शहरं
Join us  
Trending Stories
1
Maharashtra Politics: हिंदीवरून महायुतीत गोंधळ, महाविकास आघाडीमध्ये ऐक्य
2
आजचे राशीभविष्य - २८ जून २०२५, आज 'या' राशीतील लोकांनी आरोग्याची काळजी घेणे आवश्यक
3
भारतासोबत ‘खूप मोठा’ व्यापार करार; डोनाल्ड ट्रम्प यांनी दिली माहिती, भारताला कोणती चिंता?
4
नग्न फोटो काढले; भयग्रस्त विद्यार्थिनीने जेवण सोडले; बीडमध्ये २ शिक्षकांकडून १० महिन्यांपासून लैंगिक छळ
5
आपले पूर्वज तरी कोण? कोणाशी जुळतो डीएनए? एम्स व कॅलिफोर्नियाच्या शास्त्रज्ञांचा महत्त्वपूर्ण शोध
6
भाजप प्रदेशाध्यक्षपदी रवींद्र चव्हाण, १ जुलैला घोषणा; किरण रिजिजू निरीक्षक
7
विशेष लेख: इंदिरा गांधी यांच्या जागी दुसरे कुणी असते तरीही...
8
जुलैमध्ये १३ दिवस बँका राहणार बंद; राज्यनिहाय वेगळ्या सुट्ट्या, महाराष्ट्रात किती दिवस राहणार बंद?
9
मनोमीलनाआधी ‘मोर्चा’मीलन; हिंदी विरोधी मोर्चात राज ठाकरे-उद्धव ठाकरे एकत्र
10
अग्रलेख: अंतराळात भारतीय शुभकिरण! भारताचे स्वप्न पूर्ण होण्याचा क्षण
11
लेख: तुमच्या घरातला एसी आता ‘फार’ थंड नाही होणार!
12
Shefali Jariwala Death: 'कांटा लगा गर्ल' अ‍ॅक्ट्रेस शेफाली जरीवालाचे निधन, वयाच्या ४२ व्या वर्षी आला हृदयविकाराचा झटका
13
जगन्नाथ यात्रेला गालबोट, प्रचंड जनसमुदायामुळे व्यवस्था फोल; तब्बल ६०० भाविक जखमी, उपचार सुरू
14
“राष्ट्रीय स्वयंसेवक संघ काय करतो, RSS म्हणजे काय?”; मोहन भागवतांनी एकाच वाक्यात सांगितले
15
ट्रम्प यांचा चीनसोबत व्यापार करार, आता भारतासंदर्भात केलं मोठं विधान; म्हणाले- 'खूप मोठा...'
16
प्लेन क्रॅशनंतर खुशाल ऑफिसात पार्टी करत होते, एअर इंडियाने 4 अधिकाऱ्यांना झटक्यात 'किक आउट' केले!
17
'त्यांना संविधान खुपते, म्हणून...', RSS नेते दत्तात्रय होसबळे यांच्या वक्तव्यावर राहुल गांधी संतापले
18
“समृद्धीनंतर आता शक्तिपीठ महामार्गात मोठा भ्रष्टाचार, कमिशनखोरी...”: पृथ्वीराज चव्हाण
19
"४० हजार घे अन् माझ्यासोबत...", सासऱ्याची सुनेकडे विक्षिप्त मागणी; अखेर 'असा' शिकवला धडा!
20
"माझा मुलगा तर गेला, आता त्याचे स्पर्म तरी द्या", मुंबई उच्च न्यायालयाकडे आईची मागणी; जाणून घ्या, मग काय घडलं?

दत्तवाड बंधाऱ्याला बरगे घालण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 15, 2015 23:56 IST

पाणीटंचाईचे सावट : दूधगंगा नदीवरील राज्यातील शेवटचा बंधारा

गणपती कोळी -- कुरुंदवाड -कर्नाटक-महाराष्ट्र राज्याला जोडणारा दूधगंगा नदीवरील दत्तवाड-एकसंबा बंधारा सीमाभागाला एक वरदान म्हणून लाभले आहे. मात्र, सध्या येथील नदीपात्रात पाण्याचा तुटवडा आहे. त्यामुळे बंधाऱ्याला बरगे घालून पाण्याची बचत करण्याबरोबरच सुरळीत पाणीपुरवठा करण्याची गरज निर्माण झाली आहे.यावर्षी पाणीटंचाई असताना दत्तवाड बंधाऱ्याला बरगे नसल्यामुळे नदीतील पाणी थेट कर्नाटकात वाहून जात आहे. त्यामुळे दत्तवाड, नवे दानवाड, जुने दानवाड, घोसरवाड, मडिकवाड, एकसंबासह परिसरातील गावांना पिण्याच्या व शेतीच्या पाण्याच्या प्रश्न गंभीर बनला असून, पाण्यावरून सीमाभागातील गावांत असंतोष निर्माण होण्याची शक्यता आहे. यावर्षी काळम्मावाडी धरणामध्ये ७५ टक्के पाणीसाठा शिल्लक असला तरी उन्हाळ्यात पाणीटंचाई निर्माण होण्याची शक्यता आहे.दूधगंगा नदीवरील दत्तवाड बंधारा हा महाराष्ट्रातील शेवटचा बंधारा असून, ती नदी पुढे कर्नाटकात यडूर येथे कृष्णा नदीस मिळते. त्यामुळे दत्तवाड बंधारा दुरुस्त करून बरगे घालण्याची गरज निर्माण झाली आहे. गेल्या आठ वर्षांत शासनाने या बंधाऱ्याकडे दुर्लक्ष केले आहे. हा बंधारा शासनाकडे हस्तांतर केला होता त्यावेळी अधिकाराऱ्यांकडून याची पाहणी झाली होती. मात्र, बरग्यांची पाहणी केली नव्हती. पाटबंधारे विभागाने या बंधाऱ्याला त्वरित बरगे घालून दुष्काळसदृश परिस्थितीत पाणी अडवून शेतकऱ्यांना दिलासा द्यावा; अन्यथा परिसरातील शेतकऱ्यांना घेऊन आंदोलन करण्यात येईल.- बबनराव चौगुले, माजी सरपंच - दत्तवाड.