शहरं
Join us  
Trending Stories
1
"हा वादाचा नव्हे, समाजाचा विषय; आरोग्य अन् आस्था..."; CM फडणवीसांचे कबुतरखाना वादावर विधान
2
Palghar Crime: धक्का लागला म्हणून कुऱ्हाडीने केले वार, लोकांनी झाडाला बांधून आरोपी चोपला
3
"आम्हाला नाही माहीत, पाकिस्तानला...!"; ऑपरेशन सिंदूर दरम्यान एफ-१६ लढाऊ विमान पाडलं गेलं? अमेरिकेनं दिलं असं उत्तर
4
सावरकरांवरील विधानांमुळे माझ्या जीवितास धोका, राहुल गांधींचा दावा, महात्मा गांधींचा उल्लेख करत म्हणाले... 
5
Kabutar Khana: 'तुम्ही असा आदेश कसा काढू शकता?', उच्च न्यायालयाने मुंबई महापालिकेला झापले; काय घडलं?
6
दोन नाही, युट्यूबर अरमान मलिकच्या चार पत्नी; कोर्टाने पाठवले समन्स; धक्कादायक कारण आले समोर
7
भारताचं नागरिकत्व घेण्यापूर्वीच मतदार यादीत नोंदवलं गेलं होतं सोनिया गांधींचं नाव, भाजपाचा गंभीर आरोप
8
'झपाटलेला'मधील लक्ष्याची आवडी आठवतेय का?, सध्या या मालिकेत करतेय काम
9
"संतोष देशमुखांच्या कार्याने गावाला दिल्लीचा मान"; मस्साजोगच्या सरपंचांना PM मोदींकडून निमंत्रण
10
"Muscles असलेल्या बिपाशाशीच लग्न कर", म्हणणाऱ्या मृणाल ठाकूरला अभिनेत्रीचं चोख उत्तर, म्हणाली- "एक स्त्री..."
11
कबुतरखाना बंदी वाद राज ठाकरेंनी मध्यस्थी करून संपवावा; जैन मुनींनी घातली साद, म्हणाले...
12
SBI च्या ग्राहकांना मोठा झटका! १५ ऑगस्टपासून 'या' सेवेसाठी लागणार शुल्क, वाचा नवे नियम
13
Maharashtra Politics : एकनाथ शिंदे अन् आदित्य ठाकरे एकाच मंचावर येणार,नेमकं कारण काय?
14
पुढच्या ५ वर्षात २० हजार जणांना नोकरी देण्याचं लक्ष्य; PWC कंपनीने जाहीर केले 'व्हिजन २०३०'
15
ऑपरेशन सिंदूरवेळी सीमेवरील गावातील ग्रामस्थांनी केलं असं काम, आता सरपंचांचा स्वातंत्र्य दिनी होणार सन्मान
16
एकही सामना न खेळता Rohit Sharma ला अचानक 'प्रमोशन'; पाकिस्तानच्या माजी कर्णधाराने केली मदत
17
500 KM रेंज देणारी Maruti e-Vitara किती तारखेला लॉन्च होणार? खास असतील फीचर्स, जाणूनघ्या किंमत!
18
“...तरच दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येऊ शकतात”; पुतण्याची काकांना थेट ऑफर; पण ठेवली मोठी अट
19
अमेरिका पाहत राहणार...! ऑटोमोबाईलचा किंग भारताला लढाऊ विमानांचे इंजिन देणार, मोठ्या डीलच्या दिशेने
20
ट्रम्प यांचे टॅरिफ वॉर, त्यात पाकिस्तान...; ऑपरेशन सिंदूर: भारताचे ४०० सैनिक अमेरिकेला जाणार

दत्तवाड बंधाऱ्याला बरगे घालण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2015 23:56 IST

पाणीटंचाईचे सावट : दूधगंगा नदीवरील राज्यातील शेवटचा बंधारा

गणपती कोळी -- कुरुंदवाड -कर्नाटक-महाराष्ट्र राज्याला जोडणारा दूधगंगा नदीवरील दत्तवाड-एकसंबा बंधारा सीमाभागाला एक वरदान म्हणून लाभले आहे. मात्र, सध्या येथील नदीपात्रात पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे बंधाऱ्याला बरगे घालून पाण्याची बचत करण्याबरोबरच सुरळीत पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.यावर्षी पाणीटंचाई असताना दत्तवाड बंधाऱ्याला बरगे नसल्यामुळे नदीतील पाणी थेट कर्नाटकात वाहून जात आहे. त्यामुळे दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, घोसरवाड, मडिकवाड, एकसंबासह परिसरातील गावांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनला असून, पाण्यावरून सीमाभागातील गावांत असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षी काळम्मावाडी धरणामध्ये ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.दूधगंगा नदीवरील दत्तवाड बंधारा हा महाराष्ट्रातील शेवटचा बंधारा असून, ती नदी पुढे कर्नाटकात यडूर येथे कृष्णा नदीस मिळते. त्यामुळे दत्तवाड बंधारा दुरुस्त करून बरगे घालण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या आठ वर्षांत शासनाने या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा बंधारा शासनाकडे हस्तांतर केला होता त्यावेळी अधिकाराऱ्यांकडून याची पाहणी झाली होती. मात्र, बरग्यांची पाहणी केली नव्हती. पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याला त्वरित बरगे घालून दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी अडवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल.- बबनराव चौगुले, माजी सरपंच - दत्तवाड.