शहरं
Join us  
Trending Stories
1
IND vs SA : बुमराह-वरुण चक्रवर्तीचा जलवा! मालिका विजयासह टीम इंडियानं वर्षाचा शेवट केला गोड
2
तैवान: मेट्रो स्टेशनवर थरार! ग्रेनेड, चाकूहल्ल्यात तीन जणांचा मृत्यू, हल्लेखोरही ठार
3
लालू यादव यांची पत्नी राबडी देवी यांंना दिल्ली न्यायालयाचा मोठा धक्का, काय आहे प्रकरण?
4
अवैध सावकारी प्रकरणात ब्रह्मपुरीत पुन्हा तक्रार; राजकुमार बावणे यांचा गंभीर आरोप
5
Hardik Pandya : पांड्याचा हार्ड हिटिंग शो! जलद अर्धशतकी खेळीसह घातली विक्रमाला गवसणी
6
रशिया-युक्रेन युद्ध तत्काळ थांबवण्यासाठी पुतिन तयार, पण ठेवली एक मोठी अट! ट्रम्प यांच्यासंदर्भातही बोलले
7
सायबर फ्रॉड करणाऱ्यांना आता चक्क मारले जाणार चाबकाचे फटके; कुठल्या देशात झाला निर्णय?
8
IND vs SA 5th T20I : तिलक वर्मा- हार्दिक पांड्यानं धु धु धुतलं! भारतीय संघानं उभारला धावांचा डोंगर
9
"She was Lo, plain Lo"; अल्पवयीन मुलींच्या शरीरावर एपस्टीनने लिहिलेल्या ओळींमागे भयानक अर्थ, अमेरिकेचे डार्क सिक्रेट उघड
10
"मीरा भाईंदर महापालिका निवडणुकीत ५० टक्के जागा द्या, नाहीतर..."; मंत्री सरनाईकांचा इशारा
11
SIR मुळे तामिळनाडूत खळबळ, मतदार यादीतून हटवली तब्बल ९८ लाख नावं, धक्कादायक माहिती समोर
12
IND vs SA 5th T20I : वर्ल्ड कप संघ निवडीआधी गिल 'आउट'; संजूला पुन्हा मिळाली ओपनिंगची संधी अन्...
13
Manikrao Kokate: माणिकराव कोकाटे यांची अटक टळली; हायकोर्टाने शिक्षेला स्थगिती दिली, पण...
14
नालासोपारा: जमिनीवर पाडलं, लाथाबुक्क्यांनी मारलं... सख्ख्या भावाचा खून करणाऱ्या आरोपीला अटक
15
सावधान! तुम्हीही घाईघाईत जेवताय? आताच बदला सवय; स्वत:च देताय अनेक आजारांना आमंत्रण
16
लाडात वाढवलं, खूप शिकवलं, पण मुलीनं पळून जाऊन लग्न केलं, संतप्त कुटुंबानं जिवंतपणी काढली अंत्ययात्रा 
17
अंगठी घातल्याने अथवा नाव बदलल्याने नशीब बदलतं का? प्रेमानंद महाराजांनी दिलं असं उत्तर
18
NCP नेत्यांची अजितदादांसोबत बैठक, CM फडणवीसांशीही चर्चा अपेक्षित; २९ मनपात महायुती म्हणून…
19
U19 Asia Cup 2025 : ठरलं! आशिया कप स्पर्धेत पुन्हा भारत-पाक यांच्यात रंगणार फायनल!
20
“भगवान ऋषभदेवांचे विचार भारताच्या प्राचीन व महान संस्कृतीचे प्रतीक”: CM देवेंद्र फडणवीस
Daily Top 2Weekly Top 5

दत्तवाड बंधाऱ्याला बरगे घालण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2015 23:56 IST

पाणीटंचाईचे सावट : दूधगंगा नदीवरील राज्यातील शेवटचा बंधारा

गणपती कोळी -- कुरुंदवाड -कर्नाटक-महाराष्ट्र राज्याला जोडणारा दूधगंगा नदीवरील दत्तवाड-एकसंबा बंधारा सीमाभागाला एक वरदान म्हणून लाभले आहे. मात्र, सध्या येथील नदीपात्रात पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे बंधाऱ्याला बरगे घालून पाण्याची बचत करण्याबरोबरच सुरळीत पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.यावर्षी पाणीटंचाई असताना दत्तवाड बंधाऱ्याला बरगे नसल्यामुळे नदीतील पाणी थेट कर्नाटकात वाहून जात आहे. त्यामुळे दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, घोसरवाड, मडिकवाड, एकसंबासह परिसरातील गावांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनला असून, पाण्यावरून सीमाभागातील गावांत असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षी काळम्मावाडी धरणामध्ये ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.दूधगंगा नदीवरील दत्तवाड बंधारा हा महाराष्ट्रातील शेवटचा बंधारा असून, ती नदी पुढे कर्नाटकात यडूर येथे कृष्णा नदीस मिळते. त्यामुळे दत्तवाड बंधारा दुरुस्त करून बरगे घालण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या आठ वर्षांत शासनाने या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा बंधारा शासनाकडे हस्तांतर केला होता त्यावेळी अधिकाराऱ्यांकडून याची पाहणी झाली होती. मात्र, बरग्यांची पाहणी केली नव्हती. पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याला त्वरित बरगे घालून दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी अडवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल.- बबनराव चौगुले, माजी सरपंच - दत्तवाड.