शहरं
Join us  
Trending Stories
1
उत्तर प्रदेशमध्ये मतदार यादीतून तब्बल २.८९ कोटी लोकांची नावं वगळणार, SIRबाबत धक्कादायक माहिती समोर 
2
पळवा पळवी! पंतप्रधान मोदींच्या कार्यक्रमानंतर लोकांनी कुंड्या, होर्डिंग आणि पुतळे पळवले   
3
स्वबळावर लढणाऱ्या काँग्रेसला ठाकरेंकडून मोठा धक्का, माजी नगरसेवक चंगेज मुलतानी उद्धवसेनेत
4
IND W vs SL W T20I : शफालीची वादळी खेळी! विजयी हॅटट्रिकसह टीम इंडियाचा मालिकेवर कब्जा; हरमनप्रीतनंही रचला इतिहास
5
"भाजपचे लोक हुशार, विरोधकांना सतत होमवर्क देतात", 'धुरंधर'चं नाव घेत कुमार विश्वास यांचा टोला
6
सीरियामध्ये मोठा हल्ला! नमाज पठणादरम्यान मशिदीत स्फोट, ८ जणांचा मृत्यू, १८ जण जखमी
7
IND W vs SL W : पहिल्या ओव्हरमध्ये धुलाई; मग रेणुकानं असा काढला राग! शेवटी 'चार चौघीं'वर पडली भारी
8
‘निष्ठावंतांना उमेदवारी न दिल्यास ते ज्या पक्षात जातील त्याचा प्रचार करणार’, भाजपाच्या ज्येष्ठ आमदाराचा इशारा
9
छत्रपती संभाजीनगरात एमआयएममध्ये 'राडा'; अधिकृत उमेदवारावर पक्ष कार्यकर्त्यांचाच हल्ला!
10
"भाजपाच्या पाठिंब्याशिवाय शिंदेसेना जिंकू शकत नाही"; मीरा-भाईंदरमध्ये महायुतीसाठी अटीशर्ती
11
लेडी DSP दीप्ती शर्मानं रचला इतिहास! असा पराक्रम करणारी ठरली पहिली भारतीय गोलंदाज
12
Ishan Kishan ने ठोकली सलग दोन शतकं, तरीही संघातून बाहेर; BCCIच्या आदेशानंतर घरी का परतला?
13
दिल्लीकडून खेळताना किंग कोहलीची ‘विराट’ कामगिरी! नव्या विश्वविक्रमासह ऑस्ट्रेलियन दिग्गजाला धोबीपछाड
14
"धर्म आणि विज्ञान यांच्यात कुठलाही संघर्ष नाही; दोघांचेही ध्येय एकच...!" नेमकं काय म्हणाले मोहन भागवत?
15
पित्याला मृत्युच्या दाढेतून ओढलं, थेट मगरीशी भिडला, चिमुकल्या अजयराजच्या शौर्याची कहाणी!
16
पुतण्यानेच रचला चुलत्याच्या हत्येचा कट; पराभवाचा बदला घेण्यासाठी मंगेश काळोखेंची हत्या, तटकरेंच्या निकटवर्तीयावरही गुन्हा दाखल
17
"कितीही अडथळे आले तरी परत आणणारच"; मोदी-माल्यांच्या लंडनमधील ‘त्या’ मस्करीला भारताचं चोख प्रत्युत्तर
18
"लोकं अडकून पडलेत, मुलांचं शिक्षण रखडलंय"; H1B व्हिसा मुद्द्यावर भारताची अमेरिकेशी चर्चा
19
जावळ काढण्याच्या प्रथेत आईचेही बळजबरीने मुंडन; दौंडमधील महिलांची राज्य महिला आयोगाकडे तक्रार
20
Viral Video: "ही कार आहे... बाईक नाही!" नको त्या कारणावरून जोडप्यामध्ये पेटला वाद, व्हिडीओ व्हायरल
Daily Top 2Weekly Top 5

आयुक्त नसतील तर सभा नाही

By admin | Updated: April 15, 2016 00:04 IST

कोल्हापूर महानगरपालिका : स्थायी समिती सभेत सदस्यांचा इशारा

कोल्हापूर : महानगरपालिकेच्या स्थायी समिती सभेला जर आयुक्त उपस्थित राहणार नसतील, तर यापुढे सभा घेतली जाणार नाही, असा इशारा बुधवारी झालेल्या सभेत सदस्यांनी दिला. स्थायी समितीच्या सभेत झालेल्या चर्चेनुसार प्रशासनाकडून अंमलबजावणी होत नसल्यामुळे सदस्यांनी हा इशारा दिला आहे. या सभेच्या अध्यक्षस्थानी सभापती मुरलीधर जाधव होते. स्थायी समितीच्या बुधवारच्या सभेस आयुक्त पी. शिवशंकर गैरहजर होते, त्यामुळे संतप्त झालेल्या सदस्यांनी त्यांना टार्गेट केले. प्रत्येक सभेत सदस्यांनी वारंवार प्रश्न मांडूनही प्रशासनाकडून कोणतीही कार्यवाही होत नाही. त्यामुळे पहिल्यांदा मागील सभेत झालेल्या चर्चेप्रमाणे कोणती कार्यवाही झाली ते प्रशासनाने सांगावे, असा आग्रह यावेळी सदस्यांनी धरला. सदस्यांनी मांडलेल्या समस्यांवर प्रशासनाकडून कोणतेच ठोस निर्णय घेतले जात नाहीत. आयुक्तांशी चर्चा करून निर्णय घेऊ, अशी उत्तरे दिली जातात. त्यामुळे आयुक्तांनी सभेला हजर राहावे, अन्यथा येथून पुढची सभा घेतली जाणार नाही, असा इशारा यावेळी देण्यात आला. या विषयावरील चर्चेत सत्यजित कदम, सुनील पाटील, अजित ठाणेकर, रूपाराणी निकम, जयश्री चव्हाण यांनी भाग घेतला. प्रभागातील कोणतीच कामे वेळेवर होत नाहीत. जेसीबी, बूम मिळत नाहीत, औषध फवारणी होत नाही. साधे साधे प्रश्नही मार्गी लागत नाहीत. त्यामुळे सदस्यांमध्ये गैरसमज होत आहेत. किरकोळ कामे होणार नसतील तर स्थायी समिती सभा कशाला घ्यायची, असा संतप्त सवाल सभापती मुरलीधर जाधव यांनी अधिकाऱ्यांना विचारला. यावर प्रशासनातर्फे कामे झटपट करण्याबाबत सर्व विभागप्रमुखांना पत्राद्वारे आदेश देण्यात येतील, असे सांगण्यात आले. यावेळी लक्ष्मीपुरी धान्य बाजार, तावडे हॉटेल परिसरातील अवैध बांधकाम, आदी विषयांवर नीलोफर आजरेकर, मेहजबीन सुभेदार, जयश्री चव्हाण, दीपा मगदूम, आदींनी भाग घेतला. (प्रतिनिधी) सत्यजित कदम : कंटेनर महागड्या दराने का घेणार ?स्थानिक कंपन्यांना कंटेनर खरेदीचे काम मिळू नये म्हणून कंटेनर खरेदीच्या निविदामधील अटी व शर्र्तींमध्ये बदल केला आहे. स्थानिक बाजारपेठेतील एका कंपनीने ३५ ते ३७ हजार रुपयांना कंटेनर देण्याची तयारी दर्शविली आहे. परंतु, मनपा अधिकाऱ्यांनी केलेल्या इस्टिमेटमध्ये कंटेनरचा दर हा ६५ हजार रुपये आहे. त्यामुळे महानगरपालिकेचे आर्थिक नुकसान होणार आहे. कोल्हापुरात चांगल्या प्रकारचे मटेरियल तयार होऊन देश-विदेशात पाठविले जात असताना मग बाहेरच्या कंपन्यांकडून कंटेनर का घेण्यात येत आहेत, अशी विचारणा सत्यजित कदम यांनी केली.