शहरं
Join us  
Trending Stories
1
“आम्ही कट्टर देशाभिमानी हिंदू, भ्रष्ट भाजपावाले घरोघरी ‘सिंदूर’ वाटणार होते”: उद्धव ठाकरे
2
Vivek Lagoo: ज्येष्ठ अभिनेते विवेक लागू यांचं निधन, रंगभूमीवरचा शिस्तप्रिय नट हरपला
3
"महाराष्ट्रात हिंदी लादल्यास रस्त्यावर उतरू", मराठी अस्मितेसाठी उद्धव ठाकरेंचा एल्गार
4
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दिबांचे नाव लवकरात लवकर द्या, सर्वपक्षीय कृती समितीची मागणी
5
"आपला मेळावा बाळासाहेबांच्या विचारांचा, तर दुसरा..."; एकनाथ शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
6
इराण-इस्रायल युद्धात दोन गटात विभागलं केलं जग? रशियानंतर आता चीनचीही 'एन्ट्री', भारताची भूमिका काय?
7
ऑपरेशन सिंधू: भारत सरकार इस्रायलमधील भारतीयांना परत आणणार! कशी करता येणार नोंदणी? जाणून घ्या
8
“पहलगाम हल्लातील दहशतवादी आकाशात गेले, पाताळात गेले की भाजपात गेले?”; ठाकरेंचा बोचरा सवाल
9
"पाकिस्तानात ठेवलं जाणार इराणचं अण्वस्त्र साहित्य?"; ट्रम्प यांनी मुनीर यांना नेमकं का जेवायला बोलावलं? सगळं विचित्रच...!
10
"अमेरिकेनं इस्रायलला थेट लष्करी मदत केली तर..." आता इराण-इस्रायल युद्धात रशियाची 'एन्ट्री'; दिली खुली धमकी!
11
आरोपांची उठली राळ, मंत्री संजय शिरसाटांचा इम्तियाज जलीलांविरोधात कायदेशीर पलटवार
12
सोनम आणि राज कुशवाह यांना दिलासा नाही, न्यायालयाने पोलीस कोठडीत केली वाढ!
13
ऑपरेशन सिंदूर: मोदींनी अमेरिकेच्या न झालेल्या ५१ व्या राज्यात जाऊन सुनावले, ट्रम्प वठणीवर आले...
14
मेहुणीवर जीव जडला, प्रेमाच्या मर्यादा ओलांडल्या, प्रेग्नंट झाल्याचं कळताच केलं कांड!
15
देशातील सर्वात महागडा टीव्ही ३० लाखांना विकला गेला; कंपनीचे नाव पाहून तुम्ही म्हणाल...
16
परदेशातून २ किलो सोनं घेऊन आला, विमानातच सोडून बाहेर पडला! पुढे जे झालं ते ऐकून व्हाल हैराण
17
होणाऱ्या १८ वर्षीय सुनेच्या प्रेमात पडला ५५ वर्षीय सासरा, केलं लग्न; आता म्हणतो, "या जन्मात..."
18
दिवस नाहीत फार, महिंद्रा ही कोणती आणतेय कार? एसयुव्ही प्रेमींमध्ये नाही उरला 'थार'...
19
'तुम्ही सुरुवात केली, मी अंत करेन...', लालू प्रसाद यादवांचा फोटो पाहत तेज प्रताप यांनी केली मोठी घोषणा
20
Anderson-Tendulkar Trophy : दोन दिग्गजांच्या खास फ्रेमसह दिसली नव्या ट्रॉफीची पहिली झलक (See Pics)

पन्हाळा तालुक्यातील ग्रामपंचायतींची स्वच्छतेकडे पाठ

By admin | Updated: March 26, 2015 00:12 IST

अनेक गावे स्वच्छतेपासून वंचित : नागरिकांचे आरोग्य धोक्यात, वरिष्ठांनी लक्ष घालण्याची गरज

किरण मस्कर - कोतोली पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी स्वच्छ भारत अभियान सुरू केले. हे अभियान गावोगावी करण्याचे प्रयत्न सुरू झाले असून, यापूर्वीही सरकारने गावांना स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी खूप प्रयत्न केले, पण अद्यापही अनेक गावांची दिशा व दशा सुधारलेली दिसत नाही. ग्रामपंचायतीसह वरिष्ठ प्रशासनाने स्वच्छता अभियानाकडे लक्ष न दिल्यामुळेच तालुक्यातील अनेक गावे स्वच्छतेपासून वंचित आहेत.स्वच्छता अभियानाबाबत लोकप्रतिनिधींमध्येही उदासीनता दिसून येत असून, ज्या गावात स्वच्छतेकडे ग्रामपंचायतीचे दुर्लक्ष आहे, तेथे घाणीचे साम्राज्य दिसून येते. आजही तालुक्यातील अनेक गावे घाणीच्या विळख्यात असून, नाल्यांमध्ये दुर्गंधीयुक्त पाणी साचले आहे. पाण्याचा निचरा होत नसल्याने साचलेल्या पाण्यामुळे डासांची उत्पत्ती वाढत आहे. यामुळे नागरिकांना डेंग्यू, मलेरिया या आजारांची लागण होण्याची शक्यता आहे. परिसरातील मटण विक्रेते हे दुकानातील घाण गावच्या बाहेर न टाकता त्या ठिकाणी अथवा जवळपास फेकली जाते. यामुळे गाव परिसर दूषित होण्यास कारणीभूत ठरतात. मात्र, या प्रकाराकडे कोणाचेही लक्ष नाही. ग्रामपंचायत प्रशासनाने स्वच्छता अभियानांकडे लक्ष न दिल्यामुळे तालुक्यातील अनेक गावे स्वच्छतेपासून दुरावलेली आहेत. यामुळे दुर्गंधी पसरुन रोगराई पसरण्याची शक्यता निर्माण झाली आहे. नागरिकांच्या आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छतेकडे लक्ष देण्याची गरज आहे.अस्वच्छ ग्रामपंचायतीकोतोली, कोलोली, कसबा बोरगाव, तिरपण, घोटवडे, नणुंद्रे, करंजफेण, गोलिवडे, पोर्ले, आसुर्ले, माजगाव, पुनाळ, आळवे, उत्रे, निवडे, उंड्री, तेलवे, आदी ग्रामपंचायतींचा समावेश आहे.‘स्वच्छ भारत’ ही योजना देशभरात सुरू आहे. याचे पालन नियमित संबंधित ग्रामपंचायतीने करणे गरजेचे आहे. या योजनेमध्ये ग्रामपंचायत प्रशासनासह संपूर्ण गावाचा सहभाग मोलाचा आहे.- बाजीराव उदाळे, सरपंच, ग्रामपंचायत वाघवे.पन्हाळा तालुक्यातील अनेक ग्रामपंचायतींनी स्वच्छ गाव, सुंदर गाव, स्वच्छ घर, स्वच्छ दार अशा विविध योजना घेतल्या आहेत, पण काही ग्रामपंचायतींनी आजही त्या अमलात आणलेल्या नाहीत, तर काहींचा फक्त दिखावा आहे. लवकरच याची माहिती घेऊन निर्णय घेऊ.- सौ. सुनीता पाटील, सभापती, पंचायत समिती पन्हाळा.