शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-पाकिस्तान युद्धाच्या तोंडावर आयएमएफ देणार १ अब्ज डॉलर; पाकिस्तानच्या बेलआऊट पॅकेजला मंजुरी
2
रात्र वैऱ्याची! दोन्ही देश रात्रीचेच हल्ले का करत आहेत? मागे कारण काय... अंधार पडला की...
3
Operation Sindoor Live Updates: पाकिस्तानच्या ड्रोन हल्ल्यांनंतर भारतीय सैन्य अॅक्टीव्ह, जम्मू सेक्टरमध्ये जोरदार प्रत्युत्तराला सुरुवात
4
Pakistan Drone Attack: बारामुल्लापासून भूजपर्यंत पाकिस्तानकडून २६ ठिकाणी ड्रोन हल्ल्याचा प्रयत्न, भारतीय सुरक्षा यंत्रणांनी उधळले मनसुबे 
5
पंतप्रधान नरेंद्र मोदींची सैन्य प्रमुखांसह अजित डोवाल यांच्यासोबत बैठक, परिस्थितीचा घेतला आढावा, पुढचा प्लॅन तयार?  
6
Video: 'नीच' पाकिस्तानचे भारतीय नागरिकांवर ड्रोन हल्ले; फिरोजपूरमध्ये संपूर्ण कुटुंब जखमी
7
India Pakistan Tension: जम्मू, सांबा, पठाणकोट विभागात दिसले पाकिस्तानी ड्रोन, जम्मू, उधमपूरमध्ये ब्लॅकआऊट 
8
गरज पडली तर युद्धात मदरशातील मुलांचा वापर करू, पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचे हास्यास्पद विधान
9
हे आहेत तुर्कीचे ड्रोन, ज्यांना पाकिस्तानने विध्वंस घडवण्यासाठी पाठवले होते भारतात, अशी आहेत वैशिष्टे
10
भारत-पाकिस्तान यांच्यातील तणावामुळं दादर चौपाटी पर्यटकांसाठी बंद? मुंबई पोलिसांची महत्त्वाची पोस्ट
11
धोनी, तेंडुलकरही पाकिस्तानविरूद्ध युद्धभूमीत दिसणार? तणावादरम्यान भारत सरकारचा मोठा निर्णय
12
युद्धसदृश परिस्थिती, आयपीएलला स्थगिती, जय हिंद म्हणत विराट कोहलीने व्यक्त केल्या भावना
13
Mumbai: ६३ टक्क्यांहून अधिक मुंबईकर सहा तासांपेक्षा कमी झोपतात, कारण तर ऐका!
14
निशस्त्र ड्रोन पाठवण्यामागे पाकिस्तानचा होता मोठा कट, परराष्ट्र मंत्रालयाने दिली धक्कादायक माहिती
15
"भारतीय सैन्याचा जोश... High! पाकिस्तानला तोडीस तोड उत्तर मिळेल"; उरी भेटीनंतर LGचे विधान
16
India Pakistan Tensions: बिथरलेल्या पाकिस्तानकडून नागरी विमानांचा ढाल म्हणून वापर, परराष्ट्र मंत्रालयाची माहिती
17
"धार्मिक स्थळांवर हल्ले...दुटप्पीपणा...त्यांनी खालची पातळी गाठली"; परराष्ट्र सचिवांनी वाचला पाकिस्तानच्या कुकर्मांचा पाढा
18
तुर्कीत निर्मिती झालेल्या ३०० ते ४०० ड्रोनद्वारे पाकिस्तानचा भारतातील ३६ ठिकाणी हल्ला, कर्नल सोफिया कुरेशी यांनी दिली माहिती 
19
"पाकिस्तानला अक्कल असेल तर बंदुका शांत ठेवाव्यात, नाहीतर..."; CM ओमर अब्दुल्ला यांचा थेट इशारा
20
बीकेसी ते वरळी फक्त १५ मिनिटांत! मेट्रो-३ चा दुसरा टप्पा सुरु, CM फडणवीसांच्या हस्ते उदघाटन

पशुखाद्य, दुधाच्या अटीने अनेकांच्या दांड्या गुल होणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2021 04:23 IST

लोकमत न्यूज नेेटवर्क कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या २१ जागांसाठी तब्बल ४८२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या ...

लोकमत न्यूज नेेटवर्क

कोल्हापूर : ‘गोकुळ’ दूध संघाच्या २१ जागांसाठी तब्बल ४८२ जणांनी उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत. या अर्जांची सोमवारी (दि. ५) छाननी होणार असून, दहा टन पशुखाद्य व वर्षाला ४० हजार लिटर दूध पुरवठा या अटीने राखीव गटातील अनेकांच्या दांड्या गुल होणार आहेत. २० एप्रिलपर्यंत माघारीची मुदत असून, २ मे रोजी मतदान होणार आहे.

‘गोकुळ’साठी दाखल झालेल्या अर्जांची सोमवारी सकाळी अकरा ते संपेपर्यंत छाननीची प्रक्रिया सुरू राहणार आहे. उमेदवारी अर्ज दाखल करतानाच संबंधित इच्छुकाला छाननीबाबतची नोटीस लागू केली आहे. एकाच इच्छुकांनी तीन-चार अर्ज दाखल केले आहेत. ते सगळे एकत्र करून त्यांची छाननी केली जाणार आहे. अर्ज सोपा असल्याने त्यामध्ये फार कमी जणांच्या चुका असणार आहेत. छाननीमध्ये बहुतांशी जणांना दहा टन पशुखाद्य व ४० हजार लिटर दूध पुरवठ्याची अट अडचणीची ठरणार आहे. राखीव गटातील अनेकांच्या दांड्या उडण्याची शक्यता आहे. अनुसूचित जाती, इतर मागासवर्गीय व भटक्या विमुक्त जाती, जमाती गटातील उमेदवारांना जातीचा दाखला पुरेसा आहे. त्याबाबत पडताळणीचे बंधन नाही.

उमेदवार किंवा सुचकालाच प्रवेश

छाननीच्या ठिकाणी गर्दी होऊ नये, म्हणून निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांनी काही निर्बंध घातले आहेत. छाननीवेळी संबंधित उमेदवार किंवा सुचकालाच प्रवेश दिला जाणार आहे. ज्यांना वकिलांच्या मार्फत बाजू मांडायची आहे, त्यांना सोबत आणण्याची परवानगी दिल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी वैभव नावडकर यांनी दिली.

छाननीमध्ये याची लागणार चाळण

पंच कमिटीने आपल्या प्रतिनिधीला संघाच्या संचालक मंडळाची निवडणूक लढविण्याबाबत अधिकार दिल्याचा ठराव.

ज्या संस्थेचा ठराव आहे, त्या संस्थेच्या पंच कमिटीत असणे बंधनकारक आहे.

प्रतिनिधित्व करणाऱ्या संस्थेने संघाच्या लगतच्या ३१ मार्चला सभासद होऊन तीन वर्षे पूर्ण केली असली पाहिजेत.

संघास वर्षातील २४० दिवस व ४० हजार लिटर दूध पुरवठा केला पाहिजे.

संबंधित संस्था ऑडिट झालेल्या शेवटच्या वर्षी ‘अ’ अथवा ‘ब’ वर्ग गरजेचा.

संघाचे कोणत्याही प्रकारचे देणे थकीत नसावे.

संलग्न संस्थेने सलग तीन वर्षे प्रत्येक वर्षी दहा टन पशुखाद्य संघाकडून घेतले पाहिजे.