शहरं
Join us  
Trending Stories
1
मोठी बातमी! हिंदी भाषेच्या सक्तीविरोधात ठाकरे बंधू एकत्र येणार, मुंबईत एकच मोर्चा काढणार, संजय राऊत यांची घोषणा
2
Harjit Kaur: दुचाकीवरून आले अन् धाडधाड गोळ्या झाडल्या, कुख्यात गुन्हेगाराच्या आईची भररस्त्यात हत्या
3
ट्रेनच्या तिकिटांपासून ते ATM मधून पैसे काढण्यापर्यंत; १ जुलैपासून बदलणार तुमच्या पैशांशी निगडित 'हे' ६ नियम
4
पुण्यातील महिलेला ५ कोटींची पोटगी मिळालेली; NRI च्या भानगडीत पडली आणि...
5
Prada :"नियमबाह्य नक्कल करणाऱ्या कंपन्यांना सरकारनेही...", प्राडा कंपनीविरोधात संभाजीराजेंची पोस्ट
6
...तर दिल्ली-मुंबई टोल केवळ ३० रुपये लागेल; वार्षिक पास खरेदी करून २०० टोल ओलांडता येणार
7
बोगस लाभार्थी हटवले; केंद्राने ३ लाख कोटी रुपये वाचविले, ३१४ केंद्रीय योजनांची छाननी सुरू
8
रशिया भारताला आणखी S-400 क्षेपणास्त्रे कधी देणार? मोठी अपडेट आली समोर; कारणही सांगितले
9
शुभांशू ठरले अंतराळ स्थानकावर पाऊल ठेवणारे पहिले भारतीय; म्हणाले, 'लहान बाळासारख्या गोष्टी शिकतोय'
10
"जबरदस्ती करायचे, नको तिथे स्पर्श करायचे, केबिनमध्ये बोलावून...’’, बीडमध्ये  शिक्षकांकडूनच विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण
11
'बँकांनो, व्याज घटवा, कर्जे स्वस्त करा'; घर, वाहन घेणाऱ्यांना मिळू शकतो लवकरच दिलासा
12
आजचे राशीभविष्य- २७ जून २०२५, 'या' राशींसाठी आजचा दिवस ठरणार खास!
13
Shaktipeeth Expressway: ...हा तर आर्थिक संकटाचा महामार्ग;  वित्त विभागाचा कर्जवाढीचा इशारा
14
मुंबईतले सर्वधर्मीय १५०० भोंगे उतरवले, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या मोहिमेला यश
15
पुन्हा एकदा निळ्या ड्रममध्ये सापडला मृतदेह, दोरीने बांधलेले होते पाय आणि गळा
16
...तर शेतकरी जातील काळ्या यादीत अन् पाच वर्षे मिळणार नाही कोणत्याच योजनेचा लाभ
17
विशेष लेख: एकनाथ शिंदे आणि अजित पवारांचे जमत का नाही?
18
जगभर: चीनमध्ये ५ मिनिटांच्या मिठीसाठी ६०० रुपये, ‘मॅन मम्स’ प्रकरण काय?
19
अग्रलेख: आता शक्तिपीठाचा मनोरा... राज्याला ते परवडणार आहे का?
20
नवी मुंबई: जेएनपीए बंदरात पाकिस्तानचे ३९ कंटेनर जप्त, ‘डीआरआय’ची धडक कारवाई; नऊ कोटींचा माल हस्तगत

दस साल बाद... परप्रांतीय पक्षांची साद

By admin | Updated: January 20, 2017 01:11 IST

वेध महापालिकेचे : स्वबळावर लढण्याची भाषा

कोल्हापूर : कसबा बीडशेड (ता. करवीर) येथे चार महिन्यांपूर्वी झालेल्या ‘कोर्स आॅन कॉम्प्युटर कन्स्पेट (सीसीसी)’ परीक्षेत गैरप्रकार झाल्याची तक्रार वडणगे (ता. करवीर) येथील अमर पाटील या युवकाने केली. याबाबत पोलिस प्रशासन, राष्ट्रीय इलेक्ट्रॉनिक्स एवं सूचना प्रौद्योगिकी (नायलिट) यांच्याकडे आवश्यक ते पुरावे सादर करूनही न्याय मिळाला नसल्याची व्यथा पाटील याने ‘लोकमत हेल्पलाईन’कडे बुधवारी मांडली.याबाबत अमर पाटील याने सांगितले की, एमएससीआयटी अभ्यासक्रमाप्रमाणे केंद्र सरकार हे सीसीसी परीक्षा घेते. कसबा बीडशेड येथील एका शाळेत दि. ४ सप्टेंबर २०१६ रोजी परीक्षा घेण्यात आली. दुपारच्या सत्रातील या परीक्षेसाठी २० परीक्षार्थी होते. यामध्ये महिलांचा समावेश होता. परीक्षा कक्षामध्ये पेपर सोडविण्यासाठी काही विद्यार्थ्यांसह त्यांचे शिक्षकही उपस्थित होते. त्यांनी महिला परीक्षार्थ्यांमध्ये बसण्याचे असभ्य वर्तन केले. हे शिक्षक आपल्या विद्यार्थ्यांना उत्तरे सांगत असल्याचे, काही विद्यार्थ्यांचे पेपर सोडवीत असल्याचे छायाचित्रीकरणात दिसून आले आहे. असे प्रकार गेल्या कित्येक वर्षांपासून सुरू आहेत. त्यामुळे अनेक गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ते लक्षात घेऊन कसबा बीडशेडमधील या परीक्षेतील गैरप्रकारांची तक्रार दि. ९ सप्टेंबर २०१६ रोजी विशेष पोलिस महानिरीक्षक, जिल्हा पोलिस अधीक्षक आणि करवीर पोलिस ठाणे यांच्याकडे लेखी स्वरूपात केली. त्यासह ‘नायलिट’च्या दिल्ली व औरंगाबाद कार्यालयांना संबंधित गैरप्रकारांची माहिती लेखी स्वरूपात व व्हिडीओ फुटेजसह दि. १३ सप्टेंबरला ई-मेलद्वारे पाठविली. येथील अधिकाऱ्यांशी दूरध्वनीवरून संपर्क साधला. मात्र, त्यांनी योग्य प्रतिसाद दिला नाही. या दरम्यान करवीर पोलिस ठाण्याने माझ्यासह ज्यांच्याविरोधात मी तक्रार केली होती, त्यांचे जबाब घेतले. मी तक्रारदार असूनदेखील माझा सुमारे २० वेळा जबाब घेतला आहे. यानंतर चौकशीअंती माझा तक्रार अर्ज निकालात काढला असल्याचे पत्र पोलिसांनी मला दि. १७ जानेवारी २०१७ रोजी दिले आहे. आवश्यक ते पुरावे सादर करूनही न्याय मिळविण्यासाठी झगडावे लागणे हे दुर्दैवी आहे. (प्रतिनिधी)न्यायालयात दाद मागणार : पाटीलपरीक्षेमधील गैरप्रकारांमुळे सीसीसी अभ्यासक्रमाचे नाव खराब होत असून, गुणवंत विद्यार्थ्यांचे नुकसान होत आहे. ते रोखण्यासाठी कसबा बीडशेडमधील गैरप्रकारांबाबत तक्रार करून न्यायासाठी लढत असल्याचे अमर पाटील याने सांगितले. करवीर पोलिस ठाणे ते मुंबई पोलिस आयुक्त आणि ‘नायलिट’कडे वास्तव मांडूनही न्याय मिळाला नाही; त्यामुळे आता या प्रकरणी न्यायालयात दाद मागणार आहे.