शहरं
Join us  
Trending Stories
1
बांगलादेशातील हिंदू तरुणाच्या हत्येप्रकरणी मोठा खुलासा; ईशनिंदेचा आरोप खोटा, 'हे' होते कारण
2
महाराष्ट्रापाठोपाठ गोव्यातील निवडणुकीतही भाजपाची मुसंडी, काँग्रेसची पीछेहाट, आपचा धुव्वा
3
IPL 2026: Axar Patel ला धक्का! कर्णधारपदावरून हटवलं, आता 'हा' Delhi Capitals चा 'कॅप्टन'
4
"पालिका निवडणुकांमध्येही देवेंद्र फडणवीसच ‘धुरंधर’; उद्धव ठाकरे 'रेहमान डकैत"; भाजपाची टीका
5
झाडू मारण्यासाठी सॉफ्टवेअर इंजिनिअरने सोडली हाय-फाय नोकरी; आता महिन्याला १.१ लाख पगार
6
हाण की बडीव! रुग्णालयात डॉक्टर-रुग्ण भिडले, एकमेकांच्या जीवावर उठले; लाथाबुक्क्यांनी मारहाण
7
VIDEO: तुर्की संसदेत जोरदार राडा ! आधी खासदारांमध्ये बाचाबाची अन् लाथाबुक्क्यांनी हाणामारी
8
नगरपरिषद निवडणुकीतील यश भाजपाचंच की 'इनकमिंग'चं?; सुप्रिया सुळेंनी मांडला 'हिशेब'
9
मंत्रिपदाचा आणि जिंकण्याचा संबंध नाही, आत्मचिंतनाची गरज; बावनकुळेंचा मुनगंटीवारांवर निशाणा?
10
"ज्यांच्याकडे मुख्यमंत्रिपद तेही कायम नाही, मी योग्य क्षणी..."; सुधीर मुनगंटीवारांनी थेटच सांगितले
11
"…तर तुला कोणीच संघाबाहेर काढू शकणार नाही!" १९८३ च्या वर्ल्ड चॅम्पियनकडून संजू सॅमसनला सल्ला
12
बाजारात जोरदार उसळी! गुंतवणूकदारांनी कमावले ३.५ लाख कोटी रुपये; 'ही' ६ कारणे ठरली गेमचेंजर
13
सात दिवसांत खचला नवा रस्ता, आठ फूट खोल खड्ड्यात अडकला टँकर, महिला जखमी   
14
‘पैशांपेक्षा जनतेचा विश्वास आणि सत्तेपेक्षा विचारधारा महत्त्वाची हे मतदारांनी दाखवून दिले’, हर्षवर्धन सपकाळ यांचं विधान
15
ख्रिसमस धमाका! अवघ्या १ रुपयात महिनाभर 'अनलिमिटेड' कॉलिंग आणि डेटा; BSNL ची खास ऑफर
16
Astro Tips: आंघोळीच्या पाण्यात १ वेलची टाकल्याने होणारे लाभ वाचून चकित व्हाल!
17
Jara Hatke: कचरा फेकू नका, विकून पैसे मिळवा! 'या' ॲपची देशभर चर्चा; नेमका प्रकार काय?
18
४ दिवसांपासून सातत्यानं 'या' शेअरला अपर सर्किट; ७४% नं वाढला स्टॉक, तुमच्याकडे आहे का?
19
मस्तच! हात लावताच समजणार संत्र गोड की आंबट? आई-आजीलाही माहीत नसेल ही सुपर ट्रिक
20
Flashback 2025: वर्षभरात ८ लढती! टीम इंडियाचा 'षटकार' अन् पाकिस्तानला 'ट्रॉफी चोर'चा टॅग
Daily Top 2Weekly Top 5

कर्जमाफी कामाचा लेखापरीक्षकांवर ताण-- एक लाख याद्या तपासल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2017 01:07 IST

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील शेतकºयांच्या याद्या तपासण्याच्या कामाचा जिल्ह्यातील लेखापरीक्षकांवर मोठा ताण आहे. यापूर्वीची कर्जमाफी वादग्रस्त बनली होती. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. त्यामुळे यावेळेला लेखापरीक्षकांना डोळ््यात तेल घालून हे काम करावे लागत आहे. त्यासाठी पुरेसा अवधीही दिलेला नाही आणि अधिकाºयांकडून मात्र वाढता दबाव असल्याने ...

ठळक मुद्दे: अधिकाºयांकडून दबाव

लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : शासनाने जाहीर केलेल्या कर्जमाफी योजनेतील शेतकºयांच्या याद्या तपासण्याच्या कामाचा जिल्ह्यातील लेखापरीक्षकांवर मोठा ताण आहे. यापूर्वीची कर्जमाफी वादग्रस्त बनली होती. ते प्रकरण सर्वोच्च न्यायालयापर्यंत गेले. त्यामुळे यावेळेला लेखापरीक्षकांना डोळ््यात तेल घालून हे काम करावे लागत आहे. त्यासाठी पुरेसा अवधीही दिलेला नाही आणि अधिकाºयांकडून मात्र वाढता दबाव असल्याने लेखापरीक्षक त्रस्त झाले आहेत.जिल्ह्यात या योजनेचे २ लाख ४७ हजार लाभार्थी आहेत.

त्यापैकी गेल्या ११ दिवसांत १ लाख ६ हजार लाभार्थ्यांच्या याद्या तपासून पूर्ण झाल्या आहेत. जिल्ह्यात ८३ लेखापरीक्षक आहेत. गेल्या पंधरवड्यात रजा, सुट्या रद्द करून सगळी यंत्रणा या कामात व्यस्त आहे. योजनेची घोषणा २४ जून २०१७ च्या मंत्रिमंडळ बैठकीत करण्यात आली. त्यानंतर २८ जूनला पहिला शासन आदेश निघाला. त्याची पुढे ५ जुलै व २० जुलैला शुद्धिपत्रके काढण्यात आली. ८ सप्टेंबरला अंतिम शासन आदेश निघाला. पुन्हा ११ सप्टेंबरला मार्गदर्शक सूचना काढण्यात आल्या. १३ सप्टेंबरला जिल्हा उपनिबंधकांनी याद्यांची तपासणी करण्याचे आदेश काढले. १८ ते २० सप्टेंबरला तीन दिवस तालुक्यात जाऊन सचिवांच्या बैठका घेण्यात आल्या व त्यांना माहिती कशी हवी याची माहिती दिली गेली.

जिल्हा बँकेने हंगामनिहाय माहिती भरून घेतली, परंतु ती चुकीचे असल्याचे नंतर सांगण्यात आले. यामध्ये काही कालावधी गेला. त्यानंतर २५ सप्टेंबरला जिल्हा उपनिबंधकांनी लेखापरीक्षकांची बैठक घेऊन पडताळणीबाबत सूचना केल्या. २६ सप्टेंबरपासून लगेच हे काम सुरू झाले. शेतकºयांना या कर्जमाफीचा तत्परतेने लाभ मिळावा यासाठी लवकर याद्या तपासून देणे आवश्यक आहे व तशीच लेखापरीक्षकांचीही धडपड आहे, परंतु वारंवार बदलणारे आदेश व अधिकाºयांचा तगादा यामुळे ते हैराण झाले आहेत. जोखमीचे काम असल्याने ते अधिक जबाबदारीने पार पाडावे लागत आहे.पात्र-अपात्र ठरविण्यासाठी समितीकर्जयोजनेस पात्र-अपात्र कोण ठरले याचा निर्णय घेण्याचे अधिकार लेखापरीक्षकांना नाहीत. हे काम तहसीलदारांच्या अध्यक्षतेखालील समिती करणार आहे. या समितीत जिल्हा बँकेचा विभागीय अधिकारी, तालुका लेखापरीक्षक यांचा समावेश आहे. सहायक निबंधक हे सचिव आहेत. लेखापरीक्षकांनी याद्या तपासून त्या जिल्हा बँक निरीक्षकाकडे द्यायच्या आहेत. ते शासनाच्या वेबसाईटवर ही माहिती लोड करणार आहेत. त्यामुळे कुणाला किती कर्जमाफी मिळाली हे सर्वांनाच समजणार आहे.याची पडताळणीकर्जमाफी योजनेच्या फॉर्ममध्ये १ ते ६६ कॉलम आहेत. त्यामध्ये कर्जदारास दिलेलेकर्ज, वाटप तारीख, वसूल, व्याज, थकबाकी असेल तर त्याची पडताळणी बारकाईने करावी लागत आहे. एक फॉर्म तपासायला किमान२० मिनिटांचा अवधी लागतो.