शहरं
Join us  
Trending Stories
1
उद्धवसेनेशी युतीच्या शक्यतेवर CM फडणवीस स्पष्टच बोलले; म्हणाले, "सध्याची महायुती..."
2
IND vs ENG 5th Test Day 3 Stumps: मियाँ मॅजिक! परफेक्ट यॉर्करसह थांबला खेळ; सलामी जोडी फुटली
3
हार्दिक पटेल यांनी आळवले बंडाचे सूर, मुख्यमंत्र्यांना पत्र लिहून दिला असा इशारा, गुजरातमध्ये भाजपाला धक्का बसणार?
4
Asia Cup 2025 Venues : भारत-पाक 'हायहोल्टेज' सामना दुबईत; या ठिकाणी रंगणार आशिया कप स्पर्धेतील सामने
5
Mumbai LocaL: तिकीट तपासणीवरून लोकलमध्ये वाद, प्रवाशाचा कर्मचाऱ्यांवर हल्ला, कार्यालयाचीही तोडफोड!
6
"मोदी, योगी आणि मोहन भागवतांवर आरोप कर, नाहीतर…’’, प्रज्ञा सिंह यांचा ATS वर गंभीर आरोप
7
रिलेशनमध्ये असतानाही ५० टक्के महिला ठेवतात बॅकअप पार्टनर, सर्वेतून धक्कादायक माहिती समोर
8
बेकरीत काम करणाऱ्या २५ वर्षीय तरुणाची आत्महत्या, ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
9
आम्ही पुन्हा प्रयत्न करतोय...; सायना नेहवालचे Ex-पती पारूपल्ली कश्यपची 'पॅच-अप'; २० दिवसांत 'यू-टर्न'
10
VIDEO : एकदम कडक! ओव्हलच्या स्टेडियमवर दिसली हिटमॅन रोहितची झलक; अन्...
11
Amravati: अमरावतीत जागेच्या वादावरून महिला सरपंच अन् सदस्यांमध्ये फ्रीस्टाईल हाणामारी!
12
धनश्री वर्माशी शेवटचं बोलणं केव्हा झालं? क्रिकेटर युजवेंद्र चहलने सांगितला 'त्या' वेळचा किस्सा
13
माजी पंतप्रधानांचा नातू प्रज्वल रेवण्णाला जन्मठेपेची शिक्षा; मोलकरणीवर अत्याचार केल्याप्रकरणी दोषी
14
२० हजारांपेक्षा कमी किंमतीत वनप्लस, सॅमसंग आणि आक्यूओओचे 5G फोन!
15
Yashasvi Jaiswal Century : यशस्वी 'सेंच्युरी रोमान्स' अगेन्स इंग्लंड! जशी सुरुवात तसाच शेवट
16
"आम्ही स्वतः कारवाई केली नाही, माधुरीच्या भविष्यासाठी..."; वाढत्या विरोधानंतर वनताराकडून स्पष्टीकरण
17
"ती माझी चूकच..."; युजवेंद्र चहलने दिली प्रामाणिक कबुली, सांगितलं धनश्रीशी नातं तुटण्याचं कारण
18
 Crime: दोस्त दोस्त ना रहा! दारुसाठी मित्राच्या डोक्यात चाकू खुपसला, जालन्यातील घटना
19
Mumbai: आयआयटी मुंबई कॅम्पसमध्ये विद्यार्थ्याचा मृतदेह आढळल्याने खळबळ, पोलीस तपास सुरू!
20
Mumbai: मुंबईतील चारकोपच्या राजाचे १७७ दिवसांनी विसर्जन; ढोल-ताशांच्या गजरात बाप्पाला निरोप!

तेरणीच्या शाळेत विद्यार्थ्यांशी जमिनी बोलतात

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

मनोहर कोरवींचे प्रयत्न : महाराष्ट्रातील कन्नड भाषिक गावातील मुलांना लावली मराठीची गोडी

एम. ए. शिंदे -- हलकर्णी --तेरणी हे गडहिंग्लज तालुक्यातील कन्नड भाषिक गाव. इथे घरी आणि समाजात विद्यार्थ्यांच्या कानी पडतात ते कन्नड शब्दच. मात्र, येथील मराठी शाळेतील शिक्षकांनी शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनात मराठीची गोडी निर्माण केली आहे. या शाळेत ई-लर्निंग आणि बोलक्या जमिनी आहेत. शिक्षक चांगल्यासाठी धडपडणारे असले की, शाळेचा चेहरा मोहरा बदलून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होतो याचे तेरणी मराठी शाळा हे एक उत्तम उदाहरण आहे.ह्या शाळेतील कवीचे मन आणि चित्रकाराची बोटे असलेले सहायक शिक्षक मनोहर कोरवी यांनी पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये ज्ञानरचनावादावर आधारित बोलक्या जमिनी तयार केल्या आहेत. सर्व आकृत्या, दर्शक तक्ते, आॅईल पेंटमध्ये जमिनीवर तयार केल्या आहेत. त्यातून विद्यार्थी स्वत: ज्ञानार्जन करू शकतो. पहिलीच्या वर्गात काना, मात्रा, वेलांटी याचे ज्ञान देणारे बाराखडी चक्र, बेरीज-वजाबाकी, पुढील, मागील संख्या ओळखणे, सामान्य विज्ञान चक्र, अक्षरापासून शब्द निर्मिती, मुक्तछंद कलाकृती, वारचक्र, अंकी अक्षरी संख्या लेखन असे, इयत्तानिहाय अभ्यासक्रम चित्रित केले आहेत.शाळा समाजाभिमुख बनविल्यामुळे लोकवर्गणी आणि मुंबईकर मंडळी यांच्या प्रयत्नाने एक लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव झाला. त्यातून ई-लर्निंगची योजना राबविली. संगीत साहित्य आणि प्रिंटरची सुविधा उपलब्ध केली. प्रत्येक वर्गाला अर्धा तास ई-लर्निंगद्वारे अद्यापन केले जात आहे.शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची तयारी करवून घेतली जाते. सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धेत शाळेला यश मिळाले आहे. सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजनेमध्ये शाळेने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत.बसवेश्वर दूध संस्थेने संगणक दिला असून, स्पर्धेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च ही संस्था करते. संगमेश्वर विकास सेवा सोसायटीच्या बचत गटातर्फे दिला जाणारा पोषण आहार उत्कृष्ट असून, शासनाच्या निकषांनुसार सर्व मेनू दिले जातात.माजी उपसभापती अरुणराव देसाई हे मुलांना क्रीडा स्पर्धेच्यावेळी सेंद्रिय गूळ खायला देतात. हे येथील वैशिष्ट्य आहे. अनेक शाळांची पटसंख्या ढासळत असताना येथे पहिली ते सातवीच्या वर्गात ३२५ विद्यार्थी आहेत. १२ शिक्षक कार्यरत आहेत. सेवानिवृत्तीच्या अंतिम पर्वामध्ये असलेले मुख्याध्यापक दत्तात्रय दोरुगडे यांनी सहकारी शिक्षक, ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेचा साधलेला विकास कौतुकास्पद आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षणप्रत्येक इयत्तानिहाय चित्रित अभ्यासक्रमामुळे आकलन सोपेबाराखडी चक्र, वारचक्र, अंकी, अक्षरी संख्या लेखन, मुक्तछंद कलाकृती यामुळे आनंददायी शिक्षणप्रत्येक वर्गाला अर्धा तास ई-लर्निंगद्वारे अध्यापन