शहरं
Join us  
Trending Stories
1
डोनाल्ड ट्रम्प यांचा ४ वेळा फोन, पण PM मोदींचा बोलण्यास नकार; जर्मन वृत्तपत्राचा दावा
2
'सर्व भारतीयांचा DNA एकच; हिंदू राष्ट्र म्हणजे...', RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे विधान
3
जरांगे पाटलांबद्दल आक्षेपार्ह पोस्ट टाकल्याने तरुणाला काळं फासलं; समर्थकांकडून तरुणाला मारहाण
4
मराठा आरक्षणासाठी ३५ वर्षीय तरुणाने केला आत्महत्येचा प्रयत्न; लातूर जिल्ह्यातील घटना
5
डीएचएलसह अनेक कंपन्यांनी अमेरिकेकडे पाठवणारे पार्सल थांबवले! डोनाल्ड ट्रम्प यांच्यामुळे उडाला गोंधळ
6
विकासकामांत तोडली जाणारी झाडे वाचवण्याचा अनोखा उपक्रम! पुण्यात 'वृक्ष पुनर्रोपण' अभियान
7
फोनमधील 'या' सेटिंग्ज बदलाल तर वाचेल बराच इंटरनेट डेटा! अनेकांना माहीत नाहीत सोप्या टिप्स
8
प्रेरणादायी अध्यात्मिक वक्त्या जया किशोरी यांच्या हस्ते होणार श्रीमंत भाऊसाहेब रंगारी बाप्पाची प्राणप्रतिष्ठा!
9
सिंहगडावर 'त्या' ५ दिवसांत काय काय घडलं? बेपत्ता झालेल्या गौतम गायकवाडने सांगितला थरार
10
काश्मीर खोऱ्यातील तीन मंडळांना गणेश मूर्ती प्रदान; पुनीत बालन यांच्यासह मानाच्या गणेश मंडळाचा स्तुत्य उपक्रम!
11
वैष्णोदेवी यात्रा मार्गावर मोठा अपघात; भूस्खलनामुळे ५ भाविकांचा मृत्यू, १४ जखमी
12
Vidarbha Weather Alert: पावसाचा विदर्भाकडे मोर्चा; अनेक ठिकाणी मुसळधार कोसळणार; कोणत्या जिल्ह्यांना अलर्ट?
13
आणखी एक 'निक्की', हुंड्याने घेतला संजूचा जीव; मुलीसह स्वतःला पेटवलं, चिठ्ठीत म्हणाली...
14
किचनमधील 'या' वस्तूंमुळे दुप्पट वाढतो कॅन्सरचा धोका; डॉक्टर म्हणाले, आताच उचला अन् बाहेर फेका
15
७ मुलांची आई २२ वर्षांच्या भाच्याच्या प्रेमात पडली, पळून जायचा प्लॅन केला अन् पतीचे तीन लाखही केले लांपास!
16
बदल्याची आग! लव्ह मॅरेजनंतर पहिल्यांदा गावी आलं कपल; कुटुंब झालं हैवान, केली जावयाची हत्या
17
"मुंबईत येणारच, न्यायदेवता नक्कीच न्याय देईल", हायकोर्टाच्या निर्णयानंतरही मनोज जरांगे ठाम
18
पाकिस्तानला आसिम मुनीर यांचं किती कौतुक! 'ऑपरेशन सिंदूर'मध्ये आपटल्यानंतरही सरकारने दिलं मोठ बक्षीस
19
दक्षिण कोरियाचे राष्ट्राध्यक्ष ली व्हाईट हाऊसमध्ये, ट्रम्प यांची घेतली भेट! चर्चेत झाला किम जोंग उनचा उल्लेख
20
झाली का गणपती पूजेची तयारी? काय राहिलं, काय घेतलं? झटपट तपासून घ्या पूजा साहित्य 

जिल्हाधिकाऱ्यांच्या नावावरील जमिनीचीच चोरी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 15, 2021 04:22 IST

श्रीकांत ऱ्हायकर लोकमत न्यूज नेटवर्क धामोड : बुरंबाळी (ता. राधानगरी) येथील जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नावे असलेल्या तब्बल चौदा एकर ...

श्रीकांत ऱ्हायकर

लोकमत न्यूज नेटवर्क

धामोड : बुरंबाळी (ता. राधानगरी) येथील जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नावे असलेल्या तब्बल चौदा एकर जमिनीवर बुरंबाळी ग्रामस्थांनी परस्पर डल्ला मारला असून, या जमिनीची परस्पर विल्हेवाट लावली आहे. गावातील प्रतिष्ठित नागरिकांबरोबरच सर्वसामान्य लोकांनीही या जमिनीवर स्वतःचा हक्क सांगत कंपाउंड करत जागेचा ताबा घेतला आहे, तर गावातील गायरान जमिनीमध्येसुद्धा मोठे अतिक्रमण करून त्या जमिनीचाही ताबा घेतल्याने आता ग्रामपंचायतीनेच हे अतिक्रमण काढण्याची मागणी केल्याने गावात मोठा गोंधळ उडाला आहे.

तुळशी धरण उभारणीमुळे संपूर्ण बुरंबाळी गाव धरणग्रस्त बनले. या गावाची जवळपास ७० ते ८० टक्के जमीन या धरणात गेली व सर्व गाव धरणग्रस्त बनले. १९७८ नंतर तुळशी जलाशयाच्या पूर्व बाजूच्या किनाऱ्यावर बुरंबाळी गावाची स्थापना झाली व येथील गट नं. ५८ व ५९ मधील २ हेक्टर ६६ आर जमीन शासनाने गावातीत ६४ कुटुंबांना ३ गुंठे ते ६ गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट करून वाटप केली; पण कब्जेपट्टी एक व वहिवाट दुसरीच, यामुळे या जमिनीचेही सातबारा चुकीच्या पद्धतीने झाले, तर दुसरीकडे याच दोन गट नंबरमधील उर्वरित चौद एकर जमीन सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देऊन एका खाजगी शेतकऱ्याच्या नावावरून काढून घेत ती जिल्हाधिकारी पुनर्वसन कोल्हापूर यांच्या नावे करून घेण्यात यश मिळवले; पण गेल्या दोन- चार वर्षांपासून या संपूर्ण जमिनीवर गावातील प्रतिष्ठित लोकांनी अतिक्रमण करत ही जागा बळकावली आहे. सध्या या जागेवर अनेकांनी घरे, जनावरांचे शेड, वाहनांचे शेड उभारले आहे, तर काहींनी जागेभोवती कंपाउंड मारले आहे. गावात ज्यांची टोलेजंग घरे आहेत, अशांनीही फायदा उठवत, ही शासकीय जमीन लाटण्याचा प्रयत्न केला आहे, तर वाटप केलेल्या २ हेक्टर ६६ आर जमिनीपैकी शिल्लक गायरान जमीनही काही धनदांडग्यांनी बळकावली आहे, तर याच ग्रामपंचायतीमध्ये समाविष्ट असलेल्या देऊळवाडी वसाहतीमध्येही १५२/२ या जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेल्या गटातील जवळपास नऊ एकर दहा गुंठे जमीन येथील शिवाजी धोंडिराम जांभळे यांनी बळकावली असल्याचे ग्रामपंचायत प्रशासनाने प्रसारमाध्यमांसमोर सांगितले आहे. जिल्हाधिकाऱ्यांच्या नावे असलेली जवळपास २३ एकर इतकी जमीन एका ग्रामपंचायतीतील लोक परस्पर विल्हेवाट लावत असताना महसूल प्रशासन नेमके काय करते, असा प्रश्न या निमित्ताने समोर येत आहे.

प्रतिक्रिया

माननीय जिल्हाधिकारी कोल्हापूर यांच्या नावे असलेल्या सर्वच जमिनीवर पूर्णत: अतिक्रमण झाले असून, गावच्या गायरान जमिनीवरही लोकांनी परस्पर ताबा घेतला आहे. प्रशासनाने यावर वेळीच कठोर पावले उचलत गायरान जमीन अतिक्रमणाच्या विळख्यातून मुक्त करत ग्रामपंचायत प्रशासनाला परत मिळवून द्यावी.

-माधवी विष्णू चौगुले

(सरपंच, ग्रा.पं. बुरंबाळी)