शहरं
Join us  
Trending Stories
1
Operation Sindoor : पाकिस्तानवर हवाई हल्ला करताच पुण्यातून लढाऊ विमाने झेपावली; मुंबईपर्यंत दिले संरक्षण...
2
“भारताला स्वसंरक्षणाचा अधिकार, दहशतवाद्यांना...”; ‘ऑपरेशन सिंदूर’चे इस्रायलकडून खुले समर्थन
3
“आगे बढ़ते रहो, ऐसाही बदला लेते रहो”; ‘ऑपरेशन सिंदूर’वर शहीद नरवाल कुटुंबाने व्यक्त केला आनंद
4
Operation Sindoor Live Updates: भारताचा पाकिस्तानवर स्ट्राईक; पुन्हा घरात घुसून मारलं
5
Operation Sindoor: 'जय हिंद', राहुल गांधींची पाकिस्तानातील एअर स्ट्राईकनंतर पहिली पोस्ट; काय म्हणाले? 
6
Operation Sindoor: जबरदस्त खेळी, इकडे मॉक ड्रील सांगत पाकिस्तानला गाफील ठेवले; ऑपरेशन सिंदूरच नाव का दिले...
7
Operation Sindoor: ऑपरेशन सिंदूरनंतर भारतीय सैन्य अलर्ट; 'कारगिलचा हिरो' पुन्हा सीमेवर सज्ज
8
"जय हिंद की सेना...!", 'ऑपरेशन सिंदूर'वर रितेश देशमुखचं रात्री ३ वाजून २ मिनिटांनी ट्विट
9
"अब मिट्टी में मिल जाओगे...", भारतीय सैन्याच्या 'ऑपरेशन सिंदूर'चं देवोलिनानं केलं कौतुक
10
'ऑपरेशन सिंदूर'अंतर्गत पाकमधील 'या' ९ ठिकाणी एअर स्ट्राईक; २६/११, पुलवामाशी होता संबंध
11
"पाकपुरस्कृत दहशतवाद संपूर्ण संपेपर्यंत अशाच पद्धतीनं कारवाई होणार, हा संदेश देण्यात आपण यशस्वी"
12
Operation Sindoor: एअर स्ट्राईकनंतर भारताची पहिली प्रतिक्रिया; पाकिस्तानशी लढणे आमचा हेतू नाही, पण...
13
Operation Sindoor : भारतीय सैन्याचं 'ऑपरेशन सिंदूर'; पाकिस्तानच्या हद्दीत १०० किमी आत घुसून मारलं, ९ ठिकाणे कोणती?
14
Operation Sindoor: "आज तोच विश्वास सार्थ ठरवत, भारतीय हवाई दलाने...", शरद पवारांनी लष्करांचं केलं अभिनंदन
15
“त्यांनी आमचे कुंकू पुसले, मोदींनी ऑपरेशन सिंदूरने उत्तर दिले”; जगदाळे कुटुंबाने मानले आभार
16
Operation Sindoor: "माझ्या पतीच्या हत्येचा बदला घेतला..," शुभम द्विवेदींच्या पत्नीची 'ऑपरेशन सिंदूर' नंतर पहिली प्रतिक्रिया
17
पहलगामचा सूड घेतल्यानंतर पाकिस्तान बिथरला; नियंत्रण रेषेवरील मोर्टार शेलिंगमध्ये ३ भारतीयांचा मृत्यू
18
Operation Sindoor: भारताचा पाकिस्तानवरील हा हल्ला २०१९ पेक्षाही मोठा, आता पुढे... ऑपरेशन सिंदूरनंतर अमेरिकन एक्सपर्टचा दावा
19
"आम्हाला सडेतोड उत्तर देण्याचा संपूर्ण अधिकार"; ऑपरेशन सिंदूरनंतर पाकिस्तानचे पंतप्रधान काय म्हणाले?
20
Operation Sindoor: हॅमर, स्कॅल्प मिसाईल आणि राफेल...; भारताच्या हवाई हद्दीत राहून हल्ला, जगानं ताकद पाहिली

...तर दरासाठी आंदोलनाची गरज नाही

By admin | Updated: December 26, 2015 00:24 IST

राजू शेट्टी : आजऱ्यात भात उत्पादकांचा मेळावा; शेतकऱ्याची बाजार, राजकारणावर हुकमत हवी

आजरा : छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजर्षी शाहू महाराजांपर्यंत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कदापिही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली, तरीही शेतकऱ्यांची खळी लुटण्याची प्रवृत्ती कमी झाली नाही. ज्या दिवशी शेतकऱ्यांची शिवारात, बाजारात आणि राजकारण्यांवर एकाचवेळी नजर व हुकमत निर्माण होईल त्यादिवशी शेतकऱ्याला शेतीमालाच्या दरासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.स्वाभिमानी अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे तांदूळ विक्री प्रारंभ व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तांदूळ वाहतुकीचा प्रारंभ शेट्टी यांच्याहस्ते झाला.शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारी मंडळी आपणाला अलीकडे सल्ला देऊ लागली आहेत. मुळातच शेतकऱ्यांनी विविध आंदोलनांमध्ये आपणाला इतके गुंतवून ठेवले आहे की, शेतकऱ्यांसाठीच्या अनेक कल्पना, योजना आपल्याकडे असूनही त्या राबविताना मर्यादा येत आहेत.भविष्यात जी लढाई आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल ती बी-बियाणांसाठीची असेल. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्याजवळ जे नाही त्याबाबत दु:ख करीत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य वापर केल्यास त्यासाठी संघर्ष केल्यास बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण होईल. तसे झाल्यास सरकारकडून सकारात्मक निर्णय करवून घेणे शक्य होईल.तांदूळ खरेदी-विक्री करण्याचे धोरण ‘स्वाभिमानी’ने अवलंबले आहे. मुळातच व्यापाऱ्यांनी आजरा घनसाळला बदनाम केले आहे. ‘स्वाभिमानी’ने विश्वासार्हता कमविण्यासाठी १५ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी घालविला आहे. तांदूळ विक्री करताना ही विश्वासार्हता गमावली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सरकारचा एक रुपयाचाही निधी न घेता शेतकरी कंपन्या उभा करू शकतात. त्या चालवू शकतात हे दाखवून द्यावे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.यावेळी कॉ. संपत देसाई, तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत, नंदकुमार सरदेसाई, आजरा साखर कारखाना संचालक बयाजी मिसाळ, सखाराम केसरकर, उद्योजक महादेव पोवार, तुळसाप्पा पोवार, आबासाहेब पाटील, शिवाजीराव इंजल, शांताराम पाटील, बी. के. कांबळे यांच्यासह शेतकरी व ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन कृष्णा पाटील यांनी केले. माजी उपसभापती निवृत्ती कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आंदोलनाच्या प्रवासातला मैलाचा दगड निखळलाशेतकरीवर्गासाठी आंदोलनाच्या प्रवासातला मैलाचा एक दगड शरद जोशी निखळला आहे. भविष्यात राजू शेट्टीही निखळेल. शेतकऱ्यांनी आता स्वत: लढण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.लढा चालूच राहणार आहे, असे भावनिक उद्गार खासदार शेट्टी यांनी काढले.चांगली माणसे द्याप्रामाणिकपणे गोठ्यातल्या औत ओढणाऱ्या बैलासारखी आपली अवस्था झाली आहे. एकाचवेळी किती जबाबदाऱ्या माझ्या एकट्यावर टाकाल. आता बिनकामाचे बैल पोसणे बंद करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकीसाठी मला चांगली माणसे द्या व माझा भार हलका करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.