शहरं
Join us  
Trending Stories
1
“आता गृह मंत्रालय घेतले, पुढे भाजपावाले नितीश कुमारांचे CM पद काढून घेतील”; कुणाचा दावा?
2
“भावनिक वातावरण तयार करून मते मिळवण्याचा प्रयत्न”; राज ठाकरेंच्या विधानावर भाजपाचे उत्तर
3
सोन्याच्या खाणीत गुंतवणूक करा, 5 वर्षांची कर सूट मिळवा; अफगाणिस्तानची भारताला मोठी ऑफर
4
रिलायन्स जिओला ग्राहक वैतागले! कॉलवेळी ऐकायलाच येत नाहीय..., प्रचंड समस्या, बीएसएनएल परवडले...
5
मोठा पेच...! धर्मेंद्र यांच्या ४५० कोटींच्या संपत्तीचे वारसदार कोण? दोन पत्नी, ६ मुले... 
6
Dharmendra Last Rites: देओल कुटुंबीयांचा आधार हरपला; अभिनेते धर्मेंद्र अनंतात विलीन, सनी देओलने दिला मुखाग्नी
7
"सरकारनं माझं ऐकलं नाही तर संसदेच्या छतावरून उडी मारेन"; जेव्हा राजकारणात दिसली धर्मेंद्र यांची 'शोले स्टाईल'
8
Women’s Kabaddi World Cup 2025: कबड्डीतही भारताच्या लेकी जगात भारी! सलग दुसऱ्यांदा जिंकली वर्ल्ड कप स्पर्धा
9
आधी कारने धडक, मग १९ सेकंदात १९ कुऱ्हाडीचे घाव; गुरुग्राममध्ये डिलिव्हरी बॉयवर जीवघेणा हल्ला!
10
आधुनिक तंत्रज्ञान, पूर्णपणे मेड इन इंडिया; भारतीय नौदलात ‘INS माहे’ची धमाकेदार एन्ट्री...
11
प्रेमात धोका! मिस कॉलने जोडले नाते, प्रियकराने तोडले! गर्भवती प्रेयसीचा गर्भपात करून स्टेशनवर सोडून पळाला
12
डॉ. गौरी गर्जे यांचा मृत्यू अनैसर्गिक; डॉक्टरांच्या खुलाशाने खळबळ, शवविच्छेदन अहवालात कोणत्या नोंदी?
13
"विश्वास ठेवा, दुसरा कुठलाही हेतू नाही" माओवाद्यांनी आत्मसमर्पणासाठी मागितली १५ फेब्रुवारीपर्यंतची वेळ
14
IND vs SA: टीम इंडियाच्या फलंदाजांची घसरगुंडी, दुसरीकडे करूण नायरची सूचक पोस्ट, म्हणाला...
15
गौरी पालवे मृत्यू प्रकरण: पती अनंत गर्जेंना २७ नोव्हेंबरपर्यंत पोलिस कोठडी, काल झालेली अटक
16
'३० कॉटेजचे एक आलिशान रिसॉर्ट बांधायचेच राहिले...'; बिझनेसमन धर्मेंद्रची शेवटची इच्छा होती...
17
महिंद्रा-टाटासह 'या' कंपन्यांचे शेअर्स धडाधड कोसळले! बाजारात अचानक का वाढला विक्रीचा दबाव?
18
दिल्ली विमानतळावर मोठा अपघात टळला; अफगाणिस्तानातून आलेल्या विमानाची चुकीच्या रनवेवर लँडिंग
19
IND vs SA 2nd Test Day 3 Stumps : बावुमानं टीम इंडियाला फॉलोऑन देणं टाळलं; कारण...
20
नगरपरिषद निवडणूक होण्यापूर्वीच भाजपाच्या १०० सदस्यांची बिनविरोध निवड; विरोधकांचा हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

पेयजलमधील भ्रष्टाचाऱ्यांची गय नाही

By admin | Updated: January 1, 2017 23:26 IST

सदाभाऊ खोत : चिपरी येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालयाचे उद्घाटन

जयसिंगपूर : अपुऱ्या व मंजुरीच्या प्रतीक्षेत असलेल्या पेयजल योजना पूर्णत्वासकडे नेणार आहे. अनेक गावांत या योजनेत घोटाळे झाले आहेत. सध्या पाणीपुरवठा व स्वच्छता खाते माझ्याकडे असल्याने ज्यांनी हे घोटाळे केले आहेत, त्यांची गय करणार नाही, असा इशारा राज्याचे कृषी व पणनमंत्री सदाभाऊ खोत यांनी व्यक्त केला. शेतकऱ्यांच्या हिताचे निर्णय होणार असल्यामुळे हे सरकार शेतकऱ्याचे असल्याचा विश्वासही त्यांनी व्यक्त केला.चिपरी (ता. शिरोळ) येथे नूतन ग्रामपंचायत कार्यालय व बौद्ध समाज मंदिराचे उद्घाटन मान्यवरांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी मंत्री खोत बोलत होते. अध्यक्षस्थानी खासदार राजू शेट्टी होते. यावेळी आमदार उल्हास पाटील म्हणाले, गेल्या दोन वर्षांत शिरोळ तालुक्यात मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध केला आहे, तर तालुक्यातील प्रत्येक गावाला एक कोटी रुपयाचा निधी देणार आहे. त्यामुळे तालुका विकासाच्या अव्वलस्थानी राहणार असल्याचे त्यांनी सांगितले. स्वागत धनपाल कनवाडे, तर प्रस्ताविक सरपंच सुरेश भाटिया यांनी केले.यावेळी जिल्हा परिषद सदस्य नीता परीट, सावकार मादनाईक, जयसिंगपूरच्या नगराध्यक्ष डॉ. नीता माने, पक्षप्रतोत बजरंग खामकर, भगवान काटे, प्रा. जालिंदर पाटील, मनोज राजगिरे, भगवानराव कांबळे, ग्रामसेवक बी. एन. टोणे, शीतल पाटील, अर्चना मरळे, वनिता जगदाळे, मिलिंद जगदाळे, प्रवीण देसाई, जयपाल कोळी, श्रीकांत पवार, रमेश रजपूत, विविध संस्थेचे पदाधिकारी यांच्यासह ग्रामस्थ उपस्थित होते. उपसरपंच अभयकुमार पाटील यांनी आभार मानले.चिपरीचा रस्ता करणारचिपरी उद्घाटनप्रसंगी खासदार राजू शेट्टी म्हणाले, खासगी ठेकेदाराच्या मनमानी कारभारामुळे सांगली-कोल्हापूर महामार्गाच्या अंतर्गत जोड रस्त्यावरील चिपरी गावाचा रस्ता अडचणीत सापडला आहे. त्यामुळे या गावाच्या चारही बाजूला रस्त्याची दुरवस्था मोठ्या प्रमाणात झाली आहे. त्यामुळे विकासाच्या दृष्टीने चिपरी गावाच्या रस्त्यासाठी मुख्यमंत्री फंडातून सदाभाऊ खोत निधी देणार आहेत. तसेच खासदार फंडातून निधी उपलब्ध करणार असल्याचे सांगितले.