शहरं
Join us  
Trending Stories
1
Akash Deep Maiden Fifty : 'नाईट वॉचमन' आकाशदीपनं उडवली इंग्लंडची झोप! ठोकली सॉलिड 'फिफ्टी'
2
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
3
आकाशदीपची फिफ्टी पाहून गिल-जड्डूला सेंच्युरीचं फिल! बॅटसह हेल्मेट उंचावण्याची केली डिमांड (VIDEO)
4
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
5
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!
6
"शिंदे गटाच्या मोर्चाचे लक्ष्य चुकले; मोर्चाच काढायचा तर फडणवीसांच्या बंगल्यावर काढा’’, हर्षवर्धन सपकाळ यांचा टोला 
7
मोठी बातमी: सोमनाथ सूर्यवंशी मृत्यू प्रकरणात पोलिसांवर नव्हे, अज्ञातांवर खुनाचा गुन्हा
8
जिममध्ये व्यायाम करत असतानाच आला हार्ट ॲटॅक, उदयोन्मुख क्रिकेटपटूचा मृत्यू
9
राज्यात दोन-तीन भागात गुन्हेगारी वाढतेय, त्यात पुणे येतं; याला जबाबदार कोण? - सुप्रिया सुळे
10
राजा रघुवंशीच्या भावाच्या पत्नीने केला सनसनाटी दावा, म्हणाली, "माझ्या मुलाचा बाप…’’
11
Viral Video: नाशकात दुचाकीवरून आलेल्या सोनसाखळी चोराला महिलेनं दाखवला इंगा!
12
कॉफीसोबत झुरळंही रगडली जातात, कॉफीत असतातच झुरळं! खोटं वाटतंय, वाचा FDA काय सांगतेय..
13
IND vs ENG ...तर भारतीय गोलंदाजाला ठोसा मारला असता; आकाशदीपसंदर्भात काय म्हणाला पाँटिंग?
14
"...तर तुम्हालाही अटक होईल"; राज ठाकरेंनी दिलेल्या आव्हानावर CM फडणवीस स्पष्टच बोलले
15
संजय बांगरची 'ट्रान्सजेंडर' मुलगी अनाया बांगर हिची धडाकेबाज फटकेबाजी, पाहा फलंदाजीचा VIDEO
16
जागे राहा, सतर्क राहा, महाराष्ट्र विकला जाऊ देऊ नका; मनसे प्रमुख राज ठाकरेंचं जनतेला आवाहन
17
"शाहरुखपेक्षा विकी कौशलने सॅम बहादूरमध्ये चांगलं काम केलं होतं", राष्ट्रीय पुरस्कारावर लेखिकेची पोस्ट
18
Yavat Violence: "बाहेरून आलेले लोक तिथे..." यवत हिंसाचाऱ्याच्या घटनेवर सुप्रिया सुळेंची प्रतिक्रिया
19
SIP चे दिवस गेले? आता लाँच होणार SIF; 'या' कंपनीला SEBI कडून मिळाली मंजुरी
20
Ritual: एखाद्या व्यक्तीच्या निधनानंतर घरात तीन दिवस का केला जात नाही स्वयंपाक? वाचा शास्त्र!

रसिक आहेत म्हणूनच!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 2, 2019 23:42 IST

भारत चव्हाण माणसाचं नशीब कधी फळफळेल सांगता यायचं नाही. नशिबात असेल तर राजयोगसुद्धा जुळून येतो आणि जर तुमच्या नशिबात ...

भारत चव्हाणमाणसाचं नशीब कधी फळफळेल सांगता यायचं नाही. नशिबात असेल तर राजयोगसुद्धा जुळून येतो आणि जर तुमच्या नशिबात एखादी गोष्ट नसेलच तर कितीही आपटलं तरी काही साध्य होत नाही. अलीकडील काळात शिकलेले तरुण नशिबापेक्षा स्वत:च्या कर्तृत्वाला महत्त्व देतात. स्वत:च्या कर्तृत्वाने, जिद्दीच्या जोरावर नशीब घडविण्याची भाषा करतात. त्यात तथ्यही आहे. जिद्दीच्या जोरावर यश मिळतं, तुमचं करिअर घडतं; परंतु त्याकरिता बरेच कष्ट उपसावे लागते. रातोरात सर्व काही मिळवता येत नाही. यशाची दीर्घकाळ प्रतीक्षा करावी लागते. पण, जर तुमचं नशीब चांगलं असेल तर कर्तृत्वशून्य असतानाही बरंच काही मिळतं. अनेकदा आपण म्हणतो ‘बघा, कर्तृत्व काहीच नाही; पण बरंच काही मिळालं. त्याचं नशीबच चांगलं आहे.’ समाजात आजूबाजूला अशी अनेक उदाहरणे पाहायला मिळतात. कोणी रातोरात श्रीमंत होतं, कोणी प्रसिद्धीच्या झोतात येतं, कोणाला लॉटरी लागते. कोणाला आणखी काही.... ज्यांच्याकडे ३५ खासदार नव्हते, असे एच. डी. देवेगौडा देशाचे पंतप्रधान झाले. त्यांचा राजयोग चांगला होता; पण ज्यांनी भारतीय जनता पक्षाला देशपातळीवर नेऊन ठेवले, कार्यकर्त्यांचे मोठे जाळे विणून दिले, एकेकाळी भाजप म्हणजे अटलबिहारी-लालकृष्ण अडवाणी असंच समीकरण होतं; पण सत्ता यायची वेळ जवळ आली तेव्हा त्यांना ज्येष्ठांच्या यादीत स्थान मिळाले. याचाच अर्थ त्यांचं कर्तृत्व ९९ टक्के होते; पण एक टक्का नशीब त्यांच्यासोबत नव्हतं.राणू मंडल नावाच्या महिलेचं नशीब असंच रात्रीत फळफळलं. तिलाही वाटलं नसेल की आपण कधीतरी अशा प्रसिद्धीच्या झोतात येऊ आणि देशभर आपलं नाव होईल! पश्चिम बंगालच्या राणाघाट रेल्वेस्थानकावर गाणं म्हणत भिक्षा मागून पोट भरणारी ही महिला. आख्ख्या खानदानात कोणी गायक नाही अशी राणू आपल्या सुरेल गायनाने कुठल्या कुठं जाऊन पोहोचली आपण पाहतोय. रोज रेल्वे स्थानकावर गाणं गाणाऱ्या राणूला कोणी कानसेन पैसे देऊन तिच्यातील कलेला प्रतिसाद देत होता. मुंबईत राहणारी ही महिला पतिनिधनानंतर पश्चिम बंगालमध्ये जाते आणि उदरनिर्वाह म्हणून रेल्वेस्थानक हेच निवासस्थान समजून तेथेच राहते. अशा या राणूला एक दिवस मोठी प्रसिद्धी मिळेल, मोठी संधी मिळेल, असे भविष्य कुणी सांगितले असते तर त्याला लोकांनी चक्क खुळ्यात काढले असते! पण, अशी संधी मिळण्याचा राजयोग तिच्या नशिबानं लिहून ठेवला होता. वेळ येताच नशीब फळफळलं. एतिंद्र चक्रवर्ती नावाच्या रसिक व्यक्तीने तिच्या गाण्याचा व्हिडीओ बनविला आणि सोशल मीडियावर व्हायरल केला. रूप नाही, रंग नाही, अंगावर चांगले कपडे नाहीत, अशा राणूला बघता-बघता लाखो लाईक्स, कॉमेंट्स मिळाल्या. तसं संगीत व गायन क्षेत्रात नामवंत असलेल्या कलाकारांचे तिच्याकडे लक्ष वेधले. जणू दुसरी लता मंगेशकर मिळाल्याचा साक्षात्कार झाला.राणू मंडलच्या गाण्याचे तसेच तिच्या जीवनावर आधारित शेकडो व्हिडीओंनी सोशल मीडियावर, यू ट्युबवर धुमाकूळ घातला आहे. हिमेश रेशमियाने तर तिच्याकडून आपल्या अल्बममधील एक गाणे गाऊन घेतले आहे. तिच्या आवाजाची खात्री झाल्यामुळे तिला अनेक आॅफर्स येऊ लागल्या आहेत. कर्तृत्व काहीच नसताना नशिबाची साथ तिच्यासोबत होती म्हणूनच हे घडलं; परंतु त्याच्याही पुढे जाऊन मला असं वाटतं की, एक कलाकाराला दुसरा कलाकार भेटला आणि त्याचं कौतुक केले याला महत्त्व आहे. हिमेश जर पुढे आला नसता, तर येणाºया शेकडो व्हिडीओंमधील एक म्हणून तोही डिलिट झाला असता.कलाकाराचं कौतुक तितक्याच संवेदनशील असलेल्या कलाकाराकडूनच होत असतं. आपल्याला आठवत असेल, कोल्हापुरातील ख्यातनाम चित्रकार शरद वायकूळ यांचा नावलौकिक देशभर झाला. वायकूळ सरांनी एकदा मुंबईतील जहॉँगीर आर्ट गॅलरीत त्यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरविले होते. अनेकांनी प्रदर्शन पाहिलं, कौतुक केलं. असाच एक अवलिया प्रदर्शन बघायला आला. त्यांनी वायकूळ सरांची चित्रे निरखून पाहिली, त्यांतील जिवंतपणा पाहिला. त्यांनी नम्रपणे आपली ओळख सांगितली. दुसºया दिवशी त्यांनी सरांना सपत्नीक बंगल्यावर बोलावले. चहापाणी झाले. दुपारचे जेवणही झाले. निरोप घ्यायची वेळ आली तेव्हा त्या अवलियाने सरांना एक नवा सूट भेट दिला. दहा हजार रुपये हातांवर ठेवले तेव्हा वायकूळ सर खूपच भारावून गेले. तो अवलिया होता जगप्रसिद्ध गायक महंमद रफी! एका कलाकाराने दुसºया कलाकाराचे केलेले हे कौतुक भावस्पर्शी होते. पारख करणारे रसिक आहेत म्हणूनच कलाकार आणि कला जिवंत आहे.