शहरं
Join us  
Trending Stories
1
Maruti Chitampalli Death: 'अरण्यऋषी' मारुती चितमपल्ली यांचे निधन; वयाच्या ९३व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
कोण होते मारुती चितमपल्ली? जाणून घ्या त्यांचा जीवनप्रवास व दिनचर्या
3
मराठी साहित्य संपदा समृद्ध करणारा अरण्यऋषी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची ज्येष्ठ साहित्यिक मारूती चितमपल्ली यांना श्रद्धांजली
4
अमेरिका शेवटी विश्वासघातकीच! सोबत लढता लढता मध्येच या सैन्याला त्यांच्या नशिबावर सोडले 
5
एअर इंडियाच्या जिवात जीव आला! बोईंग-787 विमानांत मोठी समस्या सापडली नाही; डीजीसीएकडून घोषणा
6
Jejuri Accident : जेजुरी मोरगाव रोडवर भीषण अपघात;आठ ठार, पाच गंभीर जखमी
7
"सोनमनं दिली होती लग्न न करण्याची धमकी?", पोलिसांनी कुटुंबीयांना विचारले हे 10 प्रश्न!
8
F-35 Shot Down: इस्रायलचं पाचवं F-35 पाडलं, इराणच्या दाव्यानं अमेरिकेचं टेन्शन वाढलं! 
9
इस्राइलचा निशाणा 'सुप्रीम लीडर'वरच! खामेनेईंचा बंकर असलेल्या भागात केला बॉम्बचा मारा
10
फास्टॅग पास एक्स्प्रेस हायवे, समृद्धी, अटल सेतूवरही लागू होणार? जाणून घ्या, नेमका कुठे फायदा होणार
11
“भाजपा केवळ देशातील नव्हेच तर जगातील मोठा पक्ष, पण...”; जयंत पाटील नेमके काय म्हणाले?
12
Sonam Raghuvanshi : "आम्ही कोणतंही पाप केलेलं नाही..."; नार्को टेस्टच्या मागणीवर सोनम रघुवंशीचा भाऊ संतापला
13
“काँग्रेस दिशाहीन पक्ष”; CM फडणवीसांच्या उपस्थितीत जयश्रीताई पाटील यांचा भाजपा प्रवेश
14
एअर इंडियाच्या अपघातात विमा धारकाचाही मृत्यू अन् नॉमिनीचाही; विमा कंपन्या पेचात सापडल्या, इरडाचे तर स्पष्ट आदेश आहेत...
15
हजारो जीव वाचणार! आपत्कालीन परिस्थितीत विमानातील प्रवाशांचे केबिन वेगळे होणार, युक्रेनियन अभियंत्याने केले डिझाइन
16
"राजा भाई तुम तो गए...!" ...अन् अँकर गमतीत बोलला, ते खरं ठरलं; बघा संपूर्ण VIDEO 
17
जेव्हा James Bond चित्रपट सत्यात उतरतो; पहिल्यांदाच MI6 चे नेतृत्व एका महिलेकडे...
18
Video - जिंकलंत मित्रांनो! झोमॅटो डिलिव्हरी बॉयचे पाणावले डोळे, ग्राहकांनी दिलं मोठं सरप्राईज
19
काहीतरी विपरित घडणार? तामिळनाडूत आढळली Doomsday fish; सोशल मीडियावर वेगळीच चर्चा

दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतकºयांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केला.महाअवयव दान पंधरवडा सांगता समारंभासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतकºयांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केला.महाअवयव दान पंधरवडा सांगता समारंभासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात मंत्री पाटील सोमवारी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी भाजप सरकारने ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो पण आतापर्यंत आलेले आॅनलाईन ७२ लाख अर्ज दाखल झाले आहेत. जो खरा शेतकरी आहे तोच अर्ज भरत असून इतर मंडळींच्या मनात शंका असल्याने ते अर्ज भरण्यापासून लांब राहिले आहेत.ही आकडेवारी पाहता राज्यात सुमारे १० लाख शेतकºयांची खाती बनावट असल्याचे स्पष्ट होते. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (दि. १५)पर्यंत मुदत असून त्यानंतर पंधरा दिवसांत नेमलेली समिती अभ्यास करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. आॅनलाईन अर्ज भरण्यास अजूनही काही ठिकाणी अडचणी येत आहेत, त्या लवकरच दूर करून शेतकºयांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले जाणार असल्याने कोणालाही त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दसºया मेळाव्यासाठी आपण उपस्थित राहणार का? यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, सदाभाऊंचे काम चांगले आहे आणि आपण चांगल्या कामाची नेहमी स्तुती करतो. त्यांना भाजपमध्ये का घेतले नाही, याबाबत आपण आताच काही बोलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.‘देवस्थान’च्या जमिनी कुळांनाच देणारदेवस्थान समितीच्या जमिनीची मालकी कुळाकडे असल्याने त्यातून समितीला फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या जमिनी संबंधित कुळांनाच रेडिरेकनर दराने देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. या जमिनींवरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढून टाकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विमानसेवेबाबत आज बैठककोल्हापूरच्या विमान सेवेबाबत डेक्कन चार्टर एव्हिएशन कंपनीच्या अधिकाºयांशी आज, मंगळवारी दुपारी तीन वाजता मुंबईत बैठक होत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. विमान सुरू व्हावे, यासाठी आता अंबाबाईलाच नवस करायला पाहिजे, अनेकदा विमान सुरू होण्याच्या तारखा येतात, पण ते प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत मी कोणताही नवा वायदा देणार नसल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगून टाकले. कोल्हापूर विमान सेवा अनेक वर्षांपासून बंद आहे. केंद्र सरकारच्या छोट्या शहरांसाठीच्या उड्डाण योजनेतून सप्टेंबर महिन्यात विमान सुरू होणार होते. याबाबत पत्रकारांनी पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, विमान सुरू करण्यासाठी होकार दिलेल्या डेक्कन चार्टर कंपनीसोबत आज, मंगळवारी चर्चा होणार आहे. विमान सेवा सुरू करायला कंपनी तयार आहे; पण वेळापत्रकाचा घोळ आहे. रात्रीची वेळ मिळाली आहे. ही वेळ चुकीची असल्याने आपण पुन्हा सकाळच्या सत्रात विमान सेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. विमान सेवा सुरू करणाºया कंपन्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे ही सेवा नक्की सुरू होईल परंतु जोपर्यंत ती सुरू होत नाही तोपर्यंत आश्वासन मी देणार नाही.’