शहरं
Join us  
Trending Stories
1
'या' माशांना वाचवण्यासाठी बांगलादेशनं उतरवलं सैन्य दल; बंगालच्या खाडीत पाठवल्या १७ युद्धनौका
2
‘कोस्टल’वर थेट १४० चा हायस्पीड: ...तर मग गुन्हाच होईल दाखल; वाहतूक पोलिसांकडून दिवसाला ५०० ई-चालानची कारवाई
3
FD करुन तुम्ही कधीही श्रीमंत होणार नाही? CA ने दिला इशारा, म्हणाले खऱ्या कमाईसाठी गुंतवणूक धोरण बदला
4
Video - अरे बापरे! ऑर्डर केला iPhone 16; बॉक्स उघडताच...; ऑनलाईन खरेदीत अजब भानगड
5
Tata Capital IPO: प्रतीक्षा संपली! तुमच्या खिशात आहेत का १४,९९६ रुपये? तर बनू शकता टाटांच्या कंपनीचे प्रॉफिट पार्टनर
6
इवलीशी मुंबई झाली महाकाय ! त्या त्या भागानुसार प्रति स्क्वेअर फुटाचा दर काय... पहाल तर...
7
"प्यार मे सौदेबाजी...", अरबाज खान दुसऱ्यांदा बाबा झाल्यानंतर मलायका अरोराची क्रिप्टिक पोस्ट
8
सोनम वांगचुक यांच्या अटकेवर आज सर्वोच्च न्यायालयात सुनावणी, पत्नीने दाखल केली याचिका
9
Kantara Chapter 1: साऊथने पुन्हा एकदा करून दाखवलं! फक्त ४ दिवसांत 'कांतारा'ने कमावले ३०० कोटी
10
पतीच्या मृत्यूनंतर पुन्हा जोडीदाराची इच्छा पडली महागात; मॅट्रिमोनियल साइटवरून शिक्षिकेला कोट्यवधींचा गंडा!
11
Post Office Scheme: दर महिन्याला होईल ₹६१,००० ची कमाई; जबरदस्त आहे ही सरकारी स्कीम, कोट्यधीशही बनवेल
12
Jaipur Hospital Fire: जयपूरच्या एसएमएस रुग्णालयात भीषण अग्नितांडव: आयसीयूमध्ये ६ रुग्णांचा दुर्दैवी अंत, ५ जणांची प्रकृती चिंताजनक
13
Share Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, Nifty २४,९१० च्या वर; सरकारी बँकांच्या शेअर्समध्ये मोठी तेजी
14
Jaipur Hospital Fire: '२० मिनिटांपूर्वी आगीची माहिती दिली, पण डॉक्टर पळून गेले'; SMS रुग्णालयातील प्रत्यक्षदर्शींचा धक्कादायक दावा
15
Video:...तर भारताच्या 'या' खेळाडूला मारायचंय; पाकिस्तानी स्पिनर अबरार अहमदचं विधान चर्चेत
16
पती अन् दोन मुलांना सोडून शेजाऱ्यासोबत सुरू होतं अफेअर; 'ओयो'मध्ये प्रियकर गर्लफ्रेंडसोबत दिसला अन्...
17
या राज्यात ५० किमी वेगाने वारे वाहतील, मुसळधार पाऊस आणि गारपिटीचा इशारा
18
देशातील राष्ट्रीय चलनातून चार शून्य हटवले जाणार; इराणचा ऐतिहासिक निर्णय, काय होणार बदल?
19
उत्खनन क्षेत्रात छत्तीसगडची ऐतिहासिक झेप; खनिज महसूल २५ वर्षांत ३४ पटीने वाढला!
20
त्यानं स्वतःच कापला प्रायव्हेट पार्ट अन् रचला हल्ल्याचा बनाव! पोलिसांना गोंधळात टाकणारा प्रकरणाचा 'असा' झाला खुलासा

प्रगतीसाठी आरक्षण मिळालेच पाहिजे

By admin | Updated: October 13, 2016 02:06 IST

अंजली साळवी : आरक्षणाअभावी प्रगती नाही

कोल्हापूर : गुणवत्ता असताना देखील मराठा तरुण-तरुणींची शैक्षणिक आणि नोकरीच्या ठिकाणी आरक्षण नसल्याने नेहमीच पिछाडी होत आहे. त्यामुळे प्रगतीसाठी मराठा समाजाला आरक्षण मिळणे गरजेचे आहे, असे मत सीमंतिनी मराठा महिला मंडळाच्या अध्यक्षा डॉ. अंजली साळवी यांनी ‘लोकमत’शी बोलताना व्यक्त केले. डॉ. साळवी म्हणाल्या, ‘मराठा म्हणजेच महाराष्ट्र आणि महाराष्ट्र म्हणजेच मराठा,’ अशी ओळख आहे.आपला मराठा समाज क्षत्रिय म्हणून नावाजलेला पण, या समाजाच्या उन्नतीकडे मराठा समाजाचे नेते, राज्यकर्त्यांनी लक्षच दिले नाही. त्यामुळे या समाजाला प्रगतीचे ठोस असे कुठलेच साधन उपलब्ध नाही. बहुतांश मराठा हा शेती व्यवसाय करतो. शेतीला हमीभाव मिळत नसल्याने समाजासमोर तीव्र स्वरूपात आर्थिक प्रश्न निर्माण झाले आहेत. त्यामुळे मराठा समाजातील मुला-मुलींना उच्चशिक्षण घेता येत नाही. त्याचा परिणाम समाजाच्या प्रगतीवर झाला आहे. छत्रपती शिवराय यांचे कर्तृत्व आणि त्यांच्या मावळ्यांनी महाराष्ट्राचे अस्तित्व कायम ठेवले. हे अस्तित्व कायम ठेवणारे मराठेच होते. बदलत्या काळानुसार पुढच्या पिढीचा विचार करता, शिक्षणाची विविध दालने उभी केली. युवापिढी कष्टाने शिकत राहिली. आरक्षणाअभावी शिक्षणाचा उपयोग मात्र, त्यांना त्यांच्या आयुष्यामध्ये आशेचा किरण दाखवू शकला नाही. त्याचा परिणाम ही युवा पिढी मानसिकदृष्ट्या खचली. आरक्षण मिळविण्यासह स्त्री सन्मानाची जाणीव करून देण्यासाठी मराठा समाजाने क्रांती मूक मोर्चाद्वारे पाऊल टाकले आहे. झळ बसल्याने तरुणाईच अधिक पेटून उठली आहे मराठा समाजातील खदखद लक्षात घेऊन मागण्यांबाबत सरकारने सकारात्मक पाऊल टाकले पाहिजे.लढा शांततेच्या मार्गानेमराठा समाजाने न्याय मागण्यांसाठी क्रांती मूकमोर्चाद्वारे शांततेच्या माध्यमातून लढा उभारला आहे. ‘आता नाही, तर कधीच नाही’ हे या भूमिकेतून मराठा समाज रस्त्यावर उतरला आहे. आता मराठा समाज अन्याय सहन करणार नाही, असे डॉ. साळवी म्हणाल्या. समाजातील महिला बदलत्या काळानुसार घराचा उंबरठा ओलांडून बाहेर पडल्या आहेत. शिक्षण घेतल्यानंतर त्या ज्ञानाचा उपयोग समाज व स्वत:ची आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी त्या नोकरीच्या शोधात बाहेर पडल्या; परंतु, क्षमता असून आरक्षणाअभावी योग्य नोकरी नाही. स्वतंत्र महामंडळ हवेमराठा समाजातील महिलांच्या सक्षमीकरणासाठी राज्य सरकारने स्वतंत्र महामंडळ सुरू करावे. त्यांच्यासाठी विशेष सवलती जाहीर करून त्या कागदावर न ठेवता प्रत्यक्षात अंमलबजावणी करावी. महिलांसाठी विशेष आरक्षण दिले पाहिजे. आर्थिकदृष्ट्या मागे पडलेल्या मराठा समाजाला आरक्षणाच्या माध्यमातून नवी दिशा प्राप्त होईल. या समाजाच्या प्रगतीसाठी आरक्षण महत्त्वाचे आहे. भूमिका मराठाशिलेदारांच्या