शहरं
Join us  
Trending Stories
1
दिल्लीचे प्रदूषण रोखण्यासाठी चीनचा 'धक्कादायक' सल्ला! ३००० मोठे उद्योग बंद करण्याची सूचना; बीजिंगच्या धर्तीवर प्लॅन तयार?
2
Short Term Investment: केवळ एका वर्षासाठी गुंतवणूक करायचीये? 'हे' ५ पर्याय देऊ शकतात तुम्हाला जबरदस्त रिटर्न, जाणून घ्या
3
गृहकर्जावर होईल १८ लाख रुपयांपर्यंतची बचत! EMI कमी करण्यापेक्षा वापरावा लागेल 'हा' पर्याय
4
कोल्हापूर हादरलं! मुलानेच केली आई-वडिलांची हत्या; धक्कादायक कारण आले समोर
5
ICICI Prudential AMC IPO Listing: आयसीआयसीआय प्रूडेंशियल एएमसीच्या आयपीओनं केलं मालामाल; प्रत्येक शेअरवर मिळाला 'इतका' नफा
6
बांगलादेशात ISI सक्रीय, कंटरपंथींकडून जाळपोळ, हिंसाचार सुरू; भारताविरोधात पाकिस्तानचं षडयंत्र?
7
नोकरी बदलणाऱ्यांना EPFO चा मोठा दिलासा! 'ब्रेक'बाबतचे नियम बदलले; आता शनिवार-रविवारची सुट्टी अडथळा ठरणार नाही
8
Dolphin in Mumbai: मुंबईकरांना सुखद धक्का! वरळी सी फेसच्या समुद्रकिनाऱ्यावर डॉल्फिनची मस्ती, व्हिडीओ व्हायरल
9
मुंबईत ठाकरे बंधू युतीत शरद पवारांची राष्ट्रवादी सहभागी होणार?; २२ जागांचा देणार प्रस्ताव
10
VIDEO: दादरमध्ये अजब प्रकार, एक तरुण या इमारतीवरुन त्या इमारतीवर मारतोय उड्या; पोलिसांची दमछाक
11
Stock Market Today: शेअर बाजाराची जबरदस्त सुरुवात; Sensex ची ३३० अंकांनी उसळी; IT Stocks सुस्साट
12
अमेरिकेतील नॉर्थ कॅरोलिनामध्ये जेट विमानाचा अपघात; संपूर्ण कुटुंबच उद्ध्वस्त
13
'...तर त्यांचा एक हात तोडून दुसऱ्या हातात दिला असता'; इम्तियाज जलील मंत्री संजय निषाद यांच्यावर संतापले
14
'या' कंपनीच्या गुंतवणूकदारांना ₹५५,५५० कोटींपेक्षा अधिकचा फटका; १६ महिन्यांत स्टॉक ८० टक्क्यांनी आपटला
15
मुंबई विमानतळाची गोपनीय माहिती चोरट्यांच्या हाती; ऐरोलीतील घटना : अदानी ग्रुपच्या मॅनेजरचा लॅपटॉप चोरीला
16
मी सर्वांसमोर तिला चुकीच्या पद्धतीने का किस करेल? ट्रोल झाल्यावर राकेश बेदींनी दिलं स्पष्टीकरण
17
डेमोक्रेट्सच्या खासदारांनी जारी केले एपस्टीनचे ६८ नवीन फोटो; महिलेसोबत दिसले बिल गेट्स
18
Vijay Mallya : देशातून फरार, पण लंडनमध्ये मात्र जोरदार सेलिब्रेशन; ललित मोदीच्या घरी झाली विजय माल्ल्याची जंगी बर्थ डे पार्टी
19
उस्मान हादी यांच्या मृत्यूनंतर बांग्लादेश पेटला, कट्टरपंथांनी भारताचे नाव घेतले; शेख हसीना यांच्या सरकारला हादीनेच दिले होते हादरे
20
राज्यातील पहिले 'जेन झी टपाल' आयआयटी मुंबईत; कार्यालयामध्ये नवीन सुविधांसह डिजिटल सेवा
Daily Top 2Weekly Top 5

ग्रंथ व्यक्तिमत्त्व घडवितात

By admin | Updated: January 29, 2016 23:57 IST

‘ग्रंथोत्सव’ परिसंवादातील सूर : सकारात्मक मनोवृत्तीसाठी पुस्तक वाचन आवश्यक

कोल्हापूर : आपल्या व्यक्तिमत्त्वात आमूलाग्र बदल घडविणारी पुस्तकेच असतात. आपण कसेही असलो तरी आपला स्वीकार करणारी आणि त्यांच्या संगतीत राहिल्यास आपले व्यक्तिमत्त्व घडविणारा पुस्तकांइतका सुंदर सहवास दुसरा नाही. वाचनाचा संस्कार जितक्या लवकर होईल, तितके आपले व्यक्तिमत्त्व अधिक विकसित होत जाते, असा सूर ‘ग्रंथोत्सवा’मधील परिसंवादात पाहायला मिळाला.शासनाचा मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, ग्रंथालय संचालनालय, माध्यमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद कोल्हापूर, जिल्हा माहिती अधिकारी व जिल्हा ग्रंथालय अधिकारी, यांच्यावतीने ‘कोल्हापूर जिल्हा ग्रंथोत्सव’ राजर्षी छत्रपती शाहू स्मारक भवनात सुरू आहे. शुक्रवारी दुसऱ्या दिवशीच्या पहिल्या सत्रात ‘ग्रंथाने मला काय दिले?’ या विषयावर परिसंवाद झाला. यामध्ये माध्यमिक शिक्षणाधिकारी ज्योत्स्रा शिंदे, शिवाजी विद्यापीठातील बॅ. बाळासाहेब खर्डेकर ग्रंथालयातील ग्रंथपाल डॉ. नमिता खोत, भालचंद्र चिकोडे स्मृती मोफत वाचनालयाचे अध्यक्ष राहुल चिकोडे सहभागी झाले होते. अध्यक्षस्थानी उपजिल्हाधिकारी संजय पवार होते.उपजिल्हाधिकारी पवार म्हणाले, शालेय वयात पुस्तक वाचनाची आवड निर्माण होते. आनंद मिळविण्यासाठी वाचन केले जात असले तरी पुस्तके सकारात्मक मनोवृत्ती निर्माण करतात. बालपणी पुस्तकांची निवड फार महत्त्वाची असते. वाचन कमी असले तरी चालेल; पण चांगली पुस्तके वाचावीत. पुस्तके निवडण्यासाठी पालकांनी व शिक्षकांनी मुलांना मार्गदर्शन करावे; तरच त्यांची वाचनातील अभिरुची वाढेल. ग्रंथ आपल्या जगण्याला दिशा देतात. चूक मान्य करण्याचे धाडस पुस्तके देतात. खरेपणासाठी लढण्याचे बळ महान व्यक्तींच्या आत्मचरित्र वाचनाने मिळते. डॉ. खोत म्हणाल्या, सुजाण नागरिक घडविण्यासाठी ग्रंथालयांची आवश्यकता आहे. स्वयंप्रेरणेने मुलांनी वाचनाकडे वळावे, यासाठी त्यांच्या आसपास पुस्तके असावीत. पुस्तके अडचणींवर मात करण्याचे बळ देतात. अनुवादित पुस्तकांमुळे बाहेरच्या देशातील लेखकांच्या विचारांची, तिथल्या राहणीमानाची, संस्कृतीची ओळख होण्यास मदत होते. युवराज कदम यांनी प्रास्ताविक केले. वनिता कदम व संतोष वडेर यांनी सूत्रसंचालन केले. बाळासाहेब कावळे यांनी आभार मानले. यावेळी जिल्हा ग्रंथालय अधिकारी विजयकुमार जगताप, उत्तम कारंडे, आदी उपस्थित होते.दुपारच्या सत्रातील ‘कथाकथन’ या कार्यक्रमात प्रा. अप्पासाहेब खोत यांनी ‘गवनेर’ व विजयराव जाधव यांनी ‘थैमाल’ या कथा सादर केल्या.पुस्तके जगण्याची प्रेरणा फक्त पुस्तके वाचणे इतकेच महत्त्वाचे नाही, तर वाचलेल्या पुस्तकांमधील आशय लक्षात ठेवून त्याचे अनुकरण प्रत्यक्ष आपल्या जीवनात करणे तितकेच महत्त्वाचे आहे. पुस्तक वाचनाने मनाला ऊर्जा आणि जगण्यास प्रेरणा मिळते. दु:ख हलके करण्यास पुस्तके मदत करतात. उत्तमोत्तम ग्रंथवाचनाची सवय असलेले लोक एक चांगला समाज निर्माण करू शकतात. वर्तमानात जगायचा सकारात्मक विचार ग्रंथ देतात, असे राहुल चिकोडे यांनी सांगितले.