शहरं
Join us  
Trending Stories
1
“इराणच्या १० कलमी प्रस्तावाला ट्रम्प यांनी दाखवली केराची टोपली”; व्हाइट हाऊसने सगळे सांगितले
2
Gold Silver Price Today: बाजार उघडताच सोन्या-चांदीच्या दरात मोठी घसरण; Silver ₹४,७०० नं स्वस्त, Gold चे दर काय?
3
केजचे तहसीलदार राकेश गिड्डे यांचा अपघाती अंत; कार्यक्षम अधिकाऱ्याच्या मृत्यूने बीड जिल्हा सुन्न!
4
३९ दिवसांच्या युद्धानंतर इराण, अमेरिका, इस्रायल... कुणी काय कमावले, काय गमावले?
5
STतील सफाईचा प्रवाशांना भूर्दंड; आधी दरवाढ केली, आता ‘स्वच्छता अधिभार’ लावला, प्रवास महागला
6
Post Office च्या 'या' स्कीममध्ये व्याजाद्वारेच मिळतील ४.४० लाख; ३०० रुपयांच्या बचतीतून तयार होईल १५ लाखांचा फंड
7
Share Market: शेअर बाजारात घसरण: सेन्सेक्स ५०० हून अधिक अंकांनी घसरला, निफ्टी २३,९०० च्या खाली
8
नाशिकमध्ये नामांकित कंपनीतील ८ जणींचा विनयभंग; एकीवर 'अतिप्रसंग'; ६ जणांना अटक
9
एक डॉलर प्रति बॅरल, त्यासोबत..., होर्मुझवरील टोलसाठी इराणने तयार केला असा नियम   
10
आजचे राशीभविष्य, ०९ एप्रिल २०२६: योग्य क्षेत्रातील गुंतवणूक आज लाभदायक; रागावर नियंत्रण ठेवावं लागेल
11
पाकला बळीचा बकरा बनवले, इराणला राजी करायला भाग पाडले, ट्रम्प यांनाच हवा होता युद्धविराम?
12
NATO देशांना ट्रम्प यांनी सुनावले, मदत न केल्याने व्यक्त केली तीव्र खंत; इशारा देत म्हणाले...
13
राज्य निर्मितीआधीपासूनच मराठा आरक्षण; उच्च न्यायालयात राज्य सरकारचा युक्तिवाद
14
१० मिनिटं, १०० ठिकाणं अन् १६० बॉम्ब; लेबनॉनवर इस्रायलचा सर्वात मोठा हल्ला; बेरूतमध्ये रक्ताचा सडा
15
शस्त्रसंधीमुळे अदानी-अंबानींवर डॉलर्सचा पाऊस; जगातील श्रीमंतांच्या यादीत स्थान वधारले
16
युद्ध की शांतता? अमेरिकेला काहीतरी एक निवडावं लागेल, इराणचा थेट इशारा; लेबनॉनवरून पेच वाढला!
17
अजूनही ५०% जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट नाही; कालमर्यादेबाबत स्पष्टता नसल्याने अनेकांची पाठ
18
एलिफंटा उत्खननात दोन विशाल साठवण भांड्यांचा शोध; ऐतिहासिक महत्त्वात भर
19
शिखर बँक घोटाळा: रोहित पवारांच्या अर्जावर गुणवत्तेनुसार निर्णय घ्या! EDची विशेष न्यायालयाला विनंती
20
१२,३०० हल्ल्यांनंतरही इराणची ताकद कायम कशी? 'ही' आहेत यामागची कारणं
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावरील जमिनीचीच चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:22 IST

श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : बुरंबाळी (ता. राधानगरी) येथील जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नावे असलेल्या तब्बल चौदा एकर ...

श्रीकांत ऱ्हायकर

लोकमत न्यूज नेटवर्क

धामोड : बुरंबाळी (ता. राधानगरी) येथील जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नावे असलेल्या तब्बल चौदा एकर जमिनीवर बुरंबाळी ग्रामस्थांनी परस्पर डल्ला मारला असून, या जमिनीची परस्पर विल्हेवाट लावली आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिकांबरोबरच सर्वसामान्य लोकांनीही या जमिनीवर स्वतःचा हक्क सांगत कंपाउंड करत जागेचा ताबा घेतला आहे, तर गावातील गायरान जमिनीमध्येसुद्धा मोठे अतिक्रमण करून त्या जमिनीचाही ताबा घेतल्याने आता ग्रामपंचायतीनेच हे अतिक्रमण काढण्याची मागणी केल्याने गावात मोठा गोंधळ उडाला आहे.

तुळशी धरण उभारणीमुळे संपूर्ण बुरंबाळी गाव धरणग्रस्त बनले. या गावाची जवळपास ७० ते ८० टक्के जमीन या धरणात गेली व सर्व गाव धरणग्रस्त बनले. १९७८ नंतर तुळशी जलाशयाच्या पूर्व बाजूच्या किनाऱ्यावर बुरंबाळी गावाची स्थापना झाली व येथील गट नं. ५८ व ५९ मधील २ हेक्टर ६६ आर जमीन शासनाने गावातीत ६४ कुटुंबांना ३ गुंठे ते ६ गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट करून वाटप केली; पण कब्जेपट्टी एक व वहिवाट दुसरीच, यामुळे या जमिनीचेही सातबारा चुकीच्या पद्धतीने झाले, तर दुसरीकडे याच दोन गट नंबरमधील उर्वरित चौद एकर जमीन सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन एका खाजगी शेतकऱ्याच्या नावावरून काढून घेत ती जिल्हाधिकारी पुनर्वसन कोल्हापूर यांच्या नावे करून घेण्यात यश मिळवले; पण गेल्या दोन- चार वर्षांपासून या संपूर्ण जमिनीवर गावातील प्रतिष्ठित लोकांनी अतिक्रमण करत ही जागा बळकावली आहे. सध्या या जागेवर अनेकांनी घरे, जनावरांचे शेड, वाहनांचे शेड उभारले आहे, तर काहींनी जागेभोवती कंपाउंड मारले आहे. गावात ज्यांची टोलेजंग घरे आहेत, अशांनीही फायदा उठवत, ही शासकीय जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे, तर वाटप केलेल्या २ हेक्टर ६६ आर जमिनीपैकी शिल्लक गायरान जमीनही काही धनदांडग्यांनी बळकावली आहे, तर याच ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या देऊळवाडी वसाहतीमध्येही १५२/२ या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या गटातील जवळपास नऊ एकर दहा गुंठे जमीन येथील शिवाजी धोंडिराम जांभळे यांनी बळकावली असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेली जवळपास २३ एकर इतकी जमीन एका ग्रामपंचायतीतील लोक परस्पर विल्हेवाट लावत असताना महसूल प्रशासन नेमके काय करते, असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.

प्रतिक्रिया

माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नावे असलेल्या सर्वच जमिनीवर पूर्णत: अतिक्रमण झाले असून, गावच्या गायरान जमिनीवरही लोकांनी परस्पर ताबा घेतला आहे. प्रशासनाने यावर वेळीच कठोर पावले उचलत गायरान जमीन अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करत ग्रामपंचायत प्रशासनाला परत मिळवून द्यावी.

-माधवी विष्णू चौगुले

(सरपंच, ग्रा.पं. बुरंबाळी)