शहरं
Join us  
Trending Stories
1
ऑपरेशन सिंदूर: शरद पवारांनी केला पंतप्रधान नरेंद्र मोदींना फोन; म्हणाले, “या कठीण काळात...”
2
भारताच्या कारवाईने पाकिस्तानचा तीळपापड, शाहबाज शरीफ बैठका घेत सुटले; म्हणाले, 'आम्हीही उत्तर..."
3
हाफिज सईद, मसूद अझहर, सय्यद सलाउद्दीन..., भारताच्या एअर स्ट्राईकमध्ये दहशतवाद्यांच्या म्होरक्यांचं झालं एवढं नुकसान
4
'सैन्याच्या शौर्याला सलाम, आम्ही सरकारसोबत उभे आहोत'; 'ऑपरेशन सिंदूर'वर काँग्रेसची पहिली प्रतिक्रिया
5
लादेन पुरवायचा निधी, कसाब-हेडलीने घेतलेले प्रशिक्षण..; भारताने 'ते' मरकज केले जमीनदोस्त
6
Operation Sindoor : "मुलाच्या मृत्यूचा बदला घेतला"; पर्यटकांसाठी जीव धोक्यात घातलेल्या आदिलच्या वडिलांची प्रतिक्रिया
7
'ऑपरेशन सिंदूर'मुळे IPL 2025 स्पर्धेच्या नियोजनात काय बदल होणार? BCCI ने दिलं उत्तर
8
operation sindoor video: जिथे रचले गेले, भारतात रक्ताचा सडा पाडणारे कट; ती ठिकाणं अशी उडवली, बघा व्हिडीओ
9
Naxal news: दहशतवाद्यांपाठोपाठ नक्षल्यांवरही 'वार'; तेलंगणाच्या सीमेवर २२ नक्षलवादी ठार
10
Operation Sindoor Live Updates: ऑपरेशन सिंदूरचं जे लक्ष्य होतं ते साध्य केलं - राजनाथ सिंह
11
भारत आणि पाकिस्तानमध्ये कोणत्या वस्तूंचा व्यापार होतो? किती आहे टॅरिफ?
12
तणाव वाढवायचा नाही, पण...; अजित डोवाल यांची अमेरिका,ब्रिटन आणि सौदीसह अनेक देशांशी चर्चा!
13
"भारतीय सैन्याने पाकिस्तानच्या दहशतवादी तळांवर केलेला हल्ला अभिमानास्पद, आता...", उद्धव ठाकरे यांची प्रतिक्रिया
14
Operation Sindoor : "आता पाकिस्तानला वेदनांची जाणीव झाली असेल, ऑपरेशन सिंदूरचा संपूर्ण देशाला अभिमान"
15
Operation Sindoor:'आम्ही झोपलेलो होतो अन् मोठा स्फोट झाला, असं वाटलं सूर्य उगवला'; मध्यरात्री पाकिस्तानात काय घडलं?
16
भारताच्या 'ऑपरेशन सिंदूर'मुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण! पंजाबच्या CM मरियम नवाज यांनी आणीबाणी जाहीर केली
17
'ऑपरेशन सिंदूर'वर सिनेमा बनवा! नेटकऱ्यांची बॉलिवूडकडे मागणी, सुचवलं 'या' अभिनेत्याचं नाव
18
पोलिसाच्या वर्दीत पाहून लेकाची काय होती प्रतिक्रिया? अंकुश चौधरी म्हणाला, "त्याने भलतीच मागणी..."
19
Operation Sindoor: 'ऑपरेशन सिंदूर'नंतर बांगलादेशच्या मनात भिती; खेळाडूंच्या सुरक्षेबाबत उपस्थित केले प्रश्न
20
वर्धा: विवाहित महिला आणि पुरुषाचे प्रेमसंबंध, शेतातील विहिरीत सापडले दोघांचे मृतदेह

ऊस उत्पादनात एकरी दहा टनांचा फटका

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 20, 2018 00:31 IST

राजाराम लोंढे । लोकमत न्यूज नेटवर्क कोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम वेळेत सुरू झाला असला, ...

राजाराम लोंढे ।लोकमत न्यूज नेटवर्ककोल्हापूर : ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम वेळेत सुरू झाला असला, तरी उसाच्या उत्पादनात झालेल्या घटीमुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. कोल्हापूर जिल्ह्यात एकरी दहा टनांचे उत्पादन कमी झाले असून, राज्याच्या उत्पादनातही यंदा ५० लाख टनांची घट होईल, असे चित्र आहे.उसाच्या एफआरपीमध्ये वाढ झाल्याने यंदा उसाचे क्षेत्र सगळीकडेच वाढले होते. त्यामुळे यंदा राज्यात उसाचे जास्त पीक होऊन अतिरिक्त साखर होईल, असाच तज्ज्ञांचा अंदाज होता; पण जून ते आॅगस्ट या कालावधीत झालेल्या एकसारख्या पावसाने उसाची वाढ खुंटली. सप्टेंबर महिन्यात पावसाने एकदमच दडी मारल्याने पाण्याअभावी ऊस करपू लागले आणि किडीला पोषक असेच वातावरण राहिल्याने करप्याने ऊस खाली बसविला. परिणामी उत्पादन घटणार हे निश्चित होते; मात्र एवढ्या मोठ्या प्रमाणात त्यात घट होईल, याचा अंदाज नव्हता.ऊस दराची कोंडी फुटून साखर कारखान्यांचा हंगाम सुरू होऊन १0 दिवस झाले. सगळ्याच कारखान्यांची तोडणी यंत्रणा गतिमान झाली असून, सुरुवातीला आडसाल लावणीची तोड प्राधान्याने सुरू आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा विचार केल्यास आडसाल लावणीच्या उसाला सरासरी एकरी ६० टनांचा उतारा पडणे अपेक्षित आहे; मात्र यंदा त्यामध्ये १0 टनांची घट झाल्याचे चित्र आहे. सध्या एकरी ४५ ते ५० टनांपर्यंतच उतारा मिळत असल्याने शेतकऱ्यांबरोबरच साखर कारखानदारांची चिंता वाढलीआहे. गेल्यावर्षी राज्यात सुमारे ९४० लाख टन उसाचे गाळप झाले होते. त्यामध्ये मोठ्या प्रमाणात घट होण्याची शक्यता आहे. कोल्हापूर विभागात थोडा फटका बसेल; पण उर्वरित राज्यात दुष्काळाचा मोठा फटका बसणार आहे; त्यामुळे राज्याचे एकूण उत्पादन गतवर्षीच्या तुलनेत किमान ५० लाख टनांनी कमी होईल, असा अंदाज आहे.आतापर्यंत राज्यातील १३० हून अधिक साखर कारखान्यांचे गळीत हंगाम सुरू झाले आहेत. त्यांचे १६ नोव्हेंबरपर्यंत ८२ लाख ४० हजार टन गाळप होऊन ७४ लाख ९६ हजार क्विंटल साखरेचे उत्पादन झाले आहे. राज्याचा सरासरी साखर उतारा ९.१० टक्के आहे.गाळप व उताºयात ‘पुणे’ पुढेराज्याच्या एकूण गाळपाचे चित्र पाहिले, तर पुणे विभागाने आघाडी घेतली आहे. या विभागातील ४९ खासगी व सहकारी साखर कारखान्यांनी ४२.९३ लाख टनांचे गाळप करीत ९.२८ टक्के साखर उतारा राखला आहे.