शहरं
Join us  
Trending Stories
1
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
2
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
3
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
4
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
5
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
6
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
7
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
8
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
9
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
10
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
11
चव्हाणांनी टाळला 'महायुती' शब्दप्रयोग; म्हणाले, फक्त कमळालाच करा मतदान..!
12
मुंबईत मात्र शरद पवार गटाची राज, उद्धवसोबत जाण्याला पहिली पसंती; मुंबईसाठी उद्धवसेनेला २२ ते ३० जागांचा प्रस्ताव? 
13
६ किलो सोने, ३१३ किलो चांदी अन् ४.६२ कोटी रोख; दिल्लीतील ट्रॅव्हल एजंटवर ईडीची कारवाई, १२ छापे
14
एकतर मैत्रिपूर्ण लढा किंवा समसमान जागावाटप करा; भाजपमधील युती नकोच म्हणणाऱ्यांची नवी भूमिका
15
'सर तन से जुदा' घोषणा देणे देशद्रोह : हायकोर्ट; प्रेषित मोहम्मदांच्या आदर्शाचा केलेला अवमान
16
ठाण्यातील १३१ पैकी १०० जागांवर उद्धवसेना; शरद पवार गटाचा दावा, पहिल्या बैठकीत चर्चा
17
IND vs SA :गोलंदाजीत बुमराह-चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
18
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
19
"मी माझ्या पार्टनरलाही सांगितले होते की,..." मॅचनंतर पांड्यानं शेअर केली आक्रमक खेळीमागची गोष्ट
20
अमरावतीत १९ वर्षीय तरुणाच्या हत्येनंतर तणाव, २०-२५ जणांच्या टोळक्याचा धुडगूस, १० जण ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

चौपदरीकरणात नुकसानभरपाई नाही

By admin | Updated: April 22, 2015 00:23 IST

मिळकतधारकांचा आंदोलनाचा पवित्रा : कोल्हापूर-सांगली रस्त्याचे काम हातकणंगलेत रखडण्याची शक्यता

'दत्ता बीडकर - हातकणंगले कोल्हापूर - सांगली रस्त्याच्या चौपदरीकरणात इमारतमालकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाची बांधकामासाठी परवानगी पूर्वी घेतली नसल्याने पेठा विभागामधील दोनशे ते तीनशे इमारती रस्ता चौपदरीकरणात जाणार असताना त्यांना नुकसानभरपाई मिळणार नसल्याचा फतवा सार्वजनिक बांधकाम व प्रांत कार्यालयाकडून काढल्यामुळे इमारत मिळकतधारक आंदोलनाबरोबर न्यायालयाचे दरवाजे ठोठावणार आहेत. त्यामुळे चौपदरीकरणाचे काम हातकणंगलेत रखडण्याची शक्यता निर्माण झाली आहे.याबाबत ठेकेदार सुप्रीम कंपनीच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता कंपनीने चौपदरीकरणाचा सर्व्हे करताना या इमारतीच्या नुकसानीचा सर्व्हे आणि द्यावी लागणारी रक्कम बांधकाम विभागाकडे अहवालाद्वारे दिली आहे. मात्र, बांधकाम विभागाने या इमारतमालकांची परवानगी घेतली नाही, असे कंपनीला कळविल्याचे मत व्यक्त केले.३१ मार्चनंतर ३१ मे ही डेडलाईन काम पूर्ण करण्यासाठी सार्वजनिक बांधकाममंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिल्यानंतर प्रशासन, ठेकेदार, सुप्रीम कंपनी चौपदरीकरणासाठी लागणारी जमीन भूसंपादन करण्यासाठी इचलकरंजी प्रांत कार्यालयाकडून पावले उचलली जात आहेत. हातकणंगले आणि अतिग्रे येथील भूसंपादनासाठी मिळकतधारकांना अंतिम नोटिसा देऊन रक्कम अदा करण्याची कारवाई पूर्ण केली जात आहे.हातकणंगले पंचायत समिती ते इचलकरंजी फाटा असा ९०० मीटरचा उड्डाणपूल वाढीव प्रस्तावित करून कंपनीने पूर्वीच्या आघाडी सरकारकडे उड्डाणपुलासाठी ६० कोटींचा जादा निधी खर्च करण्यास परवानगी मागितली होती. मात्र, पायाभूत समितीने आणि मंत्रिमंडळ समितीने ठेकेदार कंपनीला उड्डाणपूल उभारणीस मान्यता दिली नाही. तत्पूर्वीच कंपनीने हातकणंगले येथे उड्डाणपूल उभारणीसाठी रस्त्याच्या मध्यभागी कॉलम उभा केले. मात्र, मंत्री समिती आणि जिल्हाधिकारी यांनी उभा केलेले उड्डाणपुलाचे कॉलम कापून टाकून रस्ता खुला करण्याचे आदेश सुप्रीम कंपनीला दिले असताना कंपनीने याकडे डोळेझाक केली आहे. उड्डाणपुलाचे कॉलम पूर्वपरवानगीशिवाय उभा केल्याबद्दल तसेच वाहतुकीस अडथळा निर्माण केल्याच्या कारणास्तव कंपनीविरुद्ध हातकणंगले पोलीस ठाण्यामध्ये गुन्हा दाखल करण्याचे आदेश पोलीस अधीक्षकांनी दिले होते.पंचायत समिती ते इचलकरंजी फाटा या ९०० मीटरच्या अंतरामध्ये जवळपास २०० ते ३०० इमारती आहेत. या दोन्ही बाजूंच्या इमारतीत गेली ४०-५० वर्षे लोक आपले वास्तव्य करीत आहेत. स्वत:च्या सात-बाराच्या जागेत घरे बांधून, तर काही रहिवाशी सातबाराची जागा बिगरशेती आणि व्यावसाईक बिगरशेती करून राहत आहेत. या रहिवाशांनी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून आपल्या इमारती-घरे बांधताना परवानगी घेतली नाही, या कारणास्तव या मिळकतधारकांना नुकसानभरपाईमधून वगळण्यात आले आहे. सात-बाराच्या जमिनीचे बिगरशेती परवाने तसेच व्यावसाईक परवाने तहसीलदार-प्रांताधिकारी यांनी दिल्यानंतर नागरिकांनी आपल्या इमारती-घरे बांधली आहेत. मग सार्वजनिक बांधकाम विभागाने इमारती बांधत असताना संबंधितांना नोटिसा काढून अटकाव का केला नाही, असा सवाल उपस्थित होत आहे.