यांना त्रास देण्याचा प्रश्नच येणार नाही. एलबीटीबाबत पदाधिकाऱ्यांशी चर्चा करून व्यापाऱ्यांची बैठक बोलविण्याचा विचार आहे. जोपर्यंत एलबीटीचा कायदा अस्तित्वात आहे, तोपर्यंत त्याची वसुली करावीच लागणार आहे. मला संस्थेचे हित महत्त्वाचे आहे. व्यापाऱ्यांनी कर भरला तर शहरातील सहा लाख नागरिकांना सुविधा देणे शक्य होणार आहे. त्यासाठी आता एलबीटीतून माघार घेणार नाही, असे स्पष्ट करीत ठोस कृती करण्याचे संकेत दिले. (प्रतिनिधी)