शहरं
Join us  
Trending Stories
1
क्रीडामंत्री माणिकराव कोकाटेंविरोधात अटक वॉरंट, कोणत्याही क्षणी अटक होणार, आमदारकीही जाणार?
2
राजकीय सूडबुद्धीतून रचलेले प्रकरण, ईडी-सीबीआयचा गैरवापर; 'नॅशनल हेराल्ड'वरुन खरगेंची मोदी-शाहांवर टीका
3
...अन् त्यावेळी राष्ट्रपती बनण्याचा प्रस्ताव वाजपेयींनी नाकारला; 'अटल संस्मरण' पुस्तकात दावा
4
“मातोश्रीबाबत मनात आदर कायम, पण...”; शिंदे गटात प्रवेश करताच बड्या नेत्याने सगळेच सांगितले
5
Video - हार्ट अटॅकमुळे वेदनेने तडफडत होता पती; पत्नीने जोडले हात, पण कोणीच केली नाही मदत
6
शेतकऱ्यांसाठी मोठा अलर्ट! फार्मर आयडीशिवाय पीएम किसानचे पैसे येणार नाहीत; अशी तयार करा ID
7
Gold Silver Price Today: सोन्या-चांदीचे दागिने घेताना १०० वेळा विचार करावा लागणार; चांदी २ लाखांच्या पार, सोन्याच्या दरातही मोठी तेजी
8
‘मी काही चुकीचं बोललो नाही, माफी मागण्याचा प्रश्नच नाही..’, पृथ्वीराज चव्हाण ऑपरेशन सिंदूरबाबतच्या वक्तव्यावर ठाम  
9
BMC ELections: मुंबईत अजित पवार पडले एकटे, राष्ट्रवादीची किती जागांवर लढण्याची तयारी, बैठकीत काय झाला निर्णय? 
10
‘ते’ विधान भोवणार, संजय राऊत अडचणीत येणार?; गृहराज्यमंत्री म्हणाले, “…तर गुन्हा दाखल करू”
11
Video - लग्नात राडा! नवरदेवाच्या मित्रांनी नवरीला घातली 'स्नो स्प्रे'ने आंघोळ, मेकअपच गेला वाया
12
क्रेडिट कार्ड वापरताय? मग 'या' ७ चुका टाळा, अन्यथा बसेल आर्थिक फटका!
13
IPL मधील ऑक्शनची संपूर्ण रक्कम घरी नेतात का खेळाडू? पाहा टॅक्स, सॅलरी आणि इनहँड रकमेचा कसा असतो हिशोब
14
‘टायगर स्टेट’समोर गंभीर आव्हान! एका आठवड्यात 6 तर, वर्षभरात 54 वाघांचा मृत्यू; शिकारीचा संशय
15
शाल, गळ्यात रुद्राक्षांची माळ आणि डोक्यावर टिळा, अनंत अंबानींसोबत वनतारामध्ये दिसलं मेसीचं भारतीय रूप
16
कर्माची फळं इथेच भोगली! 'धुरंधर'मधील खनानी होता सगळ्यात खुंखार; भारतात पाठवायचा खोट्या नोटा, मिळाला खतरनाक मृत्यू
17
किडन्या फेल, डायलिसिससाठी पैसेच नाहीत; ७० दिवस 'डिजिटल अरेस्ट' करुन ५३ लाखांचा गंडा
18
Saif Ali Khan : "पॅरेलाइज होऊ शकलो असतो..."; सैफ अली खानने सांगितला हल्ल्याचा थरार, आजही वाटतेय भीती
19
"कायदा यांच्या कोठीवर नाचतोय, जोवर दिल्लीत आणि निवडणूक आयोगात हरामखोरांचं राज्य, तोवर...;" संजय राऊतांची जीभ घसरली!
Daily Top 2Weekly Top 5

...तेव्हा ‘आर. आर.’ कोठे होते?

By admin | Updated: September 18, 2014 00:36 IST

राजू शेट्टी यांचा पलटवार : राजकारणाचा धंदा करणाऱ्यांनी बोलू नये

कोल्हापूर : शरद पवार यांच्या चुकीच्या धोरणामुळे दूध अतिरिक्त होऊन शेतकऱ्यांना रस्त्यावर दूध ओतावे लागले, त्यावेळी आर. आर. पाटील कोठे होते? असा पलटवार स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते खासदार राजू शेट्टी यांनी प्रसिद्धी पत्रकातून केला. स्वाभिमानी शेतकरी संघटनेने समाजकारण व राजकारण हे शेतकऱ्यांसाठी केले; पण ज्यांनी राजकारणाचा धंदा केला, त्यांनी आमच्यावर बोलू नये, अशी टीकाही शेट्टी यांनी पाटील यांच्यावर केली. राष्ट्रवादी काँग्रेसच्या कोल्हापुरातील प्रचार प्रारंभ सभेत गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी खासदार शेट्टी यांच्यावर बोचरी टीका केली होती. त्या टीकेला त्याच शब्दांत शेट्टी यांनी आज, बुधवारी उत्तर दिले. ‘युपीए’च्या काळात कांद्यावर निर्यातबंदी घातली नाही, असे म्हणणाऱ्या पवार यांचे साथीदार सप्टेंबर २०११ मध्ये पंतप्रधानांकडे कशासाठी गेले होते? आता शेतकऱ्यांच्या बाजूने गळा काढणाऱ्यांच्या हातात दहा वर्षे कृषी खाते असताना काय दिवे लावलेत, हे महाराष्ट्रातील जनतेला माहिती आहे. गेल्या दहा वर्षांत जमले नाहीत ते निर्णय नरेंद्र मोदी यांनी तीन महिन्यांत घेतल्याचे शेट्टी यांनी म्हटले आहे. गेल्या दहा वर्षांत साखरेचे दर स्थिर ठेवून शेतकऱ्यांच्या उसाला चांगला दर दिल्याची वल्गना पवार करीत आहेत; पण हा दर कोणामुळे मिळाला हे शेतकऱ्यांना ज्ञात आहे. गेल्या दहा वर्षांत देशांतर्गत बाजारपेठेतील साठ्याचा चुकीचा अंदाज वर्तवून ती साखर बंदरात ठेवून कारखान्यांकडून कोणत्या दराने घेतली व ग्राहकांना कोणत्या दराने दिली, याचा खुलासा पहिल्यांदा शरद पवार यांनी करावा, असे आव्हानही खासदार शेट्टी यांनी दिले. कांदा उत्पादक शेतकरी अडचणीत येण्यामागे कोणाचा हात आहे? ‘वेफको’सह इतर कंपन्यांच्या कांदा खरेदी-विक्रीची माहिती उघडकीस येईल, त्यावेळी यातील खरे अर्थशास्त्र शेतकऱ्यांसमोर येईल. नाशिक येथील बाजार समित्यांवर कोणाचे वर्चस्व आहे? ‘नाफेड’ व ‘वेफको’च्या माध्यमातून शेतकऱ्यांची कशी फसवणूक होते? चांगदेवराव होळकर हे कोणत्या पक्षाचे आहेत? ‘नाफेड’चे अध्यक्ष असताना त्यांनी ‘वेफको’मध्ये कसा पैसा गुंतवला? याची उत्तरे शरद पवार यांनी द्यावीत. नरेंद्र मोदी यांच्या सरकारने निर्यातबंदी केलेली नाही, किमान निर्यातमूल्य आकारले होते. त्याविरोधात थेट सरकारला इशारा देऊन केंद्रीय कृषिमंत्र्यांचे पुतळे आमच्या कार्यकर्त्यांनी जाळले, हे आर. आर. पाटील यांना दिसत नाही का? शरद पवार केंद्रीय मंत्री असताना दुग्धजन्य पदार्थांवर निर्यातबंदी घातल्याने संकलन बंद करण्याची वेळ दूध संघावर आली. कच्च्या साखरेच्या आयात-निर्यातीत घोटाळा झाला त्यावेळी आर. आर. पाटील कोठे होते? असा सवालही त्यांनी केला. (प्रतिनिधी)...तर शेतकरीही सुखाने दिवाळी खातीलपाच वर्षांत शेतकरी संघटनेने दिवाळी सुखाने खाऊ दिली नसल्याचे आर. आर. पाटील सांगत आहेत; पण चुकीच्या धोरणाने शेतकरी उद्ध्वस्त होत असेल तर तुम्हाला कदापि सुखाने झोपू देणार नाही. प्रश्न तसेच भिजत ठेवायचे आणि शेतकऱ्यांच्या नावाने ओरड करायची हे तुणतुणे बंद करा. साखर बोर्ड स्थापन केले; पण त्याचे कामकाज बंद आहे. आता कारखाने सुरू होतील. मग आम्ही गप्प बसायचे का? अशी विचारणा शेट्टी यांनी केली.