शहरं
Join us  
Trending Stories
1
राज ठाकरेंच्या भेटीबाबत अनिल परबांनी सगळे सांगितले; म्हणाले, “युती, जागावाटप अन्...”
2
"एक मुस्लीम महिला म्हणून…!"; हिजाब ओढल्यावरून 'दंगल गर्ल' जायरा नीतीश कुमारांवर भडकली!
3
पश्चिम बंगालमध्ये ५८ लाख मतदारांची नावे वगळली, निवडणूक आयोगाने नवी यादी केली प्रसिद्ध
4
IPL 2026 Auction: अखेरच्या क्षणी BCCI कडून यादीत बदल! टीम इंडियातून डावललेला खेळाडूही लिलावात दिसणार
5
धक्कादायक...! हल्लेखोर पिता-पूत्र भारताच्या पासपोर्टवर मनिलाला आलेले; फिलिपिन्सच्या दाव्याने खळबळ 
6
‘मनरेगा’चं नाव बदलण्याविरोधात प्रियंका गांधी आक्रमक, लोकसभेत सरकारला सुनावले खडेबोल
7
PAN-Aadhaar लिंक करण्याची अखेरची तारीख जवळ; विसरलात तर लागेल इतका दंड, पाहा स्टेप बाय स्टेप प्रोसिजर
8
ज्या ठिकाणी गायब होतात विमाने अन् जहाज...'त्या' बर्म्युडा ट्रॅंगलवर वैज्ञानिकांचा नवा खुलासा
9
जनरल याह्या खान, नियाझी 'मदिरा, महिलां'त अडकलेले...; बांगलादेश मुक्तीसंग्रामाचा रिपोर्ट पाकिस्तानने दडपलेला...
10
संजय राऊतांनी घेतली राज ठाकरेंची भेट; म्हणाले, “काँग्रेस आमच्यासोबत नाही, भाजपाला मदत...”
11
Video - मनालीला गेलेल्या पर्यटकासोबत 'स्नो स्कॅम'; युजर म्हणतात, "यापेक्षा जास्त बर्फ फ्रीजमध्ये"
12
फोल्डेबल आयफोनमध्ये काय काय मिळणार? अ‍ॅप्पलनं निश्चित केले फीचर्स, किंमत जाणून थक्क व्हाल!
13
Video - "मी GPS लावला होता..."; हॉटेलमध्ये बायकोला रंगेहाथ पकडल्यावर ढसाढसा रडला नवरा
14
जागावाटपावरून महायुतीत तणाव! मुंबईत शिंदेसेनेला हव्यात १०० हून अधिक जागा, भाजपाचा प्लॅन बी तयार
15
वसंत मोरे मनसे कार्यालयात जाणार; ठाकरे बंधू युतीमुळे पुण्यात पदाधिकाऱ्यांमधील रुसवे फुगवे दूर
16
IPL ऑक्शनच्या दिवशीच परफेक्ट ऑडिशन! व्यंकटेश अय्यरचा SMAT स्पर्धेतील टी-२० सामन्यात मोठा धमाका
17
पश्चिम बंगालमध्ये लाखो मतदारांची नावं वगळली, SIRच्या मसुदा यादीतून धक्कादायक आकडेवारी समोर 
18
National Herald Case: नॅशनल हेराल्ड प्रकरणात सोनिया गांधी आणि राहुल गांधी यांना मोठा दिलासा
19
ICICI Prudential IPO मध्ये गुंतवणूक करणाऱ्यांसाठी आज अखेरची संधी; GMP ₹३०० च्या पार, धमाकेदार लिस्टिंगचे संकेत
20
पीएम नरेंद्र मोदी जॉर्डनच्या दौऱ्यावर; भारतासाठी का महत्वाचा आहे हा देश? जाणून घ्या...
Daily Top 2Weekly Top 5

वस्त्रोद्योग नगरीत गुन्हेगारांची ‘धडधड’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 4, 2018 00:45 IST

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : इचलकरंजीत गेल्या तीन वर्षांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, घरफोडी असे २९२ गंभीर गुन्हे नोंद झाले आहेत. वस्त्रनगरीतील गुन्हेगारी वाढून तिची ‘क्राइम नगरी’कडे वाटचाल झाली आहे. या नगरीवर वर्चस्व मिळविण्यासाठी गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण १४ टोळ्यांना ‘मोक्का’ लावण्यात आला, त्यांतील ...

अतुल आंबी ।लोकमत न्यूज नेटवर्कइचलकरंजी : इचलकरंजीत गेल्या तीन वर्षांत खून, खुनाचा प्रयत्न, खंडणी, मारामारी, घरफोडी असे २९२ गंभीर गुन्हे नोंद झाले आहेत. वस्त्रनगरीतील गुन्हेगारी वाढून तिची ‘क्राइम नगरी’कडे वाटचाल झाली आहे. या नगरीवर वर्चस्व मिळविण्यासाठी गुन्हेगारांच्या टोळ्या तयार झाल्या आहेत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये एकूण १४ टोळ्यांना ‘मोक्का’ लावण्यात आला, त्यांतील इचलकरंजीच्या सर्वाधिक दहा टोळ्या आहेत. त्यावरून या गुन्हेगारीचे स्वरूप स्पष्ट होते. पिस्तूल जवळ बाळगणाऱ्या ७२ जणांवर कारवाई करून पोलिसांनी तेवढीच पिस्तुले जप्त केली आहेत.गुन्हेगारीचा आलेख पाहता सन २००९ ते २०१५ पर्यंतच्या गुन्हेगारीच्या तुलनेत सन २०१६ ते २०१८ या तीन वर्षांत खून, खुनाचा प्रयत्न, रक्तबंबाळ होईपर्यंत मारहाण, गर्दी-मारामारी या गुन्ह्यांमध्ये वाढ झाल्याचे दिसते. तीन वर्षांमध्ये खून १८, खुनाचे प्रयत्न ४२, गंभीर मारहाण १७४, गर्दी-मारामारी ८० व घरफोड्या ७८ झाल्याचे चित्र दिसते. सुरुवातीला बाहेरहून कामानिमित्त आलेल्या कामगारांना धमकावणे, त्यांच्या पगारातील रक्कम काढून घेणे; येथून सुरू झालेला गुन्हेगारीचा प्रवास वाढत जाऊन मालक, उद्योजक, व्यापारी यांना धमकावत त्यांच्याकडून महिन्याला हप्ता ठरवून घेऊन खंडणी गोळा करण्यापर्यंत पोहोचला. खंडणीची रक्कम एक हजार रुपयांपासून ते एक कोटीपर्यंत असल्याची पोलीस दप्तरी नोंद आहे. जो खंडणी देण्यास नकार देतो, त्याचा मुदडा पाडण्यासही हे गुन्हेगार मागे-पुढे बघत नव्हते. त्यामुळे त्यांची दहशत निर्माण होऊन गुन्हेगारी फोफावली. अशा अनेक गुन्हेगारांनी मोठे गुंड बनून अवैध मार्गाने मिळविलेला पैसा अवैध व्यवसायांत गुंतविला. त्यातूनही माया जमवत पुढे जाऊन ते दादा बनले. त्यानंतर राजकारणात घुसून नेतेही बनले.अवैध व्यवसायांसह शहरात क्रिकेट बेटिंग (सट्टा), मटका, गुटखा, गुटखानिर्मिती कारखाना, गावठी दारूअड्डे, घातक शस्त्र व पिस्तूल जवळ बाळगण्याचे प्रकार, मुलींची छेडछाड, विनयभंग, बलात्कार, फसवणूक अशा सर्व प्रकारच्या गुन्ह्यांचे प्रमाण लक्षणीय आहे. गुन्हेगारीचा आलेख वाढून दिसू नये, याची खबरदारी घेत मारामारीचे व गंभीर गुन्हेदेखील अदखलपात्र म्हणून दाखल केले जातात. अनेक गुन्हे नोंद न करता परस्पर मिटविण्याचेही प्रकार होत आहेत.इचलकरंजी शहर परिसरातील अवैध व्यवसायही चांगलेच फोफावले आहेत. शहरातील कामगार वस्ती व अवैध व्यवसायातील वरपर्यंत निर्माण झालेली साखळी यामुळे हे व्यवसाय बिनदिक्कतपणे सुरू आहेत. फसवणूक करणे व वस्त्रोद्योगातील काही व्यवसायांमध्ये हस्तक्षेप करून कमिशनच्या नावाखाली दादागिरीने आपला वाटा ठेवणे. जागा खरेदी-विक्री व्यवहारात दमदाटीने सहभाग घेऊन आपला हिस्सा घेणे, असे अनेक प्रकार सुरू आहेत.शहरातील पोलीस ठाण्यांतील दहा वर्षांमध्ये गुन्हे दाखल होण्याचे प्रमाण पाहिल्यास गुन्हेगारी वाढल्याचे दिसते. सन २०१५ पूर्वी शहरात दोन पोलीस ठाणी होती. सन २०१५ नंतर एक पोलीस ठाणे नवीन झाले. शिवाजीनगर, गावभाग (इचलकरंजीपोलीस ठाणे) व नव्याने निर्माण झालेले शहापूर पोलीस ठाणे या तीनही पोलीस ठाण्यांतील दाखल गुन्हे पाहता, हा विळखा साºया शहरालाच बसल्याचे चित्र दिसते.गुन्हेगारीचा आलेख असावर्ष २०१६गुन्ह्याचा प्रकार शिवाजीनगर गावभाग शहापूर एकूणखून ०४ ०० ०२ ०६खुनाचा प्रयत्न ०२ ०१ ०२ ०५गंभीर मारहाण २६ २० १० ५६गर्दी, मारामारी २१ ०५ ०६ ३२चोरी-घरफोडी १० ०३ ०६ १९वर्ष २०१७खून २ १ २ ५खुनाचा प्रयत्न ११ ५ ४ २०गंभीर मारहाण ३७ १७ २० ७४गर्दी, मारामारी १७ २ ११ ३०चोरी-घरफोडी २२ ८ १२ ४२वर्ष २०१८ (आॅगस्टपर्यंत)खून ४ २ १ ७खुनाचा प्रयत्न १० ३ ४ १७गंभीर मारहाण २५ १२ ७ ४४गर्दी, मारामारी १४ १ ३ १८चोरी-घरफोडी ११ --- ६ १७