शहरं
Join us  
Trending Stories
1
विमानतळावर मारहाण करणाऱ्या लष्करी अधिकाऱ्याच्या अडचणी वाढणार! भारतीय लष्कराने निवेदन प्रसिद्ध केले
2
Joe Root Century : शतक साजरे करताच हेल्मट काढलं अन् Headband बांधला; जो रुटनं असं का केलं?
3
महादेवी हत्तीण वनतारामधून परत आणणार?  मुख्यमंत्र्यांनी ५ ऑगस्टला बोलावली बैठक, फडणवीसांनी सांगितला पुढचा प्लॅन
4
पत्नी आजारी म्हणून लिव्ह इनमध्ये राहू लागला अन् प्रेयसीनेच केली हत्या; दोघांमध्ये कशावरून बिनसलं?
5
युगेंद्र पवार-तनिष्का कुलकर्णींचा मुंबईत झाला साखरपुडा, कोण आहेत तनिष्का?
6
IND vs ENG : ...अन् सिराजनं कॅच घेऊन दिलेला 'तो' सिक्सर Harry Brook नं सेंच्युरीत बदलला!
7
एका फिचरमुळे ChatGPT चॅट्स लीक होण्याचा धोका! गुगल सर्चमध्ये खाजगी गोष्टी दिसतात?
8
"लोकांचा सहभाग वाढवून...", उद्योजकांसमोर नितीन गडकरींनी मांडले गांधी-नेहरूंचे विचार; नागपूरमध्ये काय बोलले?
9
IND vs ENG : जो रुटनं साधला मोठा डाव! WTC मध्ये ६००० धावांचा पल्ला गाठणारा ठरला पहिला फलंदाज
10
कोल्हापुरात १९३१ मध्ये होते त्याच जुन्या सर्वोच्च न्यायालयाच्या इमारतीत नवे सर्किट बेंच
11
संजय शिरसाटांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून पाठराखण; म्हणाले, "मंत्री कधी कधी..."
12
धक्कादायक! मित्रांनी केला मित्राचा घात, बाकाचा वाद बेतला जीवावर; अल्पवयीन गुन्हेगारीचा प्रश्न पुन्हा गंभीर
13
VIDEO : इथंही सिराज ठरला कमनशिबी! हॅरी ब्रूकचा कॅच घेतला; पण सीमारेषेवर अंदाज चुकला अन्...
14
विमानतळावर लष्करी अधिकाऱ्याची गुंडगिरी, स्पाइसजेट कर्मचाऱ्यांना मारहाण; पाठीचा कणा फ्रॅक्चर झाला
15
पोटच्या मुलीच्या मदतीने पतीला संपवले, ह्रदयविकाराने मृत्यू झाल्याचा बनाव; पण 'त्या' एका गोष्टीमुळे अडकली
16
Manoj Jarange: बीडमध्ये मनोज जरांगेंच्या लिफ्टचा अपघात, पहिल्या मजल्यावरून कोसळली; नंतर...
17
VIDEO : इनस्विंग की, ऑफस्पिन? टप्पा पडला अन् सिराजचा चेंडू हातभर वळला! ओली पोपचा करेक्ट कार्यक्रम
18
महादेवी हत्ती परत आणण्यासाठी राजू शेट्टींची आत्मक्लेष पदयात्रा; अनेकांनी घेतला सहभाग
19
"मी आता फोन वापरणार नाही"; लेकीला मोबाईलपासून दूर करण्यासाठी पालकांचा जबरदस्त जुगाड
20
तुमच्या पगारातून कापला जाणारा PF जातो तरी कुठे? जाणून घ्या, पैशांची विभागणी कशी होते?

...तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल, कुडित्रे येथे सेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरेंचा घणाघात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 25, 2017 01:19 IST

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात असणाºया शेतकºयांच्या व्यथा आजही तशाच आहेत. सरकार बदलल्यावर शेतकºयांच्या व्यथा दूर होऊन त्यांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळेल असे वाटत होते;

ठळक मुद्देशेतकºयांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नसेल तर न्याय मागणाºया शेतकºयांसह जनतेप्रती सरकारमधील मंत्र्यांनी व नेत्यांनी अशी चुकीची भाषा का वापरावी,

कोल्हापूर : कॉँग्रेस आघाडी सरकारच्या काळात असणाºया शेतकºयांच्या व्यथा आजही तशाच आहेत. सरकार बदलल्यावर शेतकºयांच्या व्यथा दूर होऊन त्यांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळेल असे वाटत होते; परंतु तसे होत नसेल तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल, असा घणाघात शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी शुक्रवारी येथे पत्रकार परिषदेत केला.कुडित्रे (ता. करवीर) येथील कुंभी-कासारी साखर कारखान्याच्या कार्यस्थळावर आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी जलसंपदा राज्यमंत्री विजय शिवतारे, शिवसेना सचिव खा. विनायक राऊत, खा. गजानन किर्तीकर, ज्येष्ठ नेते दगडू सपकाळ, आमदार चंद्रदीप नरके आदी उपस्थित होते.उद्धव ठाकरे म्हणाले, दिवसा वीज नाही व रात्री नियमित असेल याची खात्री नाही, हे चित्र पूर्वीच्या सरकारप्रमाणे आताही आहे. त्यामुळे बदललेले काहीच नाही. अशा अडचणींतूनही शेतकºयांनी पिकविलेल्या मालाला हमीभाव मिळत नसेल तर हे सरकार नालायक म्हणावे लागेल.शेतकºयांसह जनतेचे प्रश्न समजावून घेण्यासाठी आपण आजपासून राज्यव्यापी दौरा सुरू केला आहे. सरकारवर टीका करणे हा उद्देश नाही तर या सरकारला तीन वर्षे पूर्ण झाली असून त्यांच्याकडून जनतेच्या अपेक्षा पूर्ण झाल्या की नाही? तसेच नुसत्याच केलेल्या घोषणा प्रत्यक्षात उतरल्या की नाही? हे पाहण्यासाठी आपण लोकांसमोर जात आहे. शेतकºयांकडून त्यांच्या अडचणी जाणून घेत त्यांच्याकडून निवेदनही स्वीकारत आहे. ही निवेदने मी उशाला घेऊन झोपणार नाही तर आवश्यकता वाटल्यास या सर्वांना सोबत घेऊन मुख्यमंत्र्यांनाही भेटू.उमेदवार बघून विधान परिषदेबाबत निर्णय घेऊमाजी मुख्यमंत्री नारायण राणे यांच्या राजीनाम्यानंतर रिक्त झालेल्या विधान परिषदेच्या जागेवर निवडणूक लागली आहे. त्यात भाजपने शिवसेनेकडे सहकार्य मागितले आहे. याबाबत विचारणा केली असता भाजपकडून उभा राहणार उमेदवार पाहूनच मदत करायची की नाही? याबाबत निर्णय घेतला जाईल, असे सांगून शिवसेना कुणाशी बांधील नाही, असे ठाकरे यांनी स्पष्ट केले.मुख्यमंत्र्यांनी आवर घातला नाही तर दरोडेखोरी वाढेलसांगली येथे घडलेली अमानुष घटना गंभीर आहे. पोलिसांकडूनच पोलिसांची बदनामी करण्याची कृती होत असेल तर ते थांबविण्याची जबाबदारी या खात्याचे मंत्री म्हणून मुख्यमंत्र्यांची आहे. त्यांनी याला वेळीच आवर घातला नाही तर दरोडेखोरी सुरू होऊन प्रामाणिक पोलिसांवर अन्याय होईल, असे ठाकरे यांनी सांगितले.भाजप नेत्यांनी चुकीची भाषा का वापरावी?डांबराचा खर्च अर्धा दाखवा, खड्डे भरले नाही तर आभाळ कोसळेल काय? अशी महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांची वक्तव्ये तर भाजपचे प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब दानवे यांच्याकडून ऊस आंदोलनात तेल ओतून रस्त्यावर उतरणाºया शेतकºयांच्या पायात गोळ्या घालाव्यात, असे केलेले बेजबाबदार वक्तव्य हे योग्य नाही. न्याय मागणाºया शेतकºयांसह जनतेप्रती सरकारमधील मंत्र्यांनी व नेत्यांनी अशी चुकीची भाषा का वापरावी, अशी विचारणाही ठाकरे यांनी केली.मराठा आरक्षण, राणे, मंत्रिपद विषयाला बगलमंत्रिमंडळात नारायण राणे यांच्या समावेशाबाबतच्या प्रश्नावर हा त्यांच्या जीव-मरणाचा प्रश्न असून मला त्याच्यापेक्षा शेतकºयांचा प्रश्न महत्त्वाचा आहे, असे सांगून त्याला ठाकरे यांनी बगल दिली तर मराठा आरक्षणाबाबत आपण यापूर्वीच भूमिका स्पष्ट केल्याचे सांगून त्यावर अधिक बोलणे टाळत कोल्हापूरच्या आमदारांना मंत्रिपद मिळणार का? या प्रश्नावरही हसतच त्यांनी कोल्हापूरला एक पालकमंत्री दिला असताना इतर मंत्री कशाला? अशी कोटीही त्यांनी केली.