शहरं
Join us  
Trending Stories
1
Sonam Raghuvanshi: सोनम रघुवंशीला तीन दिवसांची पोलीस कोठडी; मेघालय पोलीस विमानाने गुवाहाटी, तिथून शिलाँगला नेणार
2
Apple WWDC 2025: अ‍ॅपल सुस्साट! आयओएस १८ वरून थेट २६ वर उडी; सर्वच आयफोनना लिक्विड ग्लास डिझाईन, लाईव्ह ट्रान्सलेशन अन् बरेच काही...
3
ग्रुप कॅप्टन शुभांशू शुक्लांचे उड्डाण एक दिवस लांबणीवर; खराब हवामानामुळे नासाचा निर्णय
4
कॅप्टन कूल महेंद्रसिंह धोनीचा मोठा सन्मान! ICC हॉल ऑफ फेममध्ये मिळालं स्थान
5
सांगलीत महापालिका उपायुक्त वैभव साबळे अटकेत; उंच इमारतीच्या बांधकाम परवान्यासाठी ७ लाखांची लाच मागितली
6
Sonam Raghuvanshi: सोनम बेवफा...! ज्या राजसाठी राजाला मारले, त्यांची प्रेम कहाणी समोर आली
7
तरुणींनो खासगी फोटो लीक झाले तर घाबरू नका, लगेच हटवू शकता...; या वेबसाईटची मदत घ्या... 
8
अमेरिकेच्या समुद्रात विमान कोसळले; सहा जणांचा शोध सुरु
9
भारताविरोधात षडयंत्र करतोय आणखी एक इस्लामिक देश; गुप्तचर रिपोर्टमधून मोठा खुलासा, वाचा
10
जबरदस्त स्पीडने इंटरनेट मिळणार! एलॉन मस्क थेट आकाशातून देणार सुविधा; किती रुपयांत मिळणार?
11
IND vs ENG : मुंबईकराच्या शतकाआड आला कॅप्टन! तो ९० धावांवर असताना इंग्लंड लायन्सला दिली बॅटिंग
12
कोरोनानंतर केरळमध्ये आणखी एक संकट, हेपेटायटीसचे रुग्ण वाढले
13
गेल्या ११ वर्षांत मोदी सरकार किती यशस्वी झाले? महागाई, बेरोजगारी... सी व्होटरचा सर्व्हे...
14
गणेश मंडळांना मोठा दिलासा! POP गणेश मूर्तींवरील बंदी उठवली, हायकोर्टाचा महत्त्वपूर्ण निर्णय
15
फ्रेंच ओपन जिंकणाऱ्या अल्काराझने एकट्यानं मिळवलं अख्ख्या RCB पेक्षा जास्त बक्षीस, पाहा किती?
16
पाकिस्तानवर कर्जाचा डोंगर आणखी वाढला! कर्ज आतापर्यंतच्या सर्वोच्च पातळीवर; आर्थिक सर्वेक्षणातून माहिती आली समोर
17
ISRO-NASA Gaganyaan Mission: शुभांशू शुक्ला अवकाशात रचणार इतिहास! १० जूनला होणारे उड्डाण कुठे पाहता येणार?
18
झालं... युपीआय 'बॅलन्स चेक'वर फांदी कोसळली; १ ऑगस्टपासून बंधने लादण्याची तयारी
19
पाकिस्तानला मदत करणाऱ्याला जशास तसं उत्तर; तुर्कीच्या कट्टर शत्रूची भारत ताकद वाढवणार, पण कशी?
20
सोनमने ज्याच्यासाठी राजा रघुवंशीला संपवलं, त्या राज कुशवाहाची संपत्ती किती? पगार किती होता?

हद्दवाढ करावीच लागेल

By admin | Updated: March 8, 2016 01:00 IST

चंद्रकांतदादा : कोणती गावे घ्यावीत अन् घेऊ नये हाच वादाचा मुद्दा

कोल्हापूर : शहराची हद्दवाढ करावीच लागणार आहे. फक्त कोणती गावे घ्यावीत अन् कोणती घेऊ नयेत. दोन्ही एमआयडीसी घ्याव्यात की नको एवढा एकच मुद्दा वादाचा आहे; परंतु यासंदर्भात शहरी आणि ग्रामीण जनता यांच्यात संघर्ष होणार नाही याची खबरदारी बाळगून राज्य सरकार सकारात्मक निर्णय घेईल, असे पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी सोमवारी येथे सांगितले. पालकमंत्र्यांच्या या वक्तव्यावरून राज्यसरकार काही गावे व दोन एमआयडीसी वगळून हद्दवाढ करण्यास इच्छुक असल्याचे स्पष्ट झाले. शासकीय विश्रामगृहावर झालेल्या दोन्ही बैठकीत पालकमंत्री पाटील यांनी आपली आणि सरकारची भूमिका स्पष्ट केली. त्यांनी सांगितले की, शहराची हद्दवाढ होणार यात कसलीच अडचण वाटत नाही. फक्त किती गावे घ्यावीत, एमआयडीसी घ्याव्यात की नकोत, हे मुद्दे चर्चेतून पुढे आले आहेत. पुणे, नाशिक, ठाणे, औरंगाबाद, सांगली या शहरांच्या हद्दवाढी दोन-चारवेळा झाल्या आहेत. मग कोल्हापूर शहराची हद्दवाढ का नको, अशी विचारणा नगरविकास विभागाने केली आहे. त्यामुळे पहिल्या टप्प्यात सहा-सात गावे वगळून का होईना हद्दवाढ करावीच लागेल. औद्योगिक वसाहती या ग्रामपंचायत किंवा महानगरपालिका हद्दीत असू नयेत त्यासाठी स्वतंत्र टाउनशीप करण्याचा कायदा १९७२ मध्ये झाला आहे. त्यामुळे दोन्ही औद्योगिक अशी विनंती न्यायालयाला केली होती. त्यानुसार सोमवारी वसाहतीसाठी वेगळा विचार करावा लागणार आहे. दोन-तीन मुद्दे सोडले तर हद्दवाढ करण्यात अडचण नाही तरीही सर्वांना विश्वासात घेऊन संघर्ष होणार नाही याची खबरदारी घेत निर्णय घ्यावा लागणार आहे, असे पाटील यांनी सांगितले. शहरवासीयांचे नुकसान नको : नरवणकर दरम्यान, उच्च न्यायालयात दाखल झालेल्या हद्दवाढ जनहित याचिकेचे काम पाहिलेले अ‍ॅड. युवराज नरवणकर हे स्वत: पालकमंत्री पाटील यांच्यासोबत झालेल्या बैठकीस उपस्थित होते. यावेळी त्यांनी माहिती देताना सांगितले की, शहराच्या हद्दवाढीसाठी राज्य सरकारने आतापर्यंत कायदेशीर प्रक्रिया राबविलेली नाही. त्यामुळे आधी अधिसूचना काढा, त्यावर हरकती मागवा आणि मग हरकतींची छाननी करून योग्य निर्णय घ्या, अशी कायद्याची अपेक्षा आहे. राज्य सरकार हे कायदे मंडळ असते.त्यामुळे दोन्ही बाजू ऐकून घेऊन निर्णय घ्यावा, असे अपेक्षित नाही. सरकार सारासार विचार करून निर्णय घेऊ शकते. तो त्यांचा अधिकार आहे. दुर्दैवाने हा लढा ‘कोल्हापूर विरुद्ध कोल्हापूर’ असा सुरू असून त्यात शहराचे नुकसान होऊ नये, अशी अपेक्षाही अ‍ॅड. नरवणकर यांनी व्यक्त केली. मिरवणुकीवर निर्णय नाहीहद्दवाढीचा निर्णय घ्या, तुमची हत्तीवरून मिरवणूक काढतो, असे हद्दवाढ कृती समितीने, तर हद्दवाढीचा प्रस्ताव रद्द करा, आम्हीही तुमची उंटावरून मिरवणूक काढतो, असे विरोधी कृती समितीने पालकमंत्र्यांना सांगितले. त्याचा संदर्भ देत पालकमंत्री पाटील म्हणाले की, माझी हत्तीवरून मिरवणूक काढली जाणार आहे किंवा नाही यावर निर्णय होणार नाही. त्यामुळे कोणाच्या हत्तीवरून जायचे की उंटावरून जायचे, हा माझ्या समोरचा प्रश्नच नाही. जो निर्णय होणार आहे, तो वास्तवाला अनुसरून होईल. अद्याप हद्दवाढीचा निर्णय झालेला नाही. त्यामुळे आतापासूनच कोणी आंदोलन करू नये.काही गावे वगळून हद्दवाढ शहराची हद्दवाढ करताना पाच गावे आणि दोन एमआयडीसी वगळल्या जाऊन उर्वरित गावांना शहर हद्दीत समाविष्ट करून घेतली जाण्याची शक्यता पालकमंत्र्यांच्या वक्तव्यामुळे ठळक झाली आहे. \