शहरं
Join us  
Trending Stories
1
खळबळजनक दावा! एपस्टीन फाईल्समध्ये Modi On Board उल्लेख, एका केंद्रीय मंत्र्याचेही नाव समोर
2
India T20 World Cup Squad Announced : टी-२० वर्ल्ड कपसाठी टीम इंडियाची घोषणा! गिलचा पत्ता कट, ईशान किशनला संधी
3
२०×१२×२० SIP Rule ची कमाल, दर महिन्याची छोटी रक्कम बनवेल कोट्यधीश; सोप्या भाषेत समजून घ्या
4
तुमचे आरोग्य खऱ्याच गोष्टीस पात्र आहे! बनावट उत्पादनांविरोधात हर्बालाइफ इंडियाचा उपक्रम
5
एपस्टीन फाइल्स प्रकरण, मोदींचे नाव घेणाऱ्या पृथ्वीराज चव्हाणांना DCM शिंदेंचे उत्तर; म्हणाले…
6
"हा तोच अब्दुल रशीद खान उर्फ मामू आहे, ज्याच्यावर..."; उद्धव ठाकरेंना अमित साटमांनी घेरले
7
‘वंदे मातरम्’ हा राष्ट्र निर्माणाचा मंत्र बनवायचा आहे; प. बंगालमधून PM मोदींचे देशाला आवाहन
8
Menstrual Syndrome: फक्त पोटदुखीच नाही; पाळी येण्यापूर्वी शरीर देते 'हे' ५ संकेत, या बदलांकडे वेळीच लक्ष द्या
9
२०२६ मध्ये सोनं १.५० लाखांच्या पार जाणार, महिन्याभरात चांदीही ₹४८,००० नं महागली
10
नितीश कुमारांनी हिजाब ओढलेल्या डॉक्टर तरुणी सरकारी सेवेत रुजू होण्यासाठी आलीच नाही, कारण...
11
बांगलादेशात हिंदू तरुणाच्या मॉब लिंचिंग प्रकरणात 7 जणांना अटक; सर्वत्र टीकेची झोड उठल्यानंतर, अखेर मोहम्मद युनूस झुकले
12
कल्याणमध्ये ठाकरेंना मोठा धक्का, माजी आमदाराचा भाजपात प्रवेश; शिंदेसेनेची कोंडी करणार?
13
'धुरंधर'मुळे पालटले या टीव्ही कलाकारांचे नशीब; कोणी आयटम साँगने गाजवले, तर कोणी अभिनयाने जिंकली मने!
14
भाजपचा यू-टर्न! आमदार देवयानी फरांदेंच्या नियुक्तीनंतर नाराजीची लाट, भाजपने आमदार ढिकलेंबद्दल केला खुलासा
15
३ लाख पगार, सरकारी घर, हवी तिथे नोकरी; बुरखा प्रकरणातील डॉ. नुसरत यांना कुणी दिली मोठी ऑफर?
16
बॉक्स ऑफिस मॉन्स्टर 'धुरंधर'सोबत 'उत्तर' रिलीज झाला अन्.., क्षितिज पटवर्धनची लक्षवेधी पोस्ट
17
सरकारच्या तिजोरीत लोकांनी भरले १७ लाख कोटी; कॉर्पोरेट, वैयक्तिक करात मोठी वाढ
18
'धुरंधर'मध्ये अक्षय खन्नाचंच होतंय कौतुक, आर माधवनचा जळफळाट? म्हणाला, "तो नव्या घरात..."
19
BMC निवडणुकीपूर्वी महायुतीत ट्विस्ट! भाजपा-राष्ट्रवादी नेत्यांची बैठक, शिंदेसेनेला डच्चू?
20
“सावकारांचे रॅकेट विदर्भ-मराठवाड्यात सक्रिय, महायुती सरकार शेतकरी विरोधी”: विजय वडेट्टीवार
Daily Top 2Weekly Top 5

पोलिसांच्या दागिने लॉकरकडे सांगलीकरांची पाठ--लोकमत विशेष

By admin | Updated: January 5, 2015 00:38 IST

पोलिसांवर अविश्वास : उपक्रमाचा नारळही फुटला नाही, सुरक्षेच्या प्रश्नाबाबत नागरिकांतूनच उदासीनता..

सांगली : परगावी जाणाऱ्या नागरिकांचे दागिने सुरक्षित रहावेत, यासाठी जिल्हा पोलीसप्रमुख दिलीप सावंत यांनी पोलीस मुख्यालयात स्वतंत्र विभाग स्थापन करून दागिने ठेवण्यासाठी लॉकर उघडले. जिल्ह्यात प्रथमच हा उपक्रम राबविण्याचा निर्णय दोन महिन्यांपूर्वी घेण्यात आला होता. मात्र या उपक्रमाकडे सांगलीकरांनी पाठ फिरवल्याने या योजनेचा नारळही फुटला नाही.शहरात सातत्याने घरफोडीच्या घटना घडत आहेत. या घटना रोखण्यासाठी नागरिकांनी काय काळजी घ्यावी, याविषयी पोलिसांनी अनेकदा आवाहन केले. अगदी घरोघरी जाऊन जागृतीविषयी पत्रकांचेही वाटप केले होते. मात्र या आवाहनास नागरिकांकडून कोणताही प्रतिसाद मिळालेला नाही. त्यामुळे परगावी जाणाऱ्या नागरिकांचे दागिने पोलीस ठाण्यातील ‘लॉकर’मध्ये जमा करून घेण्याचा प्रयोग जिल्ह्यात प्रथमच राबविण्याचा निर्णय पोलिसांनी घेतला होता. पण पोलिसांकडे कधी जायचे? तिथे दागिने कसे ठेवायचे? पुन्हा आणायला कधी जायचे? याचा विचार करून लोक आले नसावेत, असा अंदाज बांधला जात आहे.लोक परगावी गेल्याची माहिती काढून चोरटे घरफोडी करून लाखो रुपयांचे दागिने लंपास करतात. आयुष्याची कमाई काही क्षणात चोरट्यांच्या हाती लागते. घरफोडीचे गुन्हे करणाऱ्या गुन्हेगारांना पकडले जाते, मात्र सर्वच गुन्हे उघडकीस आणण्यात पोलिसांना यश येत नाही. परगावी जाताना लोकांनी नजीकच्या पोलीस ठाण्यात माहिती द्यावी, घरात किमती ऐवज ठेवून जाऊ नये, असे अनेकदा पोलिसांनी आवाहन केले आहे. मात्र या आवाहनास लोकांचा प्रतिसाद मिळत नाही. (प्रतिनिधी)असा आहे उपक्रम परगावी जाताना लोकांनी त्यांच्या घरातील सर्व दागिने एका बॅगेत भरावेत व ही बॅग मुख्यालयातील कक्षात आणून जमा करावी. पोलीस कर्मचारी संबंधितांसमोर दागिन्यांची पाहणी करून बॅग सील करून ती जमा करून घेतील. गावाहून परतल्यानंतर सील फोडून बॅगेत दागिने आहेत का नाही, याची खात्री करून ती परत देतील. हे काम जबाबदारीचे होते. लोकांचे दागिने सुरक्षित रहात असतील, तर पोलिसांनी ही जबाबदारी पार पाडण्याची तयारी दर्शविली होती. मात्र सांगलीकरांनीच पुढाकार न घेतल्याने या उपक्रमाचा नारळही फुटला नाही.नागरिकांचे दागिने लॉकरमध्ये ठेवण्याचे काम जबाबदारीचे होते. दागिने सुरक्षित रहात असतील तर ही जबाबदारी आम्ही स्वीकारली होती. मात्र सांगलीकरांमधून कोणताही प्रतिसाद मिळाल नाही. किमान त्यांनी गावाला जाताना तरी याची माहिती नजीकच्या पोलीस ठाण्यात दूरध्वनीवरुन द्यावी.- दिलीप सावंत, जिल्हा पोलीसप्रमुख, सांगली