शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्याच्या दुसऱ्या दिवशी बीएसएफचा जवान पाकिस्तानच्या ताब्यात; सीमेवर पोहोचली गर्भवती पत्नी
2
वाहतूक कोंडीने बेजार झालेल्या पुणेकरांना दिलासा मिळणार?; PMU च्या बैठकीत अजित पवारांचे महत्त्वाचे निर्देश
3
पाकिस्तान दुष्ट राष्ट्र...! संयुक्त राष्ट्रांत भारताने पाकच्या संरक्षण मंत्र्यांची क्लिप ऐकविली
4
अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शरद पवार गटाला धक्का; २ माजी मंत्री पक्षात प्रवेश करणार
5
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
6
Badrinath Yatra: बद्रीनाथ मंदिर परिसरात फोटो काढणे, व्हिडीओ कॉल करण्यावर बंदी, 'हे' नियमही बदलले
7
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
8
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
9
रिस्क घेतली अन् दीड कोटीची सॅलरी सोडून 'तो' भारतात आला; १२ जणांच्या साथीनं उभारला उद्योग
10
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
11
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
12
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
13
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
14
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
15
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
16
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
17
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
18
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
19
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
20
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या

मुख्यमंत्र्यांकडून चर्चेचे निमंत्रणच नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 17, 2018 01:05 IST

कोल्हापूर : दूध दर आंदोलनप्रश्नी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयाकडून चर्चेचा कोणताही प्रस्ताव अथवा त्यांच्याकडून कोणताही संपर्क झालेला नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. आम्ही चर्चेला बोलवत आहे; परंतु संघटना किंवा शेट्टीच त्यासाठी तयार नाहीत, असा बुद्धिभेद करीत असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे. आम्ही ...

कोल्हापूर : दूध दर आंदोलनप्रश्नी चर्चा करण्यासाठी मुख्यमंत्री किंवा त्यांच्या कार्यालयाकडून चर्चेचा कोणताही प्रस्ताव अथवा त्यांच्याकडून कोणताही संपर्क झालेला नसल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी सांगितले. आम्ही चर्चेला बोलवत आहे; परंतु संघटना किंवा शेट्टीच त्यासाठी तयार नाहीत, असा बुद्धिभेद करीत असल्याची टीका शेट्टी यांनी केली आहे. आम्ही कायमच चर्चेला तयार असतो व चर्चेतूनच प्रश्न सुटतात यावर संघटनेचा विश्वास असल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे.मुंबईचा दूध पुरवठा बंद व्हावा यासाठी शेट्टी सोमवारी रात्रीपासून पालघर व ठाणे जिल्ह्यांत ठाण मांडून बसले आहेत. सोमवारी पहिलाच दिवस असल्याने ग्राहकांना फारसा फटका बसला नाही तरी बुधवारपासून दुधाची टंचाई जाणवणार आहे. आंदोलनास सर्वत्रच प्रतिसाद असून, शेतकऱ्यांनी थोडी कळ सोसावी, असे आवाहन शेट्टी यांनी केले. एरव्ही कोणत्याही प्रश्नावर प्रतिक्रिया देणारे नेते आता मूग गिळून गप्प असल्याची टीका स्वाभिमानी संघटनेने केली आहे.सदाभाऊंचे आगीत तेल...गाय दुधाच्या दरवाढीसाठी राज्यभर आंदोलन पेटले असताना त्यात कृषी राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आगीत तेल ओतले. सदाभाऊ यांनी या आंदोलनात दुधात पाणी मिसळून रस्त्यावर ओतले जात असल्याची टीका दुपारी केली. त्यामुळे दूध उत्पादकांतून संतप्त प्रतिक्रिया व्यक्त झाली. सदाभाऊंनी आंदोलनाची अशी कुचेष्टा केल्यास त्यांना हाच शेतकरी धडा शिकविल्याशिवाय राहणार नाही, असा इशाराही कार्यकर्त्यांनी दिला.