शहरं
Join us  
Trending Stories
1
सोनम वांगचुक यांनीच लोकांना भडकावले; लेहमधील हिंसाचारासाठी गृहमंत्रालयाने धरले जबाबदार
2
'तुमचेही फोटो लावा'; प्रताप सरनाईकांच्या पूरग्रस्तांच्या मदतीच्या किटवरुन अजितदादांनी विरोधकांना सुनावलं
3
"अक्खी दुनिया एक तरफ, मेरा बुमराह एक तरफ"; अभिनेत्याची फरमाईश अन् संजनाची डायलॉगबाजी (VIDEO)
4
"मुस्लिमांनी अयोध्या सोडावी, या मंदिरनगरीत मशिदीच्या बांधकामाला परवानगी दिली जाणार नाही..."; भाजप नेते विनय कटियार यांचं विधान
5
Asia Cup 2025: सलग पाचव्या विजयासह टीम इंडियानं गाठली फायनल! आता बांगलादेश-पाक यांच्यात रंगणार सेमीफायनल
6
MBBS आणि वैद्यकीय पदव्युत्तर अभ्यासक्रमांसाठी १० हजार जागा वाढवण्यास मान्यता; प्रत्येक जागोसाठी १.५० कोटींचा खर्च
7
"रशिया कागदी वाघ नाही, तर...!"; डोनाल्ड ट्रम्प म्हणाले होते 'कागदी वाघ', रशियानं केला पलटवार; म्हणाला...
8
Pahalgam Terror Attack : मोठं यश...! पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांना मदत करणाऱ्या मोहम्मद कटारियाला अटक; असा पकडला
9
अभिषेकनं साधला मोठा डाव! आधी हिटमॅन रोहितला ओव्हरटेक केलं, मग गुरबाझचा विक्रमही मोडला
10
३ दिवस भारताचे मंत्री, अधिकारी अमेरिकेत तळ ठोकून; ट्रेड डील, ट्रम्प टॅरिफ, H1B व्हिसावर चर्चा
11
पूरग्रस्तांच्या मदतीसाठी भाजपा खासदार, आमदारांचा मोठा निर्णय, एक महिन्याचे वेतन देणार!
12
IND vs BAN : बांगलादेशच्या नव्या कॅप्टननं नशीब काढलं, पण तो गडबडला! सूर्या म्हणाला, आमच्या मनासारखं झालं
13
एकीकडे डोनाल्ड ट्रम्प यांची 'बोंबाबोंब', दुसरीकडे रशियाने मात्र थेट इराणसोबत केला अणू करार
14
राज ठाकरेंचे CM फडणवीसांना पत्र; सरकारला ५ महत्त्वाच्या सूचना, मदत-जाहिरातबाजीवरून टोचले कान
15
“शेतकऱ्यांना सर्व प्रकारची मदत, ड्रोनने केलेले पंचनामे मान्य करणार”; CM फडणवीसांची ग्वाही
16
त्याला अजून फाशी का दिली नाही? मुख्यमंत्र्यांची हत्या करणाऱ्या आरोपीच्या याचिकेवर कोर्टाने सरकारला फटकारलं
17
सरकार शेतकऱ्यांचे आहे, चिंता करू नका! एकनाथ शिंदे यांनी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिला धीर
18
वायरल 'बाल्कनी' हिमनगाचे केवळ टोक? ९९८ कोटींचा इंडोरा–दिगोरी उड्डाणपूलामुळे प्रभावित मालमत्तांची यादी तयार करण्याचे आदेश
19
“पूरग्रस्त प्रत्येक कुटुंबाला १० किलो गहू-तांदूळ, केंद्राची मदत १०० टक्के येईल”: छगन भुजबळ
20
"प्रत्येकाला स्वाभिमान असतो, त्याने..."; शाहीन शाह आफ्रिदीकडून हॅरिस रौफच्या कृतीचे समर्थन

उपाध्याय घरकुल योजनेसाठी जिल्ह्यातून प्रस्तावच नाही

By admin | Updated: May 26, 2017 01:09 IST

अनुदान वाढविण्याची गरज : पर्यायी जागा उपलब्ध करण्यासाठी प्रशासकीय प्रयत्न आवश्यक

समीर देशपांडे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ग्रामीण भागातील जागांच्याही किमती वाढल्यामुळे पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजनेअंतर्गत कोल्हापूर जिल्ह्यातून एकही प्रस्ताव जिल्हा परिषदेकडे अजून दाखल झालेला नाही. एकीकडे जिल्ह्यातील ७५० कुटुंबांना घर बांधण्यासाठी जागा उपलब्ध नसताना दुसरीकडे या योजनेला प्रतिसादच नाही. त्यामुळे एक तर या योजनेतून अनुदान वाढवून देण्याची गरज आहे किंवा संबंधितांना शासकीय जागा उपलब्ध करून देण्याबाबत प्रशासकीय प्रयत्नांची गरज आहे. इंदिरा आवास योजनेचा एक भाग म्हणून ग्रामीण भागातील दारिद्र्यरेषेखालील बेघरांपैकी ज्यांना स्वत:ची जागा नाही अशा कुटुंबांकरिता जागा उपलब्ध करून देण्यासंदर्भात केंद्र सरकारने २०१०/११ पासून मान्यता दिली आहे. याआधी या योजनेतून केंद्र सरकारचे आणि राज्य सरकारचे प्रत्येकी १० हजार असे एकूण २० हजार रुपये मिळत होते. ग्रामीण भागातील जागांचे दर वाढलेले असल्याने २० हजार रुपये अपुरे पडत असल्याचे शासनाच्या निदर्शनास आले. सन २०१५ मध्ये स्वत:ची जागा नसलेली अशी २ लाख कुटुंबे महाराष्ट्रात होती. ही अडचण लक्षात घेऊन २०१५/१६ पासून राज्य शासनाने ‘पंडित दीनदयाळ उपाध्याय घरकुल जागा खरेदी अर्थसहाय्य योजना’ जाहीर केली. त्यावेळी इंदिरा आवास योजना, रमाई आवास योजना व शबरी आवास योजना या योजनेतील दारिद्र्यरेषेखालील घरकुल पात्र परंतु जागा उपलब्ध नसलेल्या लाभधारकांसाठी ही योजना आहे. त्यातून केंद्र सरकारचे १० हजार तर राज्य सरकारने आपल्या हिश्श्याचे ४० हजार रुपये घालण्याचा निर्णय घेतला. यामध्ये ५०० चौरस फुटांची जागा लाभार्थ्याने खरेदी करावयाची असून त्यामध्ये घरकुल व शौचालय उभारावयाचे आहे. ५० हजार रुपयांमध्ये जागा खरेदी करणे शक्य नसेल तर उर्वरित रक्कम देण्याची हमी लाभार्थ्याला द्यावी लागते. हे प्रस्ताव छाननी करून मंजुरीसाठी गटविकास अधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली समितीही नेमण्यात आली आहे. मात्र, ग्रामीण भागातील जागांचे दर वाढल्याने ही ५० हजार रुपयांची रक्कमही अपुरी ठरत आहे. कोल्हापूर शहराच्या आसपास असणाऱ्या गावांच्या परिसरामध्ये प्रतिगुंठा जमिनीचा दर ५ लाखांपर्यंत आहे. तालुकास्तरीय गावांच्या आसपासही ३ ते ४ लाखांपर्यंत गुंठ्याचा दर आहे. त्यामुळे एवढ्या महाग दराने दारिद्र्यरेषेखालील लाभार्थ्याला जागा खरेदी करणे अशक्य बनले आहे. त्यामुळेच या अनुदानात वाढ करण्याची सार्वत्रिक मागणी होत आहे. जागा नसलेले ७५० लाभार्थी विविध घरकुल योजनेतून कोल्हापूर जिल्ह्णातील ७५० असे लाभार्थी आहेत की ज्यांना स्वत:ची जागा नाही. त्यामुळे अशा लाभार्थ्यांची यादी जिल्हाधिकारी कार्यालयाला कळविण्यात आली आहे. जळगावमध्ये महसूल पड जागा देऊन अशा लाभार्थ्यांची सोय करण्यात आली आहे. या धर्तीवर कोल्हापूर जिल्ह्यात निर्णय व्हावा, अशीही अपेक्षा व्यक्त होत आहे.