शहरं
Join us  
Trending Stories
1
अभिनेता श्रेयस तळपदेवर गुन्हा दाखल; उत्तराखंडमधील घोटाळा प्रकरण, आलोक नाथ यांचेही नाव...
2
राहुल गांधी निराश, त्यांच्या नेतृत्वात काँग्रेसने ९० निवडणुका हरल्या; अनुराग ठाकूरांचा हल्लाबोल
3
"राहुल गांधींचे सर्व आरोप खोटे आणि निराधार" निवडणूक आयोगाचे प्रत्युत्तर!
4
पत्रकाराचा फोन, बूथ मंत्र अन् ८० टक्के टार्गेट...; निवडणुकीसाठी अमित शाहांनी आखला 'प्लॅन'
5
पुढचे २४ तास फ्रान्स सगळंच बंद! रस्त्यांवर उतरणार तब्बल ८ लाख लोक; काय आहे कारण?
6
पंतप्रधान मोदी आणि नेपाळच्या हंगामी PM सुशीला कार्की यांचा फोनवरून संवाद, काय झाली चर्चा?
7
१० रुपयांची बाटली... तीन भावांनी मिळून केली कमाल, आता त्यांच्या प्रोडक्टची गल्ली-गल्लीत आहे चर्चा
8
संरक्षण करारानुसार पाकिस्तानला युद्धात साथ देण्याचा शब्द देणाऱ्या सौदी अरेबियाची ताकद किती?
9
डोनाल्ड ट्रम्प पिच्छा सोडेना! आता भारताला टाकले ड्रग्ज उत्पादक, पुरवठा करणाऱ्या देशांच्या यादीत 
10
‘राहुल गांधींचा ‘वोटचोरी’बाबतचा कांगावा म्हणजे…’, ते पत्र दाखवत भाजपाचा पलटवार 
11
सोन्यातील तेजी शेअर बाजारासाठी धोक्याची घंटा? काय आहे 'निक्सन शॉक' घटना? ब्रोकरेज फर्मने सांगितलं सत्य
12
निवडणूक आयोगाने 'आधारहीन' म्हणत राहुल गांधींचे आरोप फेटाळले, 'त्या' मतदारसंघात काय घडलं होतं तेही सांगितले
13
५० लाखांचा फ्लॅट घ्यायचा की गावी त्याच पैशांची जमीन? सोशल मीडियावर वाद सुरु झाला...
14
VIRAL : एकमेकांना पाडलं, केस धरून हाणलं; भर बाजारात नवरा-बायकोमध्ये जुंपली!
15
मी रमी खेळत होतो कशावरून? मंत्री माणिकराव कोकाटेंनी रोहित पवारांना कोर्टात खेचलं, अब्रुनुकसानीचा दावा दाखल
16
भलामोठा डिस्प्ले, उत्कृष्ट कॅमेरा, दमदार बॅटरी; 'हे' ६ फोन ६००० पेक्षा कमी किंमतीत उपलब्ध
17
दीपिका पादुकोणची 'कल्की 2898 एडी' सिनेमातून एक्झिट, कारण आलं समोर
18
राहुल गांधींना निवडणूक आयोगातून कोण मदत करतेय? दाव्याने खळबळ
19
Shukra Pradosh 2025: पती-पत्नीचे बिघडलेले नातेही सुधारेल; शुक्र प्रदोषावर करा 'हे' उपाय!
20
प्रसिद्ध अभिनेत्रीचा मुलगा; ३६ व्या वर्षीही बॉलिवूडमध्ये करतोय संघर्ष; आता मिळाली मोठी संधी

सत्तेच्या बळावर जनतेच्या मनावर राज्य करता येणार नाही - श्रीपतराव शिंदे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 22, 2022 23:30 IST

मुश्रीफांनी मन मोठं करायला हवं होतं, गडहिंग्लज कारखान्याच्या १२ संचालकांनी राजीनामे देण्यापूर्वी कोल्हापूरच्या विश्रामगृहात मुश्रीफ यांची भेट होती

गडहिंग्लज : जयप्रकाश नारायण यांच्यासारख्या भणंग माणसामुळे दिल्लीच्या सत्तेचा सोपान उलटल्याचा इतिहास आहे.त्यामुळे सत्तेच्या बळावर जनतेच्या मनावर राज्य करता येते,असे कुणी समजू नये. महाराष्ट्रातील मोठ्या ग्रामविकास खात्याचे मोठे मंत्री हसन मुश्रीफ यांनी मन मोठं करायला हवं होत. दोन्ही बाजू ऐकून निर्णय दयायला हवा होता.परंतु,त्यांनी एकाच बाजूचे ऐकले.'त्या' लोकांच्या मतावरच ते निवडून येणार असतील तर त्यांना माझा कोपऱ्यापासून दंडवत आहे,असा इशारा गडहिंग्लज सहकारी साखर कारखान्याचे अध्यक्ष जनता दलाचे माजी आमदार श्रीपतराव शिंदे यांनी शनिवारी दिला.

गडहिंग्लज कारखान्याच्या १२ संचालकांनी राजीनामे देण्यापूर्वी कोल्हापूरच्या विश्रामगृहात मुश्रीफ यांची भेट होती.त्याचा संदर्भ देत शिंदेनी थेट मुश्रीफांवरही तोफ डागली.शेतकरी, कामगारांतर्फे आयोजित रास्तारोकोप्रसंगी ते बोलत होते. शिंदे म्हणाले,'त्या' संचालकांनी वेगळी भूमिका घेतल्यानंतर आपणही आठवडयापूर्वी मुश्रीफांना भेटलो होतो.'त्यांना' समजावून सांगा आणि विषय संपवा अशी विनंती केली होती.दोन्ही बाजूच्या संचालकांची एकत्र बैठक घेऊन निर्णय घेऊया, असे मुश्रीफांनी सांगितले होते. त्यांच्या सूचनेनुसारच 'त्या' संचालकांशी आपणही चर्चा केली होती.परंतु,त्यांनी केवळ त्यांचेच ऐकले.त्यांनी आम्हांलाही बोलवून घेऊन आमच्याशी चर्चा करून निर्णय द्यायला हवा होता.परंतु,त्यांनी केवळ त्यांचेच ऐकले,असा आरोपही शिंदे यांनी केला. पदरमोड करून आम्ही कारखाना सुरू केला.

त्यावेळी आमच्याबरोबर असणाऱ्या प्रकाश चव्हाणांनीही आमची बाजू सोडली,त्याचा जाब लोकच त्यांना विचारतील. सुतगिरणी, सोयाप्रकल्प, शिवाजी बँक, प्रकाश नागरी पतसंस्था या संस्थाचं काय झालं ? असा सवालही त्यांनी केला.डेक्कन अॅग्रोमध्ये शेतकरी व कामगारांची फसवणूक करणारे डॉ. शहापूरकरही लबाड आहेत.त्यांच्याविरूध्द बदनामीचा दावा दाखल करणार आहोत,असा इशाराही त्यांनी दिला.