शहरं
Join us  
Trending Stories
1
मुफ्ती दहशतवाद्यांच्या घरी जायच्या, काश्मिरी पंडितांना हाकलून कोणी दिलं? फारुख अब्दुल्लांचा आरोप
2
"आम्ही पाकिस्तानी लोकांना मारणार नाही, कारण..."; काय म्हणाले फारुख अब्दुल्ला? सिंधूच्या पाण्यासंदर्भातही मोठं विधान
3
IHMCL Recruitment: आयएचएमसीएलमध्ये नोकरी, एक लाखांहून अधिक पगार; जाणून घ्या पात्रता आणि निवड
4
"घरं तोडायला येतील त्यांना सांगा, राज ठाकरेंशी बोलून घ्या"; एल्फिन्स्टन पूल बाधितांना मनसेने दिला धीर
5
"मी सत्तेसाठी कधीच हपापलेलो नाही, सर्वाधिक सत्ता..."; अजित पवारांनी मांडलं रोखठोक मत
6
Alka Kubal : अलका कुबल यांनी 'माहेरची साडी'साठी घेतलं होतं फक्त इतकं मानधन, पहिल्या कमाईचा आकडाही आला समोर
7
"दादांना विचारतो त्यांनी कुठल्या ज्योतिष्याकडे पाहिलं"; CM व्हावं वाटतं म्हणणाऱ्या अजित पवारांना गोगावलेंचा टोला
8
"शिंदे कसले वाघ, मंत्र्यांचा निधी वळवला जातो, अडचण येताच गावी पळून जातात": अंबादास दानवे
9
Temple: शिवालयाच्या पायरीवर असलेल्या 'या' राक्षसाला नमस्कार करून मंदिरात जाण्याचा प्रघात का?
10
पहलगाम दहशतवादी हल्ल्याचा आखाती देशांतील मराठी अनिवासी भारतीयांकडूनही तीव्र निषेध
11
बलुचिस्तानात मोठा खेला...! भारताला पोकळ धमक्या देणारा पाक उघडा पडला; सरकारी इमारतींवर बंडखोरांचा ताबा, लावली आग
12
१३२ सेवा, २४ राज्ये, २८४ जिल्ह्यांना जोडणाऱ्या ‘वंदे भारत’मुळे रेल्वेची किती कमाई होते?
13
Pune Accident: कीर्तन ऐकून घरी परतताना भरधाव मर्सिडीजनं उडवलं; दुचाकीस्वार जागीच ठार
14
Hingoli: डिव्हायडर तोडून टिप्पर थेट ऑटोवर उलटला; टिप्परखाली दबून दोन प्रवाशांचा मृत्यू
15
“प्रत्येकाने सद्भावना मंत्र जोपासावा, महाराष्ट्र धर्म वाचवण्यासाठी काँग्रेसचा सत्याग्रह”
16
कमालच झाली राव! लहान मुलंच म्हणतील फोनला टाटा-बायबाय; फक्त पालकांनी करावं असं काही...
17
मुंबई, पंजाब नाहीतर 'हा' संघ जिंकणार आयपीएलची ट्रॉफी; सुनील गावस्कर यांची भविष्यवाणी
18
पुत्र जन्मला! मराठी अभिनेत्रीच्या घरी पाळणा हलला, गोंडस लेकाला दिला जन्म
19
पत्नीची हत्या करुन मृतदेह पुरला, तीन दिवसांनी हात बाहेर येताच...; दृष्य पाहून पोलिसही हादरले
20
"तुम्ही अजित पवारांना भेटल्या, खरं की खोटं... उत्तर द्या?"; सुषमा अंधारे-अंजली दमानिया सोशल मीडियावर भिडल्या

श्रेणीतून टक्केवारीपर्यंत जाताना विद्यार्थ्यांची कसोटी

By admin | Updated: November 25, 2015 00:44 IST

परिश्रम घ्यावे लागणार : शिक्षकांच्या जबाबदारीअभावी कायद्याची पायमल्ली

घन:शाम कुंभार -- यड्राव -पाच वर्षांपूर्वी देशभरात बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा अंमलात आला. यामध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा नसल्याने त्याच्या प्रगतीवर श्रेणी देण्यात येत आहे. अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांवर जबाबदारी असल्याने त्याना अप्रगत विद्यार्थ्यांची प्रगती दिसतच नाही. आठवीनंतर नववीची परीक्षा होत असल्याने श्रेणीतून गुणांच्या टक्केवारीपर्यंत जाताना विद्यार्थ्यांची कसोटी लागत आहे. शिक्षकांच्या जबाबदारीअभावी सक्तीच्या कायद्याची पायमल्ली झाली आहे.केंद्र सरकारने १ एप्रिल २०१० पासून बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा अंमलात आणला. या कायद्यामुळे सहा ते चौदा वयोगटांतील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची जबाबदारी राज्य शासनावर आली.मुलांचे मूल्यमापन कल्पक मार्गाने करावयाचे ही या कायद्यातील महत्त्वाची तरतूद आहे. राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार शाळेमध्ये प्रवेश दिलेल्या कोणत्याही बालकास मागे ठेवता येणार नाही. किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत काढून टाकता येणार नाही. त्याचप्रमाणे कलम ३० नुसार कोणत्याही बालकास शिक्षण पूर्व होईपर्यंत कोणत्याही मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार नाही. तसेच अनुत्तीर्ण किंवा कोणत्याही कारणास्तव बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रगती समाधनकारक नसलेल्या विषयातील प्रगती अपेक्षित पातळीपर्यंत आणण्यासाठी संबंधित शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे बंधनकारक राहणार आहे.आठवीपर्यंत परीक्षा नसल्याने मुलांचे मूल्यमापन करून त्यांना श्रेणी दिली जाते. विद्यार्थ्यांना परीक्षा नसल्याने अभ्यासाकडे म्हणावे तितके गांभीर्याने पाहावे लागत नाही. एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात अप्रगत असेल, किंवा तसे निदर्शनास आले, तर संबंधित विषयाच्या शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घ्यावे लागणार असल्याने शिक्षकांनी कोणताही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, याकडेच लक्ष दिल्याने सध्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, वाचन, लिखाण यातील असलेली वस्तुस्थिती समोर येत आहे. (उत्तरार्ध)