शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतानं ८० लढाऊ विमानांनी केला हल्ला; बिथरलेल्या पाकिस्तानी पंतप्रधानांचा कांगावा
2
२४ तासांत दुसऱ्यांदा बलुच बंडखोरांचा पाकिस्तानी सैन्यावर हल्ला, रिमोटने वाहन उडवले, ७ सैनिकांना ठार मारल्याचा दावा
3
मुंबईच्या हॉटेलमध्ये प्रियकराची हत्या, पत्नीला केला मेसेज...; राजस्थानात महिलेला अटक
4
एकनाथ शिंदेंचा एकाचवेळी काँग्रेस, शरद पवार गटाला धक्का; पदाधिकारी, कार्यकर्ते शिवसेनेत
5
Operation Sindoor Live Updates: जम्मू-काश्मीरच्या कुपवाडामध्ये पाकिस्तानकडून पुन्हा गोळीबार, भारताने दिले चोख प्रत्युत्तर
6
भारताने सियालकोटवर हल्ला चढवला, अन् पाकिस्तानने अमृतसरवर; रात्रभर अफवांचा बाजार उठला...
7
Today Daily Horoscope: आजचे राशीभविष्य: आर्थिक लाभ होऊ शकेल; लाभदायक बातम्या प्राप्त होतील!
8
पाकिस्तानला घरात घुसून मारले! १०० हून अधिक दहशतवादी ठार; पहलगाम हल्ल्याचा घेतला बदला
9
Mohini Ekadashi 2025: आज मोहिनी एकादशीनिमित्त विष्णुंच्या मोहक रूपाला घालूया आर्त साद!
10
रात्री उशिरा पाकिस्तानी पंतप्रधानांनी त्यांच्या देशाला संबोधित केले; भारताला दिली धमकी...
11
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी निवडले ‘सिंदूर’ नाव; दडले आहेत कोणते पाच अर्थ? 
12
भारताच्या हल्ल्याला प्रत्युत्तरासाठी पाकची लष्कराला परवानगी
13
अर्ध्या तासात दहशतवादी भुईसपाट; ९ तळ उद्ध्वस्त; लष्करातील नारीशक्तीचे जगाला दर्शन
14
संपादकीय: याद राखा, हिशेब चुकता होईल! पाकिस्तान काय करेल आणि काय नाही...
15
पाकला धडा शिकवलाच, कायदेही मोडले नाहीत! एलओसी पार न करताच शत्रूवर मारा... 
16
सिंदूर, सोफिया अन् व्योमिका... नावात काय नाही, नावातच सारे दडलेले होते...
17
प्रवाशांना ‘बेस्ट’ची रिअल-टाइम सुविधा; मुख्यमंत्री फडणवीस यांच्या हस्ते उपक्रमाचे उद्घाटन 
18
सीमावर्ती जिल्ह्यांमधील १४ जिल्ह्यांत सर्व शाळा बंद; ‘ऑपरेशन सिंदूर’नंतर पंजाब, राजस्थान आणि जम्मूत सूचना जारी  
19
विनाअपघात एसटी बस चालकांना बक्षीस देणार; परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती

कोविड लस घेतल्यानंतर एकही पॉझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 16, 2021 04:24 IST

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोविड लसीकरणामुळे काही मोजक्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली; परंतु अशा सौम्य लक्षणामुळे घाबरुन जाण्याचे अजिबात ...

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यात कोविड लसीकरणामुळे काही मोजक्या रुग्णांमध्ये सौम्य लक्षणे आढळली; परंतु अशा सौम्य लक्षणामुळे घाबरुन जाण्याचे अजिबात कारण नाही कारण ती अपेक्षितच आहेत, असा दावा आरोग्य यंत्रणेने केला आहे. जिल्ह्यात लसीकरणास फारशी गती मिळाली नसली तरीही ६२ टक्क्यापर्यंत उद्दिष्ट पूर्ण झाले आहे. लस घेतल्यानंतर नव्याने पॉझिटिव्ह आलेला एकही रुग्ण नसल्याचे आरोग्य विभागाच्यावतीने सांगण्यात आले.

कोविड प्रतिबंधक लस बाजारात उपलब्ध झाल्यानंतर ती सर्वांत आधी आरोग्य क्षेत्रात काम करणाऱ्या सर्व कर्मचाऱ्यांना टोचण्याचा निर्णय झाला. त्यानंतर ‘फ्रंटलाईन’वर काम करणाऱ्या महापालिकेच्या कर्मचाऱ्यांना लस टोचण्यात येत आहे. दि. १६ जानेवारीपासून जिल्ह्यात लसीकरण मोहीम सुरू झाली आणि विशेष म्हणजे एक महिन्यात ६२ टक्के काम पूर्ण झाले आहे. सध्या कोविडचा प्रभाव अतिशय कमी झाल्यामुळे आणि त्याच्या संसर्गाची भीती नसल्यामुळे आता ‘कशाला टोचून घ्यायची लस’ही मानसिकता उद्दिष्ट पूर्ण होण्यातील प्रमुख अडचण आहे.

आरोग्य कर्मचारी व फ्रंटलाईन कर्मचाऱ्यांना ही लस टोचली जात असली तरी त्याबाबत सक्ती करण्यात आलेली नाही. त्यामुळेही अपेक्षित उद्दिष्ट प्रशासनाला गाठता आलेेले नाही. लसीचे दोन डोस टोचून घेतल्यानंतर चौदा दिवसांनी संबंधित व्यक्तीची रोगप्रतिकारक शक्ती वाढते आणि कोरोना होण्याची शक्यता टळते. लस टोचून घेतल्यानंतर कसलेही पथ्यपाणी नाही, तुम्ही नेहमीप्रमाणे खाणंपिणं ठेवू शकता, प्रवास करू शकता.

लस टोचून घेणाऱ्यांपैकी काही मोजक्या लोकांना सौम्य लक्षणे दिसून आली. किरकोळ ताप, कणकण, अशक्तपणा येणे अशी लक्षणे एक-दोन दिवस दिसून आली; परंतु ती सौम्य असल्याने घाबरुन जाण्याचे काहीही कारण नाही, असे आरोग्य विभागाकडून सांगण्यात आले.

विभाग लसीकरणाची केंद्रे लसीकरणाचे उद्दिष्ट लस टोचलेेल्या व्यक्ती टक्केवारी

ग्रामीण - १८ केंद्र- २२ हजार ९८५ १४ हजार ९६५ ६५ टक्के

शहर - ११ केंद्रे १३ हजार ००० ०७ हजार ३३४ ५६ टक्के

एकूण - २९ केंद्रे ३५ हजार ९६५ २२ हजार २९९ ६२ टक्के

खबरदारी घेणे तरीही आवश्यक-

कोविड लस टोचून घेतली तर ती संबंधित व्यक्ती लस टोचून घेतल्याच्या क्षणापासून सर्वसामान्य दिनक्रम सुरू ठेवू शकते; परंतु पुढे काही दिवस नाकाला मास्क, शारीरिक अंतर राखणे या गोष्टी पाळाव्या लागणार आहे.