शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
3
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
4
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
5
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
6
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
7
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
8
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
9
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
10
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
11
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
12
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
13
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
14
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
15
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
16
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
17
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
18
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
19
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
20
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
Daily Top 2Weekly Top 5

उचंगीच्या पुनर्वसनाबाबत बैठकीत ठोस निर्णय नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 19, 2021 04:21 IST

आजरा : उचंगी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठकीत कोणताही ठोस निर्णय नाही. फक्त आश्वासने दिली. आश्वासनाऐवजी प्रत्यक्षात काम करा अन्यथा: धरणाचे ...

आजरा : उचंगी धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाबाबत बैठकीत कोणताही ठोस निर्णय नाही. फक्त आश्वासने दिली. आश्वासनाऐवजी प्रत्यक्षात काम करा अन्यथा: धरणाचे काम सुरू करण्यास धरणग्रस्तांचा विरोध आहे. असे सांगत उचंगी धरणग्रस्तांनी आज धरणाचे काम बंद पाडले.

धरणाच्या सांडव्याचे काम चालू आहे. ते काम बंद करण्यास पाटबंधारेच्या अधिकाऱ्यांनी भाग पाडले. धरणग्रस्तांच्या पुनर्वसनाशिवाय काम करू नये. मागण्यांची पूर्तता करा, मगच धरणाचे काम सुरू, अशा सूचना धरणग्रस्तांनी यावेळी दिल्या. धरणस्थळावर आंदोलक मोठ्या संख्येने जमा झाले होते.

पुनर्वसनाचे प्रश्न वेळेत संपविले जात नसल्याने गेली २१ वर्षे धरणाचे काम खोळंबले आहे. धरणाच्या कामाला धरणग्रस्तांचा विरोध नाही, पण धरणाच्या कामाबरोबर पुनर्वसनाचे काम झालेच पाहिजे ते होत नाही. बैठकांमध्ये फक्त आश्वासने दिली जातात. त्याचे पालन केले जात नसल्याच्या आरोप यावेळी धरणग्रस्तांनी केला. पाटबंधारे विभागाचे अधिकारी अमोल नाईक यांना मागणीचे निवेदन देऊन धरणाचे काम धरणग्रस्तांनी बंद पाडले.

संकलन रजिस्टरबाबत शिबिरे घेण्याऐवजी तातडीने दुरुस्त करा. धरणाची उंची दोन मीटरने वाढविलेमुळे जमीन संपादन करण्यात यावी, जमीन नाकारलेल्या धरणग्रस्तांना लाभक्षेत्रात जमीन मिळावी, २००७ पूर्वी अर्ज केलेल्या धरणग्रस्तांची ६५ टक्के रक्कम भरून घेण्यात यावी. जमीन वाटपाचे आदेश झालेल्या धरणग्रस्तांना जमिनीचे वाटप करावे, भुईभाडे व ६५ टक्के रकमेवरील व्याज तातडीने मिळावे. यासह अन्य मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

यावेळी संजय तर्डेकर, दत्तात्रय बापट, सुरेश पाटील, निवृत्ती बापट, शिवाजी बापट, संजय भडांगे, प्रकाश मणकेकर, मारुती चव्हाण यासह धरणग्रस्त मोठ्या संख्येने उपस्थित होते.

फोटो ओळी : उचंगी धरणाचे काम बंद पाडून पाटबंधारे अधिकारी अमोल नाईक यांचेकडे निवेदन देताना धरणग्रस्त.

क्रमांक : १८०३२०२१-गड-०२

-

फोटो ओळी : सांडव्याचे काम बंद पाडल्यानंतर परिसरात शुकशुकाट जाणवत होता.

क्रमांक : १८०३२०२१-गड-०३