शहरं
Join us  
Trending Stories
1
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
2
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
3
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली
4
लॉस एंजेलिसमध्ये परिस्थिती चिघळली; ट्रम्प प्रशासनाने कॅलिफोर्नियाच्या रस्त्यांवर उतरवले ७०० मरीन कमांडो
5
तैवानच्या कंपन्या महाराष्ट्राबाहेर, फॉक्सकॉन इतर राज्यात, सेमिकंडक्टर कंपन्याही इतरत्र
6
राशीभविष्य, १० जून २०२५: शुभ प्रसंगाचा बेत आखाल, चांगली बातमी मिळेल, दिवस आनंदी जाईल!
7
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
8
पीओपी मूर्तींवरील बंदी अखेर उच्च न्यायालयाने उठविली; नैसर्गिक जलस्त्रोतांमध्ये विसर्जनाबाबत निर्णय घेण्याचे सरकारला निर्देश
9
‘एसी’मुळे सामान्य प्रवाशांना फटका, लोकल प्रवासी संख्या २१ लाख : नव्या लोकल फेऱ्या २०१२ पासून वाढल्याच नाहीत
10
लाडक्या बहिणींचे कळणार उत्पन्न; आयकर देणार डेटा , आयकर भरणाऱ्या बहिणींना आता पंधराशेचा लाभ नाही
11
सात वर्षांपासून उपचारावर केला ४२ लाख खर्च; पण रेल्वेने दिला नाही रुपया
12
मी घरी येतोय... विकीचा ताे फोन अखेरचाच ठरला
13
हा सदोष मनुष्यवधच!
14
विजयाचा बेहोश उन्माद चेंगराचेंगरीत का मृत्यू पावतो?
15
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
16
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
17
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
18
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
19
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?

मंदिराच्या मूळ सौंदर्याला बाधा नको

By admin | Updated: June 10, 2016 00:51 IST

भाविकांचा विकास अपेक्षित : परंपरा, व्यवस्था यांचा विचार करून आराखडा हवा...

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या करवीरनिवासिनी अंबाबाई मंदिराचा विकास आराखडा जनतेसमोर सादर होणार आहे. या प्रकल्पाच्या निमित्ताने मंदिराचाच नव्हे तर कोल्हापूर शहराचा विकास होणार आहे. तो होत असताना भक्त आणि कोल्हापूरचा रहिवासी म्हणून नागरिकांच्या काही अपेक्षा आहेत. त्या पार्श्वभूमीवर मंदिराचा विकास आराखडा कसा असावा, यासंबंधी लोकभावनांची मांडणी आजपासून...!अन्य देवस्थानांप्रमाणे अंबाबाई मंदिराचा विकास झालाच पाहिजे. हे मंदिर अतिप्राचीन आणि सुरेख बांधणीचे आहे. त्यामध्ये प्रवेश केला की भाविकाला प्रसन्न शांततेची अनुभूती आली पाहिजे. मात्र येथील सौंदर्याला बाधा आणणाऱ्या अनेक गोष्टी परिसरात आहेत. अनावश्यक बॅरिकेटस, पूल, पाय धुण्याच्या टाक्या, लटकत्या वायरी, देवस्थानच्या केबिन्स, अडगळीच्या वस्तू अशामुळे हे सौंदर्य लुप्त झाले आहे. त्या हटवून मंदिराचे मूळ सौंदर्य प्रकाशात यायला हवे. ओवऱ्यांतील दुकानांचे अन्यत्र पुनर्वसन करून परिसर मोकळा करावा. अन्य मंदिरांचाही विचार व्हावा. मंदिर हा असा केंद्रबिंदू आहे, ज्यावर अनेकांचा चरितार्थ आहे. विकास आराखड्यामुळे त्यांचे आयुष्य बाधित होणार नाही याची काळजी घेतली जावी. आत्ता फोट्रेस कंपनीने प्रत्यक्ष परिसराचा विचार न हा आराखडा बनविला आहे. कंपनीच्या लोकांनी कार्यालयात बसून आराखडे बनवायचे आणि प्रशासकीय यंत्रणेने त्यांना मान्यता द्यायची असे होऊ नये, अन्यथा विरोध नक्की. विरोधामुळे मंदिराचा विकास थांबायला नको. मंदिरातील परंपरा, व्यवस्था आणि भाविकांचा विचार करून त्यांना सामावून घेणारा विकास येथे अपेक्षित आहे. - अजित ठाणेकर (श्रीपूजक, नगरसेवक)दर्शनमंडप हवे का ?विद्यापीठ गेट येथे सात कोटी रु पये खर्चून साडेसातशे भाविक सामावतील असा दर्शन मंडप उभारणार आहेत. मात्र, खरंच याची आवश्यकता आहे का, याचा विचार व्हावा. गाभाऱ्यापर्यंत जाणारी रांग पूर्व दरवाजातून असून ती योग्य आहे. आरसीसी इमारत उभारून सौंदर्य बिघडविण्यापेक्षा पूर्व दरवाजा येथील इमारतींचा वापर दर्शन मंडप म्हणून केला जावा. येथेच प्रसाधनगृह व्हावे.कपिलतीर्थ मार्केटचा विचार व्हावाकपिलतीर्थ मार्केट येथे पहिल्या मजल्यावर पार्किंग आणि वरच्या मजल्यावर भाजी विक्रेते किंवा व्यावसायिकांचे पुनर्वसन करता येईल. शिवाय व्हीनस कॉर्नर येथील महापालिकेच्या जागेतही पार्किंगची सोय करून भाविकांना शटल सर्व्हिस देता येईल.