शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

तेरणीच्या शाळेत विद्यार्थ्यांशी जमिनी बोलतात

By admin | Updated: January 2, 2016 08:28 IST

मनोहर कोरवींचे प्रयत्न : महाराष्ट्रातील कन्नड भाषिक गावातील मुलांना लावली मराठीची गोडी

एम. ए. शिंदे -- हलकर्णी --तेरणी हे गडहिंग्लज तालुक्यातील कन्नड भाषिक गाव. इथे घरी आणि समाजात विद्यार्थ्यांच्या कानी पडतात ते कन्नड शब्दच. मात्र, येथील मराठी शाळेतील शिक्षकांनी शाळेत विविध उपक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या मनात मराठीची गोडी निर्माण केली आहे. या शाळेत ई-लर्निंग आणि बोलक्या जमिनी आहेत. शिक्षक चांगल्यासाठी धडपडणारे असले की, शाळेचा चेहरा मोहरा बदलून विद्यार्थ्यांचा सर्वांगीण विकास कसा होतो याचे तेरणी मराठी शाळा हे एक उत्तम उदाहरण आहे.ह्या शाळेतील कवीचे मन आणि चित्रकाराची बोटे असलेले सहायक शिक्षक मनोहर कोरवी यांनी पहिली ते चौथीच्या वर्गांमध्ये ज्ञानरचनावादावर आधारित बोलक्या जमिनी तयार केल्या आहेत. सर्व आकृत्या, दर्शक तक्ते, आॅईल पेंटमध्ये जमिनीवर तयार केल्या आहेत. त्यातून विद्यार्थी स्वत: ज्ञानार्जन करू शकतो. पहिलीच्या वर्गात काना, मात्रा, वेलांटी याचे ज्ञान देणारे बाराखडी चक्र, बेरीज-वजाबाकी, पुढील, मागील संख्या ओळखणे, सामान्य विज्ञान चक्र, अक्षरापासून शब्द निर्मिती, मुक्तछंद कलाकृती, वारचक्र, अंकी अक्षरी संख्या लेखन असे, इयत्तानिहाय अभ्यासक्रम चित्रित केले आहेत.शाळा समाजाभिमुख बनविल्यामुळे लोकवर्गणी आणि मुंबईकर मंडळी यांच्या प्रयत्नाने एक लाखाहून अधिक शैक्षणिक उठाव झाला. त्यातून ई-लर्निंगची योजना राबविली. संगीत साहित्य आणि प्रिंटरची सुविधा उपलब्ध केली. प्रत्येक वर्गाला अर्धा तास ई-लर्निंगद्वारे अद्यापन केले जात आहे.शिष्यवृत्तीसाठी विद्यार्थ्यांची तयारी करवून घेतली जाते. सांस्कृतिक, क्रीडा स्पर्धेत शाळेला यश मिळाले आहे. सावित्रीबाई फुले दत्तक-पालक योजनेमध्ये शाळेने दोन मुली दत्तक घेतल्या आहेत.बसवेश्वर दूध संस्थेने संगणक दिला असून, स्पर्धेला जाणाऱ्या विद्यार्थ्यांचा प्रवास खर्च ही संस्था करते. संगमेश्वर विकास सेवा सोसायटीच्या बचत गटातर्फे दिला जाणारा पोषण आहार उत्कृष्ट असून, शासनाच्या निकषांनुसार सर्व मेनू दिले जातात.माजी उपसभापती अरुणराव देसाई हे मुलांना क्रीडा स्पर्धेच्यावेळी सेंद्रिय गूळ खायला देतात. हे येथील वैशिष्ट्य आहे. अनेक शाळांची पटसंख्या ढासळत असताना येथे पहिली ते सातवीच्या वर्गात ३२५ विद्यार्थी आहेत. १२ शिक्षक कार्यरत आहेत. सेवानिवृत्तीच्या अंतिम पर्वामध्ये असलेले मुख्याध्यापक दत्तात्रय दोरुगडे यांनी सहकारी शिक्षक, ग्रामस्थांच्या सहकार्याने शाळेचा साधलेला विकास कौतुकास्पद आहे. पहिली ते चौथीपर्यंतच्या वर्गात ज्ञानरचनावादावर आधारित शिक्षणप्रत्येक इयत्तानिहाय चित्रित अभ्यासक्रमामुळे आकलन सोपेबाराखडी चक्र, वारचक्र, अंकी, अक्षरी संख्या लेखन, मुक्तछंद कलाकृती यामुळे आनंददायी शिक्षणप्रत्येक वर्गाला अर्धा तास ई-लर्निंगद्वारे अध्यापन