शहरं
Join us  
Trending Stories
1
लक्ष्मणरेषा ओलांडाल तर तुमचा विनाश अटळ, समूळ उच्चाटन करू; PM मोदींचा पुन्हा खणखणीत इशारा
2
आजचे राशीभविष्य १४ मे २०२५: आजचा दिवस आगळा - वेगळा अनुभव देणारा
3
काश्मीरचा बळकावलेला भूभाग पाकने परत करावा; भारताची आग्रही मागणी, कोणाची मध्यस्थी मान्य नाही
4
दहशतवादी मसूद अजहरच्या कुटुंबीयांना पाकिस्तान देणार १४ कोटी; विशेष 'शुहाद पॅकेज'ची घोषणा
5
डॉ. विजय दर्डा, आपला अमृतमहोत्सव शुभंकर असो...; PM नरेंद्र मोदी यांचा विशेष शुभेच्छा संदेश
6
राज ठाकरेंना उद्धव ठाकरेंपासून दूर ठेवण्याचे प्रयत्न? शिंदे गटाकडून हालचाली, चर्चांना उधाण
7
तयार होतेय 'शक्ती' चक्रीवादळ, देशभर तीन दिवस जोरदार पाऊस; पावसाची कधी आणि कुठे शक्यता?
8
लष्कराने दहशतवादी तळ नेमके शोधले तरी कसे? या शस्त्रांमुळे पाकला दयेची मागावी लागली भीक
9
ऑपरेशन सिंदूर: 'त्या' १२ दहशतवादी तळांवर कारवाईसाठी पाकवर दबाव; २१ तळांची होती भारताची यादी
10
काश्मिरात लष्कर-ए-तैयबाच्या म्होरक्यासह ३ दहशतवाद्यांचा खात्मा
11
निवृत्तीनंतर कोणतेही सरकारी पद घेणार नाहीत सरन्यायाधीश खन्ना; भूषण गवई आज पदभार स्वीकारणार
12
"कामगारच विकासाचे खरे शिल्पकार"; राज्यपाल सी. पी. राधाकृष्णन यांचे प्रतिपादन
13
राज्याला रेल्वे फाटकमुक्त करणार: मुख्यमंत्री; नागपुरातील १० पुलांचेही लवकरच होणार उद्घाटन
14
उद्धवसेनेच्या माजी नगरसेविका तेजस्वी घोसाळकर भाजपच्या वाटेवर? ठाकरे गटाला जय महाराष्ट्र
15
दहावीतही मुलींचा 'स्ट्राइक रेट' जबरदस्त! सीबीएसईतही कन्या 'शक्ती'
16
साईभक्तांना देणगीनुसार विशेष प्राधान्य; श्री साईबाबा संस्थानचे सुधारित सुविधा धोरण
17
पश्चिम-मध्य रेल्वेच्या नव्या मार्गांच्या कामाला गती; २९.३२ हेक्टरवरची झाडे तोडण्यास परवानगी
18
“...तर लाखो लोक संघर्षाचे बळी ठरले असते”; डोनाल्ड ट्रम्प पुन्हा भारत-पाक युद्धविरामावर बोलले
19
“२४ तासांत देश सोडा”; भारताने केली पाकिस्तानी उच्चायुक्तालयातील अधिकाऱ्यावर कठोर कारवाई
20
शेख हसीना यांच्या पक्षावर बंदी; बांगलादेशच्या निर्णयावर भारताची नाराजी, स्पष्ट केली भूमिका

मराठा आरक्षण टिकेल याची शाश्वती नाही: धनंजय मुंडे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 30, 2019 00:56 IST

रहिमतपूर (जि. सातारा) : ‘भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारने धनगर आरक्षण दिले नाही. मराठा आरक्षण दिले ...

रहिमतपूर (जि. सातारा) : ‘भाजप सरकारने शेतकऱ्यांना दिलेली कर्जमाफी फसवी आहे. सरकारने धनगर आरक्षण दिले नाही. मराठा आरक्षण दिले असले तरी ते टिकेल याची शाश्वती नाही. गत निवडणुकीतील आपली भाषणं मोदींनीच पुन्हा पाहिली तर या निवडणुकीला ते प्रचाराला येणार नाहीत एवढी फसवी आश्वासने जनतेला दिली आहेत,’ अशा शब्दांत विरोधी पक्ष नेते धनंजय मुंडे यांनी भाजप सरकारवर टीकास्त्र सोडले.कोरेगाव तालुक्यातील रहिमतपूर येथे राष्ट्रवादी काँग्रेसच्या परिवर्तन यात्रेच्या स्वागतानंतर गांधी चौकात झालेल्या विराट सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार, राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, यांच्यासह आमदार उपस्थित होते.मुंडे म्हणाले, ‘२०१४ च्या निवडणुकीत महागाई झाल्याची बोंब करून केंद्र्रात व राज्यात भाजपने सत्ता मिळवली. आता पेट्रोल, डिझेल, गॅस यांचे दर बघितले तर महागाईने कळस गाठला आहे. आता यांना ही महागाई दिसत नाही का? दरवर्षी दोनशे कोटी नोकºया देण्याची घोषणा करणाºयांनी साडेचार वर्षांतकिती नोकºया दिल्या, याचा हिशोब द्यावा.’‘देशात नरेंद्र आणि राज्यात देवेंद्र अशी घोषणा करणाºया भाजप सरकारने देश आणि महाराष्ट्र कर्जात बुडवला आहे. प्रत्येकाच्या खात्यात पंधरा लाख रुपये देण्याची घोषणा करणाºया नरेंद्र मोदी यांनी साडेचार वर्षांत ८३ लाख कोटी कर्ज केले तर देवेंद्र्र फडणीस यांनी महाराष्ट्राची तिजोरी रिकामी केली, असा घणाघात माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केला.