शहरं
Join us  
Trending Stories
1
'हम दो हमारे तीन', प्रत्येक कुटुंबात तीन मुले असावीत': आरएसएस प्रमुख मोहन भागवत
2
संगमनेरचे आमदार अमोल खाताळ यांच्यावर हल्ला, सुरक्षारक्षकांनी हल्लेखोर तरुणाला घेतले ताब्यात
3
डॉन ‘डॅडी’ला जामीन मंजूर, पण शुक्रवारी सुटकेची शक्यता कमीच
4
ना बनवणार, ना विकणार! 'या' ८ जिल्ह्यांमध्ये फटाक्यांवर बंदी; नियमांचे पालन न केल्यास ५ वर्षांचा तुरुंगवास
5
भाजप आणि RSS मध्ये कुठलाही वाद नाही; संघप्रमुख मोहन भागवतांची स्पष्टोक्ती
6
कोल्हापुरातील शेतकऱ्यांना शक्तिपीठ महामार्गाबाबत दिलासा? राज्य सरकारने दिले आदेश; वाचा सविस्तर
7
नाशिकच्या देवळाली कॅम्पजवळ सैनिकाचे हँग ग्लायडर एका घरावर कोसळले; सरावादरम्यान दुर्घटना
8
नागपूर महामेट्रोच्या वित्त संचालकांना सायबर गुन्हेगारांकडून गंडा, गुगलवर बँकेचा नंबर शोधणे पडले महागात
9
Vidarbha Rain Alert: विदर्भातील 'या' जिल्ह्यांमध्ये पावसाचा जोर वाढणार, IMD ने दिला सतर्कतेचा इशारा
10
अथर्व सुदामेनंतर आता डॅनी पंडितने शेअर केलेल्या रीलची चर्चा, दिला हिंदू-मुस्लीम ऐक्याचा संदेश
11
‘पोक्सो’ प्रकरणात आरोपी कुकला २० वर्षे सक्तमजुरी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायालयाचा निकाल
12
विश्वासघातकी पक्षांनी 'समृद्ध उत्तर प्रदेश' ही ओळखच मिटवली; CM आदित्यनाथ यांचा सपा, काँग्रेसवर हल्ला
13
Video: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे राज ठाकरेंच्या 'शिवतीर्थ'वर दाखल; गणपती बाप्पाचं घेतलं दर्शन
14
जगभरात सर्वात वेगवान इंटरनेट असणारे १० देश; भारत कितव्या स्थानावर, जाणून घ्या
15
भयावह! हुंड्यासाठी जाळून मारणाऱ्या निक्कीच्या वडिलांनाही पैशांची हाव; सुनेचा गंभीर आरोप
16
पवनारातून होणार शक्तिपीठ महामार्गाची पायाभरणी, शासनाचा आदेश निघाला!
17
वीज कोसळून २९ शेळ्यांचा जागीच मृत्यू, रखवालदार बचावले; जैतापूर गावातील घटनेने खळबळ
18
तब्बल ७०० किलोमीटर दूर गर्लफ्रेंडला भेटायला गेला, पण तिने बॉयफ्रेंडसोबत जे केलं ते ऐकून बसेल धक्का!
19
जपानमध्ये स्मार्टफोनवर निर्बंध! मोबाईल दिवसातून फक्त २ तास वापरू शकता, नियम काय आहेत?
20
हायवाच्या धडकेत रिक्षाचा चक्काचूर, सहा जण जागीच ठार; गावावर कोसळला दुःखाचा डोंगर

इचलकरंजीतील चौकात हजारो युवक जमल्याने तणाव

By admin | Updated: May 6, 2016 01:06 IST

अफवेचा परिणाम : शॉपिंग सेंटर, लक्ष्मी मार्केट परिसरातील दुकाने बंद; आमदार हाळवणकर तसेच पोलिसांच्या आवाहनानंतर वातावरण निवळले

इचलकरंजी : आगामी शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांनी गुरुवारी सकाळपासून जवाहरनगरमधून संचलनास सुरुवात केली. त्यामुळे शहरात विविध ठिकाणी लावलेले डिजिटल फलक पोलिसांकडून हटविले जाणार असल्याची अफवा पसरल्याने जनता चौकामध्ये शेकडो युवक जमा झाले. जमाव अचानकपणे जमू लागल्यामुळे शॉपिंग सेंटर, शिवाजी उद्यान, लक्ष्मी मार्केट, मराठा मंडळ परिसरातील दुकाने बंद झाली. मात्र, आमदार सुरेश हाळवणकर व पोलिसांनी तेथे येऊन पोलिसांकडून फलक हटविले जाणार नसल्याचे स्पष्ट केल्याने तणाव निवळला.शहर व परिसरामध्ये रविवारी (दि. ८) होणाऱ्या शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर हजारोंच्या संख्येने डिजिटल फलक उभारले आहेत. काही डिजिटल फलकांवर आक्षेपार्ह मजकूर असल्याच्या आणि गुन्हेगारी क्षेत्राशी संबंधित असलेल्या व्यक्तींची छायाचित्रे झळकत असल्याच्या तक्रारी होत्या. त्याचबरोबर वाहतुकीस अडथळा होईल, अशा रीतीने, तसेच दुकाने झाकोळली जातील अशा प्रकारे फलक उभारल्याने दुकानदार-व्यावसायिक त्रस्त झाले होते. दरम्यान, बुधवारी रात्री उशिरापर्यंत जिल्हा पोलिस अधीक्षक प्रदीप देशपांडे यांच्या अध्यक्षतेखाली अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक, जिल्हा पोलिस उपअधीक्षक, पोलिस निरीक्षक यांच्यासह मुख्याधिकारी डॉ. प्रशांत रसाळ, अतिरिक्त मुख्याधिकारी प्रज्ञा पोतदार, आदींची बैठक झाली. सुमारे दोन तास झालेल्या बैठकीतील तपशील बाहेर समजू शकला नाही. मंगळवारी रात्री नगरपालिकेमध्ये झालेल्या पदाधिकारी, प्रशासन व पोलिस यांच्या बैठकीमध्ये १५ मे नंतर मंडळांना व संबंधित व्यक्तींना फलक हटविण्याचे आवाहन करण्याचे ठरले.शहरातील काही डिजिटल फलक उतरून घेण्यात आल्याचे वृत्त शहरभर पसरले असतानाच गुरुवारी सकाळपासून पोलिसांनी अतिरिक्त जिल्हा पोलिस अधीक्षक एस. चैतन्य, पोलिस उपअधीक्षक विनायक नरळे यांच्या नेतृत्वाखाली जवाहरनगरमधून संचलन केले. त्यात दंगल नियंत्रण कृती दलाच्या पथकानेही भाग घेतला. संचलन सुरू असतानाच विविध ठिकाणचे डिजिटल फलक पोलिस यंत्रणेकडून हटविणार असल्याचे मेसेज मोबाईलवरून फिरू लागल्यामुळे युवक चौकात जमू लागले. ही संख्या हजारोंच्या घरात गेल्याने तणाव निर्माण झाला. परिसरामधील सर्व दुकाने बंद झाली. बॅँकांनीही शटर खाली ओढले. ही माहिती मिळताच पोलिसांनी तेथे धाव घेत स्पिकरवरून जमावाला शांत राहण्यास सांगितले.