शहरं
Join us  
Trending Stories
1
आता स्टील आणि सेमीकंडक्टरवरही टॅरिफ दावणार ट्रम्प? अमेरिकन राष्ट्राध्यक्षांचं उत्तर ऐकूण वाढेल संपूर्ण जगाचं टेन्शन!
2
'वाळवा तालुका स्वाभिमानी, सहजासहजी वाकत नाही, लढाई शेवटपर्यंत...', जयंत पाटलांचा अजितदादांसमोर टोला
3
NCERT: भारताच्या फाळणीला तीन नेते जबाबदार; एनसीआरटीच्या पुस्तकात कुणाची नावे?
4
HDFC Bank च्या ग्राहकांसाठी महत्त्वाची बातमी; कॅश पासून फ्री चेकबुकपर्यंतचे नियम बदलले, जाणून घ्या
5
दहीहंडी २०२५: पहिला १० थरांचा विश्वविक्रम; जोगेश्वरीच्या कोकण नगर गोविंदा पथकाचा पराक्रम
6
पंतप्रधान नरेंद्र मोदींचा GST रिफॉर्म; दूध, दही, टीव्ही, सायकल सर्वकाही स्वस्त होणार?
7
“गुजरातींकडे नाही, मुंबई मराठी माणसाकडेच राहिली पाहिजे, हे ठाकरे बंधूंचे टार्गेट”: संजय राऊत
8
तुम्हाला माहित्येय? बाइक अथवा कारमागे का धावतात कुत्रे? जाणून घ्या, होईल फायदा...!
9
प्रेमात पडले, लग्न केलं, पण आता गायब झाली पत्नी, प्रेमविवाह ठरला रहस्य, नेमका प्रकार काय?  
10
५० टक्के ट्रम्प टॅरिफवर RSS नेते थेट बोलले; म्हणाले, “राष्ट्रहित समोर ठेवून भारताचे निर्णय”
11
"देशाचे स्वातंत्र्य हे असंख्य क्रांतिकारकांच्या त्यागाचे, बलिदानाचे आणि संघर्षाचे फळ"; CM योगींनी आपल्या निवासस्थानी फडकावला तिरंगा
12
Asia Cup 2025 : संजू अन् रिंकू आउट! आशिया कपसाठी भज्जीनं दिली केएल राहुलसह रियानला पसंती
13
Gopal Kala 2025: देवकीने जन्म दिला, तरी मातृसौख्य यशोदेला; कोणत्या हिशोबाची कृष्णाने केली परतफेड?
14
काँग्रेसकडून भाजपाला मोठा धक्का, माजी मंत्र्याने केली घरवापसी, पद्माकर वळवी यांचा पक्षप्रवेश
15
Jolly LLB 3: अ‍ॅडव्होकेट जगदीश त्यागी बनून पुन्हा एकदा अरशद वारसी येतोय भेटीला, चाहत्यांची उत्सुकता शिगेला
16
Health: हाताच्या दोन बोटांवरून लक्षात येतं, शरीरात वाढलेलं कोलेस्ट्रॉल; त्वरित करा 'हे' उपाय 
17
ठाकरे बंधूंना निवडणूक ‘बेस्ट’ ठरणार नाही? उमेदवारीवरून शिवसैनिकांत नाराजी; ‘समृद्धी’चे आव्हान
18
SBI चा ग्राहकांना दिलासा, कर्जाचा हप्ता होणार कमी; होमलोन, कार लोन स्वस्तात मिळणार
19
'या' दिवशी ७ तासांसाठी बंद राहणार HDFC च्या बँकिंग सुविधा; पाहा कोणत्या सेवांचा लाभ घेता येणार नाही?
20
सकाळी बँकर, नंतर रॅपिडो रायडर! महिला प्रवाशाला आला थक्क करणारा अनुभव; म्हणाली, “प्रेरणादायी”

जिल्ह्यात ३३१४ टन खत उपलब्ध

By admin | Updated: May 21, 2015 00:08 IST

खरीप हंगाम : जिल्हा परिषद कृषी समिती सभेत माहिती

ओरोस : सिंधुदुर्ग जिल्ह्यात खरीप हंगामासाठी आतापर्यंत ३३१४ मेट्रिक टन खत उपलब्ध झाले असून, महाबीजचे १५२४.४० क्विंटल, खासगी कंपनीचे २१७७.०३ क्विंटल, असे मिळून एकूण ३७०१.४३ क्विंटल बियाणे जिल्ह्यात प्राप्त झाल्याची माहिती कृषी समिती बैठकीत दिली.बॅ. नाथ पै समिती सभागृहात मंगळवारी कृषी समितीची सभा सभापती रणजित देसाई यांच्या अध्यक्षतेखाली पार पडली. यावेळी सदस्य दिलीप रावराणे, विभावरी खोत, सोनाली घाडीगावकर यांच्यासह खातेप्रमुख उपस्थित होते.जिल्हा परिषदेमार्फत खरीप हंगाम २०१५ साठी संकरित सह्याद्री बियाण्याकरिता अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात आले असून, प्रति किलो १६० रुपये किंमत ७५ टक्के अर्थसाहाय्य रुपये १२० व लाभार्थी हिस्सा ४० रुपये राहील. या योजनेंतर्गत प्रत्येक शेतकऱ्याला १ ते ३ किलोंपर्यंत बियाणे उपलब्ध करून दिले जाणार आहे.तसेच महात्मा ग्रामीण रोजगार हमी योजनेंतर्गत फळबाग लागवडीचे ३०० हेक्टरचे उद्दिष्ट्य निश्चित करण्यात आले असून, यावेळी शेतकऱ्यांनी या योजनेच्या अधिक माहितीसाठी पंचायत समिती स्तरावर कृषी विभागाकडे याची चौकशी करता येईल.जिल्ह्यात बायोगॅस उभारणीचे शासनाचे उद्दिष्ट्य अद्याप प्राप्त झालेले नसून, जिल्हास्तरावर आर्थिक वर्षाच्या सुरुवातीस सर्वसाधारण प्रवर्गासाठी ६८५ व जाती, जमातीसाठी १५ असे एकूण ७०० बायोगॅस आस्थापित करण्याचे उद्दिष्ट्य निश्चित केले आहे. याशिवाय दरवर्षी खरीप हंगामामध्ये घेण्यात येणाऱ्या जिल्हा पातळी भातपीक स्पर्धा व तालुका पातळी भातपीक स्पर्धा व रक्कम वाढविण्यासाठी शासनाकडे प्रस्ताव सादर करण्याबाबतही या सभेत ठराव घेण्यात आले आहेत.जिल्हा परिषदे सेस अंतर्गत दरवर्षी दोन सिंधू शेतिनिष्ठ पुरस्कार देण्यात येत असतात. या पुरस्कारांसाठी असलेली बक्षिसांची रक्कम वाढवून जिल्हा परिषदेकडे शिफारस करण्याचाही निर्णय घेण्यात आला. जिल्ह्यात कोणत्याही प्रकारची समस्या येऊ नये याची दक्षता संपूर्ण यंत्रणेने घेतलेली आहे. या सर्व विषयांबाबत पंचायत समिती स्तरावर शेतकऱ्यांनी संपर्क साधावा, असे आवाहनही सभापती रणजित देसाई यांनी केले. (वार्ताहर)उसासाठी प्रथमच अर्थसाहाय्यभात उत्पादनाबरोबर ऊस उत्पादन वाढावे यासाठी ऊस बियाणे रोपाकरिता प्रथमच ५० टक्के अर्थसाहाय्य उपलब्ध करून देण्यात येणार असून, हेक्टरी रुपये आठ हजारांपर्यंत अर्थसाहाय्य देण्यात येणार आहे. याकरिता लागवडीचे क्षेत्र मर्यादा ०.२१ ते १ हेक्टर एवढी राहील. महाबीजचे १५२४.४० क्विंटल व खासगी कंपनीचे २१७७.०३ क्विंटल, असे एकूण ३६०१.४३ क्विंटल बियाणे जिल्ह्यात प्राप्त झाले असल्याचे सभापती रणजित देसाई यांनी सांगितले. जिल्ह्यात सध्या खासगी विक्रेते व खरेदी विक्री संघ यांच्याकडे उपलब्ध आहे.