शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
5
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
6
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
7
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
8
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
9
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
10
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
11
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
12
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
13
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
14
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
15
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
16
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
17
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
18
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
19
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश
20
'परदेशात जाऊन भारताचा अपमान केला तर...', राहुल गांधीवर भाजपचा थेट पलटवार

ऊस उत्पादनात एकरी दहा टनांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:31 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम वेळेत सुरू झाला असला, ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम वेळेत सुरू झाला असला, तरी उसाच्या उत्पादनात झालेल्या घटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकरी दहा टनांचे उत्पादन कमी झाले असून, राज्याच्या उत्पादनातही यंदा ५० लाख टनांची घट होईल, असे चित्र आहे.उसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाल्याने यंदा उसाचे क्षेत्र सगळीकडेच वाढले होते. त्यामुळे यंदा राज्यात उसाचे जास्त पीक होऊन अतिरिक्त साखर होईल, असाच तज्ज्ञांचा अंदाज होता; पण जून ते आॅगस्ट या कालावधीत झालेल्या एकसारख्या पावसाने उसाची वाढ खुंटली. सप्टेंबर महिन्यात पावसाने एकदमच दडी मारल्याने पाण्याअभावी ऊस करपू लागले आणि किडीला पोषक असेच वातावरण राहिल्याने करप्याने ऊस खाली बसविला. परिणामी उत्पादन घटणार हे निश्चित होते; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यात घट होईल, याचा अंदाज नव्हता.ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन १0 दिवस झाले. सगळ्याच कारखान्यांची तोडणी यंत्रणा गतिमान झाली असून, सुरुवातीला आडसाल लावणीची तोड प्राधान्याने सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास आडसाल लावणीच्या उसाला सरासरी एकरी ६० टनांचा उतारा पडणे अपेक्षित आहे; मात्र यंदा त्यामध्ये १0 टनांची घट झाल्याचे चित्र आहे. सध्या एकरी ४५ ते ५० टनांपर्यंतच उतारा मिळत असल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखानदारांची चिंता वाढलीआहे. गेल्यावर्षी राज्यात सुमारे ९४० लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर विभागात थोडा फटका बसेल; पण उर्वरित राज्यात दुष्काळाचा मोठा फटका बसणार आहे; त्यामुळे राज्याचे एकूण उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत किमान ५० लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज आहे.आतापर्यंत राज्यातील १३० हून अधिक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यांचे १६ नोव्हेंबरपर्यंत ८२ लाख ४० हजार टन गाळप होऊन ७४ लाख ९६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.१० टक्के आहे.गाळप व उताºयात ‘पुणे’ पुढेराज्याच्या एकूण गाळपाचे चित्र पाहिले, तर पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. या विभागातील ४९ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ४२.९३ लाख टनांचे गाळप करीत ९.२८ टक्के साखर उतारा राखला आहे.