शहरं
Join us  
Trending Stories
1
Plane Crash: बोइंग विमानाचे 'दिवसच खराब'... अहमदाबाद अपघातानंतर आणखी ४ विमानांचे 'इमर्जन्सी लँडिंग'
2
आजचे राशीभविष्य - १७ जून २०२५, सरकारी कामे सफल होतील, मोठ्यांचा सहवास लाभेल
3
Mumbai Rain: मुंबईत काही तासांत ८६ मिमी पावसाची नोंद; पडझडीमुळे ३ जखमी 
4
Bombay HC: लाज वाटली पाहिजे, ११ वर्षांपासून...; मानखुर्द बालगृहातील पार्टीबद्दल हायकोर्टाचा संताप!
5
एका विमानात तांत्रिक दोष, दुसऱ्याला बॉम्बची धमकी!
6
नालेसफाई भ्रष्टाचार: तीन अभियंत्यांवर ठपका, ठेकेदार पुरोहित काळ्या यादीत 
7
Maharashtra Weather: कुठे ऊन तर कुठे पाऊस? राज्यात पावसाच्या दाेन तऱ्हा!
8
Census 2027: जनगणनेचा खर्च १३ हजार कोटी, तुम्हाला विचारले जाणार ३६ प्रश्न
9
तुटलेल्या विद्युत वाहिनीच्या स्पर्शाने दोन शेतकऱ्यांचा मृत्यू; महावितरण विरोधात चिकलठाण्यात रास्ता रोको
10
इस्रायलकडून इराणी टीव्ही स्टुडिओवर क्षेपणास्त्र हल्ला, लाईव्ह बुलेटीन सोडून अँकरने काढला पळ!
11
खुल्लम खुल्ला रोमान्स पडला महागात! बाईकच्या टाकीवर गर्लफ्रेंडला बसवणाऱ्या तरुणाला 'इतका' दंड
12
रांचीला जाणारे एअर इंडियाचे विमान टेक ऑफनंतर दिल्लीला परतले! नेमके झाले तरी काय?
13
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
14
सोनमच्याही एक पाऊल पुढे निघाली गुलफाशा; प्रियकरासोबत मिळून लग्नाच्या एक दिवस आधीच पतीला संपवलं!
15
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
16
सायप्रसच्या महिला खासदाराने PM मोदींचे चरणस्पर्श केले, पंतप्रधानांनी डोक्यावर हात ठेवत दिला आशीर्वाद
17
दहा कोटी वृक्ष लावगडीचे उद्दिष्ट; वन विभाग ‘साइट ट्रॅक’वर, रेशीमला झुकते माप
18
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
19
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका

सरकारच्या नाकर्तेपणामुळे वस्त्रोद्योगाची वाताहात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 3, 2018 00:47 IST

इचलकरंजी : भाजप सरकारच्या व सरकारमधील लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे वस्त्रोद्योगाची वाताहात झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या सर्वच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी केवळ वल्गनाच करीत आहेत. त्यामुळे वस्रोद्योगाला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी कॉँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारूया, असे आवाहन माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी ...

इचलकरंजी : भाजप सरकारच्या व सरकारमधील लोकप्रतिनिधींच्या नाकर्तेपणामुळे वस्त्रोद्योगाची वाताहात झाली आहे. त्यामुळे या क्षेत्रावर अवलंबून असणाऱ्या सर्वच कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे. असे असतानाही लोकप्रतिनिधी केवळ वल्गनाच करीत आहेत. त्यामुळे वस्रोद्योगाला ऊर्जितावस्था मिळवून देण्यासाठी कॉँग्रेसशिवाय पर्याय नाही. त्यासाठी सर्वांनी एकजुटीने लढा उभारूया, असे आवाहन माजी वस्त्रोद्योगमंत्री प्रकाश आवाडे यांनी केले.राष्टÑपिता महात्मा गांधी आणि माजी पंतप्रधान लालबहाद्दूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त शहर कॉँग्रेस समितीमध्ये आयोजित कार्यक्रमामध्ये ते बोलत होते.यावेळी माजी खासदार कल्लाप्पाण्णा आवाडे यांच्या हस्ते महात्मा गांधी व लालबहाद्दूर शास्त्री यांच्या प्रतिमेचे पूजन करून आदरांजली वाहण्यात आली.आवाडे म्हणाले, कॉँग्रेस आघाडीच्या काळात वस्त्रोद्योगाला नवसंजीवनी मिळाली होती. आज हा उद्योग मोडकळीस आला आहे. सरकारने घोषणा करून साखर वाटप करणे हेच काम केले आहे. त्याचा येथील उद्योजकांना कोणताही फायदा झाला नाही. दसरा-दिवाळीसारखे सण तोंडावर आले आहेत. हे कसे साजरे करायचे, असा प्रश्न वस्रनगरीत निर्माण झाला आहे.यावेळी विलास गाताडे, राहुल आवाडे, प्रकाश मोरे, सुनील पाटील, सतीश राठी, नंदा साळुंखे, अंजली बावणे, नजमा शेख, राजू बोंद्रे, नरसिंह पारीक, आदी कार्यकर्ते उपस्थित होते.आम्ही मालक बनविलो, हे कामगार बनवत आहेतकॉँग्रेस आघाडीच्या काळामध्ये आम्ही यंत्रमाग व्यवसायाला अनेक योजना देऊन कामगाराचा मालक बनविला. आता भाजप सरकार पुन्हा मालकाला कामगार बनवित आहे. अशा विचित्र परिस्थितीतून वस्रोद्योगाची वाटचाल सुरू आहे, अशी टीकाही माजी मंत्री प्रकाश आवाडे यांनी केली.