शहरं
Join us  
Trending Stories
1
8 कोटी, १२ पानांची चिठ्ठी आणि स्वतःवरच झाडली गोळी; Ex IPS अमर सिंग चहल यांची प्रकृती गंभीर, असा निर्णय का घेतला?
2
"मनसेचे जे काही नगरसेवक निवडून येतील, तेदेखील पळवतील", भाजपचा राज ठाकरेंना सावधगिरीचा सल्ला
3
गॅल्व्हेस्टनजवळ मेक्सिकन नौदलाच्या विमानाचा भीषण अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
विदर्भात भाजपची हुरडा पार्टी; मुनगंटीवार यांनी शाब्दिक हल्ला चढवल्याने सुरू झाला नवा वाद
5
बांगलादेशात युनूस सरकार उलथवून टाकण्याची तयारी सुरू! उस्मान हादीच्या संघटनेने दिला मोठा इशारा
6
एपस्टीन फाइल्सवरून जनतेचा रोष वाढला, ट्रम्प प्रशासनाने कोणते फोटो प्रसिद्ध केले आणि कोणते लपवून ठेवले?
7
मुंबईचा ‘ब्रेन’, पुण्याचे ‘मार्केट’ अन् सातारा-सांगलीतले ‘अड्डे’
8
Today's Horoscope: आजचे राशीभविष्य, २३ डिसेंबर २०२५: विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील, मितभाषी राहून मतभेद दूर करू शकाल
9
बांगलादेशात आणखी एका नेत्याची निर्घृण हत्या; आसाममध्ये हाय अलर्ट, सीमेवर अधिक दक्षता
10
संपादकीय: एप्स्टीन फाइल्स, भारत अन् न झालेला राजकीय भूकंप!
11
कोकाटे यांची आमदारकी तूर्त वाचली; सर्वोच्च न्यायालयाकडून २ वर्षांच्या शिक्षेला स्थगिती 
12
पार्थ पवार यांच्या अमेडिया कंपनीला आणखी एक झटका; मुद्रांक शुल्क सवलतीचे इरादा पत्र अखेर केले रद्द 
13
पालिकेसाठी ठाकरे बंधूंमधील युतीची आज घोषणा? काही जागांबद्दल एकमत होत नव्हते...
14
गांधी-नेहरूंच्या डोक्यावर खापर फोडून काय होणार?
15
आता मिशन महापालिका मैदान तयार : आजपासून अर्ज भरण्यास सुरुवात; इच्छुकांची मोर्चेबांधणी 
16
केंद्राच्या योजनांतून महाराष्ट्राला १.४७ लाख कोटी; उत्तर प्रदेश व दिल्लीपाठोपाठ राज्याचा तिसरा क्रमांक
17
वायुप्रदूषण नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई का नाही? पालिका आयुक्त, एमपीसीबी अधिकाऱ्यांना हायकोर्टात हजर हाेण्याचे निर्देश
18
‘त्या’ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या लगेच करण्याचे आदेश; राज्य निवडणूक आयोग दोन दिवसांत घेणार आढावा
19
विश्वचषक गमावल्यानंतर निवृत्तीचा विचार होता : रोहित; असे वाटले की, या खेळाने माझ्याकडून सर्वकाही हिरावून घेतले आहे
20
 आणखी किती हिंमत हवी...! पुतीनसमोर पत्रकारानं मैत्रिणीला केलं प्रपोज अन्..
Daily Top 2Weekly Top 5

मेघोली तलाव पुनर्बांधणीची जानेवारीपर्यंत निविदा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 18, 2021 04:25 IST

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. धरण कशाने फुटले याचा ...

कोल्हापूर : भुदरगड तालुक्यातील मेघोली तलाव फुटल्याने नुकसान झालेल्यांना भरपाई देण्यासंबंधीचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. धरण कशाने फुटले याचा अभ्यास पाटबंधारे विभागातील तज्ज्ञाची समिती करीत आहे. त्यांचा निष्कर्ष येण्यास दोन ते तीन महिने लागतील. तोपर्यंत तलावाची पुनर्बांधणी करण्यासाठीची जानेवारीपर्यंत निविदा निघेल, असे आश्वासन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी शुक्रवारी दिले.

स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे माजी खासदार राजू शेट्टी यांच्या नेतृत्वाखाली नुकसानग्रस्त शेतकऱ्याचे शिष्टमंडळ जिल्हाधिकारी रेखावार यांची भेट घेतली.

भेटीवेळी झालेल्या चर्चेत जिल्हाधिकारी रेखावार बोलत होते. ते म्हणाले, मेघोली तलाव फुटल्याने अनेक शेतकऱ्यांचे नुकसान झाले आहे. मी स्वत: जाऊन पाहणी करून नुकसानभरपाईचा प्रस्ताव सरकारकडे पाठवला आहे. महात्मा गांधी रोजगार हमी योजनेतून वाहून गेलेल्या विहिरीची खोदाई करता येईल. यासाठी प्रशासन मदत करेल. नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पीक कर्ज भरण्यास मुदत दिली जाईल.

माजी खासदार राजू शेट्टी म्हणाले, तलाव फुटण्यास कोण जबाबदार याची चौकशी झाली पाहिजे, दोषींवर जबाबदारी निश्चित करावी. तलावफुटीमुळे नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना तातडीने मदत करण्यासाठी प्रशासनाने पुढाकार घ्यावा. शिवाय सरकारकडून त्यांना भरीव मदत मिळायला हवी. तलावाची पुनर्बांधणीसाठी पाठपुरावा करावा.

या वेळी स्वाभिमानीचे प्रदेशाध्यक्ष जालंदर पाटील, अतुल गुरव, कुंडलिक देसाई, शिवाजी पाटील, शिवाजी देसाई आदी उपस्थित होते.

चौकट

तलाव दिवसा फुटला असता तर

मेघोली तलावाच्या खालील बाजूस शेतीच्या मशागतीसाठी अनेक शेतकरी असत. दिवसा तलाव फुटला असता तर मशागतीचे काम करणारे शेतकरी, मजूर असे शंभरावर लोक वाहून गेले असते. पाटबंधारे विभागाने गळतीकडे दुर्लक्ष केल्याने दुर्घटना झाल्याचेही शिष्टमंडळाने निदर्शनास आणून दिले.