शहरं
Join us  
Trending Stories
1
Air India Plane Crash : अहमदाबाद विमान अपघातावर मोठी अपडेट; सुप्रीम कोर्टाने केंद्र सरकारला नोटीस पाठवली, AAIB अहवालाबाबत सांगितली ही बाब
2
डीमार्टने जीएसटी दर कमी केले नाहीत? पहिल्याच दिवशी ८,८५७ रुपयांचे बिल, किती लावला GST?
3
Lamborghini Accident: भरधाव लॅम्बोर्गिनी दुभाजकावर धडकली; कोस्टल रोडवरील अपघातात, कोण चालवत होतं कार?
4
चिमुकली आई... आई... करत राहिली, लिव्ह इन पार्टनरने गर्लफ्रेंडच्या मुलीची हत्या केली  
5
Asia Cup 2025: भारत-पाकिस्तानचे संघ पुन्हा एकदा भिडणार? समजून घ्या IND vs PAKचे गणित
6
मनसे-शिवसेना युतीत जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरला; कोण किती जागा लढवणार? समोर आली माहिती
7
VIRAL VIDEO: चीनमधली खूप रील्स पाहिली असतील, पण भारतातील एअरपोर्टवर फूड डिलिव्हरी करणारा रोबो पाहिलात का?
8
Mumbai: सचिन तेंडुलकरच्या हस्ते दादरच्या शिवाजी पार्क जिमखान्याचे लोकार्पण!
9
Navratri 2025: नवरात्रीच्या पहिल्या दिवशी करूया स्मरण आणि मानसपूजन देवी शैलपुत्रीचे!
10
दुर्दैवी अंत! ज्याच्या इशाऱ्यावर 'वाघ' उठबस करायचा, त्याच मालकाला वाघाने टेन्शनमध्ये शिकार बनवलं
11
पाकिस्तानी सैन्याने त्यांच्याच देशात हवाई हल्ला केला, महिला मुलांसह ३० नागरिकांचा मृत्यू
12
ओबीसी आंदोलक नवनाथ वाघमारे यांची गाडी अज्ञात व्यक्तीने पेटवली; जालन्यातील घटना
13
"हो आम्ही पालक झालो आहोत", अखेर भूषणने उलगडलं केतकीसोबतच्या 'त्या' फोटोचं गुपित
14
पराभव दिसू लागताच पाकिस्तानी प्रेक्षक पळू लागले, भारतीय तरुणीने भर स्टेडियममध्ये डिवचले, म्हणाली...  
15
GST 2.0 Price List : स्कूटर ते होंडा ३५०... हॅचबॅकपासून लक्झरी SUV पर्यंत, GST कपातीमुळे कार-बाईक स्वस्त; पाहा संपूर्ण यादी
16
तुम्हाला फावल्या वेळेत नखं खाण्याची सवय असेल तर आताच सोडा; डॉक्टरांचा धोक्याचा इशारा
17
एका महिलेचा कॉल अन् करोडपती बँकरला २३ कोटींचा गंडा; एक महिन्यासाठी केले डिजिटल अरेस्ट
18
Tata ची मोठी घोषणा; चार वर्षांपूर्वीच्या किमतीवर मिळणार कार, जाणून घ्या नवीन दर...
19
Monsoon update: यंदाची दिवाळी पावसातच जाणार का? मान्सून भारतातून कधी परत जाणार?
20
Video - हायव्होल्टेज ड्रामा! लग्नाचं वेड, जीवाशी खेळ; गर्लफ्रेंड न भेटल्याने 'तो' टॉवरवर चढला

पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींची स्वच्छतेकडे पाठ

By admin | Updated: March 26, 2015 00:12 IST

अनेक गावे स्वच्छतेपासून वंचित : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज

किरण मस्कर - कोतोली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. हे अभियान गावोगावी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, यापूर्वीही सरकारने गावांना स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अद्यापही अनेक गावांची दिशा व दशा सुधारलेली दिसत नाही. ग्रामपंचायतीसह वरिष्ठ प्रशासनाने स्वच्छता अभियानाकडे लक्ष न दिल्यामुळेच तालुक्यातील अनेक गावे स्वच्छतेपासून वंचित आहेत.स्वच्छता अभियानाबाबत लोकप्रतिनिधींमध्येही उदासीनता दिसून येत असून, ज्या गावात स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे, तेथे घाणीचे साम्राज्य दिसून येते. आजही तालुक्यातील अनेक गावे घाणीच्या विळख्यात असून, नाल्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया या आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. परिसरातील मटण विक्रेते हे दुकानातील घाण गावच्या बाहेर न टाकता त्या ठिकाणी अथवा जवळपास फेकली जाते. यामुळे गाव परिसर दूषित होण्यास कारणीभूत ठरतात. मात्र, या प्रकाराकडे कोणाचेही लक्ष नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता अभियानांकडे लक्ष न दिल्यामुळे तालुक्यातील अनेक गावे स्वच्छतेपासून दुरावलेली आहेत. यामुळे दुर्गंधी पसरुन रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.अस्वच्छ ग्रामपंचायतीकोतोली, कोलोली, कसबा बोरगाव, तिरपण, घोटवडे, नणुंद्रे, करंजफेण, गोलिवडे, पोर्ले, आसुर्ले, माजगाव, पुनाळ, आळवे, उत्रे, निवडे, उंड्री, तेलवे, आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.‘स्वच्छ भारत’ ही योजना देशभरात सुरू आहे. याचे पालन नियमित संबंधित ग्रामपंचायतीने करणे गरजेचे आहे. या योजनेमध्ये ग्रामपंचायत प्रशासनासह संपूर्ण गावाचा सहभाग मोलाचा आहे.- बाजीराव उदाळे, सरपंच, ग्रामपंचायत वाघवे.पन्हाळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी स्वच्छ गाव, सुंदर गाव, स्वच्छ घर, स्वच्छ दार अशा विविध योजना घेतल्या आहेत, पण काही ग्रामपंचायतींनी आजही त्या अमलात आणलेल्या नाहीत, तर काहींचा फक्त दिखावा आहे. लवकरच याची माहिती घेऊन निर्णय घेऊ.- सौ. सुनीता पाटील, सभापती, पंचायत समिती पन्हाळा.