शहरं
Join us  
Trending Stories
1
"आम्ही शत्रू नाही..." CM देवेंद्र फडणवीस यांनी मानले उद्धव ठाकरे-शरद पवारांचे आभार, पण का?
2
पुण्यात मध्यरात्री २ तास गावगुंडांचा धुमाकूळ; रिक्षा, कार, स्कूल बससह २० ते २५ वाहनांची तोडफोड
3
Stock Market Today: शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात; Sensex मध्ये २०० अंकांपेक्षा अधिक उसळी, कोणते शेअर्स चमकले?
4
टेरिफची धमकी देत ट्रम्प यांनी साधली इतिहासातील सर्वात मोठी डील; जगातील मोठी अर्थव्यवस्था झुकली...
5
...तरीही भारत बांगलादेशच्या मदतीला धावला! विमान अपघातातील जखमींवर उपचारासाठी डॉक्टरांचे पथक पाठविणार...
6
ज्या मराठी तरुणीला मारहाण झाली, तिची परिस्थिती गंभीर; डॉक्टर म्हणाले, पॅरालिसीस...'
7
बाजाराचा मोह सोडा! ३ कोटी ९ लाखांचा मालक तर PPF चं बनवेल; फक्त पती-पत्नीला हा फॅार्म्युला वापरावा लागेल
8
दुबईत नोकरी, १० लाखाची ऑफर...; मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी १९ वर्षांनी मोहम्मद शेखची सुटका
9
पाकिस्तानी विमानांना भारतीय हवाई हद्दीत प्रवेश नाहीच; केंद्र सरकारने घेतला मोठा निर्णय
10
स्वत:च्या कार घेऊन आता ट्रेनने जाता येणार गोव्याला! कसं? जाणून घ्या...
11
Deep Amavasya 2025: दीप अमावास्येला दिवे उजळून 'अशी' करा शास्त्रोक्त पूजा आणि आरती!
12
"आपण भारतात राहतो, बंदूक घेऊन ठेवावी लागेल", प्रेग्नंसीवेळी घाबरलेली रिचा चड्डा; कारण काय?
13
जो पोलिसांना सापडला नाही, त्याला मनसेच्या कार्यकर्त्यांना कसा शोधला?; समोर आली थरारक घटना
14
पाच फुटांच्या मूर्तींचे कृत्रिम तलावांतच विसर्जन करा, पर्यावरण विभागाची सूचना!
15
गुरुवारी गुरुपुष्यामृत योग: १० राशींवर अपार धनलक्ष्मी कृपा, पगारवाढ लाभ, स्वामी शुभच करतील!
16
तनिष्कने उघडले चमचमणाऱ्या हिऱ्यांच्या नव्या युगाचे दारः पारदर्शकतेला मिळालं नवं तेज!
17
उपराष्ट्रपतीपदासाठी राजनाथ सिंह यांचे नाव? राष्ट्रपतींनी स्वीकारला धनखड यांचा राजीनामा
18
आजचे राशीभविष्य २३ जुलै २०२५ : या राशींना आजचा दिवस लाभदायी, या राशींसाठी...
19
केवळ १८ महिन्यांचा संसार, मागितली १२ कोटींची पोटगी, बीएमडब्ल्यू! कोर्ट महिलेला म्हणाले... 
20
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना भेटणार, गृह राज्यमंत्र्यांचा राजीनामा घेणारच : परब

...तेव्हा ‘आर. आर.’ कोठे होते?

By admin | Updated: September 18, 2014 00:36 IST

राजू शेट्टी यांचा पलटवार : राजकारणाचा धंदा करणाऱ्यांनी बोलू नये

कोल्हापूर : शरद पवार यांच्या चुकीच्या धोरणामुळे दूध अतिरिक्त होऊन शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध ओतावे लागले, त्यावेळी आर. आर. पाटील कोठे होते? असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समाजकारण व राजकारण हे शेतकऱ्यांसाठी केले; पण ज्यांनी राजकारणाचा धंदा केला, त्यांनी आमच्यावर बोलू नये, अशी टीकाही शेट्टी यांनी पाटील यांच्यावर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापुरातील प्रचार प्रारंभ सभेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खासदार शेट्टी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला त्याच शब्दांत शेट्टी यांनी आज, बुधवारी उत्तर दिले. ‘युपीए’च्या काळात कांद्यावर निर्यातबंदी घातली नाही, असे म्हणणाऱ्या पवार यांचे साथीदार सप्टेंबर २०११ मध्ये पंतप्रधानांकडे कशासाठी गेले होते? आता शेतकऱ्यांच्या बाजूने गळा काढणाऱ्यांच्या हातात दहा वर्षे कृषी खाते असताना काय दिवे लावलेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. गेल्या दहा वर्षांत जमले नाहीत ते निर्णय नरेंद्र मोदी यांनी तीन महिन्यांत घेतल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांत साखरेचे दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिल्याची वल्गना पवार करीत आहेत; पण हा दर कोणामुळे मिळाला हे शेतकऱ्यांना ज्ञात आहे. गेल्या दहा वर्षांत देशांतर्गत बाजारपेठेतील साठ्याचा चुकीचा अंदाज वर्तवून ती साखर बंदरात ठेवून कारखान्यांकडून कोणत्या दराने घेतली व ग्राहकांना कोणत्या दराने दिली, याचा खुलासा पहिल्यांदा शरद पवार यांनी करावा, असे आव्हानही खासदार शेट्टी यांनी दिले. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येण्यामागे कोणाचा हात आहे? ‘वेफको’सह इतर कंपन्यांच्या कांदा खरेदी-विक्रीची माहिती उघडकीस येईल, त्यावेळी यातील खरे अर्थशास्त्र शेतकऱ्यांसमोर येईल. नाशिक येथील बाजार समित्यांवर कोणाचे वर्चस्व आहे? ‘नाफेड’ व ‘वेफको’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची कशी फसवणूक होते? चांगदेवराव होळकर हे कोणत्या पक्षाचे आहेत? ‘नाफेड’चे अध्यक्ष असताना त्यांनी ‘वेफको’मध्ये कसा पैसा गुंतवला? याची उत्तरे शरद पवार यांनी द्यावीत. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने निर्यातबंदी केलेली नाही, किमान निर्यातमूल्य आकारले होते. त्याविरोधात थेट सरकारला इशारा देऊन केंद्रीय कृषिमंत्र्यांचे पुतळे आमच्या कार्यकर्त्यांनी जाळले, हे आर. आर. पाटील यांना दिसत नाही का? शरद पवार केंद्रीय मंत्री असताना दुग्धजन्य पदार्थांवर निर्यातबंदी घातल्याने संकलन बंद करण्याची वेळ दूध संघावर आली. कच्च्या साखरेच्या आयात-निर्यातीत घोटाळा झाला त्यावेळी आर. आर. पाटील कोठे होते? असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)...तर शेतकरीही सुखाने दिवाळी खातीलपाच वर्षांत शेतकरी संघटनेने दिवाळी सुखाने खाऊ दिली नसल्याचे आर. आर. पाटील सांगत आहेत; पण चुकीच्या धोरणाने शेतकरी उद्ध्वस्त होत असेल तर तुम्हाला कदापि सुखाने झोपू देणार नाही. प्रश्न तसेच भिजत ठेवायचे आणि शेतकऱ्यांच्या नावाने ओरड करायची हे तुणतुणे बंद करा. साखर बोर्ड स्थापन केले; पण त्याचे कामकाज बंद आहे. आता कारखाने सुरू होतील. मग आम्ही गप्प बसायचे का? अशी विचारणा शेट्टी यांनी केली.