शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणसोबत युद्धविराम करून ट्रम्प यांनी युद्धातून अंग काढले; आता इस्रायलला चुकवावी लागणार किंमत
2
इराणसोबत धोका? सीझफायरनंतर काही तासांतच लावन बेटावरील तेल रिफायनरीमध्ये भीषण स्फोट, जगाचे कान टवकारले...
3
इराण-अमेरिका युद्धबंदीने जग सुखावलं, पण 'हा' देश भडकला! पाकिस्तानच्या 'त्या' खेळीमुळे मित्रराष्ट्र नाराज
4
मोठी बातमी! इराण युद्धामुळे भारतीय अर्थव्यवस्थेसमोर निर्माण झाली ५ मोठी संकटे; आरबीआय गव्हर्नर संजय मल्होत्रांचा महागाईचा इशारा
5
‘तुमच्या बापात दम असेल तर आमच्याकडून वंदे मातरम् वदवून दाखवा’, काँग्रेस नगरसेविकेचं भाजपाला अव्हान, इंदूर महानगरपालिकेत गदारोळ
6
अवघ्या १५ वर्षांचा मुलगा जगाला नडतोय; मुंबई-राजस्थान सामन्यात भज्जीचा वैभव सूर्यवंशीला सॅल्यूट
7
सीजफायर लागू होताच पहिल्या देशाने आपली एअरस्पेस खुली केली, विमानतळही सुरु झाले...
8
Latest Marathi News Live: सुनेत्रा पवार मुख्यमंत्री फडणवीसांच्या भेटीला; बारामती निवडणुकीवर चर्चा
9
IndiGo, Air India ला संजीवनी; 'या' शुल्कात मोठी कपात, तिकिटांचे दर कमी होणार?
10
'धुरंधर'साठी गौरव गेराचं असं झालं ऑडिशन, 'त्या' सीननंतर मिळाली आलम भाईची भूमिका
11
Akshaya Tritiya 2026 Date: यंदा अक्षय तृतीया कधी आहे? १९ की २० एप्रिल? 'या' शुभ मुहूर्तावर करा सोने खरेदी; वाचा सविस्तर
12
Car Gift: बक्षीस असावं तर असं...! चेन्नईतील कंपनीने १२ मेहनती कर्मचाऱ्यांना दिली लग्झरी AUDI भेट
13
TATA च्या 'या' शेअरमध्ये तुफान तेजी; एका झटक्यात ११०० कोटींनी वाढली रेखा झुनझुनवालांची संपत्ती
14
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे कोणी कोणी केले कौतुक? अमेरिका-इराण युद्धविरामाचे जगभरातून स्वागत! ट्रम्प यांच्या भाषेवर ऑस्ट्रेलियाची टीका
15
२१ लाख गुंतवणूकदारांसाठी खुशखबर! LIC पहिल्यांदाच देऊ शकते बोनस शेअर्स; 'या' दिवशी घोषणा होण्याची शक्यता
16
इराणच्या 'पीस प्लॅन'मध्ये मोठा घोळ! फारसी आणि इंग्रजी मसुद्यात आढळला फरक; युरेनियमच्या अटीवरून संभ्रम वाढला
17
इराणमधील युद्धविरामावर भारताची पहिली प्रतिक्रिया आली समोर, निर्णयाचं स्वागत करत व्यक्त केली अशी अपेक्षा 
18
'चमका हिंदुस्तान हमारा!'; अणुऊर्जा क्षेत्रात भारताचा 'करिश्मा'! रशियानंतर भारत दुसरा देश ठरला, ४०० वर्षांपर्यंत टेन्शन संपणार
19
'राधानगरी'त तीन अस्वले ट्रॅप कॅमेऱ्यात कैद; जैवविविधता अधोरेखितः परिसंस्थेतील महत्त्वाचा घटक
20
सस्पेन्स कायम! भारतीयांनो, इराण तात्काळ सोडा; युद्धविरामानंतर काही तासांत भारताने जारी केली सूचना
Daily Top 2Weekly Top 5

मंदीसह विविध प्रश्नांत वस्त्रोद्योग गुरफटला

By admin | Updated: February 14, 2017 23:50 IST

नवसंजीवनीची अत्यावश्यकता : वस्त्रोद्योगाच्या भीषण परिस्थितीकडे गांभीर्याने पाहण्याची गरज; मुख्यमंत्र्यांचे आश्वासनाकडे दुर्लक्ष

अतुल आंबी -- इचलकरंजी --वस्त्रोद्योगातील मंदी, सुताचे अवाढव्य वाढलेले दर, वीजदराचा खेळखंडोबा आणि मजुरीवाढीचा प्रश्न यामध्ये वस्त्रोद्योग गुरफटला गेला आहे. नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर सभेत शहरातील यंत्रमागाची चाके बंद पडू देणार नाही, अशी घोषणा केली होती. या घोषणेने यंत्रमाग व्यवसाय मोडून पडत असल्याचे चित्र निर्माण झाले आहे. तर साधे यंत्रमागधारक अत्यंत बिकट परिस्थितीतून जात आहेत. त्यामुळे हा घटक मार्च एंडिंगच्या हिशेबात कर्जबाजारीपणाच्या विळख्यात सापडला जाऊन अनेकांचे उद्योग मोडून पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे. सरकारने वस्त्रोद्योगाच्या भीषण परिस्थितीकडे गांभीर्याने व डोळसपणे पाहण्याची आवश्यकता निर्माण झाली आहे.केंद्र व राज्यात भारतीय जनता पक्षाची सत्ता आल्यानंतर आपण पर्यटन व वस्त्रोद्योग याला विशेष महत्त्व देणार असल्याचे जाहीर केले होते. त्यावेळेपासून वस्त्रोद्योगाला काही तरी विशेष सवलतींचे पॅकेज मिळेल आणि या उद्योगाला झळाळी मिळून ‘अच्छे दिन’ येतील, अशी आशा लावून बसलेल्या या उद्योगातील सर्वच घटकांना घोर निराशेला सामोरे जावे लागले आहे. त्यात ‘दुष्काळात तेरावा महिना’ या म्हणीप्रमाणे अतिशय तीव्र मंदीचा सामना वस्त्रोद्योगाला गत दोन वर्षांपासून करावा लागत आहे. येथील यंत्रमाग व्यवसायातील विविध घटकांनी एकमेकाला सावरत दोन वर्षे उद्योग जेमतेम पद्धतीने ढकलत आणला. मात्र, या सहा महिन्यांत आणखीनच बिकट परिस्थिती निर्माण झाली आहे. आता वस्त्रोद्योग मोडून पडण्याच्या स्थितीकडे निघाला आहे. याला योग्य वेळी नवसंजीवनी मिळाली नाही, तर उद्योगाचे न भरून निघणारे नुकसान होणार आहे.या पार्श्वभूमीवर शहरातील विविध संघटनांच्यावतीने अनेक वेळा तीव्र आंदोलने झाली. उद्योग स्थिरावण्यासाठी ठोस अशी काहीच उपाययोजना झाली नाही.तीन महिन्यांपूर्वी नगरपालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रचारासाठी आयोजित जाहीर सभेत बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी वस्त्रोद्योगाची चाके बंद पडू देणार नाही, अशी घोषणा केली होती. वस्त्रोद्योगासाठी उपाययोजना केल्या जातील, असेही सांगितले होते. मात्र, अद्याप यंत्रमाग व्यावसायिकांच्या हाती काहीच लागले नाही. त्यानंतर वस्त्रोद्योगमंत्री सुभाष देशमुख यांनीही वेगवेगळ्या घोषणा केल्या. त्यातूनही अद्याप काहीच निष्पन्न झाले नाही. त्यामुळे वस्त्रोद्योगाकडे अक्षम्य दुर्लक्ष करणाऱ्या सरकारचा नेमका उद्देश काय, असा प्रश्न यंत्रमाग व्यावसायिकांना पडला आहे.सुताची साठेबाजी रोखणार कोण ?सध्या कोणतेही ठोस कारण नसताना महिन्याभरात सुताचे दर अवाढव्य प्रमाणात वाढले आहेत. नफेखोरी व साठेबाजीमुळे ही सूत दरवाढ झाली असल्याचे आरोप व चर्चा यंत्रमाग व्यावसायिकांत सुरू आहे. सुताला कमोडीटी मार्केटमधून काढून जीवनावश्यक वस्तूंमध्ये त्याचा समावेश करावा, अशी मागणी येथील विविध संघटनांच्यावतीने गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. मात्र, याबाबत प्रशासन व शासन यांच्याकडून काहीच हालचाल होत नाही. त्यामुळे दिवसातून चार-पाच वेळा सुताचे दर बदलतात.सूतगिरण्यांना मिळाले करोडोंचे पॅकेजवस्त्रोद्योगात मंदीची लाट पसरली असल्याने यंत्रमाग व्यावसायिकांना विविध सवलती देण्याची मागणी सुरू आहे. तसेच सूतगिरण्यांचीही परिस्थिती बिकट झाल्याने त्यांनाही स्थिरावण्यासाठी पॅकेजची आवश्यकता होती. यातील सूतगिरण्यांची मागणी शासनाने तत्काळ मान्य करीत त्यांना करोडो रुपयांचे पॅकेज मंजूर केले. त्यामुळे सूतगिरण्या, सूत व्यापारी, अधिकारी, सरकार असा काही विशेष ‘मार्ग’ आहे का? नसेल तर मग अन्य घटक अद्याप वंचित का? असे अनेक उलटसुलट प्रश्न उपस्थित होत आहेत.मुख्यमंत्री सभेत आणखीन काय घोषणा करणार?जिल्हा परिषद व पंचायत समिती निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शहरालगत असलेल्या कोरोची (ता. हातकणंगले) येथील माळभागावर भाजप उमेदवारांच्या प्रचारार्थ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची जाहीर सभा गुरुवारी (दि. १६) आयोजित केली आहे. आता या सभेत मुख्यमंत्री आणखीन काही घोषणा करणार ? अशी उपहासात्मक चर्चा वस्त्रोद्योगातील विविध घटकांमध्ये सुरू आहे.