शहरं
Join us  
Trending Stories
1
चारही बाजूंनी गोळीबार, मृत्यू समोर; तरी सुरक्षित पडला बाहेर; अमेरिकन पायलटचा थरारक अनुभव
2
विधान परिषदेसाठी शरद पवारांचा उद्धव ठाकरेंना पाठिंबा?; काँग्रेसने मात्र अंतर राखले! पुढे काय?
3
शेतकरी कर्जमाफी अहवाल लवकरच राज्य सरकारकडे; सदस्यांच्या अभिप्रायानंतर होणार शिक्कामोर्तब
4
"...तर नरकाचे दरवाजे उघडतील"; ट्रम्प यांच्या ४८ तासांच्या अल्टीमेटमवर इराणची थेट 'अणुयुद्धाची' धमकी!
5
पेट्रोल ७.४१ रुपयांनी महागले तर डिझेलमध्ये २५ रुपयांची वाढ; 'या' कंपनीने अचानक वाढवल्या किमती
6
रणबीर कपूरच्या 'रामायण'मध्ये अमिताभ बच्चन यांच्या जावयाची एन्ट्री, देवराज इंद्रची भूमिका साकारणार, कोण आहे तो?
7
"बायकोसोबत रेड कार्पेटवर चालताना भीती वाटते...", ऐश्वर्याबद्दल असं का म्हणाला अभिषेक बच्चन?
8
रात्री झोपूनही दिवसभर झोप - सुस्ती जाणवत राहते? पाहा काय आहे यामागचं कारण आणि उपाय
9
मतदान की स्वप्नभंग? फोंड्याचे भवितव्य अधांतरी; ९ रोजीच्या निवडणुकीबद्दल साशंकता
10
लोकल ट्रेनच्या दरवाजाजवळ उभे राहणे हा निष्काळजीपणा नव्हे; उच्च न्यायालयाचा निर्णय
11
आजचे राशीभविष्य, ०५ एप्रिल २०२६: चांगली बातमी, धनलाभ, नशिबाची साथ; हर्षोल्लासाचा दिवस
12
सुनेत्रा पवारांविरोधात शरद पवारांनी उमेदवार दिल्यास काँग्रेसचा पाठिंबा; प्रदेशाध्यक्षांचा नवा प्रस्ताव
13
'धुरंधर'नंतर हाच सिनेमा पाहणार, मृणाल ठाकुरच्या 'डकैत'वर प्रेक्षकांच्या कमेंट्स; ट्रेलर रिलीज
14
भोंदू अशोक खरातला मदत करणाऱ्या महसूल अधिकाऱ्यांना घरी जावे लागेल: चंद्रशेखर बावनकुळे
15
अमली पदार्थ जप्ती प्रकरणात दोघांची अखेर निर्दोष मुक्तता; नियम पालनात सरकारी पक्ष अपयशी
16
पश्चिम रेल्वेच्या ताफ्यात १५ डब्यांच्या २ नवीन लोकल; ३३ टक्के क्षमता वाढणार
17
विशेष लेख: आपल्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात नेमके चालले आहे तरी काय..?
18
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना मनासारखा काळ, पैशांचा ओघ राहील; यश-प्रगती चौफेर-चौपट लाभ!
19
राज्यातील कुपोषण घटतेय, पण धोका कायम! बालविकास योजनांना गती देण्याचे आव्हान
20
केरळातील डावे सरकार अखेरची घटका मोजतेय, राज्यात एनडीए सत्तेत येईल: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

...तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल, कुडित्रे येथे सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:19 IST

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात असणाºया शेतकºयांच्या व्यथा आजही तशाच आहेत. सरकार बदलल्यावर शेतकºयांच्या व्यथा दूर होऊन त्यांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळेल असे वाटत होते;

ठळक मुद्देशेतकºयांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नसेल तर न्याय मागणाºया शेतकºयांसह जनतेप्रती सरकारमधील मंत्र्यांनी व नेत्यांनी अशी चुकीची भाषा का वापरावी,

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात असणाºया शेतकºयांच्या व्यथा आजही तशाच आहेत. सरकार बदलल्यावर शेतकºयांच्या व्यथा दूर होऊन त्यांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळेल असे वाटत होते; परंतु तसे होत नसेल तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, खा. गजानन किर्तीकर, ज्येष्ठ नेते दगडू सपकाळ, आमदार चंद्रदीप नरके आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, दिवसा वीज नाही व रात्री नियमित असेल याची खात्री नाही, हे चित्र पूर्वीच्या सरकारप्रमाणे आताही आहे. त्यामुळे बदललेले काहीच नाही. अशा अडचणींतूनही शेतकºयांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नसेल तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल.शेतकºयांसह जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आपण आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. सरकारवर टीका करणे हा उद्देश नाही तर या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही? तसेच नुसत्याच केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरल्या की नाही? हे पाहण्यासाठी आपण लोकांसमोर जात आहे. शेतकºयांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्याकडून निवेदनही स्वीकारत आहे. ही निवेदने मी उशाला घेऊन झोपणार नाही तर आवश्यकता वाटल्यास या सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांनाही भेटू.उमेदवार बघून विधान परिषदेबाबत निर्णय घेऊमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर निवडणूक लागली आहे. त्यात भाजपने शिवसेनेकडे सहकार्य मागितले आहे. याबाबत विचारणा केली असता भाजपकडून उभा राहणार उमेदवार पाहूनच मदत करायची की नाही? याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगून शिवसेना कुणाशी बांधील नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांनी आवर घातला नाही तर दरोडेखोरी वाढेलसांगली येथे घडलेली अमानुष घटना गंभीर आहे. पोलिसांकडूनच पोलिसांची बदनामी करण्याची कृती होत असेल तर ते थांबविण्याची जबाबदारी या खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांची आहे. त्यांनी याला वेळीच आवर घातला नाही तर दरोडेखोरी सुरू होऊन प्रामाणिक पोलिसांवर अन्याय होईल, असे ठाकरे यांनी सांगितले.भाजप नेत्यांनी चुकीची भाषा का वापरावी?डांबराचा खर्च अर्धा दाखवा, खड्डे भरले नाही तर आभाळ कोसळेल काय? अशी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची वक्तव्ये तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याकडून ऊस आंदोलनात तेल ओतून रस्त्यावर उतरणाºया शेतकºयांच्या पायात गोळ्या घालाव्यात, असे केलेले बेजबाबदार वक्तव्य हे योग्य नाही. न्याय मागणाºया शेतकºयांसह जनतेप्रती सरकारमधील मंत्र्यांनी व नेत्यांनी अशी चुकीची भाषा का वापरावी, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली.मराठा आरक्षण, राणे, मंत्रिपद विषयाला बगलमंत्रिमंडळात नारायण राणे यांच्या समावेशाबाबतच्या प्रश्नावर हा त्यांच्या जीव-मरणाचा प्रश्न असून मला त्याच्यापेक्षा शेतकºयांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे सांगून त्याला ठाकरे यांनी बगल दिली तर मराठा आरक्षणाबाबत आपण यापूर्वीच भूमिका स्पष्ट केल्याचे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळत कोल्हापूरच्या आमदारांना मंत्रिपद मिळणार का? या प्रश्नावरही हसतच त्यांनी कोल्हापूरला एक पालकमंत्री दिला असताना इतर मंत्री कशाला? अशी कोटीही त्यांनी केली.