शहरं
Join us  
Trending Stories
1
पुराचा इशारा देत भारताची माणुसकी; मात्र, पाकिस्तानने काढली नवी कुरापत
2
एमएसपीची गॅरंटी द्या, शेतकरी नेते डल्लेवाल यांची मागणी; दिल्लीत महापंचायत, शेतकरी पुन्हा रस्त्यावर
3
२९ हजार किमीचे रस्ते खराब, तरीही द्यावा लागतोय टोल, ५ वर्षांत राष्ट्रीय महामार्गांवर ८० हजार जणांचा मृत्यू
4
वैकुंठाला जाण्याचा हट्ट; इरकर कुटुंबीय नजरकैदेत
5
शुभांशूने सांगितला यशाचा अस्सल मार्ग, म्हणाले, २०४० पर्यंत तुम्हीही जाऊ शकता चंद्रावर
6
जगातील सर्वांत जुनी गणेश प्रतिमा मुंबईत !पद्मश्री डॉ. प्रकाश कोठारी यांना सापडला अमूल्य ठेवा
7
बेरोजगार पतीला सतत टोमणे मारणे पत्नीला पडले महागात; कोर्ट म्हणाले ही मानसिक क्रूरता
8
'आमच्यासाठी शेतकरी महत्वाचे; कितीही दबाव टाका, आम्ही...', ट्रम्प टॅरिफवर PM मोदींचे मोठे विधान
9
‘सोना जल्दी निकालो, वरना मार दूंगा’ साधू बनून लुटले
10
Mig 21 : ६० वर्षांत पाकिस्तानला अनेकदा दिली मात; निरोप घेण्यापूर्वी लढाऊ विमान 'मिग-२१'ने केले शेवटचे उड्डाण!
11
Rain Update : बाप्पाच्या स्वागतासाठी पावसाच्या 'पायघड्या'; पुढचे चार दिवस 'झोडपणार', कोणत्या भागांना इशारा?
12
जगातील सगळ्यात महागडी ७ शहरे! 'या' ठिकाणी राहायचा विचार करत असाल तर आताच जाणून घ्या...
13
नागपुरातील रस्त्यांवर कुत्र्यांना खाऊ घालाल तर खबरदार! कारवाईसाठी रहा तयार
14
पंतप्रधान मोदींची डिग्री सार्वजनिक होणार नाही, दिल्ली उच्च न्यायालयाकडून CIC चा आदेश रद्द
15
‘रोजगार महाकुंभ’चे आयोजन; ५०,००० हून अधिक तरुणांना नोकऱ्या देणार योगी सरकार!
16
विमान हवेतच गायब झालं! २२ दिवसापूर्वी तस्मानियाहून उड्डाण केलं होतं; नेमकं काय घडलं?
17
Beed: लक्ष्मण हाके यांच्या गाडीवर गेवराईत हल्ला; आमदार पंडित यांचे कार्यकर्ते आक्रमक
18
क्षुल्लक कारणावरून वाद झाला, बॉयफ्रेंडने गर्लफ्रेंडच्या तोंडात बॉम्ब टाकला अन्...; घटना ऐकून होईल अंगाचा थरकाप!
19
Atharva Sudame : 'अक्कल शिकवतोय, तुझा धंदा मर्यादित ठेव'; अथर्व सुदामेला ब्राह्मण महासंघानेही सुनावले
20
एकाच घरात का केलं दोन्ही मुलींचं लग्न? निक्की भाटीच्या वडिलांनी सांगितलं कारण! म्हणाले...

कचरा टाकायला जागा नाही, मग द्या पेटवून

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 27, 2021 04:24 IST

कदमवाडी : सध्या शहरात कचऱ्याची समस्या गंभीर होत असून, कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने पालिकेचे कर्मचारी जागा मिळेल तेथे कचरा ...

कदमवाडी : सध्या शहरात कचऱ्याची समस्या गंभीर होत असून, कचरा टाकण्यासाठी जागा नसल्याने पालिकेचे कर्मचारी जागा मिळेल तेथे कचरा टाकून तो जाळत आहेत. सध्या कोल्हापूर शहरात कचऱ्याची समस्या मोठ्या प्रमाणात भेडसावत आहे. कचरा टाकण्यासाठी प्रकल्पस्थळावर जागाच नसल्याने कचरा गाडी लाइनमध्ये लावावी लागत आहे. त्यात वेळ खूप जास्त असल्याने पालिकेचे कर्मचारी गोळा केलेला कचरा गाडीतून काढून जागा मिळेल तिथे पेटवून देत आहेत. परिणामी यामुळे प्रदूषण वाढण्याची भीती आहे.

शहरात रोज जमा होणाऱ्या २०० टन कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी कोल्हापूर ग्रीन कंपनीला ठेका दिला होता. मात्र, कंपनीने ठरलेल्या नियमानुसार कचरा प्रक्रिया न नेल्याने प्रकल्प स्थळावर कचऱ्याचे ढीग साचून राहिले. कालांतराने कंपनीनेच काम बंद केले. पालिकेने वारंवार सांगूनदेखील कंपनीने काम चालू केले नसल्याने पालिकेने तो प्रकल्प आपल्या ताब्यात घेतला खरा, पण पालिकेसही शक्य तितका कचरा प्रक्रिया करणे शक्य नसल्याचे चित्र आहे. प्रकल्पातील पूर्वीपासून असणारा ढीग व रोज नव्याने येणारा कचरा यामुळे सध्या कचरा टाकायला जागा शिल्लक नाही.

रोज घंटागाडीद्वारे जमा होणारा कचरा प्रकल्पावर टाकला जातो. मात्र, येथे कचरा टाकायला जागा नसल्याने गाड्यांची रांग लागत आहे. त्यामुळेच ज्यावेळेस कचरा गोळा करायचा तो वेळ रांगेत जात असल्याने घंटागाडी प्रत्येक गल्लीत वेळेवर पोहोचत नाही. परिणामी नागरिक कचरा कोंडाळ्यात किंवा जागा मिळेल तिथे टाकतात. साठविलेल्या कचऱ्यामुळे गाडी एक-दोन गल्लीत फुल्ल होते. अशा वेळेस गाडीवरील कर्मचारी गोळा केलेला कचरा गल्लीच्या कोपऱ्यावरच पेटवून देत असल्याचे चित्र आहे, तर काही झाडू कामगारही कोंडाळ्यात टाकलेला कचराही पेटवून देत आहेत.

फोटो : २६ कदमवाडी कचरा

ओळ : प्रभागात गोळा केलेला कचरा प्रकल्प स्थळावर रांगेत वेळ जात असल्याने जागा मिळेल तिथे पेटवून दिला जातो.(छाया-दीपक जाधव)

--------------