शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिली ते चौथी हिंदी भाषा नको, अजित पवारांची भूमिका; भाजपामुळे होतेय एकनाथ शिंदेंची कोंडी?
2
महाराष्ट्रातील खासदाराच्या ड्रायव्हरला ड्रायव्हरला १५० कोटी रुपयांची जमीन कोणी भेट दिली?,चौकशी सुरू
3
हे आहेत अंतराळात सर्वाधिक दिवस घालवणारे अंतराळवीर; जाणून घ्या पहिल्या क्रमांकावर कोण..?
4
"एक-दोन नव्हे, माझ्या जावयाच्या १२ गर्लफ्रेंड"; पत्नीला संपवणाऱ्या पतीची सासूने केली पोलखोल
5
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
6
Jio-Blackrock ला मिळाला ब्रोकिंग लायसन्स; अंबानींच्या या कंपनीचे शेअर्स सुस्साट, तुमच्याकडे आहे का?
7
"चौथीपर्यंत हिंदी लादणं योग्य नाही, पण देशात ५० टक्के लोक हिंदीत बोलतात, त्यामुळे...’’ शरद पवारांनी मांडलं स्पष्ट मत  
8
ब्रिटनचे मालवाहू विमान भारताकडे झेपावले, युद्धनौका समुद्रात नांगर टाकून; लढाऊ विमान दुरुस्तीसाठी ४० अभियंते येणार...
9
ना नतांज, ना फोर्डो...! इस्रायलच्या नादात अमेरिकाही फसली? इराणने चकवत दुसरीकडेच सिक्रेट अण्वस्त्र अड्डा बनविलेला...
10
एवढे कोणीच करत नाही, पण ग्रुपने रतन टाटांचा वारसा जपला; मृतांच्या कुटुंबीयांसाठी ट्रस्ट स्थापणार
11
शिखर धवन लपून छपून गर्लफ्रेंडला टीम इंडियाच्या हॉटेल रुममध्ये आणायचा! रोहितनं केली होती तक्रार
12
Jagannath Yatra 2025: जगन्नाथाच्या गाभाऱ्यात समुद्राची गाज अडवण्यास हनुमंत ठरले कारणीभूत!
13
"राजकारणात फक्त आशिष शेलारांना ओळखते..."; ठाकरे बंधूंच्या मराठी मोर्चावर आशा भोसले काय म्हणाल्या?
14
अदानींनी खरेदी केली आणखी एक कंपनी, किती कोटींना झाली डील? शेअर्स सुस्साट...
15
तुम्ही ज्या विमानातून प्रवास करणार, ते किती जुने? सर्व्हिसिंग कधी केलेली? अशाप्रकारे जाणून घ्या...
16
मुख्यमंत्र्यांच्या ताफ्यासाठी १९ इनोव्हा मागवल्या, डिझेल भरायला गेल्या आणि पाणी भरून आल्या...
17
घरात सापडली संशयास्पद कागदपत्रे, पती देशद्रोही तर नाही ना? महिलेला आला संशय, त्यानंतर उचललं असं पाऊल   
18
आज दोघं एक पाऊल पुढे आलेत, भविष्यात एकत्र दिसतील ही खात्री; ठाकरे बंधूंचे मामा काय बोलले?
19
" हा तर गमावलेली राजकीय स्पेस मिळवण्याचा प्रयत्न, यांना मराठी भाषेशी…’’, ठाकरे बंधूंच्या एकत्र मोर्चाची भाजपाकडून खिल्ली

...तर दरासाठी आंदोलनाची गरज नाही

By admin | Updated: December 26, 2015 00:24 IST

राजू शेट्टी : आजऱ्यात भात उत्पादकांचा मेळावा; शेतकऱ्याची बाजार, राजकारणावर हुकमत हवी

आजरा : छत्रपती शिवाजी महाराजांपासून ते राजर्षी शाहू महाराजांपर्यंत सर्वांनीच शेतकऱ्यांच्या शेतीमालाला कदापिही धक्का लागणार नाही याची काळजी घेतली, तरीही शेतकऱ्यांची खळी लुटण्याची प्रवृत्ती कमी झाली नाही. ज्या दिवशी शेतकऱ्यांची शिवारात, बाजारात आणि राजकारण्यांवर एकाचवेळी नजर व हुकमत निर्माण होईल त्यादिवशी शेतकऱ्याला शेतीमालाच्या दरासाठी रस्त्यावर उतरण्याची गरज भासणार नाही, असा विश्वास खासदार राजू शेट्टी यांनी व्यक्त केला.स्वाभिमानी अ‍ॅग्रो प्रोड्युसर कंपनी आणि स्वाभिमानी शेतकरी संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने येथे तांदूळ विक्री प्रारंभ व भात उत्पादक शेतकऱ्यांच्या मेळाव्यात ते अध्यक्षपदावरून बोलत होते.यावेळी शेतकरी संघटनेचे नेते माजी खासदार शरद जोशी यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. त्यानंतर तांदूळ वाहतुकीचा प्रारंभ शेट्टी यांच्याहस्ते झाला.शेट्टी म्हणाले, शेतकऱ्यांसाठी काहीही न करणारी मंडळी आपणाला अलीकडे सल्ला देऊ लागली आहेत. मुळातच शेतकऱ्यांनी विविध आंदोलनांमध्ये आपणाला इतके गुंतवून ठेवले आहे की, शेतकऱ्यांसाठीच्या अनेक कल्पना, योजना आपल्याकडे असूनही त्या राबविताना मर्यादा येत आहेत.भविष्यात जी लढाई आंतरराष्ट्रीय स्तरावर होईल ती बी-बियाणांसाठीची असेल. त्यामुळे शेतकऱ्याने आपल्याजवळ जे नाही त्याबाबत दु:ख करीत बसण्यापेक्षा जे आहे त्याचा योग्य वापर केल्यास त्यासाठी संघर्ष केल्यास बाजारपेठेवर वर्चस्व निर्माण होईल. तसे झाल्यास सरकारकडून सकारात्मक निर्णय करवून घेणे शक्य होईल.तांदूळ खरेदी-विक्री करण्याचे धोरण ‘स्वाभिमानी’ने अवलंबले आहे. मुळातच व्यापाऱ्यांनी आजरा घनसाळला बदनाम केले आहे. ‘स्वाभिमानी’ने विश्वासार्हता कमविण्यासाठी १५ वर्षांचा प्रदीर्घ कालावधी घालविला आहे. तांदूळ विक्री करताना ही विश्वासार्हता गमावली जाणार नाही याची दक्षता घ्यावी. सरकारचा एक रुपयाचाही निधी न घेता शेतकरी कंपन्या उभा करू शकतात. त्या चालवू शकतात हे दाखवून द्यावे, असेही शेट्टी यांनी स्पष्ट केले.यावेळी कॉ. संपत देसाई, तालुका शेतकरी मंडळाचे अध्यक्ष संभाजी सावंत, नंदकुमार सरदेसाई, आजरा साखर कारखाना संचालक बयाजी मिसाळ, सखाराम केसरकर, उद्योजक महादेव पोवार, तुळसाप्पा पोवार, आबासाहेब पाटील, शिवाजीराव इंजल, शांताराम पाटील, बी. के. कांबळे यांच्यासह शेतकरी व ‘स्वाभिमानी’चे कार्यकर्ते उपस्थित होते. स्वागत व सूत्रसंचालन कृष्णा पाटील यांनी केले. माजी उपसभापती निवृत्ती कांबळे यांनी आभार मानले. (प्रतिनिधी)आंदोलनाच्या प्रवासातला मैलाचा दगड निखळलाशेतकरीवर्गासाठी आंदोलनाच्या प्रवासातला मैलाचा एक दगड शरद जोशी निखळला आहे. भविष्यात राजू शेट्टीही निखळेल. शेतकऱ्यांनी आता स्वत: लढण्यासाठी सज्ज राहिले पाहिजे.लढा चालूच राहणार आहे, असे भावनिक उद्गार खासदार शेट्टी यांनी काढले.चांगली माणसे द्याप्रामाणिकपणे गोठ्यातल्या औत ओढणाऱ्या बैलासारखी आपली अवस्था झाली आहे. एकाचवेळी किती जबाबदाऱ्या माझ्या एकट्यावर टाकाल. आता बिनकामाचे बैल पोसणे बंद करा. जिल्हा परिषद, पंचायत समिती, आमदारकीसाठी मला चांगली माणसे द्या व माझा भार हलका करा, असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.