शहरं
Join us  
Trending Stories
1
ड्रीम-11ने भारतीय संघाची स्पॉन्सरशिप सोडली! आशिया कपपूर्वीच BCCI ला मोठा धक्का; किती पैसा मिळायचा?
2
म्हणे, परमेश्वराचे बोलावणे आले, आम्ही ८ सप्टेंबरला देहत्याग करणार, अनंतपुरात २० भाविकांच्या निर्णयाने प्रशासनात खळबळ
3
Dream 11 आता सुरू करणार 'हा' नवा बिझनेस; ऑनलाइन मनी गेमिंग बॅननंतर नव्या क्षेत्रात एन्ट्री घेण्याची तयारी
4
१७ चौकार, पाच षटकार.. १४२ धावांचा धमाका; ऑस्ट्रेलियन 'हेड'मास्तरांनी घेतली आफ्रिकेची शाळा
5
शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; मोठ्या तेजीसह उघडले 'या' कंपन्यांचे शेअर्स
6
भटक्या कुत्र्यांचे प्रकरण: SC आदेशानंतर केंद्राचे राज्यांना निर्देश; ७० टक्के श्वानांचे लसीकरण अनिवार्य
7
'चांगली डील मिळेल तिथूनच तेल खरेदी करू'; अमेरिकेच्या टॅरिफवर भारताची रोखठोक भूमिका
8
जनावरासारखी कोंबली होती माणसं; भाविकांच्या ट्रॉलीला कंटेनरची धडक, ८ मृत्यूमुखी, ४३ गंभीर जखमी
9
Wife सोबत एकत्र Post Office च्या 'या' स्कीममध्ये करा गुंतवणूक, महिन्याला मिळेल ₹९२५० चं फिक्स व्याज
10
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना सकारात्मक, विविध लाभ; ६ राशींना संमिश्र; पैसे उसने देऊ नये!
11
आजचे राशीभविष्य, २५ ऑगस्ट २०२५: आजचा दिवस लाभदायी, वाद-विवाद टाळा, वाणीवर संयम ठेवा !
12
'निवडणूक आयोग-भाजपचे साटेलोटे; मतांची चोरी करू देणार नाही', राहुल गांधींनी ठणकावले
13
साहेब ! पाचवीतील विद्यार्थ्याचा पास संपला म्हणून त्यास भर पावसात बसमधून खाली उतरणार का?
14
विशेष लेख: जरा संभलके, बडे धोखे है इस राह में...
15
भारताने रशियाच्या तेलाबद्दल ट्रम्प यांचे मत गांभीर्याने घ्यावे, निक्की हेली यांचं विधान
16
झारखंडचे माजी मुख्यमंत्री चंपई सोरेन नजरकैदेत, नेमके प्रकरण काय? 
17
मंदिरांत राजकीय उपक्रम नकोत; खातरजमा करा, केरळमधील देवस्वोम मंडळांना कोर्टाचे निर्देश
18
युक्रेनने रशियावर मोठा हल्ला केला, अणुऊर्जा प्रकल्पाजवळ ड्रोन हल्ला; स्वातंत्र्यदिनी मोठी कारवाई केली
19
अधिक काम करतो, पण मोबदलाही द्या; वाढत्या कामामुळे होतोय जगण्यावर नकारात्मक परिणाम
20
दिल्ली पोलिसांचे वॉरंट्स आता व्हॉट्सॲपद्वारे, पोलिस ठाण्यातून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे साक्ष 

आयुक्त नसतील तर सभा नाही

By admin | Updated: April 15, 2016 00:04 IST

कोल्हापूर महानगरपालिका : स्थायी समिती सभेत सदस्यांचा इशारा

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेला जर आयुक्त उपस्थित राहणार नसतील, तर यापुढे सभा घेतली जाणार नाही, असा इशारा बुधवारी झालेल्या सभेत सदस्यांनी दिला. स्थायी समितीच्या सभेत झालेल्या चर्चेनुसार प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्यामुळे सदस्यांनी हा इशारा दिला आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. स्थायी समितीच्या बुधवारच्या सभेस आयुक्त पी. शिवशंकर गैरहजर होते, त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी त्यांना टार्गेट केले. प्रत्येक सभेत सदस्यांनी वारंवार प्रश्न मांडूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा मागील सभेत झालेल्या चर्चेप्रमाणे कोणती कार्यवाही झाली ते प्रशासनाने सांगावे, असा आग्रह यावेळी सदस्यांनी धरला. सदस्यांनी मांडलेल्या समस्यांवर प्रशासनाकडून कोणतेच ठोस निर्णय घेतले जात नाहीत. आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी उत्तरे दिली जातात. त्यामुळे आयुक्तांनी सभेला हजर राहावे, अन्यथा येथून पुढची सभा घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या विषयावरील चर्चेत सत्यजित कदम, सुनील पाटील, अजित ठाणेकर, रूपाराणी निकम, जयश्री चव्हाण यांनी भाग घेतला. प्रभागातील कोणतीच कामे वेळेवर होत नाहीत. जेसीबी, बूम मिळत नाहीत, औषध फवारणी होत नाही. साधे साधे प्रश्नही मार्गी लागत नाहीत. त्यामुळे सदस्यांमध्ये गैरसमज होत आहेत. किरकोळ कामे होणार नसतील तर स्थायी समिती सभा कशाला घ्यायची, असा संतप्त सवाल सभापती मुरलीधर जाधव यांनी अधिकाऱ्यांना विचारला. यावर प्रशासनातर्फे कामे झटपट करण्याबाबत सर्व विभागप्रमुखांना पत्राद्वारे आदेश देण्यात येतील, असे सांगण्यात आले. यावेळी लक्ष्मीपुरी धान्य बाजार, तावडे हॉटेल परिसरातील अवैध बांधकाम, आदी विषयांवर नीलोफर आजरेकर, मेहजबीन सुभेदार, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी) सत्यजित कदम : कंटेनर महागड्या दराने का घेणार ?स्थानिक कंपन्यांना कंटेनर खरेदीचे काम मिळू नये म्हणून कंटेनर खरेदीच्या निविदामधील अटी व शर्र्तींमध्ये बदल केला आहे. स्थानिक बाजारपेठेतील एका कंपनीने ३५ ते ३७ हजार रुपयांना कंटेनर देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, मनपा अधिकाऱ्यांनी केलेल्या इस्टिमेटमध्ये कंटेनरचा दर हा ६५ हजार रुपये आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. कोल्हापुरात चांगल्या प्रकारचे मटेरियल तयार होऊन देश-विदेशात पाठविले जात असताना मग बाहेरच्या कंपन्यांकडून कंटेनर का घेण्यात येत आहेत, अशी विचारणा सत्यजित कदम यांनी केली.