शहरं
Join us  
Trending Stories
1
OPEC+ Oil Output: आणखी एक अग्निपरीक्षा; ८ देशांनी मिळून घेतला असा निर्णय ज्याचा थेट भारतावर होणार परिणाम, का वाढलं टेन्शन?
2
Afghanistan Earthquake : भीषण! भूकंपाने हादरला अफगाणिस्तान; ७ जणांचा मृत्यू, १५० जखमी; मजार-ए-शरीफचं नुकसान
3
स्मृती मंधानाचा ट्रॉफी सोबतचा फोटो, हातावर टॅटू..., होणारा नवरा पलाश मुच्छलची पोस्ट व्हायरल
4
"मला २० लाख कॅश द्या, तरच वरात घेऊन येईन"; नवरदेवाचा ऐनवेळी लग्नास नकार, मागितला हुंडा
5
VIDEO: "दीदी, हा कप तुमच्यासाठी....", हरमनप्रीतचा माजी दिग्गजांसोबत मैदानात जल्लोष
6
व्होडाफोन आयडियाला पुन्हा अच्छे दिन येणार? अमेरिकेन कंपनी गुंतवणूक करण्याच्या तयारीत; पण एका अटीवर
7
एका पैशाचा खर्च नाही, संकटे-समस्या संपतील; २१ दिवस १ मंत्राचा जप करा, अशक्यही शक्य होईल!
8
३० कोटींच्या उधळपट्टीचा घोटाळा सिद्ध, मुख्यमंत्र्यांचीही परवानगी नाही; रोहित पवार म्हणाले, 'हिवाळी अधिवेशनात सरकारची धिंड काढणार'
9
पशुपतिनाथाचे अवतार आणि रक्षेतून प्रगट झाले असे गोरक्षनाथ यांची जयंती; वाचा त्यांचे कार्य!
10
'हेरा फेरी'मधील बाबूरावच्या भूमिकेला कंटाळले परेश रावल, म्हणाले - "५०० कोटींची..."
11
वैकुंठ चतुर्दशी २०२५: श्रीविष्णू-महादेवांचे वरदान, पुण्य लाभेल; ‘असे’ करा व्रत, शुभच घडेल!
12
नोट चोरी बंद झाल्याने वोट चोरीची आठवण: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा विरोधकांवर हल्लाबोल
13
६० दिवस सोन्याहून पिवळे, ५ राशींच्या घरी लक्ष्मी पाणी भरेल; भरपूर भरभराट, लक्षणीय यश-सुख-लाभ!
14
आणखी एक मोठा बस अपघात, भरधाव ट्रकने बसला समोरून दिली धडक, २० जणांचा मृत्यू
15
मोठा निष्काळजीपणा! सरकारी रुग्णवाहिकेचा टायर पंक्चर, १ तास मिळाली नाही स्टेपनी; रुग्णाचा तडफडून मृत्यू
16
मुंबईकर अमोल मुजुमदारची शांतीत क्रांती! भारतीय महिला संघाला असं बनवलं वर्ल्ड चॅम्पियन  
17
“पुढील आषाढी एकादशीपर्यंत अजितदादा CM व्हावेत अन् विठ्ठलाची महापूजा करावी”: कुणाची इच्छा?
18
अखेर 'बिग बॉस'मधून प्रणित मोरेची Exit! सलमान खानलाही बसला धक्का, म्हणाला- "तू एलिमिनेट झाला नाहीस, पण..."
19
याच महिन्यात लाँच होणार ई-आधार ॲप; पाहा घरबसल्या काय-काय अपडेट करता येणार?
20
Anil Ambani ED: अनिल अंबानींसमोरील समस्या वाढल्या; ३००० कोटींची मालमत्ता जप्त, फ्लॅट, प्लॉट आणि ऑफिसचा समावेश, काय आहे प्रकरण?

दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 01:08 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतकºयांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केला.महाअवयव दान पंधरवडा सांगता समारंभासाठी ...

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : कर्जमाफीत पारदर्शकता राहावी, यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविले आहेत. मागवलेली माहिती व शेतकºयांचा जुना आकडा पाहिला तर खरा शेतकरीच अर्ज दाखल करत आहेत. त्यामुळे राज्यात जवळपास दहा लाख शेतकºयांची बँक खाती बनावट आहेत, असा गौप्यस्फोट राज्याचे महसूलमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी कोल्हापुरात केला.महाअवयव दान पंधरवडा सांगता समारंभासाठी छत्रपती प्रमिलाराजे रुग्णालयात मंत्री पाटील सोमवारी आले होते. त्यावेळी त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.मंत्री पाटील म्हणाले, राज्यातील शेतकºयांना कर्जमुक्त करण्यासाठी भाजप सरकारने ऐतिहासिक कर्जमाफीचा निर्णय घेतला आहे. त्यासाठी शेतकºयांकडून आॅनलाईन अर्ज मागविण्याची प्रक्रिया सुरू आहे. राज्यात ८९ लाख शेतकºयांना कर्जमाफीचा लाभ मिळू शकतो पण आतापर्यंत आलेले आॅनलाईन ७२ लाख अर्ज दाखल झाले आहेत. जो खरा शेतकरी आहे तोच अर्ज भरत असून इतर मंडळींच्या मनात शंका असल्याने ते अर्ज भरण्यापासून लांब राहिले आहेत.ही आकडेवारी पाहता राज्यात सुमारे १० लाख शेतकºयांची खाती बनावट असल्याचे स्पष्ट होते. आॅनलाईन अर्ज भरण्यासाठी शुक्रवार (दि. १५)पर्यंत मुदत असून त्यानंतर पंधरा दिवसांत नेमलेली समिती अभ्यास करणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. आॅनलाईन अर्ज भरण्यास अजूनही काही ठिकाणी अडचणी येत आहेत, त्या लवकरच दूर करून शेतकºयांच्या खात्यावर थेट पैसे जमा केले जाणार असल्याने कोणालाही त्यामध्ये हस्तक्षेप करता येणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.कृषिराज्यमंत्री सदाभाऊ खोत यांच्या दसºया मेळाव्यासाठी आपण उपस्थित राहणार का? यावर बोलताना मंत्री पाटील म्हणाले, सदाभाऊंचे काम चांगले आहे आणि आपण चांगल्या कामाची नेहमी स्तुती करतो. त्यांना भाजपमध्ये का घेतले नाही, याबाबत आपण आताच काही बोलणार नसल्याचेही त्यांनी सांगितले.‘देवस्थान’च्या जमिनी कुळांनाच देणारदेवस्थान समितीच्या जमिनीची मालकी कुळाकडे असल्याने त्यातून समितीला फारसे उत्पन्न मिळत नाही. त्यामुळे या जमिनी संबंधित कुळांनाच रेडिरेकनर दराने देण्याचा निर्णय सरकार लवकरच घेणार असल्याचे मंत्री पाटील यांनी सांगितले. या जमिनींवरील अतिक्रमणे पोलीस बंदोबस्तात काढून टाकणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.विमानसेवेबाबत आज बैठककोल्हापूरच्या विमान सेवेबाबत डेक्कन चार्टर एव्हिएशन कंपनीच्या अधिकाºयांशी आज, मंगळवारी दुपारी तीन वाजता मुंबईत बैठक होत असल्याची माहिती पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांनी दिली. विमान सुरू व्हावे, यासाठी आता अंबाबाईलाच नवस करायला पाहिजे, अनेकदा विमान सुरू होण्याच्या तारखा येतात, पण ते प्रत्यक्ष सुरू होईपर्यंत मी कोणताही नवा वायदा देणार नसल्याचेही पालकमंत्र्यांनी सांगून टाकले. कोल्हापूर विमान सेवा अनेक वर्षांपासून बंद आहे. केंद्र सरकारच्या छोट्या शहरांसाठीच्या उड्डाण योजनेतून सप्टेंबर महिन्यात विमान सुरू होणार होते. याबाबत पत्रकारांनी पालकमंत्री पाटील यांना विचारले असता ते म्हणाले, विमान सुरू करण्यासाठी होकार दिलेल्या डेक्कन चार्टर कंपनीसोबत आज, मंगळवारी चर्चा होणार आहे. विमान सेवा सुरू करायला कंपनी तयार आहे; पण वेळापत्रकाचा घोळ आहे. रात्रीची वेळ मिळाली आहे. ही वेळ चुकीची असल्याने आपण पुन्हा सकाळच्या सत्रात विमान सेवा सुरू व्हावी, यासाठी प्रयत्नशील आहोत. विमान सेवा सुरू करणाºया कंपन्यांसोबत चांगले संबंध आहेत. त्यामुळे ही सेवा नक्की सुरू होईल परंतु जोपर्यंत ती सुरू होत नाही तोपर्यंत आश्वासन मी देणार नाही.’