शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदी भाषेसंदर्भातील दोन्ही शासन निर्णय रद्द; राज-उद्धव यांच्या मोर्चाआधीच CM फडणवीसांची मोठी घोषणा
2
"...म्हणून सरकारने हिंदीचा GR रद्द केला"; उद्धव ठाकरेंचा राज्य सरकारवर हल्लाबोल, स्पष्टच बोलले
3
"ती समिती उच्च शिक्षणासाठी होती, खोटं कशाला बोलता"; उद्धव ठाकरेंचे CM फडणवीसांना प्रत्युत्तर
4
"हनिमूनवरून थेट माझ्यासोबत भांडायला आल्या..."; कोलकाता सामूहिक बलात्कार प्रकरणावरून आपसातच भिडले TMC खासदार! 
5
नागपूर-रत्नागिरी राष्ट्रीय महामार्गावर अपघात; कारचे टायर फुटले, आठ जण जखमी, एअर बॅगमुळे भाविक बचावले
6
केबिनचे तापमान वाढले; Air India च्या टोकियो-दिल्ली विमानाची कोलकात्यात आपत्कालीन लँडिंग
7
मराठी जनतेच्या रेट्यामुळेच 'हिंदी सक्ती' मागे, ही भीती असली पाहिजे; राज ठाकरे स्पष्टच बोलले
8
हिंदी सक्तीचा निर्णय मागे घेतल्याने ५ जुलैला होणारा ठाकरे बंधूंचा मोर्चा रद्द, संजय राऊतांची माहिती
9
आरजी कार प्रकरणात केलेली आरोपीला फाशीची मागणी; आता स्वतःच केला तरुणीवर बलात्कार...
10
"कुठल्या तोंडाने आंदोलन करता हे राज ठाकरेंनी उद्धव यांना विचारलं पाहिजे"; CM फडणवीसांची टीका
11
कर्नाटकात मोठी 'उलथापालथ' होणार, आता 'हा' बडा नेता मुख्यमंत्री बनणार? आमदारानंच बोलता-बोलता 'लिक' केला काँग्रेसचा 'बिग प्लॅन'!
12
आमिर खानने नाकारलं अंडरवर्ल्ड पार्टीचं निमंत्रण, घाबरलं कुटुंब, म्हणाला - "मला जसं जगायचंय तसं... "
13
"हिंदीला विरोध नाही, पण..." उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले; जीआरच्या प्रतिकात्मक होळीनंतर नेमकं काय म्हणाले?
14
Shefali Jariwala Death: अँटी एजिंग औषधं बनलं मृत्यूचं कारण? शेफाली जरीवाला प्रकरणात मोठा खुलासा
15
"नारायण राणेंनी भानगडी, मारामाऱ्या केल्या"; गोगावलेंच्या विधानावर नितेश राणे म्हणाले, "माझ्या खांद्याला खांदा लावून..."
16
"अपनी औकात में रहो, अगर अब..."; अरविंद केजरीवाल यांचा भाजपला थेट इशारा, नेमकं प्रकरण काय?
17
आता आरपारची लढाई; 29 ऑगस्टला मुंबई गाठायची अन्...जरांगे पाटलांचा सरकारला इशारा
18
नाकर्त्या पंतप्रधानांमुळे जिंकलेले युद्ध हरलो; प्रकाश आंबेडकर यांचा हल्लाबोल
19
VIDEO: मुसळधार पावसाने नदीचे पाणी गावात शिरले; शाळा पाण्याखाली गेल्याने १६२ मुले अडकली
20
"महाराष्ट्रद्वेष्ट्यांच्या चहापानाला जायचं म्हणजे पापच!’’, सरकारच्या चहापानावर मविआचा बहिष्कार

श्रेणीतून टक्केवारीपर्यंत जाताना विद्यार्थ्यांची कसोटी

By admin | Updated: November 25, 2015 00:44 IST

परिश्रम घ्यावे लागणार : शिक्षकांच्या जबाबदारीअभावी कायद्याची पायमल्ली

घन:शाम कुंभार -- यड्राव -पाच वर्षांपूर्वी देशभरात बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाचा अधिकार कायदा अंमलात आला. यामध्ये पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा नसल्याने त्याच्या प्रगतीवर श्रेणी देण्यात येत आहे. अप्रगत विद्यार्थ्यांच्या प्रगतीसाठी शिक्षकांवर जबाबदारी असल्याने त्याना अप्रगत विद्यार्थ्यांची प्रगती दिसतच नाही. आठवीनंतर नववीची परीक्षा होत असल्याने श्रेणीतून गुणांच्या टक्केवारीपर्यंत जाताना विद्यार्थ्यांची कसोटी लागत आहे. शिक्षकांच्या जबाबदारीअभावी सक्तीच्या कायद्याची पायमल्ली झाली आहे.केंद्र सरकारने १ एप्रिल २०१० पासून बालकांना मोफत व सक्तीच्या शिक्षणाच्या अधिकाराचा कायदा अंमलात आणला. या कायद्यामुळे सहा ते चौदा वयोगटांतील सर्व बालकांना मोफत व सक्तीचे प्राथमिक शिक्षण पुरविण्याची जबाबदारी राज्य शासनावर आली.मुलांचे मूल्यमापन कल्पक मार्गाने करावयाचे ही या कायद्यातील महत्त्वाची तरतूद आहे. राज्य शासनाने काढलेल्या परिपत्रकानुसार शाळेमध्ये प्रवेश दिलेल्या कोणत्याही बालकास मागे ठेवता येणार नाही. किंवा प्राथमिक शिक्षण पूर्ण होईपर्यंत काढून टाकता येणार नाही. त्याचप्रमाणे कलम ३० नुसार कोणत्याही बालकास शिक्षण पूर्व होईपर्यंत कोणत्याही मंडळाची परीक्षा उत्तीर्ण होणे आवश्यक असणार नाही. तसेच अनुत्तीर्ण किंवा कोणत्याही कारणास्तव बालकास शाळेतून काढून टाकता येणार नाही. अनुत्तीर्ण विद्यार्थ्यांची प्रगती समाधनकारक नसलेल्या विषयातील प्रगती अपेक्षित पातळीपर्यंत आणण्यासाठी संबंधित शिक्षकांनी विशेष प्रयत्न करणे बंधनकारक राहणार आहे.आठवीपर्यंत परीक्षा नसल्याने मुलांचे मूल्यमापन करून त्यांना श्रेणी दिली जाते. विद्यार्थ्यांना परीक्षा नसल्याने अभ्यासाकडे म्हणावे तितके गांभीर्याने पाहावे लागत नाही. एखादा विद्यार्थी एखाद्या विषयात अप्रगत असेल, किंवा तसे निदर्शनास आले, तर संबंधित विषयाच्या शिक्षकांना त्या विद्यार्थ्यांसाठी परिश्रम घ्यावे लागणार असल्याने शिक्षकांनी कोणताही विद्यार्थी अप्रगत राहणार नाही, याकडेच लक्ष दिल्याने सध्या विद्यार्थ्यांची शैक्षणिक गुणवत्ता, वाचन, लिखाण यातील असलेली वस्तुस्थिती समोर येत आहे. (उत्तरार्ध)