शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे ब्रँड चितपट-महायुतीला टक्कर; करून दाखवणारे शशांक राव कोण? बेस्ट निवडणुकीत ठरले बाजीगर
2
रेशन कार्ड धारकांसाठी महत्वाची अपडेट! कार्डवरुन नाव काढणार? केंद्राने १.१७ कोटी लोकांची यादी पाठवली
3
पत्नीची गोळ्या, कीटकनाशक देऊन हत्या, मृतदेह पुरला; बॉयफ्रेंडसोबत पळून गेल्याचा केला बनाव, पण एका चुकीमुळे अडकला
4
रेखा गुप्ता यांच्यावरील हल्ला पूर्व नियोजित कट; आरोपीचे २४ तास पूर्वीचे सीसीटीव्ही फुटेज समोर
5
"खडा हूं आज भी वहीं..."; मतचोरीच्या आरोपांवरून जेपी नड्डांनी घेतली राहुल गांधींची 'फिरकी', VIDEO शेअर करत सगळंच उघडं पाडलं!
6
आधी ट्रम्प यांची भेट, नंतर भारतात मोठी कर्मचारी कपात; एकाच दिवसात मालकाला बसला १.३१ लाख कोटींचा फटका
7
या देशात शुक्रवारचे नमाजपठण केले नाही तर 2 वर्षांचा तुरुंगवास; भरावा लागेल ₹ 61 हजारचा दंड! का करण्यात आला असा कायदा?
8
आता खरी बायको कोण? एकाच वेळी ६ पत्नींचा पतीच्या नुकसानभरपाईवर दावा, वन विभाग संभ्रमात
9
"करीना कपूरला नवाब असल्याचा गर्व...", पत्रकार अनिता पाध्ये स्पष्टच बोलल्या, म्हणाल्या...
10
सरकारच्या एका निर्णयामुळे २ लाख नोकऱ्या धोक्यात? ४०० कंपन्या बंद होण्याची भीती, कोणी दिला इशारा?
11
'ते व्हिडीओ पाहून तो अस्वस्थ होता म्हणूनच...'; CM रेखा गुप्तांवर हल्ला करणाऱ्या राजेशच्या आईची धक्कादायक माहिती
12
अमेरिकेच्या टॅरिफविरोधात लढण्यासाठी रशिया भारतासोबत! म्हणाले, भारतीय वस्तूंचे स्वागत, तेलही देणार
13
टीम इंडियातील माजी सहकाऱ्यांपैकी कुणी कॉल केला का? पृथ्वी म्हणाला, मला सहानुभूती नकोय!
14
CM-PM आणि मंत्र्यांना पदावरुन हटवण्याचे विधेयक योग्य; शशी थरुर यांचा पाठिंबा
15
वाईफ स्वॅपिंग, पोलिसही चक्रावले! पत्नीला मित्राकडे पाठवले, मित्राच्या पत्नीला आपल्याकडे ठेवले
16
हृदयद्रावक तेवढीच धक्कादायक...! कुत्र्याने चावलेही नाही, तरी २ वर्षांच्या चिमुकल्याचा रेबीजने मृत्यू
17
सोने-चांदीच्या दरात मोठी घसरण! १ तोळा सोन्याचा भाव काय? अचानक का घसरले दर?
18
बेस्ट निवडणूक २०२५: ठाकरे बंधूंच्या दारुण पराभवावर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…
19
गुजरातमध्ये नववीच्या विद्यार्थ्याचा दहावीच्या विद्यार्थ्यावर चाकू हल्ला; मृत्यूनंतर जमावाकडून शाळेची तोडफोड
20
₹७.५८ ची SUV रोज खरेदी करताहेत ६०० लोक; २ लाखांच्या DP सह विकत घेऊ शकता, किती असेल मंथली EMI?

...तर दरासाठी आंदोलनाची गरज नाही

By admin | Updated: December 26, 2015 00:24 IST

राजू शेट्टी : आजऱ्यात भात उत्पादकांचा मेळावा; शेतकऱ्याची बाजार, राजकारणावर हुकमत हवी

आजरा : छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजर्षी शाहू महाराजांपर्यंत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कदापिही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली, तरीही शेतकऱ्यांची खळी लुटण्याची प्रवृत्ती कमी झाली नाही. ज्या दिवशी शेतकऱ्यांची शिवारात, बाजारात आणि राजकारण्यांवर एकाचवेळी नजर व हुकमत निर्माण होईल त्यादिवशी शेतकऱ्याला शेतीमालाच्या दरासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.स्वाभिमानी अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे तांदूळ विक्री प्रारंभ व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तांदूळ वाहतुकीचा प्रारंभ शेट्टी यांच्याहस्ते झाला.शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारी मंडळी आपणाला अलीकडे सल्ला देऊ लागली आहेत. मुळातच शेतकऱ्यांनी विविध आंदोलनांमध्ये आपणाला इतके गुंतवून ठेवले आहे की, शेतकऱ्यांसाठीच्या अनेक कल्पना, योजना आपल्याकडे असूनही त्या राबविताना मर्यादा येत आहेत.भविष्यात जी लढाई आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल ती बी-बियाणांसाठीची असेल. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्याजवळ जे नाही त्याबाबत दु:ख करीत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य वापर केल्यास त्यासाठी संघर्ष केल्यास बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण होईल. तसे झाल्यास सरकारकडून सकारात्मक निर्णय करवून घेणे शक्य होईल.तांदूळ खरेदी-विक्री करण्याचे धोरण ‘स्वाभिमानी’ने अवलंबले आहे. मुळातच व्यापाऱ्यांनी आजरा घनसाळला बदनाम केले आहे. ‘स्वाभिमानी’ने विश्वासार्हता कमविण्यासाठी १५ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी घालविला आहे. तांदूळ विक्री करताना ही विश्वासार्हता गमावली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सरकारचा एक रुपयाचाही निधी न घेता शेतकरी कंपन्या उभा करू शकतात. त्या चालवू शकतात हे दाखवून द्यावे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.यावेळी कॉ. संपत देसाई, तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत, नंदकुमार सरदेसाई, आजरा साखर कारखाना संचालक बयाजी मिसाळ, सखाराम केसरकर, उद्योजक महादेव पोवार, तुळसाप्पा पोवार, आबासाहेब पाटील, शिवाजीराव इंजल, शांताराम पाटील, बी. के. कांबळे यांच्यासह शेतकरी व ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन कृष्णा पाटील यांनी केले. माजी उपसभापती निवृत्ती कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आंदोलनाच्या प्रवासातला मैलाचा दगड निखळलाशेतकरीवर्गासाठी आंदोलनाच्या प्रवासातला मैलाचा एक दगड शरद जोशी निखळला आहे. भविष्यात राजू शेट्टीही निखळेल. शेतकऱ्यांनी आता स्वत: लढण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.लढा चालूच राहणार आहे, असे भावनिक उद्गार खासदार शेट्टी यांनी काढले.चांगली माणसे द्याप्रामाणिकपणे गोठ्यातल्या औत ओढणाऱ्या बैलासारखी आपली अवस्था झाली आहे. एकाचवेळी किती जबाबदाऱ्या माझ्या एकट्यावर टाकाल. आता बिनकामाचे बैल पोसणे बंद करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकीसाठी मला चांगली माणसे द्या व माझा भार हलका करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.